मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

दुष्काळात तेरावा महिना! निसर्गाचा कोप आणि सरकारची डोळेझाक; सरडेवाडीत बळीराजा उद्ध्वस्त!

इंदापूर:  "बाप जगू देईना आणि आई भीक मागू देईना..." अशी अत्यंत विदारक आणि काळजाचा थरकाप उडवणारी परिस्थिती आज इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील सामान्य शेतकऱ्याची झाली आहे. आधीच तीव्र दुष्काळाच्या होरपळीत होरपळणाऱ्या शेतकऱ्याला आता निसर्गानेही दगा दिला आहे. सरडेवाडी परिसरात झालेल्या भीषण चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाने इथल्या शेतकऱ्यांचे कंबरडे पार मोडून टाकले आहे. या वादळी वाऱ्याचा सर्वात मोठा आणि भीषण फटका शेतकरी नितीन कोकरे यांना बसला आहे. निसर्गाच्या तांडवामुळे नितीन कोकरे यांचे राहते घर आणि जनावरांचा गोठा अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. डोक्यावरचे छत हिरावले गेले असून, मुक्या जनावरांचा आसराही या वादळाने हिरावून घेतला आहे. लाखो रुपयांचे नुकसान डोळ्यांदेखत झाल्याने कोकरे कुटुंबीयांवर उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.   नेहमीप्रमाणे शेतकरी संकटात सापडल्यावर महसूल प्रशासन आणि विमा कंपन्या सुस्त का बसतात,कागदी घोडे नाचवणे बंद करा, सरडेवाडीतील नुकसानग्रस्त भागाचे आणि विशेषतः शेतकरी नितीन कोकरे यांच्या घराचे व गोठ्याचे तात्काळ पंचनामे झाले पाहिजेत, तात्काळ आर्...
अलीकडील पोस्ट

वरिष्ठ नागरिकों के स्वास्थ्य के लिए 'मोटा अनाज' (तृणधान्य) अमृत के समान है: डॉ. श्रेणिक शाह

इंदापूर, डॉ. संदेश शाह। वरिष्ठ नागरिक समाज के आधारस्तंभ हैं और समाज को सक्षम व सुसंस्कृत बनाने में उनका महत्वपूर्ण योगदान है। इसलिए उनके स्वास्थ्य को बेहतर बनाए रखने के लिए दैनिक आहार में मोटे अनाज (मिलेट्स/तृणधान्य) का उपयोग करना समय की मांग है, ऐसा प्रतिपादन जनरल सर्जन डॉ. श्रेणिक शाह ने किया। वे इंदापूर के 'आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान' तथा 'वरिष्ठ नागरिक संघ' की ओर से वरिष्ठ नागरिक भवन में आयोजित स्वास्थ्य जागरूकता कार्यक्रम में मार्गदर्शन करते हुए बोल रहे थे। कार्यक्रम की अध्यक्षता वरिष्ठ नागरिक संघ के अध्यक्ष सुभाष थोरात ने की। इस अवसर पर मई महीने में जन्मदिन मनाने वाले सभी वरिष्ठ नागरिकों का सत्कार (सम्मान) किया गया।32 प्रकार के मोटे अनाज, 18 प्रकार की आयुर्वेदिक वनस्पतियों के चूर्ण और 7 प्रकार के सूखे मेवों (ड्राय फ्रूट्स) से युक्त मिलेट्स शरीर की दैनिक कैलोरी की आवश्यकता को पूरा करते हैं।  शरीर की इम्यूनिटी (रोगप्रतिकारक शक्ति) को मजबूत बनाए रखता है। * इसमें किसी भी प्रकार के रसायन (केमिकल) का उपयोग नहीं होता, इसलिए शरीर पर इसका कोई द...

अनंतराव थोपटे यांच्या निधनाने ऋषीतुल्य नेतृत्व हरपले- हर्षवर्धन पाटील

इंदापूर : प्रतिनिधी दि.5/6/26                                     राज्यातील जेष्ठ नेते, माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या निधनाने समाजाला दिशा देणारे, आदर्श मूल्ये जपणारे व जनहितासाठी आयुष्य वेचणारे अभ्यासू नेतृत्व आता आपल्यामध्ये राहिलेले नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक ऋषीतुल्य नेतृत्व गमावले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.          अनंतराव थोपटे साहेबांनी आयुष्यभर लोकाभिमुख आणि मूल्याधिष्ठित असे राजकारण, समाजकारण केले. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये दुर्गम भागातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख राजकारण केले. भोर तसेच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांचे मोलाचे योगदान दिले. सर्वसामान्य नागरिकांशी कायम असलेला जिव्हाळ्याचा संबंध आणि लोकहिताची तळमळ ही त्यांची खरी ओळख होती, असे हर्षवर्धन ...

कारखाना चालतोय 'सहकारा'वर, शेतकरी जगतोय 'उधारी'वर..! पाटलांच्या 'कर्मयोगीला' लागला थकीत बिलांचा डाग.; शेतकरी आक्रमक!

इंदापूर:- एकेकाळी सहकार क्षेत्रात आदर्श मानला जाणाऱ्या इंदापूरच्या 'कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्या'च्या नावाला आज ग्रहण लागले आहे. कर्मयोगी शंकरराव भाऊ पाटील आणि गोकुळदास भाई शहा यांनी अत्यंत शिस्तबद्ध नियोजनाने जो कारखाना शेतकऱ्यांचा 'आधारस्तंभ' बनवला होता, त्याच कारखान्यात आज शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत; घामाचे दाम अडकले एक काळ असा होता की, कारखान्याच्या गेटमधून ऊस गेला की काही दिवसांतच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायचे. 'शेतकरी सुखी तरच कारखाना सुखी' हे ब्रीदवाक्य या दिग्गज नेत्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले होते. मात्र, आज चित्र पूर्णपणे बदलले आहे. कारखान्याचे सूत्रे बाबुराव बोत्रे यांच्या हाती सोपवल्यापासून शेतकऱ्यांच्या नशिबी केवळ हतबलता आली आहे. ऊस देऊन पाच-सहा महिने उलटले, तरी अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळालेले नाहीत. भाऊ-भाई'च्या सुवर्णकाळाची आज आठवण   मा.ना.हर्षवर्धनभाऊ पाटील आणि मा.भरतभाऊ शहा यांच्या काळात कारख...

इंदापूर शहरातील प्रत्येक प्रभाग स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध : नगराध्यक्ष भरतभाऊ शहा

स्वच्छ सर्वेक्षण २०२६' आणि 'माझी वसुंधरा अभियान अंतर्गत इंदापूर शहरातील व्यंकटेशनगर परिसर नगरपरिषदेकडून चकाचक इंदापूर :- शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये व्यापक स्वच्छता अभियान राबवून शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्यासाठी नगरपरिषद पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी दिली. केंद्र सरकारच्या 'स्वच्छ सर्वेक्षण २०२६' मिशन लाईफ' आणि राज्य सरकारच्या 'माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक सातमधील व्यंकटेशनगर परिसरात आयोजित विशेष 'स्वच्छता मोहिमेच्या' प्रसंगी ते बोलत होते. या पालिकेने शहराला देशपातळीवर आघाडीवर नेण्यासाठी हे कंबरकसून नियोजन केले आहे. इंदापूर नगर परिषदेच्या वतीने शहरामध्ये, स्वच्छ इंदापूर ! सुंदर इंदापूर !! हरित इंदापूर !!!"या त्रिसूत्री संकल्पनेतून विविध प्रभागांमध्ये अत्यंत गतिमान पद्धतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून व्यंकटेश नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान श्री बालाजी मंदिर परिसर, टाऊन हॉल परिसर, शिकलक...

तालुक्यातील 'सहकार सम्राटाचा' माज मोडूनच काढणार..! मयूरसिंह पाटलांच्या व्हाट्सॲप स्टेटसने इंदापुरात खळबळ

इंदापूर :राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो, पण सध्या इंदापूर तालुक्यात नेत्यांच्या भाषणांपेक्षा त्यांच्या 'व्हाट्सॲप स्टेटस'चीच जास्त चर्चा रंगू लागली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयूरसिंह पाटील यांनी आपल्या व्हाट्सॲपवर ठेवलेल्या एका स्टेटसने सध्या इंदापूरच्या राजकीय गल्लीबोळांमध्ये चांगलाच उन्हाळा वाढवला आहे.मयूरसिंह पाटील यांनी आपल्या स्टेटसवर भगव्या बॅकग्राउंडवर थेट आणि धारदार शब्दांत लिहिलंय"तालुक्यातील सहकार सम्राटाचा माज मोडूनच काढणार..!केवळ एका ओळीच्या या स्टेटसने तालुक्याच्या राजकारणात 'न भूतो न भविष्यती' असा भूकंप आणला आहे. अवघ्या काही मिनिटांतच या स्टेटसचे स्क्रीनशॉट संपूर्ण इंदापूर तालुक्यात वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत.मयूरसिंह पाटील यांनी थेट नाव न घेता 'सहकार सम्राट' असा उल्लेख केल्यामुळे आता हा बाण नक्की कोणाच्या दिशेने सुटलाय, यावर चौकाचौकांत पैजा लागल्या आहेत. तालुक्यात सहकार क्षेत्रावर वर्चस्व असणाऱ्या कोणत्या मोठ्या नेत्याला मयूरसिंह यांनी हा थेट इशारा दिला आहे? आणि हा 'माज' नक्की कसा मोडला जाणा...

*पंतप्रधानांच्या 'हरित वाहतूक' आवाहनाला राजवर्धन पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद; पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू!

 इंदापूर  देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत इंदापूरचे युवा नेते राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. "हरित वाहतूक"आणि इंधन बचतीच्या दृष्टीने त्यांनी आपल्या सेवेत नवीन इलेक्ट्रिक वाहन  दाखल केले असून, आजपासून त्याचा प्रत्यक्ष वापर करण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरण संवर्धन, वाढते प्रदूषण आणि पारंपारिक इंधनाचा तुटवडा या पार्श्वभूमीवर राजवर्धन पाटील यांनी घेतलेला हा निर्णय सध्या मतदारसंघात विशेष चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.याप्रसंगी बोलताना राजवर्धन पाटील म्हणाले की, "पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि प्रदूषणमुक्त भारताच्या निर्मितीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही आजच्या काळाची गरज बनली आहे. स्वच्छ आणि हरित भविष्यासाठी आपण सर्वांनीही शक्य तितक्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करावा. वाढत्या वायुप्रदूषणामुळे आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमुळे जगभरात आता पर्यायी ऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. अशातच, इंदापूर तालुक्यातील एका अग्रगण्य युवा ...