मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फलटण येथे भारतीय पत्रकार संघाकडून परिसंवाद सोहळ्याचे आयोजन

वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण येथे येत्या २ नोव्हेंबर रोजी भारतीय पत्रकार संघ सातारा विभागाकडून परिसंवाद तसेच पदग्रहण व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव यांनी दिली. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांसह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांसह संजीवराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बाळासाहेब सोळसकर शिरुपराजे खरडेकर शिवसेनेचे चंद्रकांत जाधव आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड युवा उद्योजक सचिनजी यादव अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रसाद जोशी डॉ.सचिन बेडके सत्कार मूर्ती जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत . यावेळी फलटणच्या मारवाड पेठेतील नवलबाई मंगल कार्यालयात २ नोव्हेंबर रोजी साय.४ च्या दरम्यान पत्रकार संघाच्या विविध कार्यक्रमांना सुरवात केली जाणार असून सर्वप्रथम परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन युवा उद्योज...

वडापुरी -माळवाडी गटात, गणात आयात उमेदवाराला दाखवणार आस्मान,

स्थानिक गट व गणातील ग्रामस्थांचा आयात उमेदवाराला प्रचंड विरोध. इंदापूर तालुक्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत असुन. तालुक्यातील पुढाऱ्यांनी स्वताच्या बगलबच्यांच्या कल्याणासाठी  गण व गट निर्माण केले. असले तरी गण व गटातील आरक्षणा मुळे पेच निर्माण झाला आहे. अशी चर्चा सुरू झाली आहे. आणि त्यातून आपल्या गण व गटात संधी मिळत नाही. म्हणून दुसऱ्याच्या गण आणी गटात उभारायचे, गाव पुढाऱ्यांचा मनसुबा आहे. आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा डाव आहे. पण गण व गटातील नागरिकांचा प्रचंड विरोध असुन, आपल्या गण गटात आपली सोय करावी. आम्ही दुसऱ्यांच्या सतरंज्या उचलायला कुणाचे बांधिल नाही. अशी लोकांत चर्चा आहे. नेमका कुठला पक्ष आयात उमेदवार देतोय, त्या पक्षाला जबर किंमत मोजावी लागणार.अन्यथा आम्ही विरोधी गटाला आतुन मदत करू, आयात उमेदवारांची चांगलीच जिरवू असा लोकांन मध्ये सुर आहे.त्यामुळे मोठ मोठ्या पुढाऱ्यांनी पंचायत होणार आहे. खोबरे तिकडे चांगभले म्हणणार्‍यांची  काय अवस्था होईल. हा येणारा काळच ठरवेल.त्यामुळे तालुक्यातील नेतृत्व...

सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई माने -कोळेकर घरोघरी जाऊन भावांचे औक्षणकरून दिली मिठाई भेट.

इंदापूर:  भाऊबीज हा रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून.  प्रेम आणि विश्वासाचा सन आहे. ज्यांना बहिण किंवा भाऊ नाही. तेही हा सण उत्साहात साजरा करू शकतात.  दिवाळीतील महत्वाचा आणि भाऊ, बहिणीच्या अतुट नात्याचा सण म्हणून भाऊबीजे कडे पाहीले जाते. बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्या साठी.  सुखासाठी प्रार्थना करते. तर भाऊ बहीणीला भेट वस्तू देऊन तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. जवळच्या किंवा शेजारच्या व्यक्तीला भाऊ भाऊ मानून त्याला टिळा लावून.  औक्षण केले जाते. त्यामुळे मैत्रीचे नाते अधिक दृढ होते. धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या भाऊबीज हा केवळ रक्ताच्या नात्या पुरता मर्यादित नसून. प्रेम विश्वास आणि संरक्षणाच्या भावनेतून जोडल्या गेलेल्या पवित्र नात्याचा उत्सव आहे. असे सरपंच सुप्रियाताई माने -कोळेकर म्हणाल्या.

स्व.मंगेशबाबा पाटील प्रतिष्ठान व पतंजली योग समिती च्या संयुक्त विद्यमाने संगीतमय दिवाळी पहाट हा कार्यक्रम धुमधडाक्यात

 इंदापूर स्व.मंगेशबाबा पाटील प्रतिष्ठान व पतंजली योग समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर शहरांमध्ये संगीतमय दिवाळी पहाट हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक व दोन नगरपालिके शेजारी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी ओंकार साळुंखे बालगंधर्व पुरस्कार सन्मानित सर्व कलाकार स्वरवृंद ग्रुप यांनी सर्व कलाकारांनी पहाटेची भक्ती गीते भावगीते दिवाळी गीते या सुमधुर गीतांची मैफिल करत इंदापूरकरांची मने जिंकली या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते त्यावेळी त्यांनी माझे सहकारी स्व. मंगेश पाटील यांची आठवण आणि त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचे काम गेले चार वर्षे दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित करून शेखर पाटील हे या कार्यक्रमाचे आयोजन करतात त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले यापुढेही असेच कार्यक्रम जीवनामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा हा जपला पाहिजे असे उद्गगार यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी काढले या कार्यक्रमासाठी स्व.मंगेशबाबा पाटील प्रतिष्ठानचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे पतंजली परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते ...

भारतीय पत्रकार संघाने अनेकांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ  पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक  कार्यातही अग्रगण्य असणाऱ्या भारतीय पत्रकार संघाकडून यंदा गरीब कुटुंबातील सदस्यांना दिवाळीचा फराळ घरपोच देण्यात आल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटताना पहावयास मिळाल्या आहेत. यावेळी भारतीय पत्रकार संघाच्या बारामतीसह पुणे शहर विभागाकडून फराळ वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.या आनंददायी उपक्रमामुळे भारतीय पत्रकार संघाला समाजात मानाचे स्थान मिळाले असल्याची भावना पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष रमेश ( मामा ) गणगे पाटील यांनी व्यक्त केली.  भारतीय पत्रकार संघाकडून यापूर्वी आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, पूरग्रस्तांना मदत असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत .परंतु यावर्षी दीपावली निमित्त गरीब कुटुंबातील सदस्यांना फराळ वाटप करण्याचा निर्णय पुरंदर मधील निरा - शिवतक्रार ग्रामपंचायत कार्यालय येथे  नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला होता . या बैठकीत भारतीय पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बारामती तालुक्याचे नवनिर्वाचि...

समाजातील दुर्बल घटकांपर्यंत सणाचा आनंद पोहोचविणे हीच खरी दिवाळी - महारुद्र पाटील

इंदापूर, सणाच्या उत्साहात स्वतःच्या आनंदाबरोबर इतरांच्या चेहऱ्यावरही हसू उमटविण्याचा प्रयत्न करणं, हीच खरी दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. याच भावनेतून इंदापूर शहरातील श्रावण बाळ अनाथ आश्रम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अनाथ बालकांसाठी दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला. समाजातील वंचित घटकांपर्यंत सणाचा आनंद पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.आसे मत महारूद्र पाटील कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर यांनी व्यक्त केले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, शहराध्यक्ष ॲड. इनायातअली काझी, तालुका महिला अध्यक्षा छाया पडसळकर, तसेच राजीव करडे, गणेश देवकर, अमोल मुळे, समद सय्यद, आप्पासाहेब गायकवाड, विकास खिलारे, अक्षय कोकाटे, केशव भापकर, दादा थोरात, भारत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी मुलांना फराळ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला. बालकांच्या निरागस हास्याने वा...

वडापुरी गणात आणखी एका इच्छुकाने थोपटले दंड.

इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे आरक्षणही स्पष्ट झाले असून संभाव्य उमेदवार मतदार संघ आपल्याच वाट्याला या अपेक्षेने मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.  भारतीय जनता पार्टीचे प्रविण भैय्या माने यांचे खंदे समर्थक इंदापूर तालुका बाजार समितीचे माजी संचालक सरडेवाडी येथील राजाराम सागर यांनी थोपटले दंड आयात उमेदवारा विरोधात शंभर टक्के लढणारच. कार्यकर्ते, मित्र परिवार, मतदार बंधु भगिनी व आमचे नेते प्रविण भैय्या माने यांच्या पाठबळावर नक्कीच विजयश्री खेचून आणू असे राजाराम सागर म्हणाले.विविध गावात जलजीवन योजनाही अपूर्ण अवस्थेत असल्याने पाण्यासाठीही नागरिकांना धावाधाव करावी लागते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही. यावर कोणताही पक्ष आक्रमक भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.पण माळवाडी वडापुरी गटातून राजाराम सागर यांच्या नावाला जनतेतून पंसती दर्शविली जात आहे,

ग्रामीण संस्थेचे कार्य कौतुकास्पद -भालेराव

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ  एकीकडे दिवाळी साजरी होत असताना पुरंदर हवेलीतील मुस्लिम समाजासह इतर समाजातील निराधार तसेच गरीब व गरजू कुटूंबातील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा , त्यांचीही दिवाळी गोड व्हावी याउद्देशाने गेली १८ वर्षांपासून वंचित घटकांना फराळ वाटप करणाऱ्या ग्रामीण संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत जेष्ठ विधितज्ञ विजय भालेराव यांनी व्यक्त केले. वाल्हे (ता. पुरंदर ) येथील मुस्लिम बांधवांना माजी आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण संस्थेच्या वतीने दीपावलीनिमित्त फराळाचे वाटप विजय भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भालेराव पुढे म्हणाले, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी संजय जगताप यांनी परंपरेनुसार पुरंदर हवेलीतील मुस्लिम समाजासह कुंभारवळण येथील सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदनात तसेच दुःखद घटना घडलेल्या आणि इतर गरीब कुटुंबापर्यंत दिवाळीचा फराळ पोहोचवविण्याचे काम सुरू केल्याने जवळपास साडेतीन हजार कुटुंबाची दिवाळी गोड होणार आहे.तर संस्थेचे सदस्य मोहन शिंदे यांसह मोबीन बागवान यां...

सुकलवाडीत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

वाल्हे प्रतिनिधी -सिकंदर नदाफ विकास कामांच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असलेल्या पुरंदर तालुक्यातील सुकलवाडीत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली भोसले तसेच रणगडे परिवाराच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला माजी जिल्हाधिकारी शिवलिंग गणपत भोसले यांच्या स्मरणार्थ भोसले परिवाराच्या वतीने १५ गुंठे जागा बक्षिसपत्र स्वरूपात देण्यात आली होती. त्या जागेवर नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन प्रताप भोसले कमल भोसले सुवर्णा राणगडे निखिल राणगडे आदींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक जितेंद्र निगडे यांसह विराज काकडे वामनराव जगताप माजी सरपंच दत्तात्रय पवार तसेच मोहन पवार सुनील पवार अमोल खवले महादेव चव्हाण सतीश सूर्यवंशी मोहन जगताप संतोष निगडे नितीन गावडे रणसिंग पवार अमित पवार उर्मिला पवार वैजंता दाते अश्विनी चव्हाण तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र चिकणी यांसह साईनाथ चव्हाण संध्या पवार आदी मान्यवर उपस्थित ह...

हर्षवर्धन पाटील यांचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद दौरा

इंदापूर : प्रतिनिधी दि.20/10/25                               राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कंदर (ता. करमाळा) व शिराळा (ता. माढा) येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद दौरा रविवारी (दि.19) संपन्न झाला. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.            निरा भिमा कारखान्याचा आगामी सन 2025-26 चा गळीत हंगाम 25 वा म्हणजे रौप्यमहोत्सवी गळीत हंगाम आहे. या गळीत हंगामासाठी कारखान्याची दररोज 6500 मे. टन ऊस तोडणी वाहतूकीची यंत्रणा सज्ज झाली आहे. सहकारी संस्थाचा शेतकऱ्यांना नेहमीच आधार वाटला आहे. त्यामुळे सहकारी कारखानदारी महत्वाची आहे. तसेच शेतकऱ्यांना इतर पिकांच्या तुलनेत ऊस पीक शाश्वत वाटत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.         नीरा भीमा कारखान्याने गेली 25 वर्षांचा इतिहास काढून पहा नेहमीच चांगला दर दिलेला आहे. दराच्या बाबतीत क...

सरडेवाडी गाव दिपावलीच्या पुर्व संध्येला निघाले उजळून.

 इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गाव दिपावलीच्या पुर्व संध्येला निघाले उजळून,सरडेवाडी गावच्या सरपंच सुप्रियाताई माने - कोळेकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक वैभव जाधवर यांच्या पुढाकाराने सरडेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाडी वस्ती वर प्लड लाईट बसवण्यात आले. त्यामुळे गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.गावातील तळागाळातील लोकांपर्यंत प्रत्येक योजना. पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहील.  असे सरपंच सुप्रियाताई माने -कोळेकर यांनी सांगितले. सर्व ग्रामस्थ माता भगिनी यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

या स्वार्थी दुनियेत अजुनही माणुसकी जिवंत.हरवलेले पैसे, परत..!

 इंदापूर:- हरवलेले पैसे, मोबाईल,सोने, बँग, कागदपत्रे, शक्यतो परत मिळत नाहीत.पण ते परत मिळाले तर माणुसकीचे एक उत्तम उदाहरण आहे व या जगात अजुनही प्रमाणिक लोक आहेत.अशीच एक घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्यांचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख  यांच्या मौजे बाभळगाव ता. जि. लातूर येथे दिनांक.16 / 10 /2025 रोजी दुपारी 2. वाजता प्रथमेश टि हाऊस चे मालक श्री शैलेश (शालिक) नाडागुडे हे घराकडे जात असताना त्यांना त्यांच्या समोर रोडवर एक पाकीट दिसले व त्यामध्ये पाहिलं असता रोख रक्कम 5000/-हजार रुपये व एक व्यक्ती,एक महिला,दोन लहान मुलांचे मुळ आधार कार्ड, आभा कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स व इतर ओरिजनल कागदपत्रे असलेले पाकिट त्यांना सापडले.त्या मध्ये कोणाचाही मोबाईल नंबर नसल्याने कोणालाही फोन पण लावता येत नव्हता. व आधार कार्ड वरील पत्ता पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील असल्यामुळे काही संपर्क साधता येत नव्हता त्यामुळे बराच वेळ त्या ठिकाणी थांबले मागे किंवा पुढे कोणी गेले असेल त्याचे असावे परत कोणीतरी येईल असं त्यांना वाटले.बराच वेळ वाट पाहूनही कोण...

सरडेवाडीत वंदन फर्निचर शोरुमचे भव्य ग्रेड ओपनिंग,

इंदापूर सरडेवाडी टोल नाका शेजारी अथर्व लॉन्स येथे वंदन फर्निचर शोरुमचे भव्य ग्रेड ओपनिंग निमित्त लाडक्या वहिनींन साठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सिनेअभिनेते राहुल पद्मीनी नवनाथ राजे हे सादर करणार आहेत.  वार शनिवार १८/१०/२०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता.  ३ पैठणी २ सोन्याची नथ व सोफा बुकिंग वर भरघोस सवलत तसेच, इतर भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. कार्यक्रम संपल्या नंतर आलेल्या पाहुण्यांन साठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. असे वंदन फर्निचर शोरुमचे मालक सचिन उत्तेकर बांदल पाटील यांनी सांगितले.

सुकलवाडीत विद्यार्थ्यांकडून ग्राम सर्व्हेक्षण

वाल्हे प्रतिनिधी-सिकंदर नदाफ हडपसर येथील आण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सुकलवाडी (ता.पुरंदर ) येथे एक दिवशीय ग्राम सर्वेक्षण शिबिर राबविण्यात आले. या शिबिराचा शुभारंभ विद्यालयाचे प्राचार्य नितीन घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये मराठवाडा येथील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण गावामध्ये प्रभातफेरी काढत पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी निधी संकलन करण्यात आला. तसेच गावच्या शेतातील माती परीक्षण तसेच ग्रामस्थांसह शेतकऱ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांनी शेतीविषयी माहिती देखील घेतली.तसेच येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले . यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव एल.एम.पवार डॉ.संगीता साळवे डॉ.विलासजी आढाव सविता कुलकर्णी  प्रा.ऋषिकेश मोरे प्रा.नरसिंह पावडे, प्रा.अपूर्वा बनकर सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार उपसरपंच नितीन गावडे यांसह धनंजय पवार राहुल यादव साईनाथ चव्हाण ह.भ.प.माणिक महाराज पवार  नारायण पवार मनोज घाटे अरुण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

दोन घराणे जोडताना जपला सामाजिक कार्याचा वारसा

इंदापूर:- प्रा भास्कर गटकुळ(इंदापूर) यांचे सुपुत्र चि पृथ्वीराज आणि कमलाकर गायकवाड पाटील (उमरगा) यांची कन्या अनघा गायकवाड पाटील यांचे लग्न जमविताना  सुपारीच्या झाडाचे रोप भेट देऊन सुपारी फोडण्याचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी श्री व्यंकटराव गायकवाड पाटील,सेवानिवृत मुख्य सचिव,जलसंपदा महाराष्ट्र राज्य,भाजपचे माजी खासदार,प्रा. रवींद्र गायकवाड पाटील, प्रा विलासराव कदम,शिवाजीराव पाटील,अँड मनोहर चौधरी, अरविंदतात्या वाघ, डॉ महेश जगताप, सूर्यकांत भोरे, अंकुश पाडुळे,ॲड. जालिंदर बसाळे, नितीन पटेल,शिवाजी कापसे,यशवंत शितोळे, सीताराम जाधव, प्रा रविराज थोरात, अश्विनी थोरात, पंडित नलवडे, युवाउदयोजक अभिजित चव्हाण, पुणे रोटरी क्लब अध्यक्ष गोविंद जगदाळे, प्रा चंद्रशेखर लावंड मान्यवर उपस्थित होते.  सुपारी फोडण्याचा कार्यक्रम हा वधू आणि वर यांच्या दोन घराण्याचा नाते जोडणारा कार्यक्रम असून दोन घराण्यातील नात्याची ओळख आणि प्रेम वृद्धींगत होते अशा कार्यक्रमात प्रा. भास्कर गटकुळ आणि प्रा.जयश्री गटकुळ यांनी सर्व नातेवाईकांना पर्यावरण जागृतीसाठी सुपारी झाडाची रोप भेट म्हण...

*हडपसर, पिंपरीनंतर खडवासलात अजितदादांचा जनसंवाद*

*पुणे, ११ ऑक्टोबर:* महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पुढाकारातून 'जनसंवाद' उपक्रमाचा खडकवासला टप्पा मोठ्या उत्साहात पार पडला. हडपसर आणि पिंपरीतील यशस्वी जनसंवादानंतर हा उपक्रम खडकवासल्यात राबवण्यात आला.    अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी राज्यातील मुसळधार पावसामुळे आणि पूरसदृष्य परिस्थितीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्या काळात अजितदादांनी शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य दिले. पिकांच्या नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे आणि पुनर्वसनाचा आढावा घेणे, यावर अजितदादांनी लक्ष केंद्रीत केले.    या जनसंवादात नागरिक, विविध शासकीय विभाग आणि नेतेमंडळी एकाच व्यासपीठावर आले. व्हॉट्सअॅप चॅटबॉट्स, डिजिटल किऑस्क, हेल्पलाइन नंबर अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून तक्रारी नोंदविण्यात, पारदर्शकता ठेवण्यात आणि जबाबदारी ठरवण्यात भर देण्यात आला.    पिंपरीतल्या जनसंवादात तब्बल २५ हून अधिक शासकीय विभाग सहभागी झाले होते. नागरिकांच्या सुमारे ३,६०० तक्रारी नोंदविण्य...

कायदे सर्वांनाच सारखे ! कल्याण RTO च्या गाडीचा इन्शुरन्स 3महीने आधी संपला मग यांना फाईन का नाही ?

मुंबई प्रतीनीधी : (सतिश पाटील) कल्याण मध्ये एका तरुणाने आरटीओ अधिकाऱ्यांची गाडी थांबवून जाब विचारला हा प्रत्येकाला भारतीय संविधानीक अधिकार आहे?कायदे सर्वांनाच सारखे आहेत का वर्गवारीनुसार आहेत.हा  "सरकारचा अजब गजब कारभार " हातावर पोट भरणार्‍यां कडून भरमसाठ दंड वसूल करण्यात येतो.10/15 ₹ मेमो दिला जातो दिवसभरात 500₹ कमाई होते त्यात बॅंकेचे हप्ते मेंटेनन्स, ऑईल,फ्युल असे बरेच काही खर्च आहेत.मग पोट भरणार का दंड अथवा गाडी जमा करण्यात येते.ऐवढे मोठे दंड कायदेशीर आहेत का ?    राहुल पाटील कल्याण तालुका अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी आज कल्याण स्टेशन परि सरात परिवहन विभागाकडून RTO ची गाडी चेकिंग साठी आली असता त्या गाडीचे मी डॉक्युमेंट चेक केले त्यात त्यांचा जुलै महिन्यात इन्शुरन्स संपलेला आहे आणि मी पार्टी अधिकाऱ्यांना जॉब विचारला त्यांनाही जॉब विचारला त्यांनी मला उत्तर दिलं की आम्ही वर अर्ज दिलेला आहे हे आमच्या हातात नाही इन्शुरन्स काढणे वरच्या अधिकाऱ्यांच्या हातात आहे तरीही त्यांनी त्यांचे चूक मान्य केली नाही कायदा फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच आहे त्यांच्यासाठी कायद...

ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा हवी - मयूर भुजबळ

वाल्हे प्रतिनिधी-सिकंदर नदाफ  ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा महत्त्वाची असून त्यासाठी "उठा जागे व्हा ,आणि ध्येय गाठेपर्यंत प्रयत्न थांबू नका"; असा महत्वपूर्ण संदेश नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ यांनी शालेय विद्यार्थ्यांना दिला . वाल्हे (ता पुरंदर )येथील महर्षी वाल्मीकी विद्यालयात डॉ. निलेश शहा यांच्या संकल्पनेतून आदर्श सामाजिक फाउंडेशन ,नवदिशा फाउंडेशन व महर्षी वाल्मीकी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई येथील सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर सिद्राम भुजबळ यांच्यावर आधारित " मी कसा घडलो" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त मयूर भुजबळ हे बोलत होते.ते पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी सतत कार्यरत असले पाहिजे.ज्या गोष्टीमुळे ध्येय गाठण्यात अडचणी येतील अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत,विशेषतः सोशल मिडियाचा चुकीचा वापर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात टाळायलाच हवा,यामध्ये विनाकारण वेळ वाया घालवू नका,आपले छंद आवड जपा तसेच अभ्यासक्रमा...

पुण्यातील सर्व म्हणजे २८ जैन मंदिर विश्वस्त यांचा "आगाज २०२५" अंतर्गत सकल दिगंबर जैन समाज पुणे व पिंपरी चिंचवड तर्फे एच. एन. डी. जैन बोर्डिंग तसेच भगवान महावीर मंदिर वाचविण्यासाठी संघटित एल्गार, पुणे शहरात या कार्यक्रमाने घडविला इतिहास.

इंदापूर, डॉ. संदेश शहा. सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९ पुणे येथील एच. एन. डी. जैन बोर्डिंग तसेच बोर्डिंग मधील श्री. १००८ तीर्थंकर भगवान महावीर मंदिर हे दिगंबर जैन समाजातील पुणे येथे शिक्षणासाठी येणाऱ्या युवकांची अस्मिता असून ही समाजाची संपत्ती आहे. त्यामुळे बोर्डिंग व मंदिर वाचविण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करण्याचा ऐतिहासिक निर्णय श्री १०८ दिगंबर आचार्य गुप्तीनंदी महाराज व सहकारी साधूंच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. विशेष म्हणजे यासाठी पुणे शहरातील सर्व म्हणजे २८ दिगंबर जैन मंदिरच्या विश्वस्तांनी संघटित एकत्रित येऊन हजारो नागरिकांच्या उपस्थितीत निर्णय घेतल्याने इतिहास घडला. आगाज म्हणजे सुरुवात, शुभारंभ, मंगलाचरण होत आहे. या आरंभ साठी पुणे शहर व पिंपरी चिंचवड येथील २८ दिगंबर जैन मंदिर विश्वस्त यांनी एकत्र येऊन भगवान महावीर प्रतिपादीत जिनवाणी तसेच जगा व जगू द्या असा एकतेचा संदेश दिला. त्यामुळे हा दिवस दिगंबर जैन समाजामध्ये सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिला जाईल, असा आशीर्वाद आचार्य श्री १०८ गुप्तिनंदीजी महाराज यांनी दिला.  सकल दिगंबर जैन समाज पुणे व पिंपरी चिंचवड य...

*इंदापूर शहरात मुस्लिम को. ऑप. बँकेची शाखा सुरू करण्याची* *मागणी*

इंदापूर शहरात मुस्लिम को.ऑप.बँकेची स्थापना करण्यात यावी अशी मागणी पुणे जिल्हा *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री प्रदीप गारटकर* यांनी केली आहे  इंदापूर शहर हे झपाट्याने विकास करत असून या शहरात मुस्लिम समाजाला आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी मुस्लिम को ऑप. बँकेची शाखेची स्थापना करण्यात यावी इंदापूर शहरातील मुस्लिम समाज छोटे मोठे व्यवसाय करत असून त्यांची आर्थिक उलाढाल ही चांगल्या प्रमाणावर आहे जेणे करून बँकेलाही चांगला व्यवसाय मिळेल असेही त्यांनी सांगितले. बारामती येथे अल्ताफ हाजी हैदर भाई सय्यद एकता ग्रुप बारामती यांच्यावतीने बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री तनवीर पी ए इनामदार व उपाध्यक्ष ॲड. आयुब शेख यांचा सत्कार आमदार इद्रिस नायकवडी व जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप गारटकर यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी इंदापूर शहरातील मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता यावेळी मुस्लिम समाजातील नागरिकांची असलेली मागणी श्री. गारटकर यांनी बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळासमोर ठेवली या मागणीला त्यांनी तातडीने होकार देऊन शाखा सुरू करण्याचा तत्वतः निर्णय घेण्यात आल...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमधील भव्य आंतरशालेय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून 120 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग*.

