मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय मुंबई, दि. ३०: राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे. तसेच अजूनही काही भागात पूरस्थिती आहे. त्यामुळे सन २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात दि. १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यासह मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन १० रुपये कपात आणि  पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन ५ रुपये कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला. याबाबत आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सन २०२४ -२५ ऊस गाळप हंगामाचा आढावा आणि सन २०२५-२६ मधील नवीन गाळप हंगामाचे धोरण ठरविण्यासाठी मंत्री समितीच्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री (विदर्भ,तापी आणि कोकण विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ...

सरडेवाडी बामनस्थळ येथे चेअरमन विठ्ठल महाडिक व सौ. कोमलताई महाडिक यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न

 इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी बामनस्थळ येथे नवरात्र उत्सवानिमित्त दत्ता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक व त्यांच्या सौ. कोमलताई महाडिक यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न त्यावेळी रघुनाथ (आण्णा) जमदाडे, मोहन (भाऊ) जामदार, नानासाहेब हरणावळ, बाळासाहेब जाधव, संतोष (दादा) सरडे, शिवाजी (तात्या) जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ (तात्या) कोकरे, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हनुमंत (नाना) जमदाडे, नामदेव तोबरे, संजय जमदाडे, शहाजीराजे तोबरे, विजय तोबरे, बापूराव जमदाडे, अमोल जमदाडे, सुनिल तोबरे, किशोर कडाळे, ऋषिकेश शिंगाडे, अंबादास कुटे,शशीराज कदम, संदिप जमदाडे, हरिदास जमदाडे, परमेश्वर जमदाडे, नवनाथ जमदाडे, नितीन काळे, सोन्या भाऊ जमदाडे, संतोष कदम (चेअरमन, राहुल तरसे, कृष्णा हंबीरे, दादासाहेब काळे,आबासो काळे, नागेश काळे, गणेश जमदाडे, सागर जमदाडे, संतोष जामदार, दिपक हरणावळ, विठोबा सुर्यवंशी, विशाल जमदाडे, कुलदीप तोबरे,व आराधी मंडळ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते,फराळाची सोय दिपकशेठ बोंगाणे यांच्या कडून करण्यात आली.

*तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचे किट तसेच उबदार कपड्याचे वाटप*

इंदापूर:- माढा तालुक्यातील उंदरगाव,लोंढेवस्ती, सावंत वस्ती येथे नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचे किट (साखर, रवा , पोहे, चटणी, मीठ, चहा पावडर , तेल, बिस्किट पुडे, मटकी डाळ तसेच कपडे (चादर शाल) हे साहित्य वाटप करण्यात आले, यावेळी तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सौ अनिताताई खरात म्हणाल्या की इथे आल्यानंतर खरंच जीवन जगणे काय असते हे कळत आहे या लोकांची माय माऊलींची अवस्था पाहून मनाला खूप वेदना होतात. माझी मायबाप सरकारला विनंती आहे जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त मदत आपण यांना करावी. सरकारने सध्या बाकी सगळं थांबवावं आणि कोणतेही निकष न लावता या माझ्या बांधवांना मदतीचा हात द्यावा येथे कोणीही कोणते राजकारण करू नये येथील अधिकारी वर्गानेही मनापासून काम करावे जर खरच तुम्हाला थोड्याफार पुण्याचं काम करायचं असेल तर तुम्ही या लोकांना मदत करून ते पूर्ण करावे तुम्हाला यांचे खूप आशीर्वाद लागतील तसेच महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांनी मोठ्या उद्योगपतींनी किंवा मोठ्या कॉन्ट्रॅक्टरने या लोकांसाठी मदतीचा हात पुढे कर...

*इंदापूर शहरात झालेल्या पावसामुळे बाधित भागाची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी*

पुणे, दि.२७ (जिमाका वृत्तसेवा): आज इंदापूर शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे इंद्रेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यावर पाणी साचून नागरी वस्तीत पाणी शिरले होते, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या नागरी वस्तीला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.  यावेळी इंदापूर नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे, माजी उप नगराध्यक्ष भरतशेठ शहा, अशोक इजगुडे, माजी उपनगराध्यक्ष कृष्णा ताठे, माजी नगरसेवक, व्यापारी व नागरिक आणि नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  श्री. भरणे म्हणाले, इंदापूर शहर व परिसरात यापुढे अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये, याकरिता पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत नगरपरिषदेने तातडीने सविस्तर आराखडा तयार करावा. मान्सून काळात रोगराई पसरू नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. संपूर्ण परिसरात साफसफाई राहील, याबाबत दक्षता घ्यावी. सद्यस्थितीत नागरिकांची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.  मुसळधार पावसाच...

लडाखमध्ये जमावाने भाजपा कार्यालय पेटवलं; राज्याचा दर्जा मिळावा यासाठी हिंसक आंदोलन, पोलिसांवर दगडफेक

दिनांक:२७सप्टेंबर २०२५ प्रतिनीधी मुंबई:  लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी बुधवारी (२४ सप्टेंबर) ठिकठिकाणी हिंसक आंदोलनं झाली. आंदोलकांनी भाजपाच्या कार्यालयावर हल्ला केला, तसेच कार्यालय पेटवलं. लडाखमध्ये पोलीस व आंदोलकांमध्ये झडप झाल्याचं पाहायला मिळालं. लडाखचा सहाव्या अनुसूचित समावेश करावा आणि केंद्रशासित प्रदेशाऐवजी राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. अलीकडेच ही मागणी घेऊन लडाखमधील नागरिकांनी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली आहेत. या आंदोलनाने बुधवारी (२४ सप्टेंबर) हिंसक वळण घेतलं. संतप्त जमावाची पोलिसांबरोबर झडप झाली. तसेच जमावाने पोलिसांवर दगडफेकही केली. आंदोलकांनी लेह येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर दगडफेक करत कार्यालय पेटवून दिल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच काही ठिकाणी पोलिसांना आंदोलकांवर लाठीहल्ला करावा लागला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली लडाखमध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांचं शांततेच्या मार्गाने चाललेलं आ...

नीरा भीमा कारखान्याचा ऊस बिलाचा रु. 100 चा हप्ता- भाग्यश्री पाटील

- 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट   -वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न इंदापूर : प्रतिनिधी दि.26/9/25                          निरा भिमा सहकारी साखर कारखान्याकडून मागील सन 2024-25 च्या हंगामामध्ये गाळप झालेल्या ऊसाला दिवाळीपूर्वी प्रति टन रु. 100 प्रमाणे ऊस बिलाचा हप्ता येत्या दि. 10 ऑक्टोबर पूर्वी बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. कारखान्याने आगामी सन 2025-26 च्या गळीत हंगामामध्ये 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.26) दिली.           शहाजीनगर (ता.इंदापूर ) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची सन 2024-25 ची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. यावेळी सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा सौं.भाग्यश्री पाटील होत्या.         सौ...

*चेतना फार्मसी महाविद्यालयातर्फे उच्च शिक्षण व भविष्यातील करियर नियोजन विषयी तज्ज्ञांचे अनमोल मार्गदर्शन*

इंदापूर वार्ताहर: आज शुक्रवार दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी चेतना फाउंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे आज सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज इंदापूर येथे करिअर मार्गदर्शनावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात चेतना फार्मसी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी अकरावी व बारावी v विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या काळात करिअर निवड ही विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हान असून, या पार्श्वभूमीवर करियर कसे निवडावे,  स्पर्धा परीक्षा तयारी कशी करणार, जीवनात कष्ट, आत्मविश्वास, चिकाटी कशी महत्त्वाची असते, उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण करावीत असा विविध विचार व्यक्त केले. तसेच आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, व्यवस्थापन, शासकीय सेवा तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांविषयी उपयुक्त माहिती दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, योग्य दिशेने पाऊल टाकण्यासाठी या व्याख्यानाचा नक्कीच फायदा होणार असल्याचे मत प्रा. विजय धेंडे सरांनी व्यक्त केले. ...

सुकलवाडीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ पुरंदर तालुक्यात विकास कामांच्या जोरावर नावारूपाला आलेल्या सुकलवाडी ग्रामपंचायतीमध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत ग्राम गौरव प्रतिष्ठान तसेच आरोग्य भूमी आयुर्वेद आणि योग स्वास्थ्य व संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिराचे उद्घाटन माजी पोलीस उपअधीक्षक सुधाकर टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले .या शिबिरात ग्रामस्थांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देखील देण्यात आली.  या प्रसंगी कर्तव्यदक्ष सरपंच संदेश पवार यांसह ग्रामपंचायत सदस्या उर्मिला पवार माजी उपसरपंच सुवर्णा चव्हाण गणेश शिंदे वैद्यकीय अधिकारी डॉ.शाम येत्तलवाड समुदाय आरोग्य अधिकारी तेजस्विनी पवार आरोग्य सेविका जयश्री काळेल सुप्रिया पवार वनिता पवार माधुरी पवार आशा सेविका माधुरी दाते पद्मा भुजबळ, मनीषा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

"आरटीओ" शासकीय खाते म्हणजे पैशाची टकसाळच !

मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील) RTO गीता शेजवळ "पहिल्या ट्रॅपची चार्जशीट" कोर्टात दाखल होण्यापूर्वीच "दुसऱ्यां"दा एसीबीच्या "ट्रॅप"मध्ये अडकली... मुंबई सप्टेंबर २५, २०२५     काल अहिल्यानगर जिल्ह्यातील आरटीओ विभागातील RTO इन्स्पेक्टर गीता शेजवळ ही पहिल्या "ट्रॅपची चार्जशीट" कोर्टात दाखल होण्यापूर्वीच "दुसऱ्यांदा एसीबीच्या ट्रॅप"मध्ये अडकली असून केवळ ३००० रुपयांची लाच दलालाच्या माध्यमातून घेत असताना अहिल्यानगर एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकली आहे. ही तिची पहिलीच वेळ नसून याआधी सुद्धा ती विदर्भात नागपूर जिल्ह्यात कार्यरत असताना एसीबीच्या तावडीत सापडलेली आहे.ह्यावरून ती महिला अधिकारी सराईत "लाचखोर" असल्याचे दिसून येत आहे.     नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलिस स्टेशनला ह्याबाबत गीता शेजवळ विरुद्ध "लाचखोरी"चा गुन्हा दाखल झालेला असून त्यात तिला निलंबित देखील करण्यात आले होते.     यवतमाळ एसीबीच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या तक्रारदाराच्या अर्जानुसार सत्यता पडताळणी करून यवतमाळ एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नागपूर जिल्ह्यातील राम...

*चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये उत्साहात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा – स्वयंसेवकांनी राबवली स्वच्छता मोहीम*

इंदापूर – दिनांक २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करत असताना सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, इंदापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिवस मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कक्षा मार्फत सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवत महाविद्यालय परिसरात व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. “स्वच्छते पासूनच समृद्ध आरोग्याचा आरंभ होतो. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने आणि विशेषतः युवकांनी या मोहिमेत पुढाकार घेतला पाहिजे,” असे ते म्हणाले. यानंतर NSS युनिट चे सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाविद्यालय परिसरात, प्रवेशद्वाराजवळ, उद्यान भागात तसेच आसपासच्या रस्त्यांवर झाडू मारून, कचरा गोळा क...

पै.अशोकराव देवकर यांची वंचित-बहुजन आघाडी च्या इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी निवड

इंदापूर:- वंचित बहुजन युवा आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर डॉ. निलेश विश्वकर्मा : महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवा आघाडी, यांच्या संकल्पनेनुसार व मंगलदास तुकाराम निकाळजे (जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हा पूर्व) यांचे माध्यमातून श्री. अशोक बाबु देवकर यांची वंचित-बहुजन आघाडी च्या इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून आपल्या सामाजिक कार्य, संघटन कौशल्य, प्रामाणिकपणा आणि वंचित-बहुजन समाजासाठी केलेल्या योगदानाचा विचार करून नियुक्तीपत्र देण्यात आले,आहे, आपण संस्थेच्या नियमावलीनुसार संघटनेची ध्येयधोरणे, सामाजिक न्यायाची तत्त्वे, तसेच बहुजनांच्या हक्कांसाठी संघटनात्मक कार्य कराल, अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे.म्हणूनच इंदापूर तालुका उपाध्यक्ष या पदावर नियुक्त करण्यात येत आहे,अशोक देवकर यांना विचारले आसता ते म्हणाले का वंचित-बहुजन आघाडीचे कार्य व प्रकाश आंबेडकर यांचे विचार घराघरांत पोहोचणार आसे मत अशोकराव देवकर यांनी व्यक्त केले. अशोक देवकर यांनी इंदापूर तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी सामाजिक राजकीय मोठे मोठे कार्यक्रम व विविध कार्य केल्यामुळे अ...

महाराष्ट्रात "ओला दुष्काळ "घोषित करण्याची शेतकऱ्याची मागणी !

 इंदापूर तोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून घेतला. सरकारकडे मदतीची ची मागणी दुष्काळात ही दोनशे शेतकर्यांना कर्जाची नोटीस! जगाचा पोशिंदाला आज अन्नासाठी वणवण फिरण्याची वेळ !  अनेक माध्यमातून भयान विडिओ व्हायरल ! डोळ्यातील पाणी थांबत नाही ! सर्विकडेच जलमय परिस्थीती निर्माण झाली आहे.बर्‍याच ठिकाणी रेस्क्यू करून बाधितांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरूच!  दिनांक: २३सप्टेंबर २०२५ मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील) महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीला 'ओला दुष्काळ' असे संबोधले जात असून, शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या नुकसानीचा आढावा घेतला जात असून, शासनाकडे मदतीची मागणी केली जात आहे.   नुकसानाची प्रमुख कारणे आणि परिणाम शेती पिकांचे नुकसान: मुसळधार पावसामुळे भात, सोयाबीन, कापूस, आणि कांदा यांसारख्या अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  जनजीवन विस्कळीत: पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि काही...

प्रबोधनकार ठाकरे १९२३-१९२४ च्या काळातील पहीला मान दादर खांडके चाळीतील शिवभवानी नवरात्रोत्सव

मुंबई प्रतिनीधी: (सतिश पाटील) महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करण्याचा पहिला मान दादरचा महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केला हे सर्वश्रुत आहेच. पण सार्वजनिक नवरात्र उत्सव आपल्या महाराष्ट्रात कोणी सुरु केला आणि तो कुठे सुरू केला या बद्दल फारसं लोकांना माहिती नाही. सार्वजनिक नवरात्र उत्सव महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केला हे सर्वश्रुत आहेच. पण सार्वजनिक नवरात्र उत्सव आपल्या महाराष्ट्रात कोणी सुरु केला आणि तो कुठे सुरू केला या बद्दल फारसं लोकांना माहिती नाही. साधारण १९२३-१९२४ दरम्यानचा तो काळ. त्याकाळी सार्वजनिक स्वरूपात उत्सव म्हणून फक्त गणेशोत्सव साजरा केला जायचा. प्रबोधनकार ठाकरे, समाजसुधारक रावबहादूर सीताराम केशव बोले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने ‘लोकहितवादी’ या संघाच्या माध्यमातून १९२६ मध्ये महाराष्ट्रातील पहिला ‘श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव’ दादरमध्ये काळं मैदान येथे सुरु करण्यात आला. प्लाझा सिनेमासमोर असलेले हे मैदान आता वीर कोतवाल उद्यान म्हणून परिचित आहे. काही वर्षांनंतर हा उत्सव दादर येथ...

*चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मार्फत करिअर मार्गदर्शनावर विशेष अतिथी व्याख्यान आयोजित*

इंदापूर वार्ताहर:  आज शनिवार दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी चेतना फाउंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे आज कालठण नं.1 इंदापूर येथील जिजाऊ महाविद्यालय येथे करिअर मार्गदर्शनावर एक विशेष अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या शक्यता, तयारी आणि योग्य दिशा निवडण्यासाठी उत्तम मार्गदर्शन केले, तसेच प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे व त्यांचे महत्त्व समजून सांगितले. टेक्निकल एज्युकेशन घेण्यासाठी आवश्यक असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्याचे आवाहन केले. या व्याख्यानात विद्यार्थ्यांनी मोठ्या स्वारस्याने भाग घेतला. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्साहाने प्रतिसाद दिला आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा घेतली.जिजाऊ महाविद्यालयाच्या प्राचार्य जगताप मॅडम तसेच चेतना फार्मसी चे प्रा. चिंतामणी रणवरे आणि दत्ता कडवळे यांचे सहकार्य मिळाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या नियोजनात मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विजय भोसले, खजिनद...

आम्ही मंत्रालय आणि संबंधित मंत्रालयांना तक्रारी पाठवू" - अजित पवार

पुणे, २० सप्टेंबर: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठवड्यात हडपसर येथे जनसंवाद मोहिमेच्या यशस्वी सुरुवातीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस) आज पिंपरी येथे जनसंवादाचे आयोजन केले. हडपसरप्रमाणेच, पिंपरी जनसंवादानेही नागरिक, सरकारी विभाग आणि राजकीय नेतृत्व एकाच व्यासपीठावर एकत्र आणले. तक्रारी नोंदवण्यासाठी, पारदर्शकता प्रदान करण्यासाठी आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी व्हाट्सअॅप चॅटबॉट्स, डिजिटल किऑस्क आणि हेल्पलाइन नंबर यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या उपक्रमात सुरूच होता.  पिंपरी येथे २५ हून अधिक सरकारी विभागांनी नागरिकांच्या नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी सहभाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान सुमारे ४८०० तक्रारी नोंदवण्यात आल्या, त्यापैकी सुमारे १८०० तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाहतुकीशी संबंधित बहुतेक समस्या पुन्हा एकदा अजित पवार यांनी स्वतः प्रक्रियेचे निरीक्षण केले आणि जलद निवारणासाठी विभागांना मार्गदर्शन केले. "आज, मी जनसं...

जल्लोष युवा महोत्सवातील विजयी विद्यार्थ्यांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मान

इंदापूर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17/09/2025 रोजी दादा पाटील महाविद्यालय कर्जत जि. अहमदनगर या ठिकाणी आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवात कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर  या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात सहभाग नोंदविला. यामध्ये प्रामुख्याने वादविवाद स्पर्धेत अक्षय यादव आणि सायली मखरे या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक-सुवर्णपदक मिळाले तसेच भारतीय वैयक्तिक गायन स्पर्धेत सरदार मुलाणी या विद्यार्थ्याला तृतीय क्रमांक-कांस्य पदक प्राप्त झाले तसेच ओंकार कदम या विद्यार्थ्याला तालवाद्य या प्रकारात द्वितीय क्रमांक-रौप्य पदक मिळाले या यशाबद्दलराष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सर्व विजेत्या व सहभागी विध्यार्थ्यांचा सत्कार केला.       याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच पुढील काळातही आपण विविध स्पर्धेत सहभाग नोंदवून...

ठाणे वाहतूक विभागाचा भांडाफोड (rti) मधून उघड !

मुंबई प्रतिनीधी : (सतिश पाटील) ठाणे, १७ सप्टेंबर २०२५ : ठाणे वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅन कामकाजात गंभीर अनियमितता झाल्याचा धक्कादायक भांडाफोड सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी केला आहे. १७ ऑगस्ट रोजी त्यांनी स्पष्ट दाखवून दिले की वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या एसओपी (SOP) नियमांचे पालन होत नाही आणि या संपूर्ण प्रक्रियेत मोठ्या घोटाळ्याचा संशय आहे. माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या कागदपत्रांनुसार, टोईंग कामगारांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट्स व पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट्समध्ये गंभीर गैरप्रकार उघडकीस आले आहेत. अनेक कामगारांनी एकच पत्ता दिलेला असून काहींनी अपूर्ण पत्ते दिल्याने त्यांची पडताळणी करणे अशक्य ठरले आहे. उदाहरणार्थ, सलीम पठाण नावाच्या कामगाराचा पत्ता सहार अपार्टमेंट, लोकमान्य नगर, फ्लॅट 503 असा दाखवला गेला होता, मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी गणेश निषाद यांचा परिवार राहतो. त्याचप्रमाणे, कोपरी परिसरात दाखवलेले पत्ते पूर्णतः बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून, कसारवडवली येथे ८ जणांचा पत्ता एकच, तर मुंब्रा–कौसा येथे ७ जणांचा पत्ता एकाच ठिकाणी दाखवण्यात आल्याचे स...

*पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदापूरमध्ये योग शिबिर संपन्न*

 इंदापूर भारताला विश्वगुरू बनविण्याच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अपार परिश्रम घेणारे, नवनवीन उपक्रम राबवणारे आणि भारताची छाप जागतिक स्तरावर उमटवणाऱ्या  नेतृत्वाचा वाढदिवस अभिनव संकल्पनेतून पार पडावा या उद्देशातून पतंजली योग समिती इंदापूर यांच्या माध्यमातून एकदिवसीय योग शिबिर पार पडले. देशाने जगाला दिलेली देणगी असलेल्या योगाचा प्रचार आणि प्रसार आदरणीय मोदीजी सातत्याने करत असतात त्यांच्या अथक आणि अविरत प्रयत्नातूनच जागतिक योगा दिवस देखील साजरा होतो यानिमित्ताने मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त योग शिबिर आयोजित करण्याची संकल्पना पुढे आली व आज त्यांच्या वाढदिवसाच्या पावन मुहूर्तावर हे शिबिर पार पडले. माणसाला समृद्ध जीवन जगण्यासाठी सर्वात जास्त महत्वाचे असलेल्या शारीरिक संपदेची देणगी देणाऱ्या योगाचा प्रसार करून मोदींजींनी समस्त देशवासीयांना सुदृढ व समाधानी जगण्याचा मूलमंत्र दिला, त्याच मार्गाचा अवलंब करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे आम्ही साऱ्यांनीच ठरवले असल्याचे मत माने यांनी व्यक्त केले.  या योग शिबिर कार्यक्रमास इंदापूर वासियांन...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लाखेवाडी मधील खेळाडूचें राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश*

 इंदापूर *सब ज्युनियर राष्ट्रीय कुराश स्पर्धा* या अग्रसेन धाम रायपुर, छत्तीसगड येथे दिनांक 10/09/2025 ते 13/09/2025 संपन्न झाल्या यामध्ये भारतातील सर्व राज्यातून *550* खेळाडू सहभागी झाले होते,यामध्ये महाराष्ट्रातून जवळपास 55 खेळाडू सहभागी झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी,ता.इंदापूर,जि.पुणे  मधील  *पै.युद्धवीर गायकवाड 50KG प्रथम क्रमांक* *कु.पै.अण्वि गायकवाड 28 kg या गटांमध्ये तृतीय क्रमांक पटकावला*  तसेच 1) कु.पलक काळे  2) चि.रणवीर गायकवाड  3) कु.आरोही गायकवाड  4) चि.ज्योतिरादित्य गायकवाड  5) चि.आदिराज गायकवाड या खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले. जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे नाव संपूर्ण भारतभर केले तसेच महाराष्ट्र राज्याचे नाव लौकिक केले याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.      या यशाबद्दल संस्थेचे,अध्यक्ष श्रीमंत ढोले,  *उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार प्रदिप गुरव विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य ग...

बाभुळगाव ग्रामपंचायतीत सरपंच–ग्रामसेवकांच्या मनमानीला कारभाराला कंटाळून ग्रामपंचायत सदस्य सौ. संगीता राजाराम इंगळे देणार राजीनामा.

इंदापूर,  इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव ग्रामपंचायतीतील सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामपंचायत सदस्य संतप्त झाले आहेत. विकासकामे थांबलेली, निधीचा पारदर्शक वापर न होणे, सदस्यांचा सल्ला न घेता निर्णय घेणे अशा अनेक तक्रारींमुळे ग्रामपंचायतीत गंभीर असंतोष निर्माण झाला आहे. या सर्व मनमानी पद्धतीने चाललेल्या कारभाराला कंटाळून सौ.संगीता राजाराम इंगळे या राजीनामा देणार आहेत. सौ.संगीता राजाराम इंगळे सदस्यांचे म्हणणे आहे की, "ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक कोणत्याही कामाची माहिती ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांना देत नाहीत. निधी खर्चातही अनियमितता आहे. यामुळे गावकऱ्यांसमोर आमची प्रतिमा मलिन होत आहे. अशा परिस्थितीत आम्ही या अन्यायकारक व मनमानी कारभाराचा भाग होऊ शकत नाही." या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य सौ.संगीता राजाराम इंगळे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सौ.संगीता राजाराम इंगळे सदस्यांचे म्हणणे आहे की, लोकांनी विकासासाठी निवडून दिले, मात्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या हुकूमशाहीमुळे ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे.इंगळे या...

*कंपन्यानी स्थानिकांना रोजगार देण्यास प्राधान्य द्यावे-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे*

पुणे, दि.१५ (जिमाका वृत्तसेवा): इंदापूर तालुक्यात येणाऱ्या विविध कंपन्यांना उद्योगपुरक वातावरण निर्मितीकरिता आवश्यक ते सहकार्य येत आहे, कंपन्यानी आपल्या आस्थापनांमध्ये स्थानिकांना रोजगार देण्यासह, उत्पादनासाठी स्थानिक कच्चा मालाला प्राधान्य द्यावे, सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे तालुक्याच्या सर्वागीण विकासाकरिता हातभार लावावा, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.  पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे इंदापूर पंचतारांकित औद्योगिक वसाहत लोणी येथील विविध विषयासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता निलेश मोढवे, प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. श्री. भरणे म्हणाले, इंदापूर तालुक्याच्या विकासात एमआयडीसीचे महत्वपूर्ण योगदान आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक वसाहत लोणी येथे पोलीस मदत केंद्र उभारणी, अग्निशमन केंद्र, वाहतूक टर्मिनल, कामगारांकरिता बसेस सेवा आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने क...

मुसळधार पाऊसात सुध्दा आपलं कर्तव्य चोख बजावताना नगरपरिषद कर्मचारी

 इंदापूर :- भर पावसातही इंदापूर नगरपरिषद कर्मचारी पाणी पुरवठा दुरुस्ती, रस्ते साफसफाई आणि आपत्कालीन परिस्थितीत सेवा पुरवणे यांसारखी कामे करतात. या कामांमुळे नागरिकांचे होणारे हाल कमी होतात आणि शहराची यंत्रणा सुरळीत चालू राहते.  पाणी पुरवठा दुरुस्ती:इंदापूरातील एका नागरिकाच्या फोन वरून एका नगर परिषद कर्मचाऱ्याने भर पावसातही पिण्याच्या पाण्याच्या लाईनची दुरुस्ती  केली होती, ज्यामुळे लोकांना पाणी मिळत नव्हते. रस्त्यावरील पाणी काढणे इंदापूर सारख्या शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली जातात, त्यावेळी नागरिक सुरक्षित राहावेत यासाठी नगर परिषद कर्मचारी रस्त्यांवरील पाणी,तुंबलेली गटर, जिवावर उदार होऊन काढण्याचे काम करतात.  आपत्कालीन सेवा पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्त्यांच्या वेळी नागरिकांना मदतीची गरज असते, तेव्हा नगर परिषद कर्मचारी मदतीसाठी धावून जातात आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवतात. त्यांच्या कामाचे महत्त्व नागरिकांचे संरक्षण:भर पावसातही काम करून ते नागरिकांचे जीवन सुरक्षित करतात. शहराची व्यवस्था राखणे:रस्त्यांवरील पाणी क...

*फार्मास्युटिकल संशोधन आणि शिक्षणामध्ये शैक्षणिक-औद्योगिक भागीदारी: चेतना फार्मसी कॉलेज आणि प्राडो यांच्यातील सामंजस्य करार-*

इंदापूर चेतना फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच पुणे येथील प्राडो प्रीक्लिनिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन प्रा. लि. या संस्थेला एक महत्त्वाची शैक्षणिक भेट दिली. या भेटीचा उद्देश औषधनिर्मिती उद्योगात वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक संशोधनाच्या पद्धती आणि तांत्रिक प्रक्रियांची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे हा होता. या भेटीचे रूपांतर एका महत्त्वाच्या धोरणात्मक भागीदारीत झाले, ज्यामध्ये दोन्ही संस्थांमध्ये औपचारिक सामंजस्य करार (Memorandum of Understanding) करण्यात आला. हा सामंजस्य करार पारंपरिक शैक्षणिक कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि प्रशिक्षण देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात चेतना फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना प्राडोमध्ये इंटर्नशिप, प्रशिक्षण आणि संयुक्त संशोधनाच्या संधी उपलब्ध होतील. ही भागीदारी केवळ दोन संस्थांमधील सहकार्याचा एक टप्पा नसून, ती भारतातील फार्मास्युटिकल शिक्षण आणि उद्योगांमधील कौशल्य दरी भरून काढण्यासाठी एक महत्त्वाचा आदर्श म्हणून उदयास आली आहे. या अहवालात या भेट...

कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

इंदापूर : शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर च्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ.गिरीश देसाई, खजिनदार श्री.तुषार रंजनकर व विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मयोगी शंकरराव पाटील (भाऊ) यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या भावनेने प्रेरित होऊन संस्थेचे विद्यार्थी व तरुणांसह समाजातील विविध स्तरांतील लोकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त श्री.अरविंद गारटकर, आरोग्य केंद्र प्रमुख श्री.महादेव चव्हाण, कोपिवरची शाळा प्रमुख श्री.भारत बोराटे, इन्चार्ज श्री.दिपक जगताप, प्रकल्प अधिकारी श्री.सागर कांबळे,शिवाजी गोफणे, डॉक्टर सारंगी कुंभार, जावेद हबीब विभाग प्रमुख अमोल राऊत, फॅशन विभाग प्रमुख सौ.त्रिशला पाटील, रोहिणी जाधव, केदार गोसावी, भारत माने, मानसी पाटील यांच्यासह अनेक स्थानिक मान्यवर उपस्थ...

*राष्ट्रवादी परिवार मिलन: ‘जनसंवाद’ नंतर अजितदादांचा पक्षसंघटनेच्या दिशेने नवा उपक्रम*

*पुणे, १४ सप्टेंबर २०२५:* महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली *‘राष्ट्रवादी परिवार मिलन’* हा अभिनव उपक्रमाची सुरुवात आज हडपसर येथून झाली. पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांसोबतचं नातं अधिक घट्ट व्हावं या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये करण्यात आले. दिवसाची सुरुवात अजित पवार यांनी खडकी-केशवनगर पूल, मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळ येथील प्रशासनिक पाहणीतून केली.  त्यानंतर अजितदादांनी विविध भागांतील कार्यकर्त्यांच्या घरी थेट जाऊन संवाद साधला आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवसभर विविध कार्यक्रमांत सहभागी झाले. हडपसर, मुंढवा, केशवनगर, मांजरी, १५ नंबर चौक, सातववाडी, वानवडी, रामटेकडी, मगारपट्टा, हडपसर मार्केट, ससानेनगर, काळेपाडळ, चिंतामणी नगर-सय्यदनगर, मोहम्मदवाडी, कौसरबाग, लोअर कोंढवा, कोंढवा, अपर कोंढवा, कात्रज अशा परिसरांमध्ये राष्ट्रवादी परिवार मिलन उपक्रमाअंतर्गत विविध बैठका पार पडल्या पारंपरिक राजकीय उपक्रमांपेक्षा वेगळ्या श...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका!

