मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

हेडलाईट की हायलाईट..? इंदापूरात 'चायना लाईट'चा धुमाकूळ; आरटीओला फक्त नंबर प्लेटच दिसते का..?

रस्ता दिसावा म्हणून लाईट लावतात की समोरच्याला आंधळं करण्यासाठी.? दापूर शहरात सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर बसविण्यात येणाऱ्या अतितीव्र निळ्या, पांढऱ्या आणि पिवळ्या "चायना एलईडी" लाईटमुळे सर्वसामान्य वाहनचालक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशामुळे काही क्षण रस्ता दिसेनासा होतो आणि अपघाताला निमंत्रण मिळते, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. नंबर प्लेटचा फाँट बदलला, आकार बदलला किंवा नियम मोडले म्हणून तत्काळ कारवाई करणाऱ्या संबंधित यंत्रणांना रस्त्यावर दिवसरात्र डोळे दिपवणाऱ्या या प्रखर लाईट दिसत नाहीत का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे, इंदापूरातील काही गॅरेज आणि वाहन अॅक्सेसरी दुकानांमध्ये अशा नियमबाह्य एलईडी लाईटची खुलेआम विक्री व बसविण्याचे काम सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधित विभागाने अशा दुकानांवर धाडी टाकून नियमबाह्य बल्ब जप्त करावेत आणि विक्रेते तसेच वाहनधारकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. "रस्ता दिसावा म्हणून लाईट लावतात की समोरच्याला आंधळं करण्यासाठी?" असा उपरोध...
अलीकडील पोस्ट

इंदापुरात शाळकरी मुलांची कोंबडीसारखी कोंबाकोंब; एकाच खोलीत ६ मुले डांबून घरमालकांकडून चढ्या दराने भाडेवसुलीचा काळा धंदा..!

इंदापूर शहरात शिक्षणासाठी आलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांची स्थानिक घरमालकांकडून आर्थिक आणि मानसिक पिळवणूक सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरात एका छोट्याशा खोलीत क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे तब्बल ५ ते ६ मुलांना डांबून, त्यांच्याकडून अवाजवी आणि चढ्या दराने भाडे वसूल करण्याचा बेकायदेशीर धंदा जोरात सुरू आहे. प्रशासनाच्या डोळ्यांदेखत सुरू असलेल्या या गोरखधंद्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भवितव्य धोक्यात आले आहे. इंदापुरातील भयानक वास्तव क्षमता २ लोकांची, राहतात ६ मुले: अत्यंत छोट्या खोल्यांमध्ये ५ ते ६ शाळकरी मुलांना एकत्र राहावे लागत आहे. : खोलीत पाय ठेवायला जागा नसल्याने मुलांना बळजबरीने गादीवर किंवा कोपऱ्यात बसून अभ्यास करावा लागतो. पाणी आणि आरोग्याचा प्रश्न: एकाच स्वच्छतागृहावर ६ मुले अवलंबून असल्याने अस्वच्छता पसरून आजारपण वाढत आहे. मजबुरीचा गैरफायदा: ग्रामीण भागातून इंदापूर शहरात नामांकित शाळा-कॉलेजमध्ये शिकायला आलेल्या मुलांच्या हतबलतेचा घरमालक गैरफायदा घेत आहेत. बेकायदेशीर भाडेवसुलीचा आकडा थक्क करणारा मिळालेल्या माहितीनुसार, घरमालक संपूर्ण रूमचे भा...

इंदापूरच्या सुज्ञ जनतेने आता अशा 'हायफाय' आणि 'नोंदणीकृत' पाटीवाल्या वधु-वर केंद्रांना भुलण्यापूर्वी दहावेळा चौकशी करण्याची गरज

धर्मादाय आयुक्तांचे सर्टिफिकेट कार्यालयात टांगले की,  जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचा अधिकृत परवानाच' मिळाला,  लग्नाळू पोरांच्या बापाची लूट! इंदापूर तालुक्यात सध्या शेती पिकाला काय भाव मिळतोय यापेक्षा, लग्नाळू मुलांचे भाव कसे कडाडलेत यावर गल्लीबोळांत गंभीर चर्चा सुरू असतात. मुलाला शेती असली तरी मुलगी मिळेना आणि नोकरी असली तरी अपेक्षेचा गोफ विणता येईना, अशा विचित्र कात्रीत आजचा बाप सापडला आहे. सर्वसामान्य पालकांची हीच हतबलता हेरून इंदापूर तालुक्यात काही 'धंदेवाईक' टोळ्यांनी वधु-वर सूचक केंद्रांचा जणू पूरच आणला आहे. मुळात समाजोपयोगी कामासाठी धर्मादाय आयुक्तांकडे (Charity Commissioner) संस्था नोंदणी करायची आणि त्याच कायदेशीर कागदाचा ढाल म्हणून वापर करून लाखो रुपयांना जनतेला गंडवायचे, असा एक नवा 'पोटभरू' धंदा तालुक्यात उघडपणे सुरू आहे. हा प्रकार केवळ चिंताजनक नसून, इंदापूरच्या सामाजिक व्यवस्थेला लागलेली वाळवी आहे. ## १. 'नोंदणीकृत' पाटी: लुटमारीचा अधिकृत परवाना? धर्मादाय आयुक्तांचे सर्टिफिकेट कार्यालयाच्या भिंतीवर टांगले की, आपल्याला जनतेच्या खिशाला...

हिंगणगावात डाळिंब चोरीची घटना; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण,विद्युत वितरण कंपनी च्या ना - लायक पणा मुळे शेतकरी अडचणीत

इंदापूर: हिंगणगाव येथील शेतकरी देवकर यांच्या शेतातील विक्रीसाठी तयार असलेल्या डाळिंब पिकाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. सोन्यासारखे जपलेले पीक काही क्षणांत लंपास झाल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला असून परिसरातील डाळिंब उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी रात्री साधारण साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान झाली. शेतात राखण असतानाही चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत धूळफेक करत डाळिंबाचा माल लंपास केला. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शेतीसाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा वेळेवर मिळत नसल्याने रात्री शेत परिसरात अंधाराचे वातावरण असते. याच परिस्थितीचा फायदा चोरटे घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. तसेच डाळिंब पिकासाठी कोणत्याही प्रकारचे प्रभावी विमा संरक्षण उपलब्ध नसल्याने चोरी किंवा नैसर्गिक संकटांचा संपूर्ण आर्थिक भार शेतकऱ्यांवरच पडत आहे. हिंगणगाव परिसरात सुमारे २०० एकरांहून अधिक क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करण्यात आली असून, सध्य...

अकलूजमध्ये भीषण पाणीटंचाई; बंद बोरवेल व हातपंप तातडीने सुरू करण्याची मागणी,नवीन बसस्थानक परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण पालखीपूर्वी पूर्ण करण्याचेही निवेदन

अकलूज : आरोग्यदूत तथा माळशिरसचे आमदार मा. रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवक किरण बाबा गायकवाड यांनी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना विविध नागरी समस्यांबाबत निवेदन सादर केले. सादर केलेल्या निवेदनात अकलूज शहरात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणारा त्रास कमी करण्यासाठी नगरपरिषद हद्दीतील बंद अवस्थेतील सर्व हातपंप व बोरवेल तातडीने दुरुस्त करून सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच नवीन बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचा वेग अत्यंत संथ असल्याने वाहतुकीसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आगामी पालखी सोहळ्यापूर्वी हे काम पूर्ण करून भाविक व नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी जनसेवक किरण बाबा गायकवाड यांनी केली. नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत नगरपरिषद प्रशासनाने या दोन्ही मागण्यांची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, ...

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमातून आधुनिक शेतीचे धडेपवईमाळमध्ये कृषी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे आगमन; शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवादातून तंत्रज्ञानाचा प्रसार होणार

बारामती, ता. ५ : ग्रामीण भागातील शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान यांची सांगड घालणारा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (Rural Agricultural Work Experience - RAWE) पवईमाळ (ता. बारामती) येथे सुरू झाला असून, डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथील कृषी पदवीच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांचे शुक्रवारी (दि. ३) गावात दाखल झाले. प्रत्यक्ष शेतात राहून कृषी शिक्षणाचा अनुभव घेणे आणि संशोधनातून विकसित झालेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. श्री भैरवनाथ मंदिर येथे झालेल्या स्वागत कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचा परिचय करून देत आगामी दोन ते चार महिन्यांच्या कालावधीत गावात राबविण्यात येणाऱ्या कृषीविषयक उपक्रमांची रूपरेषा मांडली. आधुनिक शेती पद्धती, पीक नियोजन, पीक संरक्षण, संतुलित खत व्यवस्थापन, मृदा परीक्षण, सेंद्रिय शेती, जलसंधारण, हवामान बदलाचा शेतीवरील परिणाम, कृषीपूरक व्यवसाय तसेच शासकीय कृषी योजनांविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन...

मीसुद्धा जिल्हा परिषद शाळेचाच विद्यार्थी' : प्रविण भैय्या माने

 इंदापूर:- वाढदिवसाला फटाके, केक, डीजे, डिजिटल फलक (बैनर) आणि हारतुरे यांसारख्या गोष्टींवर विनाकारण खर्च न करता, तोच पैसा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याचा आदर्श पायंडा प्रविण माने यांनी घालून दिला. या अंतर्गत संपूर्ण तालुक्यात हजारो वह्या-पेनचे वाटप करण्यात आले. तसेच, सरडेवाडी शाळेसाठी भविष्यात कुठल्याही प्रकारची मदत लागेल, ती देण्याची संपूर्ण जबाबदारी माझी राहील,"अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रविण भैय्या माने यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, *"मी स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. आज अनेक मोठे अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकूनच उच्च पदांवर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा नेहमी मान राखला पाहिजे, तरच तुम्ही भविष्यात मोठे अधिकारी आणि एक उत्तम माणूस बनू शकाल. या कौतुकास्पद उपक्रमाच्या वेळी परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते: सचिन शिरसट (अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा), रवींद्र वामन सरडे विजय मामा शिद, लालासाहेब पिंपरे, विशाल (पिनु शेठ)...