मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नितीन गडकरी दि.10 एप्रिलला तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी करणार- हर्षवर्धन पाटील-

नितीन गडकरी दि.10 एप्रिलला तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी करणार- हर्षवर्धन पाटील - इंदापूर : प्रतिनिधी दि.28/3/26                                                संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गा (राष्ट्रीय महामार्ग 965 जी ) ची आपण स्वतः येऊन पाहणी करून आढावा घ्यावा, अशी विनंती केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर येथे भेटीत आज शनिवारी (दि. 28) केली. त्यास तात्काळ होकार देत ना.नितीन गडकरी हे पुढील महिन्यामध्ये दि. 10 एप्रिल रोजी संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी करणेसाठी येणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.            नागपूर येथे ना.नितीन गडकरी यांची हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेऊन संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या अपूर्ण व व निकृष्ट कामांबद्दल चर्चा केली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नितीन गडकरी यांचेकडे पालखी मार्गावरील ठिकठिकाणीचे उड्डाणपूल, भुय...
अलीकडील पोस्ट

प्रदीप गारटकर यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापुरात 'वन बूथ - टेन युथ' अभियानाचा श्रीगणेशा; वाढदिवसाला हार-तुऱ्यांऐवजी पुस्तकांचे आवाहन

इंदापूर: लोकनेते प्रदीप दादा गारटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावर्षी इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीसाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. "माझ्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवतानाच पक्षाची बांधणी अधिक भक्कम करण्यावर भर द्यावा," असे आवाहन स्वतः प्रदीप दादा गारटकर यांनी कार्यकर्त्यांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी 'वन बूथ - टेन युथ' हा संकल्प केला आहे. संघटनात्मक बांधणीवर भर: 'वन बूथ - टेन युथ' भारतीय जनता पार्टीच्या बळकटीकरणासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक बूथवर जाऊन कार्यकर्त्यांची फौज उभी केली जात आहे. या अभियानांतर्गत:  * प्रत्येक बूथवर एक बी.एल.ए. (Booth Level Assistant) आणि १० तरुण कार्यकर्त्यांची निवड केली जात आहे.  * हे अभियान २९ मार्च ते ०४ एप्रिल २०२६ या सात दिवसांच्या कालावधीत संपूर्ण तालुक्यात राबवले जाणार आहे. रविवारी बूथ प्रमुखांचा भव्य मेळावा या अभियानाची अधिकृत सुरुवात आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सा...

तरंगवाडीत 'अखंड हरिनाम सप्ताह' व 'ज्ञानेश्वरी पारायण' सोहळ्याचा उत्साह; हनुमान जयंती निमित्त भव्य आयोजन

इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे हनुमान जयंतीचे औचित्य साधून २७ व्या 'अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे' भव्य आयोजन करण्यात आले आहे. २६ मार्च २०२६ ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत हा सोहळा स्थानिक हनुमान मंदिरात संपन्न होणार असून, पंचक्रोशीतील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विद्वान कीर्तनकारांची मांदियाळी या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे दररोज नामवंत कीर्तनकारांची प्रवचने आणि कीर्तने होणार आहेत. ह.भ.प. आकाश महाराज शेटे (आळंदीकर) यांच्या व्यासपीठ चालकत्वाखाली हा सोहळा पार पडत आहे. सप्ताहात खालीलप्रमाणे कीर्तन सेवा होणार आहे:  * २६ मार्च: ह.भ.प. दत्तात्रय महाराज गलांडे (रामजन्माचे कीर्तन) आणि ह.भ.प. प्रमोद महाराज शिंदे.  * २७ मार्च: ह.भ.प. निलेश महाराज कोरडे.  * २८ मार्च: ह.भ.प. श्रीराम महाराज गुलदगड.  * २९ मार्च: ह.भ.प. आकाश महाराज गरगडे.  * ३० मार्च: ह.भ.प. वैष्णवीताई महाराज महानुवर.  * ३१ मार्च: ह.भ.प. राम महाराज अभंग.  * १ एप्रिल: ह.भ.प. विकास महाराज देवडे.  * २ एप्रिल: ह.भ.प. लालासो ...

भक्तांच्या वाटेत खड्डे अन् प्रशासनाच्या खिशात टोल;संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील इंदापूर-अकलुज रस्तेकामाचा बोजवारा..!

इंदापूर: संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे 'राष्ट्रीय महामार्ग' म्हणून मोठ्या थाटामाटात नामकरण झाले खरे, मात्र जमिनीवरची परिस्थिती अत्यंत विदारक आहे. इंदापूर ते अकलुज दरम्यानच्या रस्त्याचे काम अद्यापही रेंगाळलेले असताना, दुसरीकडे वाहनधारकांकडून मात्र सक्तीने टोल वसुली सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. काम अर्ध्यावर, टोल जोमात इंदापूर-अकलुज भागात अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण अपूर्ण आहे. रस्ता ठिकठिकाणी उखडलेला असून वाहन चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, रस्ता पूर्ण झालेला नसतानाही टोल नाका मात्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला आहे. " रस्ता नाही तर टोल कशाचा? " असा सवाल आता स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून विचारला जात आहे. बावडा बायपास 'बंद'च! या मार्गावरील बावडा येथील बायपासचे काम रखडल्याने हा भाग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला झालेला नाही. बायपास बंद असल्याने वाहतुकीचा सर्व ताण मुख्य गावातून किंवा अरुंद रस्त्यांवरून येत आहे. परिणामी, दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोक...

इंदापूर करांसाठी खुशखबर! थकीत मालमत्ता करावरील दंडात १००% सूट; नगरपरिषदेची 'अभय योजना' लागू

इंदापूर: इंदापूर शहरातील मालमत्ता धारकांसाठी नगरपरिषदेने एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आणली आहे. थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी शासनाच्या धोरणानुसार 'अभय योजना' जाहीर करण्यात आली असून, याअंतर्गत करावरील शास्ती (दंड) आणि व्याजामध्ये १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे.योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये: नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, ही योजना ठराविक कालावधीसाठी असून त्याचे निकष खालीलप्रमाणे आहेत: १००% शास्ती माफी: ३१ मार्च २०२५ अखेरपर्यंतची संपूर्ण थकीत रक्कम आणि चालू वर्षाचा मालमत्ता कर ३१ मार्च २०२६ पर्यंत भरल्यास, थकीत रकमेवरील दंडाची रक्कम पूर्णपणे माफ केली जाईल.अंतिम मुदत: या योजनेचा लाभ घेण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२६ ही आहे. केवळ दंडावर सूट: ही सवलत केवळ करावरील दंडासाठी (शास्ती) आहे. मूळ मालमत्ता कराच्या रकमेत कोणतीही सूट मिळणार नाही.एकरकमी भरणा: सवलतीचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता धारकांना दंडाची रक्कम वगळून उर्वरित सर्व कर रक्कम एकरकमी भरणे आणि नगरपरिषद कार्यालयात लेखी अर्ज करणे आवश्यक आहे. प्रशासनाचे आवाहन: मुख्याधिकारी श्री. रमेश ढगे, नगर...

आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ मुंबई ठाणे, पालघर विभाग

मुंबई प्रतिनीधी: (सतिश पाटील ) आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ (मुंबई ठाणे पालघर विभाग) नियोजित २१ संघामध्ये  आई गावदेवी ४०+ मास्टर (भांडुप गाव ) आयोजित चाळीस वर्षावरील खेळाडूंसाठी आगरी कोळी चषक 2026 स्पर्धेचे आयोजन भांडुप गाव येथील भांडुपेश्वर कुंडा जवळील आदर्श क्रीडांगण येथे संपन्न झाले. सदर स्पर्धा एकूण मुंबई ठाणे पालघर विभागातील २१ गावातील संघांमध्ये भरवण्यात आली होती. सदर स्पर्धेचे भरवण्याचे मुख्य हेतू हा चाळीस वर्षे वरील खेळाडूंमधील जिद्द, चिकाटी दाखवण्याची तसेच आगरी कोळी समाजाला एकत्र बांधून ठेवण्या चा एका अतुल्य उपक्रम आहे.  सदर स्पर्धेत प्रथम पारितोषिक आई गावदेवी ४०+ भांडुप मास्टर द्वितीय पारितोषिक चिखलादेवी मास्टर कोपरी ठाणे  तृतीय पारितोषिक श्री पोषमात्रा भाईंदरपाडा मास्टर तृतीय पारितोषिक शेंडोबा कासारवडवली बी  चतुर्थ पारितोषिक श्रीराम बिलालपाडा मास्टर  चतुर्थ पारितोषिक श्री दत्तगुरु नवघर मास्टर ए या संघाने मिळाले आहे. या प्रसंगी अनेक सर्व पक्षीय नेते, मंडळास मदत करणारे दानशूर व पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला.

उजनी धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी, हक्कासाठी आरपारची लढाई; निलेश देवकर यांचा सुर्लीत एल्गार

इंदापूर:-  "उजनी धरणामुळे सोलापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला असला, तरी ज्यांच्या जमिनी या धरणात गेल्या, तो धरणग्रस्त शेतकरी आज ५० वर्षांनंतरही न्याय आणि हक्कासाठी वणवण फिरत आहे. त्यातच भर म्हणून जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांनी 17 जून 2019 व 8 ऑक्टोबर 2025 रोजी केलेल्या शासन निर्णयामुळे धरणग्रस्त भागातील शेतकरी व मच्छीमार यांच्यावर फार मोठा अन्याय होऊन यांना उपासमारीचे वेळ येणार आहे  आता केवळ निवेदने देऊन थांबणार नाही, तर धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आरपारची लढाई लढली जाईल," असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश देवकर यांनी दिला. माढा तालुक्यातील सुर्ली येथे आयोजित 'उजनी धरणग्रस्त शेतकरी मेळाव्यात' ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी परिसरातील शेकडो धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते..