मुख्य सामग्रीवर वगळा

कायदे सर्वांनाच सारखे ! कल्याण RTO च्या गाडीचा इन्शुरन्स 3महीने आधी संपला मग यांना फाईन का नाही ?

मुंबई प्रतीनीधी : (सतिश पाटील) कल्याण मध्ये एका तरुणाने आरटीओ अधिकाऱ्यांची गाडी थांबवून जाब विचारला हा प्रत्येकाला भारतीय संविधानीक अधिकार आहे?कायदे सर्वांनाच सारखे आहेत का वर्गवारीनुसार आहेत.हा 
"सरकारचा अजब गजब कारभार "
हातावर पोट भरणार्‍यां कडून भरमसाठ दंड वसूल करण्यात येतो.10/15 ₹ मेमो दिला जातो दिवसभरात 500₹ कमाई होते त्यात बॅंकेचे हप्ते मेंटेनन्स, ऑईल,फ्युल असे बरेच काही खर्च आहेत.मग पोट भरणार का दंड अथवा गाडी जमा करण्यात येते.ऐवढे मोठे दंड कायदेशीर आहेत का ? 
  राहुल पाटील कल्याण तालुका अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी आज कल्याण स्टेशन परि सरात परिवहन विभागाकडून RTO ची गाडी चेकिंग साठी आली असता त्या गाडीचे मी डॉक्युमेंट चेक केले त्यात त्यांचा जुलै महिन्यात इन्शुरन्स संपलेला आहे आणि मी पार्टी अधिकाऱ्यांना जॉब विचारला त्यांनाही जॉब विचारला त्यांनी मला उत्तर दिलं की आम्ही वर अर्ज दिलेला आहे हे आमच्या हातात नाही इन्शुरन्स काढणे वरच्या अधिकाऱ्यांच्या हातात आहे तरीही त्यांनी त्यांचे चूक मान्य केली नाही कायदा फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच आहे त्यांच्यासाठी कायदा नाही त्यांना इतक्या वेळा म्हटलं की मी गाडी जाऊ देणार नाही तुम्ही मला इन्शुरन्स ची पावती दाखवा जर कायद्याचे रक्षकच कायद्याचे पालन करीत नाहीत मग यांना काय अधिकार इतरांना फाईन मारण्याचा एक नेहमीच पोलिस आपली गाडी रस्त्यात उभी करतात मग तेव्हा रस्त्यात अडथळा होत नाही का ? तुम्हाला जाऊ देतो तरी त्यांनी मान्य केलं नाही ते म्हणतात की उद्या तुम्ही ऑफिसला या तुम्हाला सगळे अर्ज दाखवले जातील त्यांची चूक आहे कायदा फक्त जनतेसाठीच कायदे आहेत आज एक गाडी चेकिंग केली अशा किती गाड्या अणखी असू शकतात.या प्रकारे कल्याण मध्ये पालिका कचरा सफाई गाड्याचा पर्दाफाश झाला होता. आता या गंभीर विषयावर सरकार मायबाप काय कारवाई करते वाकडे सर्वांचे लक्ष आहे का सरकारी वाहन म्हणून माफ केले जाते. हिंद वंदे मातरम.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...