मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*अल्पसंख्यांक समाजातील ३ कोटी रुपयांच्या निधीचे श्रेय घेणाऱ्यांनी किती अल्पसंख्यांक युवकांना नोकऱ्या लावल्या:- अंकिता पाटील-ठाकरे*

इंदापूर तालुक्यामध्ये आमदार साहेबांना सतत श्रेय घेण्याची सवय लागली आहे. नुकतेच महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजातील विविध विकास कामांसाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र हा निधी मंजूर होताच आमदार साहेबांची श्रेय घेण्यासाठी धावपळ उडाली आहे. मात्र, माझे आमदार साहेबांना आवाहन आहे की महायुती सरकारमधील निधीचे वाटप श्रेय घेण्याअगोदर आपण तालुक्यातील किती अल्पसंख्यांक युवकांना नोकऱ्या लावल्या हे जाहीर करा असे आवाहन अंकिता पाटील-ठाकरे यांनी केले आहे. त्यापुढे म्हणाल्या की इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अल्पसंख्याक समाजातील युवकांना स्वर्गीय शंकरराव भाऊ व नंतर हर्षवर्धन जी पाटील साहेब यांच्या माध्यमातून अनेक संस्थांमध्ये नोकऱ्या दिल्या. मात्र या लवकर या दिल्यानंतर कधीच श्रेयाचे राजकारण केले गेले नाही. ना. हर्षवर्धन पाटील साहेब मंत्री असताना तालुक्यामध्ये अल्पसंख्यांक समाजासाठी अनेक कामे केली. मात्र त्या कामाचा कधीही गाजा वाजा केला नाही. मात्र, सध्या तालुक्यात आमदार साहेबांनी वेगळीच सवय लावून घेतली आहे. कारण राज्यामध्ये महायुतीचे सरकार आ...

०५ सप्टेंबर ऐवजी महात्मा जोतिबा फुलेंचा जन्म दिन ११ एप्रिल हा खरा शिक्षकदिन म्हणून साजरा करावा -पै.अशोकराव देवकर

इंदापुर:- महात्मा जोतीराव फुले.  पुणे येथिल पहीली मुलींची शाळा सुरू करून बहुजन समाजातील घरात शिक्षणाची ज्ञानज्योत पेटविण्याचे काम करणारे पहीले शिक्षक म्हणजेच महात्मा फुले. काही सामाजिक संघटना महात्मा जोतिबा फुलेंच्या नावाने खरा शिक्षकदिन साजरा करताना दिसतात पण ते आजही आमच्या बहुजन समाजाला समजले नाही हीच खुप मोठी शोकांतिका आहे.आसे मत पै.अशोकराव देवकर यांनी व्यक्त केले ते म्हणाले की, महात्मा जोतिबा फुलेंचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. शाळेत शिकत असताना त्यांनी पाच-सहा वर्षातच अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यांची बुद्धी अतिशय तल्लख होती त्यामुळे ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्त्याने महात्मा फुले यांना 'सेंद्रीय बुद्धीवंत' असे संबोधले आहे. तर राधाकृष्णन यांचा जन्म ०५ सप्टेंबर १८८८ साली झाला. तर महात्मा फुलेंनी राधाकृष्णन यांच्या जन्माच्या ४० वर्षापूर्वी म्हणजेच ०१ जानेवारी १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे वाडयात पहिली मुलींची शाळा सुरू केली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स. १८५२ मध्ये शाळा स्थापन केली होती तर मग शिक्षकदिन रा...

*आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून अल्पसंख्याक समाजासाठी ३ कोटी मंजूर इंदापूर तालुक्यातील मुस्लिम बांधवांकडून आमदार भरणेंच्या कामाचे होतंय कौतुक*

 इंदापुर:- लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मिळालेल्या संधीचा उपयोग लोककल्याणासाठी कसा करायचा हे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या कौशल्यातून उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.शासनाचा कुठलाही विभाग असो,पण त्यातील क्रमांक एकचा निधी इंदापूरसाठी मंजूर करून आणण्यात आमदार भरणे हे नेहमीच यशस्वी झाले आहेत.त्यामुळेच आज इंदापूर तालुका विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर आला असुन आज पुन्हा एकदा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून शासनाच्या अल्पसंख्याक विभागातंर्गत इंदापूरसाठी सुमारे ३ कोटी निधी मंजूर झाला आहे. गेल्याच आठवड्यात श्री.भरणे यांनी अल्पसंख्याक समाजासाठी निधी मंजूर करण्याचे सुतोवाच केले होते.आणि लागलीच हा शब्द खरा ठरवत आमदार भरणे यांनी इंदापूर शहरासह ग्रामीण भागातील मुस्लिम वस्त्यांना भरघोस निधी दिला आहे.त्यामुळे मुस्लिम बांधवांकडून आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कामाचे कौतुक होत आहे. याविषयी बोलताना आमदार भरणे म्हणाले की,आमदार म्हणून काम करताना सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन प्रत्येक घटकाला उचित न्याय देण्यासाठी मी इमाने-इतबारे मेहनत घेतली असुन तालुक्यातील प्रत्येक गाव,वाडी...

*बारामती लोकसभेच्या रिंगणात सामाजिक कार्यातून स्वकर्तृत्वाने पुढे आलेल्या,परखड भूमिका मांडणाऱ्या ओबीसी बहुजन नेतृत्व-कल्याणी वाघमोडे*

आजचे राजकारण देखिल संभ्रमित करणारे, महाराष्ट्रात सापडणाऱ्या अमली पदार्थां इतकीच राज्यकर्त्याना झाली धुंदी. युवा पिढी नशेमध्ये बरबाद करण्याला जबाबदार कोण?  प्रतिनिधी- संपूर्ण महाराष्ट्रभर संघटन असणाऱ्या बारामती तालुक्यातील ढेकळवाडी गावातील इंजिनीयर, ग्रॅज्युएट पदवी प्राप्त अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठानच्या व क्रांती शौर्य सेनेच्या अध्यक्ष कल्याणी वाघमोडे या बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात सतत कार्यरत असणाऱ्या,लोकांच्या जनसंपर्कात असणाऱ्या,जागृत लेखिका व परखड महिला नेतृत्व,सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या वंचित घटक,कष्टकरी लोकांसाठी आयुष्य समर्पित करून गेली 20 वर्ष संघटनेच्या व चळवळीच्या माध्यमातून सामाजिक न्याय हक्कासाठी वाचा फोडणाऱ्या कल्याणी वाघमोडे यांचा संघर्ष मोठा आहे. राजमाता जिजाऊ ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा जपतात. पुढील पिढीला हे विचार जपता यावेत म्हणून अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या परखड शैलीतून,भाषणातून आपले मत मांडत असतात. स्व.बी.के.कोकरे व स्व.गणपत (आबा) ...

इंदापूरमध्ये भाजप ॲक्शन मोड वरती; हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार कार्यकर्त्यांचे मेळावे

इंदापुर  - कळस-वालचंदनगर गटाचा जंक्शनला तर निमगाव-निमसाखर गटाचा निमगावला शुक्रवारी मेळावा  इंदापूर : प्रतिनिधी दि.27/2/24                       भाजप नेते व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुक्रवारी (दि.1) कळस-वालचंदनगर गटातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा जंक्शन येथे 4 वा., तर निमगाव-निमसाखर गटाचा मेळावा निमगाव केतकी येथे सायंकाळी 6.30 वा. आयोजित करण्यात आला आहे.           संकल्प 2024 संकल्प विजयाचा या अभियानांतर्गत जंक्शनचा मेळावा रोहित मंगल कार्यालयात तर निमगाव केतकीचा मेळावा संत सावता माळी मंगल कार्यालयामध्ये संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आणण्यासाठी भाजप कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या मेळाव्यांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व अन्य भाजप नेते मार्गदर्शन करणार आहेत. तरी भाजपचे कार्यकर्ते, बूथ प्रमुख व सर्व पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आ...