मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

.इंदापूरमधील बहुतांश शिक्षण संस्थांनी आता स्वत:च्याच परिसरात खाजगी 'अकॅडमी' थाटल्या,

इंदापूर (प्रतिनिधी): एकेकाळी ज्ञानाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या इंदापूर तालुक्यात आता शिक्षणाचे पूर्णपणे व्यापारीकरण' झाले असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये सध्या प्रायव्हेटायझेशनचे (खाजगीकरण)पेव फुटले असून, सर्वसामान्य आणि गोरगरीब पालकांची लूट करण्याचे जणू सत्रच सुरू झाले आहे. "शाळा राहिली बाजूला, आता सगळीकडे अकॅडमीच गाजतेय," अशी संतापजनक प्रतिक्रिया तालुक्यातील पालकांमधून उमटत आहे. इंदापूरमधील बहुतांश शिक्षण संस्थांनी आता स्वत:च्याच परिसरात खाजगी 'अकॅडमी' थाटल्या आहेत. साध्या शिक्षणापेक्षा या अकॅडमीचे शुल्क अव्वाच्या सव्वा असून, हे पैसे भरताना सामान्य शेतकऱ्याचे कंबरडे मोडत आहे. केवळ नफा कमवणे हाच एकमेव उद्देश ठेवून या संस्था कार्यरत असल्याचे दिसत आहे. ज्याप्रमाणे बारामतीमध्ये शिक्षणाचे मोठे हब झाले, मात्र तिथे सर्वसामान्यांच्या मुलांपेक्षा श्रीमंतांच्या पोरांचेच चोचले जास्त पुरवले जातात, तशीच अवस्था आता इंदापूरची होताना दिसत आहे. मोठ्या इमारती आणि जाहिरातींच्या झगमगाटात गुणवत्ते'पेक्षा 'बिलाला' जास्त महत्त्...
अलीकडील पोस्ट

इंदापूरचे माजी नगराध्यक्ष स्मृतीशेष रत्नाकरजी मखरे यांचा उद्या पाचवा स्मृतीदिन; विविध कार्यक्रमांचे आयोजन

इंदापूर: इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदापूर नगरपरिषदेसमोरील पुतळ्यांचे प्रणेते, स्मृतीशेष पॅंथर रत्नाकरजी (तात्या) मखरे यांचा पाचवा स्मृतीदिन गुरुवार, दि. १४ मे २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे. रत्नाकरजी मखरे यांनी आपल्या कार्यकाळात इंदापूरच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोलाचे योगदान दिले होते. ते मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट, इंदापूरचे अध्यक्ष तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचेही (ट्रस्ट) अध्यक्ष होते. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काळ कसोटीचा आहे, पण आम्ही कसोटीलाही सांगतो.. वारसा संघर्षाचा आहे," या विचाराने प्रेरित होऊन मखरे परिवाराच्या वतीने या स्मृतीदिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त मखरे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नामांकित महाविद्यालयात 'राडा'; कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची आणि मारहाण, प्रशासनाकडून सत्यशोधन समिती नियुक्त!

-नेहमी ज्ञानाचे धडे देणाऱ्या विद्यामंदिरात चक्क 'शाब्दिक चकमक' आणि 'धक्काबुक्की'चा थरार रंगल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगत आहे. एका नामांकित महाविद्यालयात नुकताच असा काही प्रकार घडला की, ज्यामुळे शिक्षण क्षेत्रातील शिस्तीचा पुरता बोजवारा उडाला आहे.   प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक यांना फ्री स्टाईल मारहाण करत असतील तर विद्यार्थ्यांनी यातून काय बोध घ्यावा आणि विद्यार्थ्यांना तुम्ही कसे शिक्षण देत आहात याचा सर्वसामान्य माणूस नक्की विचार करेल म्हणून प्राध्यापकांनी सामाजिक जाणीव ठेवून कार्य करण्याचे भान ठेवणे आवश्यक आहे केवळ नावापुढे 'प्राध्यापक' किंवा 'अधीक्षक' लागल्याने माणूस सुसंस्कृत होत नाही. खरी पदवी ही तुमच्या वर्तणुकीतून दिसते. जर उच्चशिक्षित लोक रस्त्यावरच्या गुंडांसारखे वागत असतील, तर त्यांच्या पुस्तकी ज्ञानाची किंमत शून्य आहे. ताकद दाखवण्यासाठी हात उचलण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे शब्दांचे आणि कायद्याचे बळ नसते, तेच सहसा हिंसेचा आधार घेतात. वादावर चर्चेने मात करणे हाच सुशिक्षितपणाचा खरा मार्ग आहे.शिक्षक हे समाजाचे आरसा अस...

