मुख्य सामग्रीवर वगळा

ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा हवी - मयूर भुजबळ

वाल्हे प्रतिनिधी-सिकंदर नदाफ 
ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा महत्त्वाची असून त्यासाठी "उठा जागे व्हा ,आणि ध्येय गाठेपर्यंत प्रयत्न थांबू नका"; असा महत्वपूर्ण संदेश नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ यांनी शालेय विद्यार्थ्यांना दिला .
वाल्हे (ता पुरंदर )येथील महर्षी वाल्मीकी विद्यालयात डॉ. निलेश शहा यांच्या संकल्पनेतून आदर्श सामाजिक फाउंडेशन ,नवदिशा फाउंडेशन व महर्षी वाल्मीकी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई येथील सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर सिद्राम भुजबळ यांच्यावर आधारित " मी कसा घडलो" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त मयूर भुजबळ हे बोलत होते.ते पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी सतत कार्यरत असले पाहिजे.ज्या गोष्टीमुळे ध्येय गाठण्यात अडचणी येतील अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत,विशेषतः सोशल मिडियाचा चुकीचा वापर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात टाळायलाच हवा,यामध्ये विनाकारण वेळ वाया घालवू नका,आपले छंद आवड जपा तसेच अभ्यासक्रमासह शारीरिक कसरतींना देखील प्रत्येकाने प्राधान्य दिले पाहिजे. पूर्वी स्पर्धा परीक्षा म्हटलं की, एमपीएससी साठी पुणे आणि यूपीएससी साठी दिल्ली या ठिकाणी अभ्यास केला जायचा. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळायचं.आता मात्र सोशल मीडियाचा जमाना आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून देखील मार्गदर्शन मिळू शकते.स्पर्धा परीक्षा देत असताना पहिले वर्ष हे सर्व समजून घेण्यात जातं आणि दुसऱ्या वर्षापासून विद्यार्थी अभ्यासाला लागतो.स्पर्धा परीक्षांमध्ये लक्ष देऊन तुम्ही अभ्यास केला तर त्यामध्ये तुम्हाला सहज यश मिळू शकत,असेही मत पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी व्यक्त केले.
यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे,वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड,वागदरवाडी सरपंच सुनील पवार,सुकलवाडी सरपंच संदेश पवार,तंटामुक्ती अध्यक्ष जयवंत भुजबळ,पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप,माजी कृषी अधिकारी सिद्राम भुजबळ,दौंडजचे माजी सरपंच दामोदर कदम,माजी तंटामुक्ती अध्यक्ष समदास भुजबळ,उपसरपंच सम्राज्ञी लंबाते,तसेच मयुरी भुजबळ,मांडकीचे पोलीस पाटील श्रीतेज जगताप बाळासाहेब भुजबळ सागर भुजबळ,उद्योजक अमोल कदम आदर्श सामाजिक फाऊंडेशनचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण, उपाध्यक्ष रवींद्र भुजबळ,
नवदिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन पांडकर, सचिव दादासाहेब राऊत, तुषार भुजबळ, सुरेश भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश निगडे यांनी केले.
तर सूत्रसंचालन शैला गवारी तसेच उपस्थितांचे आभार माजी पंचायत समितीचे सभापती गिरीश पवार व दादासाहेब राऊत यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते