मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

कालूखेड़ा में जैन दिवाकर कस्तूर स्थानक भवन का लोकार्पण डॉ. गौतममुनिजी की प्रमुख उपस्थिति में, जबकि उद्घाटन पुणे के आनंद दरबार के अध्यक्ष बाबासाहेब धोका के हाथों संपन्न

पुणे, डॉ. संदेश शाह।  जैन दिवाकर श्री चौथमलजी महाराज साहब के दिव्य आशीर्वाद और महासती डॉ. मधुबालाजी महाराज साहब की प्रेरणा से कालूखेड़ा (जिला रतलाम, मध्य प्रदेश) में निर्मित 'भामाशाह श्री रसिकलालजी माणिकचंदजी धारीवाल जैन दिवाकर कस्तूर भवन' का लोकार्पण बहुश्रुत कवि प्रवर्तक श्री विजय मुनिजी, उपाध्याय डॉ. गौतम मुनि, उपप्रवर्तक श्री चंद्रेश मुनि और एकांत तप आराधक वैभव मुनिजी महाराज साहब की प्रमुख उपस्थिति में किया गया। वहीं, इस भवन का उद्घाटन पुणे आनंद दरबार के अध्यक्ष बाबासाहेब धोका के कर-कमलों द्वारा संपन्न हुआ। इस अवसर पर डॉ. गौतम मुनि महाराज साहब ने कहा:"धर्मस्थल हमारी संस्कृति का प्रतिनिधित्व करते हैं और ये आत्मचिंतन व मनन के महत्वपूर्ण केंद्र हैं। हालांकि, धर्मस्थलों का उपयोग केवल धार्मिक कार्यों के लिए ही होना आवश्यक है। धर्म प्रभावना के उद्देश्य से बनाए गए इस स्थानक के निर्माण में धारीवाल परिवार ने अमूल्य योगदान दिया है, और उनका चौतरफा कार्य अत्यंत सराहनीय है।" वैभवमुनिजी महाराज साहब ने कहा कि आधुनिक सुविधाओं से युक्त धर्मस्थलों के निर्म...
अलीकडील पोस्ट

रोजगार सेवकांच्या संपाबाबत सरकारने तोडगा न काढल्यास २५ मे रोजी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण; 'आपली नाती, आपली माणसं, आपला परिवार' संघटनेचा इशारा

इंदापूर तालुक्यातील रोजगार सेवकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या काम बंद संपाला दीड महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र, राज्य सरकारने या संपाबाबत अद्यापही कोणतीही सकारात्मक भूमिका न घेता कमालीचे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, तालुक्यातील रोजगार हमी योजना (रोहयो) विभागांतर्गत चालणाऱ्या विविध योजनांची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, हातावर पोट असणाऱ्या गरीब मजुरांवर मजुरीअभावी उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, आपली नाती, आपली माणसं. आपला परिवार ग्रुप, इंदापूर तालुका'या सामाजिक संघटनेच्या वतीने येत्या **सोमवारी, दिनांक २५ मे २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कार्यालयीन वेळेत इंदापूर तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण** करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. १९ मे) इंदापूरचे तहसीलदार मा. श्री. जीवन बनसोडे साहेब आणि इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्री. सचिन खुडे साहेब यांच्यामार्फत पुणे जिल्हाधिकारी व पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच या...

महिला सक्षमीकरणासाठी पुणे जिल्हा परिषद सज्ज; मंत्री अदिती तटकरे व सभापती अंकिता पाटील ठाकरे यांची महत्त्वपूर्ण चर्चा.

महिला व बालकल्याण योजनांना मिळणार गती; मंत्री अदिती तटकरे व सभापती अंकिता पाटील ठाकरे यांची भेट. इंदापूर  प्रतिनिधी : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अंकिता पाटील ठाकरे यांनी मंत्रालय येथे भेट घेतली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोकाभिमुख उपक्रमांबाबत तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण योजनांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.         बैठकीदरम्यान महिला सक्षमीकरण, बालकांचे आरोग्य, पोषण, शिक्षण व सर्वांगीण विकास यासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांपर्यंत शासनाच्या योजना अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी नव्या उपक्रमांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सभापती अंकिता पाटील ठाकरे यांनी यावेळी दिली. महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी मा.आदितीताई तटकरे यांनी सकारात्मक भूमिका घेत आवश्य...

चलो हिंगणगाव!" उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न? उद्या प्रशासनाविरुद्ध एल्गार!

इंदापूर/हिंगणगाव उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनींवर प्रशासनाकडून बळजबरीने ताबा मिळवण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप करत, उद्या हिंगणगाव येथे शेतकरी एकत्र येऊन प्रशासकीय हुकूमशाहीविरुद्ध तीव्र संघर्ष पुकारणार आहेत. " शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, एकजुटीची ताकद!" या घोषणेसह उद्या, गुरुवार दिनांक २१ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता हिंगणगाव येथील 'मच्छबीज केंद्र' येथे मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणगाव येथील मूळ उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी कायदेशीर प्रक्रियेला बगल देऊन, हुकूमशाही पद्धतीने आणि प्रशासनाचा वापर करून बळजबरीने मोजणी करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे स्थानिक धरणग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. "पिढ्यानपिढ्या ज्या जमिनींवर शेतकऱ्यांचा हक्क आहे, त्या जमिनी प्रशासन सालगड्यासारखा वापर करून हिरावून घेऊ पाहत आहे," असा संताप आंदोलक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या अन्यायाविरुद्ध हिं...

भोंदू महाराज चक्क 'वाळू माफियांचे' गॉडफादर,होते,वाळू चोर भोंदूबाबांची अवैध प्रकरणे मिटविण्यासाठी तत्पर, वेळ प्रसंगी जिव द्यायला तयार

इंदापूर/पुणे: पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणाच्या पट्ट्यात सध्या एक अजब आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोरगरीब जनतेला देवादिकांच्या नावाखाली गंडा घालणारे आणि स्वतःला 'महात्मा' म्हणवून घेणारे भोंदू महाराज आता चक्क 'वाळू माफियांचे' संरक्षक (गॉडफादर) बनले आहेत. अंधश्रद्धेच्या दुकानातून लाखो रुपये कमवणारे हे भामटे आता थेट उजनीच्या वाळू चोरांना अभय देत असल्याचे समोर आल्याने, सामान्य जनतेच्या डोळ्यातून संतापाच्या ज्वाला बाहेर पडत आहेत. एकीकडे गोरगरीब भाविकांना "तुमचे ग्रह फिरले आहेत", "घरात दोष आहे" असे सांगून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लाटणाऱ्या या भोंदू बाबांचा दरारा मोठा आहे. मात्र, या भोंदू महाराजांची खरी माया उजनीच्या काळ्या सोन्यात म्हणजेच वाळूमध्ये दडलेली आहे. आम्ही वीरकर महाराज यांचे शिष्य आहोत, महाराजांना काही झाले तर पहीला वार आमच्यावर घेऊ म्हणणारे वाळू व्यवसायिक एवढे आंधळे झाले कसे,काही दिवसा पुर्वी इंदापूर तालुक्यातील काही पत्रकारांनी वीरकर महाराज अडचणीत येणार आशा बातम्या टाकल्या होत्या ,विरकर महाराज...

सौ.अंकिताताई मुकुंदशेठ शहा माजी नगराध्यक्षांच्या या 'ग्रीन' कार्याला इंदापूरकरांचा कडक सॅल्यूट

इंदापूर कडक उन्हाळा असो वा वाढते प्रदूषण, इंदापूरकरांना आता त्याची फिकीर उरलेली नाही. "अतिक्रमण हटाव" पेक्षा "अतिक्रमण करूच नका" हा मंत्र जपत माजी नगराध्यक्षा सौ. अंकिताताई मुकुंदशेठ शहा, यांनी इंदापूरच्या मोकळ्या पण मोक्याच्या जागांचे थेट 'मिनी फॉरेस्ट'मध्ये रूपांतर केले आहे. त्यांना त्यांचे पती मा.मुकुंदशेठ शहा [ इंदापूरचे सयाजी शिंदे,]   यांनी,मोलाची साथ दिली,घरचीच नर्सरी आसल्याने यांनी कोट्यावधी हून अधिक झाडांची,लागवड केली,अटल वन,ऑक्सिजन पार्क,इतर ठीकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे लावून वनराई बहरली जनतेला आगळा वेगळा संदेश दिला.एखाद्या नेत्याचा वाढदिवस असेल तर झाडं मात्र शहा नर्सरीतीलच लावली जातात ,अकलूज रोड आणि टेंभुर्णी रोडवर फेरफटका मारला, तर तुम्हाला इंदापूर शहरात आहोत की महाबळेश्वरमध्ये, असा प्रश्न पडल्याशिवाय भविष्यात राहणार नाही, नेहमीच सिमेंटची जंगले वाढवण्याकडे कल असतो, पण अंकिताताईंनी मात्र 'घनदाट जंगल स्टाईल'वृक्षारोपण करून इंदापूरला एक नवी ओळख दिली आहे. ज्या मोकळ्या जागांवर उद्या टपऱ्या किंवा अनधिकृत बांधकामं होण्याच...

गोरगरीब आणि सर्वसामान्यांसाठी हक्काचे व्यासपीठ: ‘केतकेश्वर सांस्कृतिक भवन’चा १३ वा वर्धापनदिन,

 इंदापूर निमगाव केतकी (प्रतिनिधी):गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात नेहमीच वरदान ठरणारे, निमगाव परिसरातील सर्व सोयींयुक्त व भव्य मंगल कार्यालय म्हणजेच केतकेश्वर सांस्कृतिक भवन’ या नामांकित कार्यालयाने आपल्या यशस्वी सेवेची १२ वर्षे पूर्ण करून १३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त परिसरातून आणि विविध स्तरातून या कार्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोणतीही मोठी गोष्ट ही एका छोट्याशा विचारातून आणि प्रामाणिक प्रयत्नातून जन्माला येते, याचाच प्रत्यय केतकेश्वर सांस्कृतिक भवनच्या प्रवासाकडे पाहताना येतो. तात्यासाहेब कोरटकर, मुख्तार मुलाणी आणि हरीशकुमार वाघमोडे या तिघांनी एकत्र येऊन सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी एका छोट्या रोपट्याच्या रूपाने या कार्यालयाची सुरुवात केली होती. आज त्यांच्या अथांग परिश्रमातून, सचोटीतून आणि उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे या रोपट्याचा एक डेरेदार वटवृक्ष झाला आहे. आजच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेला परवडेल अशा दरात, परंतु कोणतीही तडजोड न करता अत्याधुनिक आणि दर्जेदार सोयी-सुविधा पुरवण्याचे काम केतकेश्वर सांस...