मुख्य सामग्रीवर वगळा

*हडपसर, पिंपरीनंतर खडवासलात अजितदादांचा जनसंवाद*

*पुणे, ११ ऑक्टोबर:* महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पुढाकारातून 'जनसंवाद' उपक्रमाचा खडकवासला टप्पा मोठ्या उत्साहात पार पडला. हडपसर आणि पिंपरीतील यशस्वी जनसंवादानंतर हा उपक्रम खडकवासल्यात राबवण्यात आला.
  
अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी राज्यातील मुसळधार पावसामुळे आणि पूरसदृष्य परिस्थितीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्या काळात अजितदादांनी शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य दिले. पिकांच्या नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे आणि पुनर्वसनाचा आढावा घेणे, यावर अजितदादांनी लक्ष केंद्रीत केले.
  
या जनसंवादात नागरिक, विविध शासकीय विभाग आणि नेतेमंडळी एकाच व्यासपीठावर आले. व्हॉट्सअॅप चॅटबॉट्स, डिजिटल किऑस्क, हेल्पलाइन नंबर अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून तक्रारी नोंदविण्यात, पारदर्शकता ठेवण्यात आणि जबाबदारी ठरवण्यात भर देण्यात आला.
  
पिंपरीतल्या जनसंवादात तब्बल २५ हून अधिक शासकीय विभाग सहभागी झाले होते. नागरिकांच्या सुमारे ३,६०० तक्रारी नोंदविण्यात आल्या, त्यातील १,४०० तक्रारी जागेवरच सोडवल्या गेल्या. सामाजिक कल्याण, कचरा व्यवस्थापन, महसूल, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सार्वजनिक वाहतूकसंबंधीत प्रश्नांना प्राधान्याने उत्तरे देण्यात आली. स्वत: अजितदादांनी या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले, विभागांना तात्काळ उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन केले.
  
जनसंवादाच्या समारोपावेळी अजितदादांनी सांगितले, “ज्या तक्रारी मी ऐकू शकलो नाही, त्या तक्रारींची दखल मी स्वतः घेणार आहे आणि सर्वांना खात्री देतो की संबंधित समस्या नक्की सोडवल्या जातील. आज मुख्यमंत्री पुण्यात आहेत, त्यामुळे प्रोटोकॉलनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मलाही उपस्थित राहावे लागणार आहे.”
  
प्रत्यक्ष संवाद, तसेच डिजिटल साधनांच्या समन्वयाने हा उपक्रम विश्वासार्ह ठरत आहे. नागरिक आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्यातील संवादाचा आणि विश्वासाचा बंध अधिक बळकट होत आहे, तसंच तक्रारींवरील कार्यवाही अधिक पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण ठरत आहे.
  
राज्यभर सुधारित नागरी सुविधा, लोकसहभाग वाढवणे व सुलभ प्रशासन यासाठी 'जनसंवाद' हा उपक्रम अजून व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...