मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सरडेवाडी येथे 'एक गाव, एक पोलीस' अंतर्गत पोलीस अंमलदारांची भेट; ग्रामस्थांना सुरक्षा व नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शन

इंदापूर: राज्य शासनाच्या 'एक गाव, एक पोलीस' या संकल्पनेअंतर्गत इंदापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदार **कल्याणी विजय जाधव (ASI, ब. नं. 79)** यांनी दि. १ मे २०२६ रोजी सरडेवाडी गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधून गावच्या सुरक्षेबाबत विविध सूचना दिल्या.सकाळी ८:०० ते ८:३० या वेळेत झालेल्या या भेटीदरम्यान जाधव यांनी गावातील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक आणि ग्रामपंचायत सदस्यांशी सविस्तर चर्चा केली. हिंगणगावचे पोलीस पाटील उपस्थित होते.यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला:  सीसीटीव्ही यंत्रणा:गावातील मुख्य चौक आणि गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सूचना दिल्या. सद्यस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयासमोर कॅमेरे बसवण्यात आले असून, हायवे रोडवरील महत्त्वाच्या ठिकाणीही यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.  महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि जनजागृती करण्याबाबत चर्चा झाली.  केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन BNS (भारतीय ...
अलीकडील पोस्ट

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

इंदापूर (पुणे ग्रामीण): [असिफभाई शेख यांचेकडन ] इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे सासरच्या छळाला कंटाळून एका १९ वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी पती, दीर आणि सासू अशा तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी विकास शिंदे (वय १९ वर्षे ७ महिने) असे मृत विवाहितेचे नाव आहे. शिवानीचा विवाह मे २०२५ मध्ये वरकुटे बुद्रुक येथील विकास अजिनाथ शिंदे याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत होते. मात्र, त्यानंतर पती विकास, दीर प्रकाश आणि सासू सुरेखा शिंदे यांनी शिवानीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली.फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी तिला नेहमी फोनवर कोणाशी बोलते, यावरून टोचून बोलत असत. तसेच, वॉटर फिल्टर प्लांट टाकण्यासाठी माहेरून २ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. या जाचाला कंटाळून शिवानीने सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन ...

उजणीच्या कुशीत 'वाळू'माफियांचा बाजार; प्रशासनाच्या डोळ्यावर 'गांधीजी,पण जातीयवाद बोकाळणार, मोठ्या रक्तापाताची प्रतीक्षा ? मुडदे पडतील याला जबाबदार कोण.?

इंदापूर | विशेष प्रतिनिधी उजणी धरण म्हणजे सोलापूर आणि पुण्याची जीवनवाहिनी. पण सध्या ही जीवनवाहिनी वाळू चोरांसाठी 'सोन्याची अंडी देणारी कोंबडी' ठरत आहे. प्रशासकीय यंत्रणेने डोळ्यावर गांधी वादाची पट्टी बांधली आहे की काय, असा सवाल आता सामान्य जनता विचारू लागली आहे. इंदापूर तालुक्यातील बॅकवॉटरच्या गावांमध्ये सध्या जो नंगानाच सुरू आहे, तो पाहता येथे ' खाकी'चा धाक उरलाय की 'खादी'च्या आशीर्वादाने हे दुकान सुरू आहे , हे शोधण्याची वेळ आली आहे. वाळू उपसा हा केवळ पर्यावरणाचा ऱ्हास नाही, तर तो आता सामाजिक शांततेसाठी 'कॅन्सर' ठरू लागला आहे. या अवैध व्यवसायातून जातीयवादाचे विष पेरले जात असून, वर्चस्ववादातून मोठा रक्तापात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण खेळात 'झारीतील शुक्राचार्य' नेमके कोण आहेत? हे शुक्राचार्य एसी केबिनमध्ये बसून वसुलीचे आकडे मोजत आहेत की बांधावर उभे राहून मलिदा खात आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान पुणे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसमोर आहे.असे म्हणतात की 'पैसा फेकला की तमाशा दिसतो', पण इथे पैसा फे...

गायीला 'राज्यमाता' दर्जा द्या; इंदापुरात तहसीलदारांना निवेदनराधाई रुक्मिणी गोशाळा ट्रस्टची मागणी; 'गो सन्मान आवाहन अभियाना'तंर्गत प्रशासनाला साकडे.

