मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वाल्हेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

वाल्हे प्रतिनिधी -सिकंदर नदाफ  परमपूज्य सदगुरूं व महर्षी वाल्मीकी वारकरी सेवा संघाचे संस्थापक ह. भ. प. अशोक महाराज पवार यांनी अनुग्रह दिलेल्या वाल्हे सह पंचक्रोशीतील शिष्यगणांकडून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिष्यगणांकडून वाल्हे (ता. पुरंदर) गावच्या पालखी तळानजीक विठोबा मैदानात उभारलेल्या महर्षी वाल्मीकी वारकरी सेवा संघाच्या भक्तनिवासात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भजन कीर्तन आणि प्रवचनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक शिष्यगणांनी आपल्याला ज्या सदगुरूंनी मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखविला आणि जीवन कसे जगावे हे शिकवले अशा सदगुरूं व मठाधिपती ह. भ. प. अशोक महाराज पवार यांचे पाद्यपूजन करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले या प्रसंगी सोनबा बनकर मारुती पोटे दत्तात्रेय पवार शुभम दुर्गाडे पांडुरंग पवार गजानन पवार बंडासाहेब दाते मनीषा पवार कमल पवार सुनंदा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
अलीकडील पोस्ट

वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना पण हे आश्वासन हवेतच विरले,

इंदापूर:- वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या, वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावर पुन्हा मेघडंबरीसह समाधी उभारण्यात यावी अशी सूचना प्रशासनाला दिल्याचे असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भ्रमणध्वनीवरून दिली.  त्यानंतर आ. गोपीचंद पडळकर, सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गलांडवाडी पाटीवर तब्बल अडीच तास केलेले रास्ता रोको आंदोलन सकल हिंदू समाजाने स्थगित केले. वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमण काढण्यात यावीत या मागणीसाठी व महामार्गाचे रुंदीकरण, उड्डाणपूलाच्या बांधकामामुळे वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळाच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आ.गोपीचंद पडळकर, सागर बेग व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महामार्गावरील गलांडवाडी पाटी येथे आज सकाळी साडेअकरा वाजता रास्ता रोको करण्यात आला. पडळकर म्हणाले, विशाळगड, प्रतापगड गडाच्या धर्तीवर वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील सर्वच्या सर्व अतिक्रमण काढली ज...

दिवंगत रत्नाकर(तात्या) मखरे यांच्या जन्मदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त *जीवनपट*

 इंदापूर नेतृत्व आणि वक्तृत्वाचा मिलाफ म्हणजेच तात्या. जाती धर्म बाजूला सारून केवळ माणसाला माणूस म्हणून बघून कार्य करणारे व्यक्ती बोटावर मोजण्याइतके असतात. आजच्या राजकारणात आणि समाजकारणात धर्मांध आणि जातंध्यांची चलती आहे.मात्र शिव, फुले,शाहू, आंबेडकरी विचारांची कास धरून सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रभावी वाटचाल करणारे व्यक्ती म्हणजे तात्या. त्यांची विशेष ओळख म्हणजे राजकारणा पलीकडे पाहणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच राहिली. अनेक वर्षापासून नानाविध अध्यायांचा इतिहास,हृदय आणि श्वासांच्या नात्याइतका एकरुपतेने सामावला गेला आहे. तात्यांची राजकीय जीवनाची सुरुवात खऱ्या अर्थाने सन- १९७४ पासून इंदापूर नगरपालिकेत नगरसेवक निवडीने झाली.१२ डिसेंबर १९९० ला नगरसेवकांमधून नगराध्यक्षपदी तात्यांची निवड झाली. नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विधायक योजना राबविल्या. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्ध पुतळे नगरपालिका मैदानात बसविले . रोजंदारीवरील ३८ कामगारांना न्यायालयाच्या माध्यमातून कायम केले. पालिके शेजारी जि. प.शाळेला नवीन खोल्या बांधल्या. उद्योग धंद्यासा...

राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारा मोहरमचा उत्सव – जगताप

वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ त्याग श्रद्धा आणि आत्मचिंतनासह शांततेचा संदेश देत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारा मोहरमचा उत्सव हा सर्वत्र मानला जातो. त्यामुळे या उत्सवादरम्यान कायद्याचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा वाल्हे ( ता.पुरंदर ) पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप यांनी दिला . मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाल्हे पोलीस दूरक्षेत्रात शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक जगताप हे बोलत होते.या दरम्यान मुस्लीम समाजातर्फे त्यांचा व हवालदार प्रशांत पवार यांचा देखील सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुस्लीम समाजाचे मौलाना सिकंदर इनामदार चांद शेख असलम नदाफ मलिक इनामदार आदम इनामदार वासिम इनामदार विजय पवार यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थितांचे आभार सिकंदर नदाफ यांनी मानले.

*श्री दत्तात्रय अनपट यांचा आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिलेले अभिनंदनाचे पत्र देऊन येतोचित सत्कार समारंभ*

इंदापूर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनने मागील 21 वर्षापासून अविरतपणे निशुल्क योग प्राणायामाच्या माध्यमातून असंख्य व्याधीग्रस्त रुग्णांना निरोगी केल्याबद्दल त्यांच्या या अनोख्या कार्याची दखल घेऊन सन 2025 करिता श्री दत्तात्रय अनपट यांना दिनांक 22 जून रोजी *योगरत्न* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे आज त्यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मा.खा. सुप्रियाताई सुळे यांचे विशेष अभिनंदनाचे पत्र देऊन आज सकाळी स्थायी वर्गामध्ये येऊन संबंधित पक्षाचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य मा श्री अमोल भिसे यांनी केला , यावेळी बहुसंख्येने पुरुष व महिला साधक उपस्थित होते, याप्रसंगी श्री भिसे म्हणाले की श्री दत्तात्रय अनपट यांचं कार्य खरंच वाखाणण्याजोगं आहे त्यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांना माहिती समजली असता त्यांनी या अविरत चालू ठेवलेल्या कार्याबद्दल विशेष असे अभिनंदनाचे पत्र दिले , विशेषता ग्रामीण भागात अशा प्रकारची निशुल्क सेवा चालू ठेवणं हे सोपं काम नाही परंतु पतंजली परिवार हा श्री दत्तात्रय अनपट ...

वाल्हेत जमिनीच्या वादातून दोन जणांवर कोयत्याने हल्ला

वाल्हे प्रतिनिधी ; सिकंदर नदाफ पुरंदर तालुक्यात नेहमीच चर्चेत असलेल्या वाल्हे येथील वरच्या मळ्यात जमिनीच्या जुन्या वादातून दोन जणांवर कोयत्याने हल्ला झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.   याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामचंद्र पांडुरंग भुजबळ रा.वाल्हे ( वरचा मळा ) यांनी त्यांच्या मळ्यात जाण्यासाठी पाणंद रस्ता नुकताच मंजूर करून घेतला होता.परंतु या रस्त्यासाठी रामचंद्र भुजबळ व गणेश जगन्नाथ भुजबळ यांच्यात जमिनीच्या मालकी हक्कावरून पूर्वीपासूनच वाद होता . मात्र जुन्या वादाचा राग मनात धरून गणेश भुजबळ याने याच पाणंद रस्त्यावर दि.२३ जून रोजी सायंकाळी ६ च्या दरम्यान ट्रॅक्टर आडवा लावून रामचंद्र भुजबळ यांचा रस्ता अडवला.त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याने रामचंद्र भुजबळ यांच्यावर वार करण्यास सुरवात केली.यावेळी ओंकार अरविंद पवार ( रा.आडाचीवाडी ) हे भांडणे सोडविण्यास गेले असता गणेश भुजबळ याने त्यांच्यावरही कोयत्याने वार केले व रामचंद्र भुजबळ यांचा मुलगा श्रेयश भुजबळ याला देखील मारहाण केली.या घटनेत रामचंद्र भुजबळ व ओंकार पवार...

तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने चहा वाटप अंदाजे 2000 चहा चे वाटप- अध्यक्षा सौ.अनिताताई खरात

 इंदापूर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाविक भक्तांना इंदापूर येथे आगमना दिवशी तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने चहा वाटप करण्यात आले. गेले पाच ते सहा वर्षांपासून तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने दरवर्षी भाविकांना कधी पोहे,केळी ,चहा बिस्किट ,उपमा ,पाणी बॉटल अशी वेगवेगळ्या प्रकारचे भाविकांच्या सेवेसाठी वाटप करण्यात येते यावेळी तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून चहा वाटप करण्यात आले अंदाजे 2000 चहा चे वाटप यावेळी करण्यात आले . अनिताताई खरात म्हणाल्या की मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानते, कारण तेजपृथ्वी ग्रुपचे सर्वच पदाधिकारी अतिशय मनोभावाने प्रत्येक वर्षी वारकऱ्यांच्या सेवेसाठी काहीतरी उपक्रम करत असतात त्याचा मला अभिमान आहे.तसेच यावर्षी त्यांनी चहाचे वाटप केले . यावेळी सद्दाम भाई बागवान, आबा ठावरे, लक्ष्मण वाघमोडे, शंकर उबाळे, विशाल म्हेत्रे, संदीप रेडके,पृथ्वीराज खरात,नागेश मारकड, मयुर बिचकुले,रुपेश वाघमोडे, इत्यादी उपस्थित होते. या वेळी खरात म्हणाल्या की मी प्रशासनालाही विनंती करते की बऱ्याच ठिकाणी वारकऱ्यांच्या सोईसाठी जे पाण्याचे टॅंक...