मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वाल्हेत संजय जगताप मित्र परिवारातर्फे इप्तार पार्टी

वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ रमजान महिन्याचे औचित्य साधून माजी आमदार संजय चंदुकाका जगताप मित्र परिवारातर्फे वाल्हे ( ता.पुरंदर ) येथील शाही सुन्नी मशिदीत सालाबादप्रमाणे रोजा इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुस्लीम बांधवांसह महिला वर्गाने देखील रोजा इप्तार पार्टीत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविल्याने मस्जिद परिसर अक्षरशः गजबजून गेला होता.  यावेळी संजय जगताप मित्र परिवारातर्फे मुस्लीम समाजातील उपवास धारकांना रोजा इप्तारीसाठी सरबत मिठाईसह फळांचे वाटप करण्यात आले.त्यानंतर मगरीबची नमाज अदा झाल्यावर रोजा इप्तार पार्टी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आल्याने मुस्लीम समाजातआनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच जातीय सलोखा अबाधित रहावा तसेच मित्रत्वाची भावना देखील वाढली पाहिजे या उद्देशाने माजी आमदार संजय जगताप मित्र परिवाराकडून पुरंदर हवेलीतील जवळपास सर्व मशिदीत इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष मोबीन बागवान यांनी दिली. या प्रसंगी मुस्लिम समाजाचे चांदभाई इनामदार आरिफ आतार आयुब इनामदार अरबाज नदाफ शौकत शेख आयान ...
अलीकडील पोस्ट

भारतीय क्रिकेट संघाचा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद नगराध्यक्ष मा.भरतशेठ शहा,

 इंदापूर :- टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा  पराभव करून विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे नगराध्यक्ष मा.भरतशेठ शहा, यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. इंदापूर तालुक्यातील सर्वच गावातील जनतेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला,विविध भागात अबालवृध्द चौकाचौकात मोठ्या स्क्रिनवर मॅच पाहण्याचा आनंद घेत होते, हि मॅच पाहतानाचा आनंद गगनात मावत नव्हता,आपण जिंकणारच आसे सगळेच बोलत होते,खेळाडूंनी त्यांची इच्छा पुर्ण केली,सलाम त्यांच्या कार्याला,आसे नगराध्यक्ष मा.भरतशेठ शहा ,म्हणाले की, आपल्या संदेशात म्हणाले की, भारतीय संघाने संपूर्ण टी-२० विश्वचषक स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, संघभावना आणि समर्पित खेळभावना ही संपूर्ण देशातील क्रीडाप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे.या ऐतिहासिक विजयामुळे देशभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले असून भारताचा तिरंगा जगभर अभिमानाने फडकावला आहे.शिवसृष्टी न्यूज शी बोलताना नगराध्यक्ष मा.भर...

वाल्हेत उदयगिरी फाउंडेशनतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

वाल्हे प्रतिनिधी: सिकंदर नदाफ  सामाजिक चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावात उदयगिरी सोशल फाउंडेशन व नाना दाते मित्र परिवारातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला . यावेळी वाल्हे ग्रामपंचायत नजीक शाहू फुले आंबेडकर अभ्यासिकेच्या सभागृहासमोर वृक्षारोपण करूनच या सन्मान सोहळ्याला सुरवात करण्यात आली.या कार्यक्रमात जेजुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक दिपाली पवार यांसह लेखिका राधिका घोरपडे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या डॉ. प्राजक्ता दुर्गाडे विधितज्ञ प्रिया दरेकर माय मराठी संघाच्या कल्पना शेरे माजी उपसरपंच सम्राज्ञी लंबाते तसेच दिपाली नलावडे धनश्री कसेकर गीता नांगरे आदी महिलांना विविध मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड उपसरपंच सागर भुजबळ सामाजिक कार्यकर्ते नाना दाते उदयगिरी फाउंडेशनचे शिवशंकर मोरे सचिन म्हसे तसेच सतीश पवार असलम नदाफ दिगंबर दाते आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र...

इंदापूर येथील हर्ष शिंदे सनदी लेखपाल परीक्षा उत्तीर्ण

इंदापूर : प्रतिनिधी दि.3/3/26                              इंदापूर येथील हर्ष प्रतीक शिंदे हे सनदी लेखपाल (सी. ए.) परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. हर्ष शिंदे यांनी राष्ट्रीय स्तरावरील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ची सी. ए. फायनल परीक्षा उत्तीर्ण होऊन हे प्रतिष्ठेचे यश संपादन केले आहे.     हर्ष शिंदे यांचे पूर्व प्राथमिकचे शिक्षण इंदापूर येथील गारटकर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे तर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विद्या प्रतिष्ठानचे इंग्लिश मिडीयम स्कूल इंदापूर येथे झाले. तर उच्च माध्यमिक व वाणिज्य पदवीचे शिक्षण पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या महाविद्यालय व कॉलेजमध्ये झाले. हर्ष शिंदे हे एल.आय.सी.चे इंदापूर येथील सेवानिवृत्त विकास अधिकारी प्रतिक सुधाकर शिंदे यांचे चिरंजीव आहेत. दरम्यान, इंदापूरचे सुपुत्र हर्ष शिंदे हे सीए झालेबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

उपबाजार भिगवणमध्ये नविन ज्वारी प्रति क्विंटल रु. 6,101/- उच्चांकी दराने विक्री- सभापती श्री. तुषार जाधव

इंदापूर तालुक्यातील उपबाजार भिगवण भुसार, मासे(मासळी) व शेळी-मेंढी बाजाराकरीता प्रसिद्ध बाजारपेठ आहे. इंदापूर बाजार समितीच्या मुख्य व उपबाजाराच्या ठिकाणी शेतमाल उघड लिलावाने विक्री, चोख वजनमाप व विक्रीनंतर शेतकऱ्यांना हिशोबपट्टी, त्वरीत रक्कम अदा केली जाते. बाजार समितीने उपबाजार भिगवण 60 मे. टन व राशीन रोडलगत बाजार आवारात 100 मे. टन क्षमतेचे भुईकाटा (वे-ब्रिज) असुन त्यांची 24 तास सेवा उपलब्ध आहे. *सद्या मका शेतमालाचे दर कमी झाल्याने इंदापूर बाजार समितीने मका हमीभाव दरात खरेदी केंद्र सुरु केल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. असे मत बाजार समितीचे मार्गदर्शक पुणे जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी सभापती श्री. आप्पासाहेब जगदाळे यांनी व्यक्त केले आहे.*        *उपबाजार भिगवण येथील भुसार मार्केटमध्ये रविवार दि. 01 मार्च-2026 रोजी नविन ज्वारीची, गहू व हरभरा शेतमाल आवक सुरु झालेली आहे. श्री. दिपक मचाले यांच्या आडतीवर ज्वारीला प्रति क्विंटल रु. 6,101/- अश्या उच्चांकी दराने श्री. महावीर वडुजकर यांनी खरेदी केली.* भुसार शेतमाल खरेदीकरीता श्री. बाळासाहेब फराटे, श्री. ...

इंदापूर नगरपरिषदेचा आर्थिक वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प मंजूर.- मा.भरतशेठ शहा नगराध्यक्ष

  इंदापूर शहराच्या नियोजनबध्द पारदर्शक व सर्वागीण विकासासाठी हा अर्थसंकल्प दिशादर्शक ठरणार दि. २७/०२/२०२६ रोजी इंदापूर नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजीराजे सभागृहात नगराध्यक्ष श्री. भरतशेठ शहा यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय सभा पार पडली. या वेळी नगराध्यक्ष श्री भरतशेठ शहा, उपनगराध्यक्ष शैलेश पवार उर्फ श्री. बाळासाहेब ढवळे, विरोधी पक्षनेते श्री अनिल पवार व सर्व सदस्य तसेच नगरपरिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नगराध्यक्ष श्री. भरतशेठ शहा यांनी आपले मनोगत मांडताना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता व आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा सुधारणा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते विकास, हरित उपक्रम डिजिटल प्रशासन, उत्पन्न् वाढ यास अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आल्याचे नमूद केले. मुख्याधिकारी, श्री रमेश ढगे यांनी अर्थसंकल्पातील तरतुदी अपेक्षीत उत्पन्न स्रोत व विकास कामांचे नियोजन या बाबत सविस्तर माहिती दिली. इंदापूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने सन 2025-26 या वित्तीय वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पासह सन 2026-27 या वित्तीय वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला. कोणतीह...

उजनी धरणग्रस्त शेतक-यांच्या अतिक्रमण हटाव नोटीस तात्काळ रद्द कराव्यात या मागणीचे निवेदन जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व कृषी मंत्री मा. दत्तात्रय भरणे (मामा) यांनी दिले.

उजनी धरणग्रस्त शेतक-यांना भिमा उपसा सिंचन विभागामार्फत पाठवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव नोटीस तात्काळ रद्द कराव्यात या मागणीचे निवेदन जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व कृषी मंत्री मा. दत्तात्रय भरणे (मामा) यांनी दिले. इंदापूर मतदारसंघातील व परिसरातील उजनी धरणग्रस्त शेतक-यांना भिमा उपसा सिंचन विभागामार्फत पाठवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव नोटीस तात्काळ रद्द कराव्यात या मागणीचे निवेदन राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व कृषी मंत्री मा. दत्तात्रय भरणे (मामा) यांनी भेटून दिले.  वास्तविक पाहता उजनी धरणाच्या निर्मितीसाठी इंदापूर, करमाळा, माढा, दौंड, कर्जत तालुक्यातील ८१ गावांनी त्याग केलेला आहे या गावातील शेतक-यांनी सर्वस्वी त्याग केलेला आहे. नाममात्र किंमतीमध्ये शासनाने हजारो शेतक-यांची मालमत्ता संपादित केलीली आहे. मात्र हा त्याग जनहितासाठी केलेला आहे. या धरणग्रस्तांचे अदयाप योग्य पुनर्वसन देखील झालेले नाही. अनेक उजनी धरणग्रस्त शेतकरी गावे, नागरी सुविधा पासून वंचि...