मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

उजनी धरणाची सुरक्षा 'रामभरोसे'; गेटवरील पहारेकरी गायब, धरणात मोजणीचा 'राडा',धरणाला धोका, किसनराव तात्यांचा प्रशासनाला कडक डोस

इंदापूर विठ्ठलाच्या पंढरीला पाणी पाजणारं आणि लाखो शेतकऱ्यांची तहान भागवणारं आपलं उजनी धरण सध्या देवाच्याच भरोशावर चाललंय की काय, असा झणझणीत प्रश्न आता उपस्थित झालाय. ज्येष्ठ बागायतदार किसनराव तात्या भांगे यांनी धरणाच्या सुरक्षेवरून प्रशासनाचे पार वाभाडे काढले आहेत. उजनी धरण सध्या देवाच्या म्हणजेच 'रामभरोसे' चाललंय की काय, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. धरणाच्या या ढिसाळ कारभारावर ज्येष्ठ बागायतदार किसनराव तात्या भांगे यांनी प्रशासनाचे चांगलेच कान उपटले असून एक झणझणीत सवाल उपस्थित केला आहे.नेमकं प्रकरण काय हाय,जमिनी मोजणीचा सस्पेन्स: पूर्वी धरणासाठी शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी संपादित केल्या होत्या, त्या जमिनी अचानक सरकारने मोजायला सुरुवात केली आहे. पण ही मोजणी नक्की कशासाठी आणि कोणासाठी चालली आहे? याचं गुपित सांगायला सरकार तयार नाही.,परप्रांतीयांची 'एन्ट्री' आणि सुरक्षेचा 'एक्झिट': तात्यांचा थेट संशय आहे की, या जागेवर एखादा मोठा प्रकल्प आणण्याचा डाव आहे. प्रकल्प आला की बाहेरून परप्रांतीय कामगार येणार. मग आपल्या स्थानिक लोकांच्या हक्काचं काय? आणि इतक्या...
अलीकडील पोस्ट

निरा भिमा कारखान्याच्या संचालक मंडळाची खंडाळा येथील कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांटला भेट -कारखान्याचे कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांट उभारणीचे नियोजन-हर्षवर्धन पाटील

इंदापूर : प्रतिनिधी दि.25/5/26                                           देशामध्ये ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये क्रांतीकारक बदल घडून येत आहे. या बदलाला अनुसरून शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांट (C.N.G. PLANT) उभारणीचे नियोजन सूरू केले आहे. यास अनुसरून कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांचे समवेत संचालक मंडळाने अहिरे, ता. खंडाळा येथील राज प्रोसेसच्या कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांटला रविवारी (दि. 25) भेट देऊन पाहणी केली.         निरा भीमा कारखान्याने स्थापनेपासूनच नेहमीच काळजी गरज ओळखुन सातत्याने एक पाऊल यशस्वीरित्या पुढे टाकलेले आहे, त्यानुसार  कारखान्याचे कॉम्प्रेसर बायोगॅस (CBG) उत्पादनाचे नियोजन आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी कॉम्प्रेसर बायोगॅस प्लॅन्ट पाहणी प्रसगी दिली.   ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शालेय शिक्षण विभागाच्या नूतनीकृत बालभवन इमारतीचे लोकार्पण व कोनशिला अनावरण.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज मुंबई येथे शालेय शिक्षण विभागाच्या नूतनीकृत बालभवन इमारतीचे अनावरण केले. याप्रसंगी त्यांनी इमारतीमधील प्रेक्षागृह, ग्रंथालय, संगीत कक्ष, नाटक कक्ष, बहुउद्देशीय सभागृह व कार्यालयाची पाहणी केली. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दादाजी भुसे, आमदार दिपक केसरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुणे शहरात १४ दिवसांसाठी जमावबंदी.

मुंबई प्रतिनिधी  :(सतिश पाटील ) पुणे शहरात पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असतानाच, प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. पुणे शहरात उद्या (मंगळवारी) रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी 'जमावबंदीचे आदेश' लागू करण्यात आले आहेत. या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने आणि सभा घेण्यास प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे. सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करण्यात आला आहे. जमावबंदी हा सर्वात जास्त वापरले जाणारे उपकलम आहे. मोर्चे, मिरवणुका, सभा बंद करता येतात. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांच्या जमावावर निर्बंध घातले जातात हा आदेश साधारणत १५ दिवसांपर्यंत लागू राहू शकतो; पुढे वाढवण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी लागते. कोणत्या गोष्टीवर बंदी? सध्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात राजकीय संघटना आणि सामाजिक संघटनांकडे आंदोलन करण्यात येते त्या पार्श्वभूमीवर आदेश काढलेत का? असा प्रश्न वि...

अपघातातील जखमीचा जीव वाचवून 'दाळज' वाहतूक पोलिसांची माणुसकी; नागरिकांकडून कौतुक

इंदापूर असिफभाई शेख  इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोल नाक्याजवळ, संगम हॉटेलसमोर झालेल्या एका भीषण मोटारसायकल अपघातात, दालज वाहतूक पोलीस विभागाने समयसूचकता आणि तत्परता दाखवत एका जखमी व्यक्तीचा जीव वाचवला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.सरडेवाडी टोल नाक्याजवळ मोटारसायकलचा अपघात झाल्याची माहिती मिळताच, दालज वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले. अपघात स्थळी झालेली गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता, पोलिसांनी सर्वप्रथम वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर, कोणतीही वेळ न घालवता टोल प्रशासनाच्या रुग्णवाहिकेला तातडीने पाचारण केले आणि जखमी व्यक्तीला उपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.अपघातानंतर दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि माणुसकीच्या या कार्याबद्दल खालील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक होत आहे. ए.एस.आय. भानुदास बंडगर, ए.एस.आय. ए.एस आय सतिश हिरवे,सचिन वाघ, ए.एस.आय. देविदास ढोले, हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड, हेड कॉन्स्टेबल शशिकांत खाडे  नागरिकांकडून पोलिसांचे अभिनंदन  पोलिसांच्या या तत्परत...

अवकाळी चक्रीवादळ पावसामुळे टाकळी हाजी परिसरात शेतीचे मोठे नुकसान; सरपंच दामू अण्णा घोडे यांची पंचनाम्यासाठी धाव

टाकळी हाजी: टाकळी हाजी, होणेवाडी, साळवेंद, घोडे वस्ती, थोरात वस्ती, भैरवनाथ वाडी आणि भाकरीवाडी या परिसरात आज झालेल्या अचानक अवकाळी चक्रीवादळ पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या वादळी पावसामुळे डाळिंब, केळी आणि आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. तसेच काही ठिकाणी गाईंचे गोठेही उद्ध्वस्त झाले आहेत. ## सरपंचांकडून तातडीने पाहणी आणि सूचना नुकसानीची माहिती मिळताच टाकळी हाजी गावचे आदर्श सरपंच श्री. दामू अण्णा घोडे यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार साहेब, सर्कल भाऊसाहेब आणि तलाठी दादा यांच्याशी दूरध्वनीवरून त्वरित संपर्क साधला. त्यांनी अधिकाऱ्यांना या भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ## शेतकऱ्यांना आवाहन सरपंचांनी परिसरातील सर्व प्रभावित शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या झालेल्या नुकसानीचे फोटो पंचनाम्यासाठी काढून सुरक्षित ठेवावेत, जेणेकरून शासनाकडून योग्य ती मदत मिळण्यास मदत होईल.

इंदापूर तालुक्यात वीज वितरणचा सावळागोंधळ; रात्रीच्या ऐन वेळीच ६ ते १० लाईट गुल, शेतकरी अन् जनता हैराण! 'काय चाललंय राव..!

इंदापूर: "काय चाललंय राव या तालुक्यात?" असा संतप्त सवाल सध्या इंदापूर तालुक्यातील प्रत्येक नागरिक आणि शेतकरी महावितरणला विचारत आहे. दिवसभराच्या कष्टाने दमून-भागून घरी आलेल्या जनतेला आणि पिकांना पाणी देण्याच्या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीच महावितरणकडून 'अंधाराचा शॉक' दिला जात आहे. रोज रात्री ठीक ६ ते १० या ऐन गर्दीच्या आणि गरजेच्या वेळीच वीज गायब होत असल्याने संपूर्ण इंदापूर तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे डिजिटल इंडिया आणि २४ तास विजेच्या गप्पा मारल्या जातात, तर दुसरीकडे इंदापूर तालुक्याला मात्र जाणीवपूर्वक अंधारात ढकलले जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रात्री ६ ते १० ही वेळ गृहिणींसाठी स्वयंपाकाची, मुलांसाठी अभ्यासाची आणि व्यापाऱ्यांसाठी धंद्याची असते. नेमक्या याच ४ तासांत वीज गुल करून महावितरणने जनतेचे जगणे असह्य केले आहे."रात्रीच्या वेळी साप-विंचवाचा धोका पत्करून शेतकरी शेतात जातो, पण तिथे गेल्यावर लाईट गायब असते. पिके जळून चाललीत आणि अधिकारी एसी केबिनमध्ये बसून फक्त कारणे सांगत आहेत,"** अशी संतप्त...