मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाकडून ऊस (नियंत्रण) आदेशासंदर्भात विविध सूचना-हर्षवर्धन पाटील -पुणे येथे देशातील साखर कारखानदारांची बैठक

 इंदापूर  फोटो:-पुणे येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने देशातील साखर कारखानदारांची बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या वतीने ऊस (नियंत्रण) आदेश- 2026 संदर्भात केंद्र सरकारला देशातील साखर कारखान्यांकडून आलेल्या सूचना दि. 20 मे पूर्वी सादर केल्या जाणार आहेत. या सूचनांमुळे कायदा अधिक व्यापक व सर्व समावेशक होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवीदिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.16) दिली.     पुणे येथे देशातील सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक यांची केंद्र सरकारच्या प्रस्तावित ऊस (नियंत्रण) आदेश- 2026 संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सविस्तर विचार मंथन करण्यात आले, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.        ते पुढे म्हणाले, सध्या केंद्र शासनाच्या ऊस (नियंत्रण) आदेश 1966 लागू आहे. गेल्या 40 वर्षात साखर व ऊर्जा क्षेत्रात झालेले संशोधन आणि सुधारणा यांचा अंतर्भाव करण्याच्...
अलीकडील पोस्ट

इंदापूरमध्ये धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त इतिहास जागवणारा सांस्कृतिक सोहळा

महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था; शिस्तबद्ध आणि आदर्श आयोजनाने इंदापूरकर भारावले  इंदापूर शहराने शुक्रवारी एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय सांस्कृतिक सोहळा अनुभवला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त प्रथमच इंदापूरमध्ये सांस्कृतिक गीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. “शिवशंभो गर्जना” या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आणले. इतिहास, संस्कृती, पराक्रम आणि शिवभक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या या कार्यक्रमाने संपूर्ण इंदापूर शहर शिवमय झाले होते. प्रशांतमामा उंबरे युवा मंच, इंदापूर यांच्या वतीने इंदापूर नगरपालिकेसमोरील विस्तीर्ण परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रभर गाजलेला “ABHI - AAMU LIVE FOLK MUSICAL” हा सांस्कृतिक कार्यक्रम पहिल्यांदाच इंदापूरकरांच्या भेटीला आला होता. त्यामुळे कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. सायंकाळपासूनच कार्यक्रमस्थळी नागरिकांची गर्दी उसळू लागली होती. या कार्यक्रमाला इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरतभाऊ शहा, शहा स्कूलचे विश्वस्त मुकुंदभाऊ शहा, माजी ...

जुन्या आठणींना उजाळा, ११ वर्षीय देवेंद्र फडणवीसांनी एकाच वेळी ३५ पुरणपोळ्या खाऊन रचला होता विश्वविक्रम

इंदापूर;- (विशेष प्रतिनिधी) : राजकीय पटलावर आपल्या चाणाक्ष आणि आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जाणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस यांचा लहानपणीचा एक अनोखा आणि रंजक इतिहास सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे. तब्बल ४४ वर्षांपूर्वी, म्हणजेच १५ जून १९८२ रोजी प्रसिद्ध दैनिक 'तरूण भारत'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांनी एका खाण्याच्या स्पर्धेत तब्बल ३५ पुरणपोळ्या आणि १ किलो तूप फस्त करून चक्क 'विश्वविक्रम' प्रस्थापित केला होता. नागपूरमधील रेशीमबाग भागात या भव्य पुरणपोळी खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नागपूरसह संपूर्ण विदर्भातील तब्बल ९२ दिग्गज स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. मात्र, अवघ्या ११ वर्षांच्या चिमुकल्या देवेंद्र यांनी आपल्या अफाट खाण्याच्या क्षमतेच्या जोरावर सर्वांना मागे टाकत या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.प्रथम क्रमांक:देवेंद्र फडणवीस (३५ पुरणपोळ्या आणि १ किलो तूप) द्वितीय क्रमांक शैलेंद्...

“सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 इंदापूर:- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतीसोबत पूरक उद्योग उभारणे ही काळाची गरज असून, ‘सोनाई परिवाराने’ दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून उभा केलेला विकासाचा आदर्श संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. इंदापूर ते बारामती पालखी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यानिमित्त नितीन गडकरी यांनी इंदापूर तालुक्यातील गोखळी येथील ‘सोनाई डेअरी’च्या मुख्य प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली.  यावेळी सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ दादा माने व प्रविणभैय्या माने यांनी त्यांचे स्वागत करून प्रकल्पाची माहिती दिली. प्रकल्प परिसराची पाहणी करताना गडकरी यांनी दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, शेतकरी सहभाग, दूध प्रक्रिया व्यवस्था आणि ग्रामीण रोजगारनिर्मिती याबाबत विशेष समाधान व्यक्त केले. दशरथ माने यांच्या नेतृत्वाखाली सोनाई परिवाराने परिसरातील हजारो शेतकरी कुटुंबांना दुग्ध व्यवसायाशी जोडून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन उत्पन्नात वाढ, महिलांना रोजगाराच्या संधी आणि ग्...

इंदापूरच्या राजकारणात 'संगीत खुर्ची'! गडकरींच्या गाडीत बसून नेत्यांची 'जय हरी विठ्ठल' वारी;

इंदापूर:"- राजकारणात 'नेते बदलतात, पण निष्ठा बदलत नाही' असं म्हणतात. पण सध्या इंदापूर तालुक्याच्या राजकारणाने जो नवा 'म्युझिकल चेअर'चा खेळ सुरू केलाय, तो पाहून बिचाऱ्या मतदारांच्या डोक्याचा पार दही झालाय! आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी इंदापूरच्या पालखी मार्गाच्या (इंदापूर-अकलूज पट्टा) पाहणी दौऱ्यावर आले होते. गडकरी आले तर रस्ते चकाचक होणार हे उघडच आहे, पण त्यांच्या गाडीत जी 'राजकीय सरमिसळ' बसली होती, ती पाहून इंदापुरातल्या जनतेने थेट कपाळावर हात मारून घेतलाय. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (सुनेत्राताई पवार गट - महायुती) चे कृषीमंत्री दत्तूमामा भरणे बसलेले. दुसऱ्या बाजूला काल-परवापर्यंत भाजपमध्ये असलेले आणि आता थेट तुतारी हाती घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे हर्षवर्धनभाऊ पाटील. तर खाली स्वागताला भाजपचे प्रदीपदादा गारटकर आणि प्रवीणभैय्या माने! बाप रे बाप! अशी खिचडी तर हॉटेलमध्येही मिळत नाही. ज्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत एकमेकांचे कपडे फाडायचे बाकी ठेवले होते, ते सगळे नेते आज नितीन गडकरींच्या 'हायव...

*पालखी महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा*

इंदापूर  तालुक्यातील काटेवाडी ते इंदापूर तालुक्यातील सराटी गावादरम्यान अनेक वर्षांपासून रखडलेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या अपूर्ण कामाबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी प्रदीप गारटकर व युवा नेते प्रविण माने यांच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील इतर अनेक भागांमध्ये श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम पूर्ण झालेले असताना, इंदापूर तालुक्यातील काटेवाडी ते सराटी हा महत्त्वाचा टप्पा अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवासी, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि वारकरी यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दरवर्षी होणाऱ्या पालखी सोहळ्यादरम्यान या मार्गावर प्रचंड गर्दी होत असते. अशा परिस्थितीत रस्त्याचे अपूर्ण काम हे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर समस्या बनले आहे. खराब आणि अपूर्ण रस्त्यामुळे वाहतूक कोंडी, धुळीचे प्रमाण, तसेच अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची बाबही निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे...

इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग तात्या शिंदे यांच्या मातोश्री सुंदराबाई शिंदे यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन

इंदापूर  नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग तात्या शिंदे आणि बळीराम शिंदे यांच्या मातोश्री **कै. सुंदराबाई हरिभाऊ शिंदे** यांचे आज, शुक्रवार दिनांक १५ मे २०२६ रोजी वयाच्या १०२ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिंदे परिवारावर शोककळा पसरली असून इंदापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शतायुषी आयुष्य लाभलेल्या सुंदराबाई शिंदे या अत्यंत प्रेमळ आणि सुसंस्कारी व्यक्तिमत्व म्हणून परिचित होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. एक आदर्श माता आणि मार्गदर्शक गमावल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज शुक्रवार, दि. १५/०५/२०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार आहेत. अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी (जुना शहा रोड, यशवंत नगर, इंदापूर) येथून मार्गस्थ होईल. शिंदे परिवाराच्या या दुःखात शिवसृष्टी न्यूज आणि इंदापूर शहर सहभागी असून, ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना. ---