मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

कर्मयोगी सह.साखर साखर कारखान्याची ऊसाची बिले ओंकार शुगर युनिट ने थकवली; इंदापूरच्या बाजारपेठेत शुकशुकाट, बळीराजा मेटाकुटीला,

इंदापूर: कर्मयोगी सहकारी साखर कारखाना संचलित आणि बाबूराव बोत्रे यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेल्या ओंकार शुगर युनिटने शेतकऱ्यांच्या ऊसाची बीले वेळेवर न दिल्याने इंदापूर तालुक्यात संतापाची लाट उसळली. . साखर कारखाना हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असतो. उसाचे पैसे वेळेवर आले की बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. मात्र, कर्मयोगी कारखान्याने बिले थकवल्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले ,  ऐन गुडीपाडव्याच्या सनाच्या काळात हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले, असून, याचा थेट परिणाम इंदापूरच्या बाजारपेठेवर झाला आहे. ग्राहकांअभावी बाजारपेठेत सध्या पूर्णपणे 'शुकशुकाट' पाहायला मिळत आहे.लोक म्हणतात खोकला गेला आणि दुखणं आलं, शेतकऱ्यांची अवस्था बिकट,झाली, उन्हाळ्याची चाहूल लागत असताना आणि पुढील पिकांच्या नियोजनासाठी पैशांची गरज असताना, हक्काचे ऊसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मुलांचे शिक्षण, मुलींच्या डिलिव्हरी साठी दवाखान्यात भरायला पैसेच नाहीत, असुन अडचण नसून खोळंबा हक्काचा पैसा मिळत नसल्याने बापाला सावकारांच्या घराचा दरवाजा ठोठावण्याची वेळ...
अलीकडील पोस्ट

मुख्यमंत्र्यांसमवेत साखर उद्योगातील विविध घटकांच्या अडचणीसंदर्भात सोमवारी मुंबईत बैठक -हर्षवर्धन पाटील

इंदापूर : प्रतिनिधी दि. 18/3/26                                                  राज्यातील साखर उद्योगातील ऊस उत्पादक शेतकरी, साखर कामगार, ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार आदी विविध घटकांच्या संदर्भात निर्माण झालेल्या अडचणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली बैठकीचे मुंबईत सोमवारी (दि. 23 ) आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अडचणी जाणून घेऊन सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केली.     या बैठकी संदर्भात माहिती देताना हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील साखर उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, “सामाजिक-आर्थिक उद्योग” म्हणून विकसित झाला आहे. साखर कारखाने हे फक्त उत्पादन केंद्र नसून ग्रामीण विकासाची केंद्रे आहेत. मात्र बदलत्या काळात साखर कारखानदारी समोरील अडचणी वाढत असून त्यामुळे सुम...

वाल्हेत काँग्रेस कमिटीकडून निषेध आंदोलन

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ  राजकीय चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावात काँग्रेस कमिटीकडून गॅसच्या किमतीत झालेली प्रचंड दरवाढ तसेच गॅस वितरण व्यवस्थेतील ढिसाळ नियोजन व राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांकडून आठवडे बाजाराचे औचित्य साधून येथील शहीद शंकर शिंदे चौकात शांततापूर्ण व संविधानात्मक मार्गाने आंदोलनास सुरवात करण्यात आली .या दरम्यान युवा नेते सुनील असवलीकर प्रा. सचिन दुर्गाडे यांसह काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे सेवा दलाचे बापूसाहेब मोकाशी सामाजिक कार्यकर्ते ऍड. फत्तेसिंग पवार अतिश जगताप तसेच ऍड. किरण कुमठेकर माऊली बोराडे सूरज जगदाळे यांसह आदी कार्यकर्त्यांनी गॅस व शेती खतांची झालेली दरवाढ तसेच राज्य शासनाने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी ही अक्षरशः फसवी असल्याचा आरोप करत केंद्र तसेच राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाब...

लोकनेते प्रदीप (दादा) गारटकर मित्र परिवारातर्फे इफ्तार पार्टीचे उत्साहात आयोजन सलग ३६ वर्षांची सामाजिक सलोख्याची परंपरा कायम

इंदापूर:- जनसामान्यांचे नेते श्री. प्रदीप (दादा) गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली, 'प्रदीप (दादा) गारटकर मित्र परिवारा'च्या वतीने यावर्षीही पवित्र रमजान महिन्यानिमित्त भव्य 'रोजा इफ्तार' पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या ३६ वर्षांपासून सालाबादप्रमाणे ही परंपरा अविरतपणे सुरू असून, या कार्यक्रमातून सर्वधर्मसमभावाचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.मुस्लिम समाजाला रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन 13/3/2026. शुक्रवार रोजी करण्यात आले इफ्तार पार्टी आयोजनाचे यावर्षी 36 वे वर्ष होते यावेळी मोठ्या प्रमाणावर इंदापूर शहर तथा तालुक्यातील मुस्लिम समाज उपस्थित होता इंदापूर शहरातील सर्व 14 मशिदीचे 18 मौलाना सहाब यांचा मा. प्रदीप (दादा) गारटकर यांच्या हस्ते येतोचित असा सन्मान (गुलपोशी) करण्यात आला   राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असतानाही, गारटकर मित्र परिवाराने गेल्या साडेतीन दशकांपासून ही धार्मिक एकात्मतेची परंपरा जोपासली स्थानिक भागातील मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि रोजेदार मोठ्या संख्येने या इफ्तार पार्टीला उपस्थित ह...

इंदापूर तालुक्यातील हिंदू-मुस्लीम ऐक्य राज्यात आदर्श- हर्षवर्धन पाटील-बावडा येथे इफ्तार पार्टी

इंदापूर : प्रतिनिधी दि.16/3/26                                       इंदापूर तालुक्यामध्ये पिढ्यान पिढ्यांपासून हिंदू-मुस्लीम समाज हा बंधुभावाने राहत असून, एकमेकांच्या सुख दुखात नेहमीच सहभागी राहिलेला आहे. इंदापूर तालुक्यातील हिंदू-मुस्लीम एकोपा राज्यामध्ये आदर्श असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.15) केले.           बावडा येथे जामा मस्जिदमध्ये हर्षवर्धन पाटील यांचे उपस्थितीमध्ये ईफ्तार पार्टीचे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.        ते पुढे म्हणाले, स्वतःच्या गावातील इफ्तार पार्टीला उपस्थित राहण्यास वेगळाच आनंद असतो. आपण कायमच सर्वधर्मसमभावाच्या मूल्यांची जोपासना करीत राजकारण, समाजकारण केले आहे, करीत आहोत. जगातील कोणताही धर्म असो तो माणुसकीची शिकवण देतो, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.  बावडा ग...

युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने साखर कारखान्यांचा इथेनॉल कोटा वाढवावा- हर्षवर्धन पाटील-साखर निर्यातीसाठीही मदतीची गरज

                                                 इंदापूर:- सध्या आखाती देशात चालु असलेल्या युद्धामुळे क्रूड ऑइलच्या दरात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्रालयाने जाहीर केलेल्या दि. 1 एप्रिलपासूनच्या नवीन धोरणानुसार पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणासाठी साखर कारखान्यांना इथेनॉलचा कोटा तातडीने वाढवून द्यावा, परिणामी, इथेनॉल मिश्रणामुळे पेट्रोल दरवाढीसंदर्भात जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळु शकेल. तसेच साखरेच्या निर्याती संदर्भातही केंद्र सरकारकडून मदतीची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी केले.        राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचेकडे देशातील साखर कारखान्यासंदर्भात विविध मागण्या करून तातडीने निर्णय घ्यावेत, अशी विनंती केली आहे, असे हर्षवर्धन पाटील य...

वाल्हेत संजय जगताप मित्र परिवारातर्फे इप्तार पार्टी

वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ रमजान महिन्याचे औचित्य साधून माजी आमदार संजय चंदुकाका जगताप मित्र परिवारातर्फे वाल्हे ( ता.पुरंदर ) येथील शाही सुन्नी मशिदीत सालाबादप्रमाणे रोजा इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुस्लीम बांधवांसह महिला वर्गाने देखील रोजा इप्तार पार्टीत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविल्याने मस्जिद परिसर अक्षरशः गजबजून गेला होता.  यावेळी संजय जगताप मित्र परिवारातर्फे मुस्लीम समाजातील उपवास धारकांना रोजा इप्तारीसाठी सरबत मिठाईसह फळांचे वाटप करण्यात आले.त्यानंतर मगरीबची नमाज अदा झाल्यावर रोजा इप्तार पार्टी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आल्याने मुस्लीम समाजातआनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच जातीय सलोखा अबाधित रहावा तसेच मित्रत्वाची भावना देखील वाढली पाहिजे या उद्देशाने माजी आमदार संजय जगताप मित्र परिवाराकडून पुरंदर हवेलीतील जवळपास सर्व मशिदीत इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष मोबीन बागवान यांनी दिली. या प्रसंगी मुस्लिम समाजाचे चांदभाई इनामदार आरिफ आतार आयुब इनामदार अरबाज नदाफ शौकत शेख आयान ...