मुख्य सामग्रीवर वगळा

इथेनॉलचे आगामी हंगामासाठी 1050 कोटी लि.चे टेंडर - हर्षवर्धन पाटील

इंदापूर : प्रतिनिधी दि.4/10/25
                                केंद्र सरकारने इथेनॉलचे आगामी हंगामासाठी 1050 कोटी लि.चे टेंडर काढले आहे. त्यामध्ये तब्बल 650 कोटी लि. इथेनॉल कोटा हा साखर उद्योगासाठी दिलेला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या मागणीनुसार मागील वर्षाच्या तुलनेत साखर उद्योगासाठी 8 टक्क्याने इथेनॉलचा कोटा चालू होणाऱ्या हंगामासाठी वाढविण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे व्यक्त केली.
              केंद्र सरकारने आगामी काळामध्ये इथेनॉलचे भाव वाढवणे गरजेचे झाले आहे. इथेनॉलचे भाव वाढल्यात त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल. इथेनॉलच्या तसेच साखरेच्या एमएसपीच्या भाववाढीची मागणीही राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात आलेली आहे, या संदर्भातही केंद्र सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असेही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
         ते पुढे म्हणाले, सध्या शेतकरी ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर करू लागला आहे. ऊस पिक हे शाश्वत पीक असल्याने व नैसर्गिक आपत्ती तग धरणारे पीक असल्याने देशात व राज्यामध्ये ऊसाच्या लागवड क्षेत्रात पुढील वर्षी निश्चितपणे वाढ होईल, असा आशावाद हर्षवर्धन पाटील व्यक्त केला. आगामी गळीत हंगामामध्ये महाराष्ट्रातील ऊस क्षेत्र वाढल्याने देशामध्ये साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्य अग्रभागी राहील, त्यानंतर उत्तर प्रदेश राज्य अग्रेसर असेल, असा अंदाजही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. 
--------------------------------
चालु वर्षी राज्यात 12.50 लाख हेक्टर क्षेत्र उस पिकाखाली आहे. त्यातून साधारणत: 110 ते 115 लाख मे.टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज आहे. हे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा साधारण 25 ते 30 लाख मे. टनाने जास्त निर्माण होणार आहे. तसेच देशामध्ये सुमारे 350 लाख मे. टन साखर उत्पादन होईल असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, इस्मा यांनी केंद्र सरकारला दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आगामी हंगामामध्ये सुमारे 25 ते 30 लाख मे.टन जादा उत्पादित होणाऱ्या साखरेची निर्यात करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते