वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ रमजान महिन्याचे औचित्य साधून माजी आमदार संजय चंदुकाका जगताप मित्र परिवारातर्फे वाल्हे ( ता.पुरंदर ) येथील शाही सुन्नी मशिदीत सालाबादप्रमाणे रोजा इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुस्लीम बांधवांसह महिला वर्गाने देखील रोजा इप्तार पार्टीत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविल्याने मस्जिद परिसर अक्षरशः गजबजून गेला होता. यावेळी संजय जगताप मित्र परिवारातर्फे मुस्लीम समाजातील उपवास धारकांना रोजा इप्तारीसाठी सरबत मिठाईसह फळांचे वाटप करण्यात आले.त्यानंतर मगरीबची नमाज अदा झाल्यावर रोजा इप्तार पार्टी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आल्याने मुस्लीम समाजातआनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच जातीय सलोखा अबाधित रहावा तसेच मित्रत्वाची भावना देखील वाढली पाहिजे या उद्देशाने माजी आमदार संजय जगताप मित्र परिवाराकडून पुरंदर हवेलीतील जवळपास सर्व मशिदीत इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष मोबीन बागवान यांनी दिली. या प्रसंगी मुस्लिम समाजाचे चांदभाई इनामदार आरिफ आतार आयुब इनामदार अरबाज नदाफ शौकत शेख आयान ...
इंदापूर :- टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे नगराध्यक्ष मा.भरतशेठ शहा, यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. इंदापूर तालुक्यातील सर्वच गावातील जनतेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला,विविध भागात अबालवृध्द चौकाचौकात मोठ्या स्क्रिनवर मॅच पाहण्याचा आनंद घेत होते, हि मॅच पाहतानाचा आनंद गगनात मावत नव्हता,आपण जिंकणारच आसे सगळेच बोलत होते,खेळाडूंनी त्यांची इच्छा पुर्ण केली,सलाम त्यांच्या कार्याला,आसे नगराध्यक्ष मा.भरतशेठ शहा ,म्हणाले की, आपल्या संदेशात म्हणाले की, भारतीय संघाने संपूर्ण टी-२० विश्वचषक स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, संघभावना आणि समर्पित खेळभावना ही संपूर्ण देशातील क्रीडाप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे.या ऐतिहासिक विजयामुळे देशभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले असून भारताचा तिरंगा जगभर अभिमानाने फडकावला आहे.शिवसृष्टी न्यूज शी बोलताना नगराध्यक्ष मा.भर...