इंदापूर : उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवार (दि. 24) पासून पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडणेसाठी सतत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केलेबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी निरा भिमा कारखान्यावरती शनिवारी (दि. 25) भेट घेऊन सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. सध्या उजनी धरणाच्या पावर हाऊस मधून 1600 क्युसेक्स व दरवाजामधून 4000 क्युसेक्स याप्रमाणे एकूण 6000 क्युसेक्स या क्षमतेने भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले जात आहे. इंदापूर व माढा तालुक्यातील नदीकाठच्या गावांमधील नागरिक, ग्रामपंचायतींचे सरपंच, पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी आदींनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेत नदीत पाणी सोडण्यासाठी महत्वाची भूमिका पार पडलेबद्दल आभार व्यक्त केले. भीमा नदीकाठच्या गावांमधील व नदी पात्रातील पात्रातील पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी त्याचबरोबर जनावरांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. पाणी काटकसरी...
इंदापूर: मराठा आरक्षणाच्या लढ्यातील अग्रगण्य नेतृत्व आणि 'संघर्ष योद्धा' म्हणून ओळखले जाणारे **मा. श्री. मनोज दादा जरांगे पाटील** हे येत्या **शुक्रवारी, २४ एप्रिल २०२६** रोजी इंदापूर शहरात येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे इंदापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील हे समाजातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यासाठी इंदापूर दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन भव्य स्वरूपात करण्यात आले असून, इंदापूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवार, २४ एप्रिल २०२६,सकाळी ठीक १०:०० वाजता,गुरुकृपा सांस्कृतिक भवन, राहुल सिनेमा शेजारी, इंदापूर.येथे या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून जरांगे पाटील आरक्षणाच्या लढ्याची पुढील दिशा आणि समाजापुढील आव्हाने यावर भाष्य करण्याची शक्यता आहे. "चलो इंदापूर" असा नारा देत या सभेची तयारी सध्या जोरात सुरू आहे. प्रशासनाकडूनही या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतली जात असून, जनसमुदाया...