मुंबई प्रतिनीधी :(सतिश वि.पाटील) प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर मतदार याद्या विभाजित केल्या जातील. १ जुलैपर्यंत मतदार यादीत जे नाव असेल ते गृहीत धरून मतदार निश्चित होतील असं राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यात राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. आगामी निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत निवडणूकपूर्व तयारीची माहिती दिली.  राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, ४ महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार मनपा, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा सर्व निवडणुकांचा कार्यक्रम टप्प्याटप्याने घेण्यात येईल. नाशिकमध्ये ५...

नेता असावा तर असा.शेतकऱ्यांनी मागणी करताच काही काही तासातच ट्रान्सफॉर्मर हजर

सरडेवाडी  :-विठ्ठल महाडिक म्हणजे. दिलेला शब्द पाळणारा नेता सरडेवाडी येथील शेतकऱ्यांनी मागणी करताच काही काही तासातच ट्रान्सफॉर्मर (डि पी) बसविला शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. दि.६/९/००२५रोजी. ट्रान्सफॉर्मर जळाला होता. शेतकऱ्यांनी वरिष्ठांना तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही. शिवनेरी नगर, गायकवाड वस्ती,जाधव वस्ती, देवकाते वस्ती ऐकाड वस्ती,येथील शेतकरी व घरगुती ग्राहक हैराण झाले होते.विठ्ठल महाडिक साहेब यांना कळताच काही तासातच ट्रान्सफॉर्मर डि पी बसला.एक पैसाही न खर्च करता डि पी बसविला त्या मुळे गणेश गायकवाड, सुरेश ऐकाड, सागर गायकवाड, दादा राऊत, सोमनाथ देवकाते,आल्हाबक्ष पठाण,सागर विटकर यांनी दत्ता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक साहेब यांचे आभार मानले.

महा किड्सची वैष्णवी कर्चे बुद्धिबळामध्ये तालुक्यात प्रथम

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ  सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत नातेपुते येथील महा किड्स सी.बी.एस.ई स्कूल मधील इयत्ता ६ वी मधील विद्यार्थिनी कु.वैष्णवी रवींद्र कर्चे हिने १४ वर्षीय मुलींच्या वयोगटातून तालुका पातळीवर दिमाखदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकविला आहे. यावेळी स्पर्धा स्विस पद्धतीने वयोगट १४ तसेच १७ आणि १९ मध्ये घेतल्या गेल्या. या स्पर्धेत वैष्णवी कचरे हिने एकूण ५ पैकी ४ मॅच जिंकत ३८.२६. पॉईंट्स मिळविल्याने तिची निवड जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.  यावेळी संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक अँड.शिवशंकर पांढरे यांनी तिचा सन्मान केला. याप्रसंगी संस्थेच्या कॉर्डिनेटर विद्या घोगरे क्रीडा शिक्षक रणजित मोहिते व कोमल रणदिवे उपस्थित होते.

*अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि सीएससीमध्ये सामंजस्य करार*

* आता लाभार्थ्यांना महामंडळाच्या सेवा सीएससीमध्ये माफक दरात मिळणार * पुणे, दि.१०: (जिमाका वृत्तसेवा): अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना सामान्य सेवा केंद्रामार्फत (सीएससी) महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात देण्याबाबत व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख व सीएससीचे प्रमुख वैभव देशपांडे यांच्या उपस्थितीत महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयामध्ये सामजस्य करार करण्यात आला.  सीएससी हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध सरकारी आणि खासगी सेवा पुरवण्याचे महत्वाचे माध्यम आहे, या करारानुसार लाभार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या सीएससी केंद्रावर महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, योजनेची सद्यस्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे यांसारख्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या करारामुळे लाभार्थ्यांचा वेळ आणि खर्चामध्ये बचत होणार आहे. येत्या काळात लाभार्थ्याकरिता मोबाईल अॅप व चॅट बॉट सारख्या सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नवीन उपक्रमामुळे महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रियाअधिक सोपी, पारदर्शक आणि कि...

कै.शिवाजीराव जामदार यांचे दुखःद निधन

 इंदापूर येथील कै.शिवाजीराव गोविंद जामदार, यांचेअल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले त्यांचे वय 85,वर्ष होते,त्यांचे पश्चात्ताप पत्नी दोन मुले एक मुलगी, सुना नातवंडे आसा परीवार होता,सामाजिक कार्यकर्ते बापूराव जामदार यांचे ते थोरले बंधु होते,त्यांच्या जाण्याने इंदापूरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.