मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

इंदापूर करांसाठी खुशखबर! थकीत मालमत्ता करावरील दंडात १००% सूट; नगरपरिषदेची 'अभय योजना' लागू

इंदापूर: इंदापूर शहरातील मालमत्ता धारकांसाठी नगरपरिषदेने एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आणली आहे. थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी शासनाच्या धोरणानुसार 'अभय योजना' जाहीर करण्यात आली असून, याअंतर्गत करावरील शास्ती (दंड) आणि व्याजामध्ये १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे.योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये: नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, ही योजना ठराविक कालावधीसाठी असून त्याचे निकष खालीलप्रमाणे आहेत: १००% शास्ती माफी: ३१ मार्च २०२५ अखेरपर्यंतची संपूर्ण थकीत रक्कम आणि चालू वर्षाचा मालमत्ता कर ३१ मार्च २०२६ पर्यंत भरल्यास, थकीत रकमेवरील दंडाची रक्कम पूर्णपणे माफ केली जाईल.अंतिम मुदत: या योजनेचा लाभ घेण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२६ ही आहे. केवळ दंडावर सूट: ही सवलत केवळ करावरील दंडासाठी (शास्ती) आहे. मूळ मालमत्ता कराच्या रकमेत कोणतीही सूट मिळणार नाही.एकरकमी भरणा: सवलतीचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता धारकांना दंडाची रक्कम वगळून उर्वरित सर्व कर रक्कम एकरकमी भरणे आणि नगरपरिषद कार्यालयात लेखी अर्ज करणे आवश्यक आहे. प्रशासनाचे आवाहन: मुख्याधिकारी श्री. रमेश ढगे, नगर...
अलीकडील पोस्ट

आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ मुंबई ठाणे, पालघर विभाग

मुंबई प्रतिनीधी: (सतिश पाटील ) आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ (मुंबई ठाणे पालघर विभाग) नियोजित २१ संघामध्ये  आई गावदेवी ४०+ मास्टर (भांडुप गाव ) आयोजित चाळीस वर्षावरील खेळाडूंसाठी आगरी कोळी चषक 2026 स्पर्धेचे आयोजन भांडुप गाव येथील भांडुपेश्वर कुंडा जवळील आदर्श क्रीडांगण येथे संपन्न झाले. सदर स्पर्धा एकूण मुंबई ठाणे पालघर विभागातील २१ गावातील संघांमध्ये भरवण्यात आली होती. सदर स्पर्धेचे भरवण्याचे मुख्य हेतू हा चाळीस वर्षे वरील खेळाडूंमधील जिद्द, चिकाटी दाखवण्याची तसेच आगरी कोळी समाजाला एकत्र बांधून ठेवण्या चा एका अतुल्य उपक्रम आहे.  सदर स्पर्धेत प्रथम पारितोषिक आई गावदेवी ४०+ भांडुप मास्टर द्वितीय पारितोषिक चिखलादेवी मास्टर कोपरी ठाणे  तृतीय पारितोषिक श्री पोषमात्रा भाईंदरपाडा मास्टर तृतीय पारितोषिक शेंडोबा कासारवडवली बी  चतुर्थ पारितोषिक श्रीराम बिलालपाडा मास्टर  चतुर्थ पारितोषिक श्री दत्तगुरु नवघर मास्टर ए या संघाने मिळाले आहे. या प्रसंगी अनेक सर्व पक्षीय नेते, मंडळास मदत करणारे दानशूर व पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला.

उजनी धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी, हक्कासाठी आरपारची लढाई; निलेश देवकर यांचा सुर्लीत एल्गार

इंदापूर:-  "उजनी धरणामुळे सोलापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला असला, तरी ज्यांच्या जमिनी या धरणात गेल्या, तो धरणग्रस्त शेतकरी आज ५० वर्षांनंतरही न्याय आणि हक्कासाठी वणवण फिरत आहे. त्यातच भर म्हणून जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांनी 17 जून 2019 व 8 ऑक्टोबर 2025 रोजी केलेल्या शासन निर्णयामुळे धरणग्रस्त भागातील शेतकरी व मच्छीमार यांच्यावर फार मोठा अन्याय होऊन यांना उपासमारीचे वेळ येणार आहे  आता केवळ निवेदने देऊन थांबणार नाही, तर धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आरपारची लढाई लढली जाईल," असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश देवकर यांनी दिला. माढा तालुक्यातील सुर्ली येथे आयोजित 'उजनी धरणग्रस्त शेतकरी मेळाव्यात' ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी परिसरातील शेकडो धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते..

इंदापूर तालुक्यात चिकनचे दर गगनाला भिडले; खवय्यांच्या खिशाला बसतेय कात्री

​ इंदापूर : गेल्या काही दिवसांपासून इंदापूर शहर आणि परिसरात चिकनच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. 'चिकन' हा खवय्यांच्या पसंतीचा आहार असला तरी, सध्याच्या वाढत्या किमतींमुळे मांसाहारी प्रेमींना आता विचार करावा लागत आहे. ​ दरांमध्ये मोठी वाढ ​काही दिवसांपूर्वी १५० ते १८० रुपये किलो असणारे चिकन आता चक्क  २६०  ते २८० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहे. अवघ्या काही दिवसांत दरांमध्ये झालेली ही वाढ लक्षणीय मानली जात आहे. वाढत्या उन्हाचा तडाखा आणि पोल्ट्री व्यवसायातील उत्पादनात झालेली घट हे या दरवाढीचे मुख्य कारण असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. ​ उत्पादनात घट आणि उन्हाचा परिणाम ​वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या मरतुकीचे प्रमाण वाढले आहे, ज्याचा थेट परिणाम पुरवठ्यावर झाला आहे. तसेच, पक्षी तयार होण्यासाठी लागणारा खर्च आणि खाद्याच्या किमतीत झालेली वाढ यामुळेही दरात वाढ झाली आहे. लग्नसराई आणि इतर कार्यक्रमांमुळे चिकनची मागणी वाढलेली असतानाच पुरवठा कमी झाल्याने दर कडाडले आहेत. ​ खवय्यांची प्रतिक्रिया ​"आठवड्यातून एकदा तर...

पाणी वाचवा, जीवन वाचवा, जागतिक जल दिनानिमित्त विशेष जनजागृती

इंदापूर: "करू जल संवर्धन, सुंदर बनवू जीवन" हा संदेश देत आज जगभरात 'जागतिक जल दिन' साजरा करण्यात येत आहे. वाढते तापमान आणि घटती भूजल पातळी पाहता, पाण्याचे महत्त्व ओळखून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. ​पृथ्वीवरील पाण्याचा साठा मर्यादित असून, वाढत्या लोकसंख्येमुळे आणि हवामान बदलामुळे पाणीटंचाईची समस्या गंभीर होत चालली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान असून त्याचा अपव्यय टाळणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. ​दैनंदिन जीवनात पाण्याचे नियोजन कसे कराल?  गळणारे नळ त्वरित दुरुस्त करा, जेणेकरून हजारो लिटर पाणी वाया जाणार नाही. ​ पावसाचे पाणी साठवून त्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्या. ​शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान: ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करून पाण्याची बचत करा. ​ दात घासताना किंवा भांडी घासताना नळ विनाकारण चालू ठेवू नका. ​निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला पाण्याचे संकट टाळण्यासाठी आजच जलशपथ घेण्याची वेळ आली आहे. झाडे लावा आणि पाण्याचे स्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवा. ​"पाणी हेच जीवन आहे, ते वाया घालवू नका. जल सं...

मयुर हाईट्स मुलाण पट्टा परिसरात रंगणार 'शिरखुर्मा पार्टी'चा गोडवा; आझम फाउंडेशनचा पुढाकार - अहेमदरजा सय्यद

इंदापूर:- रमजान ईदचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना, सामाजिक सलोखा आणि आनंदाची देवाणघेवाण करण्यासाठी आझम फाउंडेशनच्या वतीने उद्या, शनिवार दिनांक २१ मार्च २०२६ रोजी भव्य शिरखुर्मा पार्टी'चे आयोजन करण्यात आले आहे. ​दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फाउंडेशनने परंपरेनुसार या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम मुलाणपट्टा येथील जुम्मा मशिदी शेजारी, मयूर हाईट्स अपार्टमेंट येथे पार पडणार आहे. शनिवार सकाळी ११:०० वाजल्यापासून शिरखुर्मा पार्टीला सुरुवात होईल.​या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आझम फाउंडेशनचे अध्यक्ष अहेमदरज (तशुभाई) इक्बाल सय्यद आणि उपाध्यक्ष इमरानभाई अब्दुलहक शेख आहेत. फाउंडेशनच्या वतीने परिसरातील सर्व नागरिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आणि ईदचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ​"रमजान ईदनिमित्त आयोजित ही शिरखुर्मा पार्टी केवळ गोड मेजवानी नसून, ती आपापसातील प्रेम आणि बंधुभाव वाढवण्याचे एक माध्यम आहे," असे मत अहेमदरजा सय्यद  आयोजकांनी व्यक्त केले आहे..

कर्मयोगी सह.साखर साखर कारखान्याची ऊसाची बिले ओंकार शुगर युनिट ने थकवली; इंदापूरच्या बाजारपेठेत शुकशुकाट, बळीराजा मेटाकुटीला,

इंदापूर: कर्मयोगी सहकारी साखर कारखाना संचलित आणि बाबूराव बोत्रे यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेल्या ओंकार शुगर युनिटने शेतकऱ्यांच्या ऊसाची बीले वेळेवर न दिल्याने इंदापूर तालुक्यात संतापाची लाट उसळली. . साखर कारखाना हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असतो. उसाचे पैसे वेळेवर आले की बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. मात्र, कर्मयोगी कारखान्याने बिले थकवल्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले ,  ऐन गुडीपाडव्याच्या सनाच्या काळात हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले, असून, याचा थेट परिणाम इंदापूरच्या बाजारपेठेवर झाला आहे. ग्राहकांअभावी बाजारपेठेत सध्या पूर्णपणे 'शुकशुकाट' पाहायला मिळत आहे. लोक म्हणतात खोकला गेला आणि दुखणं आलं , शेतकऱ्यांची अवस्था बिकट,झाली, उन्हाळ्याची चाहूल लागत असताना आणि पुढील पिकांच्या नियोजनासाठी पैशांची गरज असताना, हक्काचे ऊसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मुलांचे शिक्षण, मुलींच्या डिलिव्हरी साठी दवाखान्यात भरायला पैसेच नाहीत, असुन अडचण नसून खोळंबा हक्काचा पैसा मिळत नसल्याने बापाला सावकारांच्या घराचा दरवाजा ठोठावण्याची व...