मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सौ. सायरा हमीद आत्तार यांना 'राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न' पुरस्काराने सन्मानित

इंदापूर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रभक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव सोहळा पुण्यात संपन्न झाला. यामध्ये वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल इंदापूर येथील 'वृक्ष संजीवनी परिवारा'च्या सौ. सायरा हमीद आत्तार यांना 'राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सौ. भारतीताई तूपे आणि राजेंद्र पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे ठिकाण पुणेआयोजक राष्ट्रभक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य सन्मानित व्यक्ती सौ. सायरा हमीद आत्तार (वृक्ष संजीवनी परिवार, इंदापूर) पुरस्काराचे नाव राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न प्रमुख पाहुणे/हस्ते प्रदान सौ. भारतीताई तूपे आणि राजेंद्र पवार सध्याच्या वाढत्या तापमानाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष केल्यास मानवाला भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. पर्यावरणात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येकाने 'एक व्यक्ती, एक झाड' ही संकल...
अलीकडील पोस्ट

इंदापूरचे विकास खिलारे यांना 'राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार' प्रदान

 इंदापूर  १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पुण्यात आयोजित राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात, इंदापूर येथील श्री. विकास पांडुरंग खिलारे यांना 'राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. ३ मे रोजी हा शानदार सोहळा पार पडला. श्री. विकास खिलारे यांना हे सन्मान 'रक्तदान चळवळ' या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत तब्बल ३५ वेळा रक्तदान करण्याचा विक्रम नोंदवला आहे. तसेच, वर्षातून किमान २ वेळा रक्तदान करण्याचा त्यांनी संकल्प केला असून त्यांचा हा आदर्श इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. या सोहळ्याचे आयोजन राष्ट्रीय भक्ती संघटना महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संयोजक श्री. राजेंद्र श्रीरंग पवार (कार्याध्यक्ष, राष्ट्रभक्ती संघटना महाराष्ट्र) आणि व्यवस्थापन विजेते मीडिया यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी इंदापूर चे उद्योगपती धरमचंद लोढा उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण सोहळ्याबद्दल परिसरामध्ये श्री. खिलारे यांचे अभिनंदन होत आहे.

कु.तनिष्का किशोर राऊत श्री.नारायणदास रामदास हायस्कूल व सायन्स महाविद्यालयात बारावीत ८७ टक्के गुण मिळवून प्रथम

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री.नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनिअर सायन्स महाविद्यालय इंदापूर येथील कु.तनिष्का किशोर राऊत (परीक्षा क्रमांक -P049421) ही विद्यार्थिनी श्री.नारायणदास रामदास हायस्कूल व सायन्स महाविद्यालयात बारावीत ८७ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे.तसेच पुणे जिल्ह्यात मराठी विषयात प्रथम आली आहे.तिला मराठी विषयात ९८ गुण मिळाले आहेत.मराठी विषयाच्या शिक्षिका प्रा.सौ.मीना कैलास कदम यांनी तिला मार्गदर्शन केले आहे.वर्गशिक्षक श्री.सहदेव म्हस्के व मुख्याध्यापक श्री.संजय सोरटे यांनी तिचे अभिनंदन केले.संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांनी विद्यालयाचे नावलौकिक झालेबद्दल विद्यार्थिनी व शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

सामुदायिक विवाह सोहळयाचे यंदा ६वे वर्षे डोंबिवली

मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील ) पिंपळेश्वर महादेव मंदिर मैदान,मानपाडा रोड,सागांव डोंबिवली पूर्व येथे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. आतापर्यत सामुदायिक विवाह सोहळयात ३९ शुभलग्न धुमधक्यात संपन्न झाले आहेत. यंदा ७ शुभविवाह धुमधडाक्यात पार पडली. याचे श्रेय आगरी समाज प्रबोधन संस्था सर्व कार्यकर्ते तसेच मा. आमदार राजूदादा पाटील यांना जाते कारण प्रत्येक जोडप्यास एक लाख रूपये मानधन दिले जाते. आणि पुढेही देणार भले कितीही लग्न जुळूदे असे मा.आमदार राजूदादा पाटील यांनी व्यासपीठावर जाहीर केले. त्यांनी संस्थेचे ही कौतुक केले.ज्याच्या कडे भरपूर पैसा आहे अशा लोकांनी जरूर आपल्या कुवती प्रमाणे लग्न कार्यात खर्च करावा. पण कर्ज काढून आयुष्यभर हप्ते भरत बसू नये. त्याला पर्याय म्हणून आगरी समाज प्रबोधन संस्थेत नाव नोंदणी करून सामुदायिक विवाह सोहळा उत्तम पर्याय आहे. येथे आपल्या घराच्या सारखा लग्नसोहळा  आयोजित केला जातो. वधुवर व आपले वराडी उपस्थित राहायचे आहे. भटजी,हारतुरे, पोळापापडी, सर्व धार्मिक विधी होम हवन, स्टेज,डेकोरेशन, बुफे जेवणापासून,आईसक्रीम, वेलकम ड्रीक, बँड ...

सरडेवाडी येथे 'एक गाव, एक पोलीस' अंतर्गत पोलीस अंमलदारांची भेट; ग्रामस्थांना सुरक्षा व नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शन

इंदापूर: राज्य शासनाच्या 'एक गाव, एक पोलीस' या संकल्पनेअंतर्गत इंदापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदार **कल्याणी विजय जाधव (ASI, ब. नं. 79)** यांनी दि. १ मे २०२६ रोजी सरडेवाडी गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधून गावच्या सुरक्षेबाबत विविध सूचना दिल्या.सकाळी ८:०० ते ८:३० या वेळेत झालेल्या या भेटीदरम्यान जाधव यांनी गावातील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक आणि ग्रामपंचायत सदस्यांशी सविस्तर चर्चा केली. हिंगणगावचे पोलीस पाटील उपस्थित होते.यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला:  सीसीटीव्ही यंत्रणा:गावातील मुख्य चौक आणि गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सूचना दिल्या. सद्यस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयासमोर कॅमेरे बसवण्यात आले असून, हायवे रोडवरील महत्त्वाच्या ठिकाणीही यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.  महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि जनजागृती करण्याबाबत चर्चा झाली.  केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन BNS (भारतीय ...

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

इंदापूर (पुणे ग्रामीण): [असिफभाई शेख यांचेकडन ] इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे सासरच्या छळाला कंटाळून एका १९ वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी पती, दीर आणि सासू अशा तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी विकास शिंदे (वय १९ वर्षे ७ महिने) असे मृत विवाहितेचे नाव आहे. शिवानीचा विवाह मे २०२५ मध्ये वरकुटे बुद्रुक येथील विकास अजिनाथ शिंदे याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत होते. मात्र, त्यानंतर पती विकास, दीर प्रकाश आणि सासू सुरेखा शिंदे यांनी शिवानीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली.फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी तिला नेहमी फोनवर कोणाशी बोलते, यावरून टोचून बोलत असत. तसेच, वॉटर फिल्टर प्लांट टाकण्यासाठी माहेरून २ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. या जाचाला कंटाळून शिवानीने सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन ...

उजणीच्या कुशीत 'वाळू'माफियांचा बाजार; प्रशासनाच्या डोळ्यावर 'गांधीजी,पण जातीयवाद बोकाळणार, मोठ्या रक्तापाताची प्रतीक्षा ? मुडदे पडतील याला जबाबदार कोण.?

इंदापूर | विशेष प्रतिनिधी उजणी धरण म्हणजे सोलापूर आणि पुण्याची जीवनवाहिनी. पण सध्या ही जीवनवाहिनी वाळू चोरांसाठी 'सोन्याची अंडी देणारी कोंबडी' ठरत आहे. प्रशासकीय यंत्रणेने डोळ्यावर गांधी वादाची पट्टी बांधली आहे की काय, असा सवाल आता सामान्य जनता विचारू लागली आहे. इंदापूर तालुक्यातील बॅकवॉटरच्या गावांमध्ये सध्या जो नंगानाच सुरू आहे, तो पाहता येथे ' खाकी'चा धाक उरलाय की 'खादी'च्या आशीर्वादाने हे दुकान सुरू आहे , हे शोधण्याची वेळ आली आहे. वाळू उपसा हा केवळ पर्यावरणाचा ऱ्हास नाही, तर तो आता सामाजिक शांततेसाठी 'कॅन्सर' ठरू लागला आहे. या अवैध व्यवसायातून जातीयवादाचे विष पेरले जात असून, वर्चस्ववादातून मोठा रक्तापात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण खेळात 'झारीतील शुक्राचार्य' नेमके कोण आहेत? हे शुक्राचार्य एसी केबिनमध्ये बसून वसुलीचे आकडे मोजत आहेत की बांधावर उभे राहून मलिदा खात आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान पुणे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसमोर आहे.असे म्हणतात की 'पैसा फेकला की तमाशा दिसतो', पण इथे पैसा फे...