इंदापूर;- अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या मराठवाडा, सोलापूर या भागातील संगोबा,बोरगाव त्याचबरोबर देऊळगाव या ठिकाणच्या पूरग्रस्त कुटुंबियांसाठी त्यांचा दसरा दिवाळी गोड होण्यासाठी पतंजली योग परिवाराचे अध्यक्ष मा श्री दत्तात्रय अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली व परिवारातील सर्व पुरुष व महिला साधक यांच्या सहकार्यातून व स्वच्छेने देणगी एकत्रित करून जमा झालेल्या देणगी मधून त्यांच्यासाठी जीवनाशक वस्तूंचे किट, साड्या, ब्लॅंकेट, सतरंजी, युवांसाठी पँन्टी व इतर कपडे, शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके, कंपास, पेन व इतर साहित्य शेलेय मुलांसाठी तांदूळ इत्यादी गोष्टींचा वितरण प्रत्यक्ष वस्ती/ गावामध्ये जाऊन प्रत्येक कुटुंबाला करण्यात आले. खरंच तिथली परिस्थिती पाहिली तर खूप भयावह होऊन बसली आहे तरीसुद्धा माणुसकीच्या धर्म पाळून आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे पतंजली परिवार हा आरोग्याबरोबर सर्वांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभा राहत असतो, अशाप्रसंगी सर्वच परिवारातील बंधू भगिनी नेहमीच सहकार्य करीत असतात. पूरग्रस्त बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना संकटांमधून बाहेर पडण्याचे बळ मिळो त्यांनी खचून न जाता या आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सामना एकोप्याने धीराने करावा असे मनोगत श्री विलासराव गाढवे यांनी किट वितरण प्रसंगी केले
कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट
इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...
टिप्पण्या