इंदापुरात घुमणार शंभूराजांचा जयघोष ! १४ मे रोजी भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन

इंदापूर: स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त इंदापूर शहरात 'छत्रपती संभाजी युथ फाउंडेशन'च्या वतीने भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी, दि. १४ मे रोजी सायंकाळी ५:०० वाजता या ऐतिहासिक सोहळ्याला सुरुवात होणार आहे. शहरातील प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या इंद्रेश्वर चौक, पंधारा येथून ही मिरवणूक निघणार आहे. या सोहळ्यासाठी इंदापूर परिसरातील शिव-शंभू प्रेमी मोठ्या संख्येने एकत्र येणार असून, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि भगव्या पताक्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. 'छत्रपती संभाजी युथ फाउंडेशन'ने या कार्यक्रमाचे नियोजन केले असून, मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी स्वयंसेवक सज्ज झाले आहेत. "ताठ होती मान, उंच होतील नजरा, या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा" या भावनेने इंदापूरकर या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जळालेले डीपी तात्काळ बदला, नवीन डीपी मंजुरीस गती द्या : सभापती अंकिता हर्षवर्धन पाटील

 इंदापूर:- विषय समित्यांची नुकतीच निवड झाल्यानंतर जिल्हा परिषद पुणे स्थायी समितीची आणि जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.वीरधवल जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागात डीपी जळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे डीपी जळाल्याचा अहवाल प्राप्त होताच तात्काळ नवीन डीपी बसवण्यात यावेत, जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा तसेच जनावरांच्या पाण्याची समस्या निर्माण होणार नाही या मागण्या केल्या. तसेच, ज्या ठिकाणी नवीन डीपीची मागणी प्रलंबित आहे त्या सर्व ठिकाणी तातडीने मंजुरी देऊन नवीन डीपी बसवण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.          प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा.विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.गजानन पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती मा.दिपाली हुलावळे, समाजकल्याण सभापती मा.जितेंद्र ब...

पैशांचा पाऊस की खिशाला भोक.? माढ्यात 'गुरुमाऊली'चा कासव-बाजार उद्ध्वस्त..! इंदापूर कनेक्शन काय..!

माढा/टेंभुर्णी: एकीकडे इस्रो चंद्रावर पाऊल ठेवत असताना, दुसरीकडे सोलापूरच्या माढ्यात मात्र काही लोक अजूनही 'कासवाच्या पाठीवर' बसून श्रीमंतीच्या स्वप्नांची सफर करत आहेत. मनोहर मामाच्या 'प्रसादानंतर' आता माढ्यात **नाना महाराज उर्फ गुरुमाऊली वीरकर** या दुसऱ्या महाठगाचा 'मोक्ष' झाला आहे. टेंभुर्णी पोलिसांनी भल्या पहाटे या 'माऊलीं'ना साखरझोपेतून उचलले आणि थेट कोठडीची हवा दाखवली. ' कासव' नेले अन नशीब फुटले!** एका पीडित तरुणाला या बाबाने चक्क पैशांच्या पावसाचे' स्वप्न दाखवले होते. "माझं हे खास कासव घरी ने, मग बघ तुझ्यावर लक्ष्मी कशी प्रसन्न होते," अशी थाप मारून बाबाने त्या तरुणाकडून तब्बल ५ लाख रुपये उकळले.  नशीब तर चमकले नाहीच, पण कासवाच्या नादात तरुणाचा खिसा मात्र 'कासवाच्या गतीने' रिकामा झाला आणि कर्जाचा डोंगर मात्र 'बिबट्याच्या वेगाने' वाढला!   पहाटेचा थरार: पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक ' अनेक राजकीय नेत्यांचे वरदहस्त असल्याने हे बाबा हवेत तरंगत होते. पण, आज पहाटे टेंभुर्णी पोलिसांनी असा काही 'चमत...

इंदापूर ते पुणे एसटीचा ‘ढाबा’ प्रवास: प्रवाशांच्या खिशाला कात्री, एसटी प्रशासनाचे मात्र ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष!

इंदापूर (विशेष बातमी प्रतिनिधी) इंदापूर ते पुणे प्रवासादरम्यान एसटी महामंडळाच्या बस आता अधिकृत बसथांब्यांवर न थांबता चक्क 'बेकायदेशीर' हॉटेल आणि ढाब्यांवर थांबवण्याचा सपाटा सुरू आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी धावणारी एसटी आता चहा-पाणी आणि जेवणाच्या नावाखाली प्रवाशांच्या खिशाला कात्री लावत असून, यामागे काहीतरी 'दाल में काला' असल्याची चर्चा प्रवाशांमधून रंगली आहे. अधिकृत बोर्डाचे नाटक कशासाठी?  एका बाजूला अधिकृत बसथांब्याचे फलक लावून तिथेच गाड्या थांबवण्याचा दिखावा केला जातो, तर दुसरीकडे मात्र बस थेट हॉटेलच्या पार्किंगमध्ये वळवली जाते. हे कशाचे द्योतक आहे? परवानगीचा घोळ काय? या खासगी हॉटेल आणि ढाब्यांना एसटी बसेस थांबवण्याची अधिकृत परवानगी कोणत्या अटींवर देण्यात आली आहे? गाड्यांची मर्यादा किती? संबंधित ढाब्यावर दिवसाला नेमक्या किती बसेस थांबवण्याची परवानगी देण्यात आली आहे? दरपत्रकाचे काय झाले? परवानगी देताना हॉटेल किंवा ढाबा चालकांना एसटी प्रशासनाने कोणतेही दरपत्रक (Rate Card) दिले होते का?  एफडीए (FDA) सुस्त, हॉटेल चालक मालामाल! सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्...