मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले -अमित शहां समोर हर्षवर्धन पाटील यांनी मांडल्या मागण्या इंदापूर : प्रतिनिधी दि. 27/5/26 केंद्र सरकारकडून इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरणासाठीची व्याज सवलत योजनेतील देय व्याजाची रक्कम रू. 1400 कोटी तात्काळ अदा केली जाईल तसेच इथेनॉल दरवाढ व साखरेची विक्री किंमत रू. 43 करणे आदी मागण्यांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी चर्चा करून 10 दिवसात दिलासादायक निर्णय घेऊ, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या साखर उद्योगाच्या शिष्टमंडळास नवी दिल्ली येथे बुधवारी (दि. 27) दिली. केंद्र सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे देशातील साखर उद्योग अडचणीतून निश्चितपणे बाहेर पडेल, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बैठकीनंतर दिली. या शिष्टमंडळ भेटी प्रसंगी गृहमंत्री अमित शहा यांचेसमोर देशातील साखर उ...
उजनी धरणाची सुरक्षा 'रामभरोसे'; गेटवरील पहारेकरी गायब, धरणात मोजणीचा 'राडा',धरणाला धोका, किसनराव तात्यांचा प्रशासनाला कडक डोस
इंदापूर विठ्ठलाच्या पंढरीला पाणी पाजणारं आणि लाखो शेतकऱ्यांची तहान भागवणारं आपलं उजनी धरण सध्या देवाच्याच भरोशावर चाललंय की काय, असा झणझणीत प्रश्न आता उपस्थित झालाय. ज्येष्ठ बागायतदार किसनराव तात्या भांगे यांनी धरणाच्या सुरक्षेवरून प्रशासनाचे पार वाभाडे काढले आहेत. उजनी धरण सध्या देवाच्या म्हणजेच 'रामभरोसे' चाललंय की काय, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. धरणाच्या या ढिसाळ कारभारावर ज्येष्ठ बागायतदार किसनराव तात्या भांगे यांनी प्रशासनाचे चांगलेच कान उपटले असून एक झणझणीत सवाल उपस्थित केला आहे.नेमकं प्रकरण काय हाय,जमिनी मोजणीचा सस्पेन्स: पूर्वी धरणासाठी शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी संपादित केल्या होत्या, त्या जमिनी अचानक सरकारने मोजायला सुरुवात केली आहे. पण ही मोजणी नक्की कशासाठी आणि कोणासाठी चालली आहे? याचं गुपित सांगायला सरकार तयार नाही.,परप्रांतीयांची 'एन्ट्री' आणि सुरक्षेचा 'एक्झिट': तात्यांचा थेट संशय आहे की, या जागेवर एखादा मोठा प्रकल्प आणण्याचा डाव आहे. प्रकल्प आला की बाहेरून परप्रांतीय कामगार येणार. मग आपल्या स्थानिक लोकांच्या हक्काचं काय? आणि इतक्या...