इंदापूर :संपूर्ण भारतात राबविल्या जाणाऱ्या 'गो सन्मान आवाहन अभियाना'च्या पार्श्वभूमीवर, इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथील **राधाई रुक्मिणी गोशाळा ट्रस्ट**च्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन आज इंदापूरचे तहसीलदार यांना देण्यात आले. गायीला 'राज्यमाता' आणि 'राष्ट्रधरोहर' असा दर्जा देण्यात यावा, ही या निवेदनाची प्रमुख मागणी आहे. २७ एप्रिल हा दिवस 'गो सन्मान दिवस'** म्हणून साजरा करत असताना, देशभरातील गोप्रेमी आपल्या स्थानिक महसूल कार्यालयामार्फत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना आपले गाऱ्हाणे मांडत आहेत. याच अनुषंगाने हिंगणगाव येथील गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष **श्री. नितीन मारुती आरडे पाटील** यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. गो सेवागायींच्या संगोपन, संवर्धन आणि संशोधनासाठी गोशाळांना आवश्यक तो शासकीय निधी आणि अनुदान उपलब्ध करून द्यावे. गो सुरक्षा, संपूर्ण देशभरात गोहत्या पूर्णपणे बंद करण्यासाठी कठोर आणि एकसमान केंद्रीय कायदा तातडीने लागू करावा. गो सन्मान गायीला केवळ प्राणी न मानता तिला 'राज्...
इंदापूर : उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवार (दि. 24) पासून पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडणेसाठी सतत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केलेबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी निरा भिमा कारखान्यावरती शनिवारी (दि. 25) भेट घेऊन सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. सध्या उजनी धरणाच्या पावर हाऊस मधून 1600 क्युसेक्स व दरवाजामधून 4000 क्युसेक्स याप्रमाणे एकूण 6000 क्युसेक्स या क्षमतेने भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले जात आहे. इंदापूर व माढा तालुक्यातील नदीकाठच्या गावांमधील नागरिक, ग्रामपंचायतींचे सरपंच, पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी आदींनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेत नदीत पाणी सोडण्यासाठी महत्वाची भूमिका पार पडलेबद्दल आभार व्यक्त केले. भीमा नदीकाठच्या गावांमधील व नदी पात्रातील पात्रातील पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी त्याचबरोबर जनावरांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. पाणी काटकसरी...