मुख्य सामग्रीवर वगळा

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमधील भव्य आंतरशालेय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून 120 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग*.

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,
 प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ.सौ.चित्रलेखा ढोले मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त JBVP चषक, भव्य आंतरशालेय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले होते
 *ही स्पर्धा दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात आलेली आहे*
*स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून या स्पर्धेद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांचे उज्वल भविष्य घडावे, आदर्श पिढी निर्माण व्हावी, उत्तम वक्ता हा शालेय जीवनापासूनच घडत असतो म्हणूनच या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.*
* *स्पर्धेची विभागणी तीन गटांमध्ये करण्यात आलेली होती* त्यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
*लहान गट* इयत्ता पहिली ते चौथी 

*प्रथम क्रमांक*-  भक्ती प्रवीण वाळुंजकर-प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी.*1001रू,JBVP चषक, प्रमाणपत्र*
*द्वितीय क्रमांक*-दूर्वा अमरदीप गवळी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुगाईवाडी सातारा *701रु JBVP चषक, प्रमाणपत्र* 
*तृतीय क्रमांक*-सार्थक दिलीपकुमार कुलकर्णी-अण्णासाहेब कल्याणी प्रायमरी स्कूल सातारा.*501रू JBVP चषक,प्रमाणपत्र*
*उत्तेजनार्थ क्रमांक* 1) देवांश लखन पाथरकर- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखेवाडी *301रु,प्रमाणपत्र*
*उत्तेजनार्थ क्रमांक* 2) काव्या नवनाथ माने-विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी *301रू, प्रमाणपत्र*


*मध्यम गट* इयत्ता पाचवी ते सातवी 
*प्रथम क्रमांक*-  साक्षी संजय जगताप-नवमहाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पणदरे.*3001रू,JBVP चषक, प्रमाणपत्र*
*द्वितीय क्रमांक*-  यशोधरा अमर चंदनशिवे- गुरुकुल विद्या मंदिर गोखळी. *2001रु, JBVP चषक, प्रमाणपत्र*
*तृतीय क्रमांक* - ज्योतिरादित्य गणेश जाधव देशमुख -प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी *1001रू JBVP चषक, प्रमाणपत्र*
*उत्तेजनार्थ क्रमांक*  -  शिवराज रामचंद्र राजगुडे- हनुमान हायस्कूल व जुनिअर कॉलेज तांदुळवाडी *501रू व प्रमाणपत्र*
*उत्तेजनार्थ क्रमांक*-  गाथा ज्ञानेश्वर मिले
*501रू व प्रमाणपत्र*

*मोठा गट* इयत्ता आठवी ते बारावी
*प्रथम क्रमांक*  ज्ञानेश्वरी सुशांत इंगवले- गुरुकुल विद्यामंदिर गोखळी *5001रु JBVP चषक, प्रमाणपत्र*
*द्वितीय क्रमांक*  संस्कृती संजय जगताप-नव महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पणदरे *3001रु , JBVP चषक व प्रमाणपत्र*
*तृतीय क्रमांक*  यशराज आप्पा हेगडे - यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा. *1001रू JBVP चषक व प्रमाणपत्र*
*उत्तेजनार्थ क्रमांक* 
1) ज्ञानेश्वरी ब्रह्मदेव खाडे -विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी 
*501रु प्रमाणपत्र उत्तेजनार्थ क्रमांक*
* 2) जागृती भीमराव राजगुडे-हनुमान हायस्कूल व जुनिअर कॉलेज तांदुळवाडी *501रु प्रमाणपत्र उत्तेजनार्थ क्रमांक*
* 3) तनिष्का दीपक गुळवे-प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी
*501रू व प्रमाणपत्र*
*उत्तेजनार्थ क्रमांक* 

वरील विद्यार्थ्यांना JBVP चषक,रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

वक्तृत्व स्पर्धेचे पारदर्शकपणे परीक्षण करण्यासाठी खालील प्रमाणे परीक्षक लाभले होते. 
विठ्ठल नामदेव साळुंखे,राहुल रोहिदास निर्मळ, शशिकांत श्रीपाद तेरखेडकर,  धनाजी तानाजी जगताप इत्यादी परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या  वक्तृत्वाचे पारदर्शकपणे परीक्षण केले , वक्त्याला योग्य तो न्याय दिला. वरील सर्व परीक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ, JBVP सन्मानचिन्ह, मानधन देऊन सन्मान करण्यात आला.
वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचे प्रास्ताविक विद्यानिकेतन कॉलेज चे प्राचार्य  गणेश पवार यांनी केले. 
बक्षीस वितरण प्रसंगी संस्थेचे  मुख्य सल्लागार प्रदीप गुरव यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना व पालकांना अनमोल असे मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की,विद्यार्थी दशेपासूनच वक्ता घडत असतो विद्यार्थ्यांच्या शारीरिक, विकासाबरोबर मानसिक, बौद्धिक विकास घडावा म्हणून म्हणूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या व सहभागी विद्यार्थ्यांना खचून न जाता अपयशला जिद्दीने सामोरे जावे असे सांगितले.
ज्यांच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले, त्या संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले  यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की, भाषणातून आपण  चांगले काय आहे हे शिकत असतो, 
*वाचाल तर वाचाल* चिंतन केले, चांगल्या वाचनाची गोडी निर्माण झाली तरच उत्तम वक्ता घडू शकतो असा मोलाचा सल्ला दिला.
सदर कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, सचिव  हर्षवर्धन खाडे, 
मुख्य सल्लागार  प्रदीप गुरव, विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य  गणेश पवार, इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सम्राट खेडकर, सहभागी स्पर्धक, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत गुरव यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते