इंदापूर विठ्ठलाच्या पंढरीला पाणी पाजणारं आणि लाखो शेतकऱ्यांची तहान भागवणारं आपलं उजनी धरण सध्या देवाच्याच भरोशावर चाललंय की काय, असा झणझणीत प्रश्न आता उपस्थित झालाय. ज्येष्ठ बागायतदार किसनराव तात्या भांगे यांनी धरणाच्या सुरक्षेवरून प्रशासनाचे पार वाभाडे काढले आहेत. उजनी धरण सध्या देवाच्या म्हणजेच 'रामभरोसे' चाललंय की काय, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. धरणाच्या या ढिसाळ कारभारावर ज्येष्ठ बागायतदार किसनराव तात्या भांगे यांनी प्रशासनाचे चांगलेच कान उपटले असून एक झणझणीत सवाल उपस्थित केला आहे.नेमकं प्रकरण काय हाय,जमिनी मोजणीचा सस्पेन्स: पूर्वी धरणासाठी शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी संपादित केल्या होत्या, त्या जमिनी अचानक सरकारने मोजायला सुरुवात केली आहे. पण ही मोजणी नक्की कशासाठी आणि कोणासाठी चालली आहे? याचं गुपित सांगायला सरकार तयार नाही.,परप्रांतीयांची 'एन्ट्री' आणि सुरक्षेचा 'एक्झिट': तात्यांचा थेट संशय आहे की, या जागेवर एखादा मोठा प्रकल्प आणण्याचा डाव आहे. प्रकल्प आला की बाहेरून परप्रांतीय कामगार येणार. मग आपल्या स्थानिक लोकांच्या हक्काचं काय? आणि इतक्या...
निरा भिमा कारखान्याच्या संचालक मंडळाची खंडाळा येथील कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांटला भेट -कारखान्याचे कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांट उभारणीचे नियोजन-हर्षवर्धन पाटील
इंदापूर : प्रतिनिधी दि.25/5/26 देशामध्ये ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये क्रांतीकारक बदल घडून येत आहे. या बदलाला अनुसरून शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांट (C.N.G. PLANT) उभारणीचे नियोजन सूरू केले आहे. यास अनुसरून कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांचे समवेत संचालक मंडळाने अहिरे, ता. खंडाळा येथील राज प्रोसेसच्या कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांटला रविवारी (दि. 25) भेट देऊन पाहणी केली. निरा भीमा कारखान्याने स्थापनेपासूनच नेहमीच काळजी गरज ओळखुन सातत्याने एक पाऊल यशस्वीरित्या पुढे टाकलेले आहे, त्यानुसार कारखान्याचे कॉम्प्रेसर बायोगॅस (CBG) उत्पादनाचे नियोजन आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी कॉम्प्रेसर बायोगॅस प्लॅन्ट पाहणी प्रसगी दिली. ...