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी संस्थेच्या उपाध्यक्षा माननीय डॉ.सौ.चित्रलेखा ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त JBVP चषक, भव्य आंतरशालेय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये पुणे,सोलापूर, सातारा, सांगली विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,  प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ.सौ.चित्रलेखा ढोले मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त JBVP चषक, भव्य आंतरशालेय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले होते  *ही स्पर्धा दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात आलेली आहे* *स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून या स्पर्धेद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांचे उज्वल भविष्य घडावे, आदर्श पिढी निर्माण व्हावी, उत्तम वक्ता हा शालेय जीवनापासूनच घडत असतो म्हणूनच या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.* * *स्पर...

शहा येथे अश्विन शुध्द द्वादशीला संत बाळु मामा यांचा १३४ वा जन्मोत्सव साजरा

 इंदापूर तालुक्यातील शहा येथे अश्विन शुध्द द्वादशीला संत बाळु मामा यांचा १३४ वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.सकाळी १०ते१२ ह.भ.प. लालचंद महाराज चोपडे यांचे किर्तन झाले.१२.१५ बाळु मामा देवस्थान शहा गावचे पुजारी वैजनाथ महाराज कोळी यांनी आरती केली. संत बाळु मामा एक संत होते. ज्यांनी संसारात राहून संत पद प्राप्त केले. त्यांना निस्सीम ईश्वर भक्त आणि संसारी संत म्हणून ओळखले जाते. नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. किर्तन व आरतीसाठी शेकडो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इथेनॉलचे आगामी हंगामासाठी 1050 कोटी लि.चे टेंडर - हर्षवर्धन पाटील

इथेनॉल भाववाढीची केंद्राकडे मागणी   इंदापूर : प्रतिनिधी दि.4/10/25                                 केंद्र सरकारने इथेनॉलचे आगामी हंगामासाठी 1050 कोटी लि.चे टेंडर काढले आहे. त्यामध्ये तब्बल 650 कोटी लि. इथेनॉल कोटा हा साखर उद्योगासाठी दिलेला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या मागणीनुसार मागील वर्षाच्या तुलनेत साखर उद्योगासाठी 8 टक्क्याने इथेनॉलचा कोटा चालू होणाऱ्या हंगामासाठी वाढविण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे व्यक्त केली.               केंद्र सरकारने आगामी काळामध्ये इथेनॉलचे भाव वाढवणे गरजेचे झाले आहे. इथेनॉलचे भाव वाढल्यात त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल. इथेनॉलच्या तसेच साखरेच्या एमएसपीच्या भाववाढीची मागणीही राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात आलेली आहे, या स...

पुरग्रस्तांसाठी पतंजली योग समिती व विविध संघटनांचा मदतीचा हात

  इंदापूर;- माढा तालुक्यातील दारफळ, बरडवस्ती, राहुलनगर, (सुलतानपूर)या गावांना सीना नदीला आलेल्या महापुरामुळे मोठा फटका बसला आहे. या पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी पतंजली योग समिती, राष्ट्र सेवा दल, इंदापूर नागरी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मदतीचे वाटप करण्यात आले. महापुरामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. अशा कठीण प्रसंगात शहरातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत जीवनावश्यक साहित्य गोळा केले. या माध्यमातून २५० किट्स वाटप करण्यात आले. यात ब्लँकेट, साड्या, कपडे यांसह विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचाही समावेश होता. या मदत कार्यात नागरी संघर्ष समितीचे प्रा. कृष्णा ताटे, बाळासाहेब क्षिरसागर, हामिद आतार; राष्ट्र सेवा दलाचे रमेश शिंदे, संदिपान कडवळे; पतंजली योग समितीचे अध्यक्ष मल्हारी गाडगे, रविंद्र परबत, अशोक अनपट, डॉ. रविंद्र काळे, प्रशांत गिड्डे, गणेश दरंगे, किसन पवार, देवराव मते, चंद्रकांत देवकर,ज्ञानेश्वर घोगरे, सायराभाभी आतार आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक बांधि...