इंदापूर :संपूर्ण भारतात राबविल्या जाणाऱ्या 'गो सन्मान आवाहन अभियाना'च्या पार्श्वभूमीवर, इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथील **राधाई रुक्मिणी गोशाळा ट्रस्ट**च्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन आज इंदापूरचे तहसीलदार यांना देण्यात आले. गायीला 'राज्यमाता' आणि 'राष्ट्रधरोहर' असा दर्जा देण्यात यावा, ही या निवेदनाची प्रमुख मागणी आहे. २७ एप्रिल हा दिवस 'गो सन्मान दिवस'** म्हणून साजरा करत असताना, देशभरातील गोप्रेमी आपल्या स्थानिक महसूल कार्यालयामार्फत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना आपले गाऱ्हाणे मांडत आहेत. याच अनुषंगाने हिंगणगाव येथील गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष **श्री. नितीन मारुती आरडे पाटील** यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.  गो सेवागायींच्या संगोपन, संवर्धन आणि संशोधनासाठी गोशाळांना आवश्यक तो शासकीय निधी आणि अनुदान उपलब्ध करून द्यावे.  गो सुरक्षा, संपूर्ण देशभरात गोहत्या पूर्णपणे बंद करण्यासाठी कठोर आणि एकसमान केंद्रीय कायदा तातडीने लागू करावा. गो सन्मान गायीला केवळ प्राणी न मानता तिला 'राज्...

उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले ; नागरिकांनी हर्षवर्धन पाटील यांचे मानले आभार!

इंदापूर : उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवार (दि. 24) पासून पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडणेसाठी सतत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केलेबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी निरा भिमा कारखान्यावरती शनिवारी (दि. 25) भेट घेऊन सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.        सध्या उजनी धरणाच्या पावर हाऊस मधून 1600 क्युसेक्स व दरवाजामधून 4000 क्युसेक्स याप्रमाणे एकूण 6000 क्युसेक्स या क्षमतेने भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले जात आहे. इंदापूर व माढा तालुक्यातील नदीकाठच्या गावांमधील नागरिक, ग्रामपंचायतींचे सरपंच, पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी आदींनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेत नदीत पाणी सोडण्यासाठी महत्वाची भूमिका पार पडलेबद्दल आभार व्यक्त केले.    भीमा नदीकाठच्या गावांमधील व नदी पात्रातील पात्रातील पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी त्याचबरोबर जनावरांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. पाणी काटकसरी...

इंदापुरात गुंजणार 'संघर्ष योद्धा'चा आवाज; मनोज जरांगे पाटील २४ एप्रिलला येणार!

इंदापूर: मराठा आरक्षणाच्या लढ्यातील अग्रगण्य नेतृत्व आणि 'संघर्ष योद्धा' म्हणून ओळखले जाणारे **मा. श्री. मनोज दादा जरांगे पाटील** हे येत्या **शुक्रवारी, २४ एप्रिल २०२६** रोजी इंदापूर शहरात येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे इंदापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील हे समाजातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यासाठी इंदापूर दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन भव्य स्वरूपात करण्यात आले असून, इंदापूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवार, २४ एप्रिल २०२६,सकाळी ठीक १०:०० वाजता,गुरुकृपा सांस्कृतिक भवन, राहुल सिनेमा शेजारी, इंदापूर.येथे या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून जरांगे पाटील आरक्षणाच्या लढ्याची पुढील दिशा आणि समाजापुढील आव्हाने यावर भाष्य करण्याची शक्यता आहे. "चलो इंदापूर" असा नारा देत या सभेची तयारी सध्या जोरात सुरू आहे. प्रशासनाकडूनही या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतली जात असून, जनसमुदाया...

माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी उषा कोपुलवार

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी उषा श्रीकांत कोपुलवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्राद्वारे सदरची निवड जाहीर केली असून या निवडीमुळे कामगार चळवळीला नव्याने बळ मिळणार असल्याची भावना सर्वसामान्य वर्गामधून व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून उषा कोपुलवार यांनी सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात देखील आपल्या नावाचा आगळा वेगळा ठसा उमटविला होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदाची जवाबदारी त्यांना देण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष उमेश पाटील तसेच कार्याध्यक्ष महेश पाटील व सरचिटणीस प्रसाद तनपुरे यांनी दिली. तर या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते मनोज साळवे राकेश वाघमारे अतुल चव्हाण रवी शिंगे गणेश गायकवाड विजय राठोड राजन नायर स्वाती शिंगे आरपीआयचे अध्यक्ष शैलेंद्र भोसले यांसह विविध सामाजिक संघटनेच्या वतीने उषा कोपुलवार यांचा विशेष सत्कार देखील क...