मुख्य सामग्रीवर वगळा

ठाणे वाहतूक विभागाचा भांडाफोड (rti) मधून उघड !

मुंबई प्रतिनीधी : (सतिश पाटील)
ठाणे, १७ सप्टेंबर २०२५ :
ठाणे वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅन कामकाजात गंभीर अनियमितता झाल्याचा धक्कादायक भांडाफोड सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी केला आहे. १७ ऑगस्ट रोजी त्यांनी स्पष्ट दाखवून दिले की वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या एसओपी (SOP) नियमांचे पालन होत नाही आणि या संपूर्ण प्रक्रियेत मोठ्या घोटाळ्याचा संशय आहे.
माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या कागदपत्रांनुसार, टोईंग कामगारांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट्स व पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट्समध्ये गंभीर गैरप्रकार उघडकीस आले आहेत. अनेक कामगारांनी एकच पत्ता दिलेला असून काहींनी अपूर्ण पत्ते दिल्याने त्यांची पडताळणी करणे अशक्य ठरले आहे. उदाहरणार्थ, सलीम पठाण नावाच्या कामगाराचा पत्ता सहार अपार्टमेंट, लोकमान्य नगर, फ्लॅट 503 असा दाखवला गेला होता, मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी गणेश निषाद यांचा परिवार राहतो. त्याचप्रमाणे, कोपरी परिसरात दाखवलेले पत्ते पूर्णतः बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून, कसारवडवली येथे ८ जणांचा पत्ता एकच, तर मुंब्रा–कौसा येथे ७ जणांचा पत्ता एकाच ठिकाणी दाखवण्यात आल्याचे समोर आले आहे.
या सर्व घटनांमधून हे स्पष्ट होते की मोठ्या प्रमाणावर बनावट कॅरेक्टर सर्टिफिकेट्स तयार करण्यात आले आहेत. पोलिस पडताळणी ही संबंधित व्यक्तीचा खरा पत्ता व गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी केली जाते, मात्र खोटे पत्ते वापरून अनेक कामगारांच्या खरी ओळख आणि त्यांच्या पार्श्वभूमीवरील गुन्हे झाकले गेले असावेत, असा गंभीर संशय आहे.
या प्रकरणाची थेट जबाबदारी ठाणे पोलिस प्रशासन व वाहतूक विभागाचे डीसीपी पंकज शिर्सत यांच्यावर निश्चित असल्याचे अजय जया यांनी सांगितले. त्यांनी तात्काळ स्वतंत्र चौकशी समिती नेमून संशयास्पद टोईंग कामगारांना निलंबित करण्याची तसेच बनावट पडताळणी मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अजय जया यांनी हेही स्पष्ट केले की नागरिकांच्या आंदोलनानंतर वाहतूक विभागाने टोईंग व्हॅनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आणि सर्व SOP नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झाली नाही, उलट या संपूर्ण प्रक्रियेतून मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते