मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अन्यायकारक भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी*

महावितरण अधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार व दीर्घकाळाच्या भारनियमनामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी, इंदापूर तालुक्याच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली. सध्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत शेतीसाठी आवश्यक असलेले सिंचन, विहिरी, बोअरवेल तसेच विविध विद्युत पंपांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र सततच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेत पाणी देणे अशक्य होत असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील लघु व मध्यम व्यावसायिकांनाही या भारनियमनाचा मोठा फटका बसत आहे. वीज नसल्यामुळे अनेक उद्योगधंदे व व्यावसायिक आस्थापना...
अलीकडील पोस्ट

इंदापुरात अवकाळी वादळी पावसाचा तांडव; केळी, डाळिंब व ऊस पिकांचे कोट्यवधींचे नुकसान..!

भाजप नेते प्रदीप गारटकर आणि प्रविण माने यांनी घेतली नुकसानग्रस्त भागाची बांधावर जाऊन पाहणी; तात्काळ सरसकट पंचनामे व मदतीची मागणी इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यात काल झालेल्या भीषण अवकाळी वादळी पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. प्रामुख्याने केळी, डाळिंब, ऊस तसेच इतर भाजीपाला व फळबागांना या वादळाचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती, शेटफळ हवेली, बावडा, टणू, गणेशवाडी, पिंपरी बु., लाखेवाडी, गिरवी या गावांमध्ये या वादळी पावसाने मुख्यत्वे थैमान घातले. अनेक ठिकाणी केळीच्या बागा जमिनीदोस्त झाल्या असून झाडे उन्मळून पडली आहेत. डाळिंब बागांचेही अतोनात नुकसान झाले असून काढणीस आलेला ऊस वाऱ्यामुळे आडवा झाला आहे. नेत्यांकडून प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी या भीषण परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर व नेते प्रविण माने यांनी ...

सौ. अनिताताई नानासाहेब खरात राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न' पुरस्काराने सन्मानित

पुणे::- नाव न घेता थेट 'वा-वा' मिळवणाऱ्यांच्या खाक्यात खोडा घालणे काय असते, याचा जिवंत नमुना आज पुण्यात पाहायला मिळाला. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनिताताई नानासाहेब खरात यांना राष्ट्रभक्त परिवार आणि प्रहार युथ ऑर्गनायझेशन तर्फे 'राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकीकडे पुरस्काराचा गोडवा होता, तर दुसरीकडे अनिताताईंनी आपल्या भाषणातून विघ्नसंतोषी लोकांची काढलेली चव चांगलीच झणझणीत ठरली. पुण्यातील या शानदार सोहळ्याला राष्ट्रभक्ती महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सौ. भारती तुपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रतिलाल चौधरी,राष्ट्रभक्त परिवाराचे अध्यक्ष सुनीलजी गोरे, आणि अष्टविनायक मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्यासह अनेक बड्या असामी हजर होत्या. मान्यवरांच्या हस्ते अनिताताईंना गौरवण्यात आले, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अनिताताईंनी उत्तर द्यायला सुरुवात केली आणि सभागृहात अचानक शांतता पसरली. काम न करता फक्त 'क्रेडिट' लाटणाऱ्या आणि अरेरावी करणाऱ्या हौशा-नवशांची त्यांनी चांगलीच का...

पै. सचिन शिरसट यांची भाजप इंदापूर तालुका पूर्व युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड.

इंदापूर: भारतीय जनता पार्टी संघटन विस्ताराच्या दृष्टीने इंदापूर तालुक्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरडेवाडी येथील भाजपचे सक्रिय व निष्ठावंत कार्यकर्ते पैलवान सचिन शिरसट यांची इंदापूर तालुका पूर्व विधानसभा युवा मोर्चा अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप पूर्व इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष राम असबे यांनी पत्रकाद्वारे या नियुक्तीची घोषणा केली. या बातमीचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत: पैलवान सचिन शिरसट यांचे पक्षासाठीचे सातत्यपूर्ण कार्य, संघटन बांधणीतील योगदान आणि निष्ठा लक्षात घेऊन भाजप मंडल कार्यकारिणीने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.  या नियुक्तीमुळे भाजपच्या युवा संघटनेला नवसंजीवनी मिळेल, अशा भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असून तालुक्यातून शिरसट यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नियुक्ती पत्र प्रदान करताना तालुकाध्यक्ष राम असबे यांनी विश्वास व्यक्त केला की, सचिन शिरसट पूर्व इंदापूर भागातील पक्ष संघटन अधिक मजबूत करतील आणि युवकांना पक्षाशी जोडून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतील. "गाव तिथे शाखा काढून युवकांची मोठी फळी निर्माण क...

या वेळी लाखेवाडी च्या सरपंच डाॅ.चित्रलेखा श्रीमंत ढोले मॅडम

वादळी पावसातील नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश इंदापूर  दि.६: राज्यात काल झालेल्या वादळी पावसामुळे २४ जिल्ह्यात अंदाजे १ लाख ५०० एकराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळण्याच्यादृष्टीने बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीने मदत करण्यात येईल, असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. श्री. भरणे यांनी आज इंदापूर तालुक्यातील वडापुरी, सुरवड, गणेशवाडी, बावडा, टणू, पिंपरी बु. आणि लाखेवाडी भागात झालेल्या नुकसानीबाबत प्रत्यक्ष बांधावर जाणून पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार जीवन बनसोडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे या वेळी लाखेवाडी च्या सरपंच डाॅ.चित्रलेखा श्रीमंत ढोले मॅडम आदी उपस्थित होते. श्री. भरणे म्हणाले, हवामान बदलामुळे आलेल्या राज्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत; बाधित क्षेत्रातील एकही शेतकरी पंचनाम्यापासून वं...

दुष्काळात तेरावा महिना! निसर्गाचा कोप आणि सरकारची डोळेझाक; सरडेवाडीत बळीराजा उद्ध्वस्त!

इंदापूर:  "बाप जगू देईना आणि आई भीक मागू देईना..." अशी अत्यंत विदारक आणि काळजाचा थरकाप उडवणारी परिस्थिती आज इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील सामान्य शेतकऱ्याची झाली आहे. आधीच तीव्र दुष्काळाच्या होरपळीत होरपळणाऱ्या शेतकऱ्याला आता निसर्गानेही दगा दिला आहे. सरडेवाडी परिसरात झालेल्या भीषण चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाने इथल्या शेतकऱ्यांचे कंबरडे पार मोडून टाकले आहे. या वादळी वाऱ्याचा सर्वात मोठा आणि भीषण फटका शेतकरी नितीन कोकरे यांना बसला आहे. निसर्गाच्या तांडवामुळे नितीन कोकरे यांचे राहते घर आणि जनावरांचा गोठा अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. डोक्यावरचे छत हिरावले गेले असून, मुक्या जनावरांचा आसराही या वादळाने हिरावून घेतला आहे. लाखो रुपयांचे नुकसान डोळ्यांदेखत झाल्याने कोकरे कुटुंबीयांवर उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.   नेहमीप्रमाणे शेतकरी संकटात सापडल्यावर महसूल प्रशासन आणि विमा कंपन्या सुस्त का बसतात,कागदी घोडे नाचवणे बंद करा, सरडेवाडीतील नुकसानग्रस्त भागाचे आणि विशेषतः शेतकरी नितीन कोकरे यांच्या घराचे व गोठ्याचे तात्काळ पंचनामे झाले पाहिजेत, तात्काळ आर्...

वरिष्ठ नागरिकों के स्वास्थ्य के लिए 'मोटा अनाज' (तृणधान्य) अमृत के समान है: डॉ. श्रेणिक शाह

इंदापूर, डॉ. संदेश शाह। वरिष्ठ नागरिक समाज के आधारस्तंभ हैं और समाज को सक्षम व सुसंस्कृत बनाने में उनका महत्वपूर्ण योगदान है। इसलिए उनके स्वास्थ्य को बेहतर बनाए रखने के लिए दैनिक आहार में मोटे अनाज (मिलेट्स/तृणधान्य) का उपयोग करना समय की मांग है, ऐसा प्रतिपादन जनरल सर्जन डॉ. श्रेणिक शाह ने किया। वे इंदापूर के 'आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान' तथा 'वरिष्ठ नागरिक संघ' की ओर से वरिष्ठ नागरिक भवन में आयोजित स्वास्थ्य जागरूकता कार्यक्रम में मार्गदर्शन करते हुए बोल रहे थे। कार्यक्रम की अध्यक्षता वरिष्ठ नागरिक संघ के अध्यक्ष सुभाष थोरात ने की। इस अवसर पर मई महीने में जन्मदिन मनाने वाले सभी वरिष्ठ नागरिकों का सत्कार (सम्मान) किया गया।32 प्रकार के मोटे अनाज, 18 प्रकार की आयुर्वेदिक वनस्पतियों के चूर्ण और 7 प्रकार के सूखे मेवों (ड्राय फ्रूट्स) से युक्त मिलेट्स शरीर की दैनिक कैलोरी की आवश्यकता को पूरा करते हैं।  शरीर की इम्यूनिटी (रोगप्रतिकारक शक्ति) को मजबूत बनाए रखता है। * इसमें किसी भी प्रकार के रसायन (केमिकल) का उपयोग नहीं होता, इसलिए शरीर पर इसका कोई द...