पूरग्रस्तांचा दसरा गोड होण्यासाठी पतंजली कडून अनोखी भेट

 इंदापूर;- अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या मराठवाडा, सोलापूर या भागातील संगोबा,बोरगाव त्याचबरोबर देऊळगाव या ठिकाणच्या पूरग्रस्त कुटुंबियांसाठी त्यांचा दसरा दिवाळी गोड होण्यासाठी पतंजली योग परिवाराचे अध्यक्ष मा श्री दत्तात्रय अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली व परिवारातील सर्व पुरुष व महिला साधक यांच्या सहकार्यातून व स्वच्छेने देणगी एकत्रित करून जमा झालेल्या देणगी मधून त्यांच्यासाठी जीवनाशक वस्तूंचे किट, साड्या, ब्लॅंकेट, सतरंजी, युवांसाठी पँन्टी व इतर कपडे, शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके, कंपास, पेन व इतर साहित्य शेलेय मुलांसाठी तांदूळ  इत्यादी गोष्टींचा वितरण प्रत्यक्ष वस्ती/ गावामध्ये  जाऊन प्रत्येक कुटुंबाला करण्यात आले. खरंच तिथली परिस्थिती पाहिली तर खूप भयावह होऊन बसली आहे तरीसुद्धा माणुसकीच्या धर्म पाळून आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे पतंजली परिवार हा आरोग्याबरोबर सर्वांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभा राहत असतो, अशाप्रसंगी  सर्वच परिवारातील बंधू भगिनी नेहमीच सहकार्य करीत असतात. पूरग...

सरडेवाडी येथील सरडे वस्ती येथे रस्त्याचे उद्घाटन धुमधडाक्यात संपन्न

 इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील सरडे वस्ती येथे रस्त्याचे उद्घाटन सरडेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते समाज सेवक नानासाहेब सरडे यांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे नागरीसुविधा योजना अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण झाले. सरडेवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मोहन (बापू) सरडे, उद्योजक रघुनाथ (आण्णा) जमदाडे, यांच्या हस्ते फित कापून नागरिकांना रस्ता खुला करण्यात आला. उद्धाटन वेळी आकर्षक रांगोळी व फुलांची सजावट करण्यात आली होती.उद्धाटन वेळी मधुकर भाऊ जमदाडे, मोहन भाऊ जामदार, नानासाहेब सरडे (समाजसेवक) बाळासाहेब जाधव, ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच हनुमंत नाना जमदाडे ग्रामपंचायत सदस्य गोकुळ तात्या कोकरे,प्रल्हाद बापू सरडे, कुलदीप तोबरे, नामदेव तोबरे, संतोष दादा सरडे, महावीर आबा सरडे, बापूराव जमदाडे,विजय तोबरे, संदिप जमदाडे, मंगेश सरडे, दादासाहेब सरडे, अभिजित सरडे, सचिन सरडे, इंजिनीयर शहाजीराजे तोबरे, इंजिनीयर शुभम पिंपरे, आप्पासाहेब सरडे, आलेल्या सर्व पाहुणे व मित्र परिवार यांचा सन्मान करण्यात ...

रिजवान भाई सय्यद यांची भारतीय जनता पार्टी इंदापूर शहर मंडल कार्यकारिणी मध्ये इंदापूर सचिव पदी फेर निवड

इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते ज. रिजवान भाई सय्यद यांची भारतीय जनता पार्टी इंदापूर शहर मंडल कार्यकारिणी मध्ये इंदापूर सचिव पदी फेर निवड करण्यात आली. इंदापूर शहर अध्यक्ष किरण दादा गानबोटे यांनी निवडीचे पत्र दिले. मी माझ्या पदाचा उपयोग इंदापूर शहरातील पक्ष संघटना वाढीसाठी आणि सर्व सामान्य गोरगरीबांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील.असे रिजवान भाई यांनी सांगितले.

सरडेवाडी येथेल शिवनेरी नगर जाधव वस्ती येथे विठ्ठल महाडिक यांचे हस्ते आरती संपन्न

 इंदापूर:- तालुक्यातील सरडेवाडी येथेल शिवनेरी नगर जाधव वस्ती येथे दत्ता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक साहेब यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न झाली. त्या वेळी शिवनेरी नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्ष जब्बार भाई शेख, उप अध्यक्ष मारूती अनारसे,सरडेवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य हनुमंत जमदाडे,खजीनदार दादा राऊत, हुसेन भाई शेख गोरख जाधव, अनिल पवार, सचिन साळुंखे,रवि कोराळे, किशोर कडाळे,बाळासाहेब अंधारे, सुखदेव काळे,सुरज शिताफ, गणेश शिताफ, भाऊ शिंदे,शकुर भाई पठाण, गोकुळ अनारसे, खंडू काळे, नारायण साळुंखे, समाधान जाधव, प्रसन्न गायकवाड,शरद शिंदे, हरिदास शिद, उमेश कदम,मोहन शिद, नारायण शिद, पोपटराव पवार, किशोर चित्राव, गजानन जाधव, भजनी मंडळ,आराधी मंडळ, भाविक भक्त महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.