इंदापूर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव हद्दीत वळण रस्ता असतानाही, रस्त्यालगत लावण्यात आलेल्या एका मोठ्या जाहिरात बोर्डमुळे वाहनधारकांना समोरील वाहने दिसण्यात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले असून, टोलनाका प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त होत आहे. हिंगणगाव परिसरात महामार्गाला मोठे वळण आहे. याच वळणावर ' गोकुळ वाईन्स बार अँड लॉजिंग' नावाचा एक मोठा फलक (बोर्ड) अगदी रोडलगत लावण्यात आला आहे. वळण घेताना समोरून येणारी वाहने या बोर्डमुळे वेळेवर दिसत नाहीत. वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने या ठिकाणी छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. महामार्गाच्या नियमांनुसार वळणावर किंवा 'व्हिजिबिलिटी' बाधित होईल अशा ठिकाणी जाहिरात फलक लावणे धोकादायक आहे, मात्र तरीही हा बोर्ड हटवण्यात आलेला नाही. महामार्गावरील प्रवाशांची सुरक्षितता आणि अडथळे दूर करण्याची जबाबदारी संबंधित टोलनाका व्यवस्थापनाची आहे. मात्र, इतका मोठा धोका समोर दिसत असतानाही टोलनाका प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. ...
कारखान्यांना साखर विकास निधीतून दिलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी व्याजामध्ये 50 टक्के सवलत द्यावी-हर्षवर्धन पाटील
इंदापूर : नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या सहकार विभागाकडे व्याज व्याज सवलत मागणीचे पत्र देताना राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील. प्रतिनिधी दि. 8/4/26 देशातील साखर उद्योग सध्या आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे ऊस विकास निधी (SDF) तून साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी जाहीर करण्यात आलेल्या एकरक्कमी परतफेड योजने(ओ.टी.एस.) मध्ये व्याजाच्या एकूण देय रू. 1440.04 कोटी रक्कमेवरती 50 टक्के सवलत देण्यात यावी. परिणामी, देशातील 65 कारखान्यांना सदर एकरकमी कर्जफेड योजनेतून संपूर्ण कर्ज थकबाकी फेडीसाठी घेता येईल, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या सचिवांना भेटून नवी दिल्ली येथे मंगळवारी (दि. 7) केली. यासंबंधीचे मागणीचे निवेदन हर्षवर्धन पाटील यांनी सहकार मंत्रालयाचे सचिव आशिष कुमार भुतानी यांना दिले व यासंदर्भात सविस्तर आपले म्हणणे सादर केल...