इंदापूर दि.१७(प्रतिनिधी) - इंदापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ट्रस्ट इंदापूर तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोरोनाचा काळ वगळता सलग ११ वर्षापासून साजरी करण्यात येत आहे. परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात दि.२८ जानेवारी २०२६ रोजी दुर्दैवी दुखःद निधन झाल्याने सबंध राज्यात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून हळूहळू व्यक्त केली जात आहे. आमच्या मनातही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाने अत्यंत दुःख व संवेदना आहे. त्यामुळे यंदा दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी निघणारी जेतवन बुद्धविहार (डॉ. आंबेडकरनगर) ते इंदापूर नगरपालिका मैदान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची मिरवणूक व विविध कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय जयंती महोत्सव समितीच्या वतीने घेतला असल्याची माहिती कमिटीचे आयोजक ॲड. राहुल मखरे यांनी पत्रकारांना दिली आहे.
‘ इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये महिला समृध्दीचा निर्धार नवी दिल्ली, दि. १६ : आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात एआयमुळे रोजगाराच्या संधी आणि स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलणार असून महिलांनी या तंत्राच्या केवळ ‘वापरकर्त्या’ म्हणून न राहता संशोधक आणि निर्माते होऊन नव्या परिवर्तनाचे नेतृत्व करावे. महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास होउ शकेल असा आशावाद राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज येथे व्यक्त केला. दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये आज दुपारी राष्ट्रीय महिला आयोग , आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आणि संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण व संशोधन संस्था (युनिटार) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एआय आणि आर्थिक शक्ती - महिला नेतृत्वातील समृद्धीची रूपरेषा या विषयावर आयोजित विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळ...