मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

इंदापूर शहरातील प्रत्येक प्रभाग स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध : नगराध्यक्ष भरतभाऊ शहा

स्वच्छ सर्वेक्षण २०२६' आणि 'माझी वसुंधरा अभियान अंतर्गत इंदापूर शहरातील व्यंकटेशनगर परिसर नगरपरिषदेकडून चकाचक इंदापूर :- शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये व्यापक स्वच्छता अभियान राबवून शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्यासाठी नगरपरिषद पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी दिली. केंद्र सरकारच्या 'स्वच्छ सर्वेक्षण २०२६' मिशन लाईफ' आणि राज्य सरकारच्या 'माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक सातमधील व्यंकटेशनगर परिसरात आयोजित विशेष 'स्वच्छता मोहिमेच्या' प्रसंगी ते बोलत होते. या पालिकेने शहराला देशपातळीवर आघाडीवर नेण्यासाठी हे कंबरकसून नियोजन केले आहे. इंदापूर नगर परिषदेच्या वतीने शहरामध्ये, स्वच्छ इंदापूर ! सुंदर इंदापूर !! हरित इंदापूर !!!"या त्रिसूत्री संकल्पनेतून विविध प्रभागांमध्ये अत्यंत गतिमान पद्धतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून व्यंकटेश नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान श्री बालाजी मंदिर परिसर, टाऊन हॉल परिसर, शिकलक...
अलीकडील पोस्ट

तालुक्यातील 'सहकार सम्राटाचा' माज मोडूनच काढणार..! मयूरसिंह पाटलांच्या व्हाट्सॲप स्टेटसने इंदापुरात खळबळ

इंदापूर :राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो, पण सध्या इंदापूर तालुक्यात नेत्यांच्या भाषणांपेक्षा त्यांच्या 'व्हाट्सॲप स्टेटस'चीच जास्त चर्चा रंगू लागली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयूरसिंह पाटील यांनी आपल्या व्हाट्सॲपवर ठेवलेल्या एका स्टेटसने सध्या इंदापूरच्या राजकीय गल्लीबोळांमध्ये चांगलाच उन्हाळा वाढवला आहे.मयूरसिंह पाटील यांनी आपल्या स्टेटसवर भगव्या बॅकग्राउंडवर थेट आणि धारदार शब्दांत लिहिलंय"तालुक्यातील सहकार सम्राटाचा माज मोडूनच काढणार..!केवळ एका ओळीच्या या स्टेटसने तालुक्याच्या राजकारणात 'न भूतो न भविष्यती' असा भूकंप आणला आहे. अवघ्या काही मिनिटांतच या स्टेटसचे स्क्रीनशॉट संपूर्ण इंदापूर तालुक्यात वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत.मयूरसिंह पाटील यांनी थेट नाव न घेता 'सहकार सम्राट' असा उल्लेख केल्यामुळे आता हा बाण नक्की कोणाच्या दिशेने सुटलाय, यावर चौकाचौकांत पैजा लागल्या आहेत. तालुक्यात सहकार क्षेत्रावर वर्चस्व असणाऱ्या कोणत्या मोठ्या नेत्याला मयूरसिंह यांनी हा थेट इशारा दिला आहे? आणि हा 'माज' नक्की कसा मोडला जाणा...

*पंतप्रधानांच्या 'हरित वाहतूक' आवाहनाला राजवर्धन पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद; पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू!

 इंदापूर  देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत इंदापूरचे युवा नेते राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. "हरित वाहतूक"आणि इंधन बचतीच्या दृष्टीने त्यांनी आपल्या सेवेत नवीन इलेक्ट्रिक वाहन  दाखल केले असून, आजपासून त्याचा प्रत्यक्ष वापर करण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरण संवर्धन, वाढते प्रदूषण आणि पारंपारिक इंधनाचा तुटवडा या पार्श्वभूमीवर राजवर्धन पाटील यांनी घेतलेला हा निर्णय सध्या मतदारसंघात विशेष चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.याप्रसंगी बोलताना राजवर्धन पाटील म्हणाले की, "पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि प्रदूषणमुक्त भारताच्या निर्मितीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही आजच्या काळाची गरज बनली आहे. स्वच्छ आणि हरित भविष्यासाठी आपण सर्वांनीही शक्य तितक्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करावा. वाढत्या वायुप्रदूषणामुळे आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमुळे जगभरात आता पर्यायी ऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. अशातच, इंदापूर तालुक्यातील एका अग्रगण्य युवा ...

इंदापुरात ‘स्क्रिप्टेड गुन्हेगारी’चा महाधमाका! "तक्रारी तयार करा, गुन्हे लावा आणि वसुली करा"; कोर्टाच्या आदेशाने ‘खाकी’ आणि ‘झारीतील शुक्राचार्यांचे’ धाबे दणाणले!

*इंदापूर (विशेष प्रतिनिधी): चित्रपटात दिग्दर्शक जशी स्क्रिप्ट लिहितो, तशीच काहीशी 'क्राईम स्क्रिप्ट' इंदापुरात लिहिली जात असल्याचा एक अंगावर काटा आणणारा प्रकार उघडकीस आला आहे! प्रतिष्ठित नागरिकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवायचे, पुरावे प्लांट करायचे आणि मग दबावाचे राजकारण करायचे... असा हा इंदापूर पॅटर्न! पण म्हणतात ना, "कायद्याचे हात लांब असतात", अखेर इंदापूर न्यायालयाने या ‘स्क्रिप्टेड’ प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र निंबाळकर यांच्या चौकशीचे थेट आदेश दिले आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्र. चं. बारटक्के यांनी दिलेल्या या दणक्यामुळे इंदापूरच्या पोलीस वर्तुळात आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची कथा २०१८ पासून सुरू होते. इंदापूर शहरातील नामांकित क्रिटी केअर हॉस्पिटलचे संचालक गोरख भोसले यांना फसवणुकीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा विडाच जणू तत्कालीन एपीआय महेंद्र निंबाळकर यांनी उचलला होता. यासाठी त्यांनी औंध येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अव्वल कारकून 'झेंडे' यांना व्हॉट्सअॅप...

पुणे-सोलापूर हायवेवर 'पाणी वाहून जाण्यासाठी आसणारे,, ; ढाबेवाले अन् हॉटेलचालकांनी साईट गटारेच गिळली

इंदापूर,:- पावसाळा तोंडावर आला की शासकीय पातळीवर नालेसफाई आणि पाणी वाहून जाण्यासाठी 'पावसाळापूर्व कामांची' लगबग सुरू होते. पण पुणे-सोलापूर महामार्गावर सध्या भलताच 'सांस्कृतिक आणि व्यापारी' प्रयोग पाहायला मिळतोय. महामार्गावरून पाणी सुसाट वाहून जावे म्हणून काढलेल्या साईड चाऱ्या (गटारे) महाभागांनी चक्क गायब केल्या आहेत. होय, गायब! रस्ता कडेच्या काही अपवादात्मक ढाबेवाल्यांनी, पेट्रोल पंप मालकांनी आणि हॉटेलचालकांनी आपल्या ग्राहकांच्या गाड्या आरामात लागाव्यात म्हणून या चाऱ्यांवर चक्क माती आणि मुरूम टाकून त्या बुजवून टाकल्या आहेत. आता हॉटेलमध्ये 'स्पेशल मटण थाळी' किंवा 'चिकन हंडी' ओरपायला येणाऱ्या गिऱ्हाइकांना गटारावरून उडी मारत कसं आणणार? हा विचार करून या चालकांनी 'आपला विकास, हायवेचा विनाश' हे धोरण राबवलेलं दिसतंय. पण यामुळे येत्या पावसाळ्यात महामार्गावर 'जलतरण तलाव' तयार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासकीय अधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये! या गंभीर प्रकाराची दखल सरडेवाडी टोलनाक्यावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यांनी...

साखर उद्योगासाठी केंद्र सरकारकडून दिलासादायक निर्णय; अमित शहा यांची ग्वाही -हर्षवर्धन पाटील यांची माहिती

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले  -अमित शहां समोर हर्षवर्धन पाटील यांनी मांडल्या मागण्या इंदापूर : प्रतिनिधी दि. 27/5/26                                    केंद्र सरकारकडून इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरणासाठीची व्याज सवलत योजनेतील देय व्याजाची रक्कम रू. 1400 कोटी तात्काळ अदा केली जाईल तसेच इथेनॉल दरवाढ व साखरेची विक्री किंमत रू. 43 करणे आदी मागण्यांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी चर्चा करून 10 दिवसात दिलासादायक निर्णय घेऊ, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या साखर उद्योगाच्या शिष्टमंडळास नवी दिल्ली येथे बुधवारी (दि. 27) दिली. केंद्र सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे देशातील साखर उद्योग अडचणीतून निश्चितपणे बाहेर पडेल, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बैठकीनंतर दिली.      या शिष्टमंडळ भेटी प्रसंगी गृहमंत्री अमित शहा यांचेसमोर देशातील साखर उ...

उजनी धरणाची सुरक्षा 'रामभरोसे'; गेटवरील पहारेकरी गायब, धरणात मोजणीचा 'राडा',धरणाला धोका, किसनराव तात्यांचा प्रशासनाला कडक डोस

इंदापूर विठ्ठलाच्या पंढरीला पाणी पाजणारं आणि लाखो शेतकऱ्यांची तहान भागवणारं आपलं उजनी धरण सध्या देवाच्याच भरोशावर चाललंय की काय, असा झणझणीत प्रश्न आता उपस्थित झालाय. ज्येष्ठ बागायतदार किसनराव तात्या भांगे यांनी धरणाच्या सुरक्षेवरून प्रशासनाचे पार वाभाडे काढले आहेत. उजनी धरण सध्या देवाच्या म्हणजेच 'रामभरोसे' चाललंय की काय, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. धरणाच्या या ढिसाळ कारभारावर ज्येष्ठ बागायतदार किसनराव तात्या भांगे यांनी प्रशासनाचे चांगलेच कान उपटले असून एक झणझणीत सवाल उपस्थित केला आहे.नेमकं प्रकरण काय हाय,जमिनी मोजणीचा सस्पेन्स: पूर्वी धरणासाठी शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी संपादित केल्या होत्या, त्या जमिनी अचानक सरकारने मोजायला सुरुवात केली आहे. पण ही मोजणी नक्की कशासाठी आणि कोणासाठी चालली आहे? याचं गुपित सांगायला सरकार तयार नाही.,परप्रांतीयांची 'एन्ट्री' आणि सुरक्षेचा 'एक्झिट': तात्यांचा थेट संशय आहे की, या जागेवर एखादा मोठा प्रकल्प आणण्याचा डाव आहे. प्रकल्प आला की बाहेरून परप्रांतीय कामगार येणार. मग आपल्या स्थानिक लोकांच्या हक्काचं काय? आणि इतक्या...