इंदापूर,:- पावसाळा तोंडावर आला की शासकीय पातळीवर नालेसफाई आणि पाणी वाहून जाण्यासाठी 'पावसाळापूर्व कामांची' लगबग सुरू होते. पण पुणे-सोलापूर महामार्गावर सध्या भलताच 'सांस्कृतिक आणि व्यापारी' प्रयोग पाहायला मिळतोय. महामार्गावरून पाणी सुसाट वाहून जावे म्हणून काढलेल्या साईड चाऱ्या (गटारे) महाभागांनी चक्क गायब केल्या आहेत. होय, गायब! रस्ता कडेच्या काही अपवादात्मक ढाबेवाल्यांनी, पेट्रोल पंप मालकांनी आणि हॉटेलचालकांनी आपल्या ग्राहकांच्या गाड्या आरामात लागाव्यात म्हणून या चाऱ्यांवर चक्क माती आणि मुरूम टाकून त्या बुजवून टाकल्या आहेत. आता हॉटेलमध्ये 'स्पेशल मटण थाळी' किंवा 'चिकन हंडी' ओरपायला येणाऱ्या गिऱ्हाइकांना गटारावरून उडी मारत कसं आणणार? हा विचार करून या चालकांनी 'आपला विकास, हायवेचा विनाश' हे धोरण राबवलेलं दिसतंय. पण यामुळे येत्या पावसाळ्यात महामार्गावर 'जलतरण तलाव' तयार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासकीय अधिकारी अॅक्शन मोडमध्ये! या गंभीर प्रकाराची दखल सरडेवाडी टोलनाक्यावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यांनी...
साखर उद्योगासाठी केंद्र सरकारकडून दिलासादायक निर्णय; अमित शहा यांची ग्वाही -हर्षवर्धन पाटील यांची माहिती
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले -अमित शहां समोर हर्षवर्धन पाटील यांनी मांडल्या मागण्या इंदापूर : प्रतिनिधी दि. 27/5/26 केंद्र सरकारकडून इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरणासाठीची व्याज सवलत योजनेतील देय व्याजाची रक्कम रू. 1400 कोटी तात्काळ अदा केली जाईल तसेच इथेनॉल दरवाढ व साखरेची विक्री किंमत रू. 43 करणे आदी मागण्यांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी चर्चा करून 10 दिवसात दिलासादायक निर्णय घेऊ, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या साखर उद्योगाच्या शिष्टमंडळास नवी दिल्ली येथे बुधवारी (दि. 27) दिली. केंद्र सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे देशातील साखर उद्योग अडचणीतून निश्चितपणे बाहेर पडेल, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बैठकीनंतर दिली. या शिष्टमंडळ भेटी प्रसंगी गृहमंत्री अमित शहा यांचेसमोर देशातील साखर उ...