मुख्य सामग्रीवर वगळा

प्रबोधनकार ठाकरे १९२३-१९२४ च्या काळातील पहीला मान दादर खांडके चाळीतील शिवभवानी नवरात्रोत्सव

मुंबई प्रतिनीधी: (सतिश पाटील)
महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करण्याचा पहिला मान दादरचा
महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केला हे सर्वश्रुत आहेच. पण सार्वजनिक नवरात्र उत्सव आपल्या महाराष्ट्रात कोणी सुरु केला आणि तो कुठे सुरू केला या बद्दल फारसं लोकांना माहिती नाही.
सार्वजनिक नवरात्र उत्सव
महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केला हे सर्वश्रुत आहेच. पण सार्वजनिक नवरात्र उत्सव आपल्या महाराष्ट्रात कोणी सुरु केला आणि तो कुठे सुरू केला या बद्दल फारसं लोकांना माहिती नाही.
साधारण १९२३-१९२४ दरम्यानचा तो काळ. त्याकाळी सार्वजनिक स्वरूपात उत्सव म्हणून फक्त गणेशोत्सव साजरा केला जायचा. प्रबोधनकार ठाकरे, समाजसुधारक रावबहादूर सीताराम केशव बोले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने ‘लोकहितवादी’ या संघाच्या माध्यमातून १९२६ मध्ये महाराष्ट्रातील पहिला ‘श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव’ दादरमध्ये काळं मैदान येथे सुरु करण्यात आला. प्लाझा सिनेमासमोर असलेले हे मैदान आता वीर कोतवाल उद्यान म्हणून परिचित आहे. काही वर्षांनंतर हा उत्सव दादर येथील खांडके चाळीत स्थलांतरित झाला. आजही दादर परिसरात खांडके चाळीत हा उत्सव तेवढ्याच उत्साहात आणि श्रद्धेने साजरा होतो.
 शिवसेना आज ५५ वर्षांची झाली !
१९२६ च्या पूर्वी मुंबईत व महाराष्ट्रात कोठे प्रघात नसलेला श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव साजरा करण्याचा पहिला मान दादरने मिळवला. काळया मैदानावर ८० फूट लांब आणि ६० फूट रुंद विशाल मंडप उभारण्यात आला होता. या पहिल्या शिवभवानी नवरात्रोत्सवात भवानी मातेच्या मूर्तीसाठी राजा रवी वर्मांच्या कालीदेवीच्या तांडवनृत्याचा कट आऊट तयार करण्यात आला होता.
सार्वजनिक नवरात्र उत्सव
दादरमधील खांडके चाळीतील शिवभवानी नवरात्रोत्सव
अशा प्रकारे साजरा केला गेला नवरात्र उत्सव 
शेजारी दोन्ही बाजूस पुरुषभर उंचीच्या दोन समई मांडण्यात आल्या होत्या. त्यावेळेस गिरगावातल्या मूगभाटातील वाजंत्री मंडळींनी सनई-चौघडे वाजवण्याची जबाबदारी घेतली होती. तर रावसाहेब बोले यांनी पहिल्या वाहिल्या शिवभवानी नवरात्रोत्सवात अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली होती.
आश्विनशुद्ध प्रतिपदेच्या दिनी आमदार सोळंकी यांच्या हस्ते भगवा ध्वज उभारण्यात आला होता. सर्व विधी दादरमधील विख्यात गुरुजी पालवेशास्त्री यांच्या मंत्रोच्चारांत पार पाडले. कविवर्य वसंत बिहर ऊर्फ जोशी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या जगदंबेच्या आरतीचे आबालवृद्धांनी सुरात गायन केले. भायखळा भाजी मंडईतील भाजी विक्रेत्या यमुनाबाई घोडेकर यांचे व्याख्यान तेव्हा गाजले होते. सुमारे तीन तास यमुनाबाई जीवनविषयक आपले विचार मांडत होत्या.
पुढे तीन वर्षे १९२९ पर्यंत हा उत्सव प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहिला. पुढे १९२९ सालापासून १९४० सालापर्यंत हा नवरात्र उत्सव खांडके बिल्डींगच्या पटांगणात साजरा होऊ लागला. त्यानंतर दादरमधील खांडके चाळीतील रहिवाशांनी शिवभवानी नवरात्रोत्सवाची ही परंपरा आजवर जपली आहे. कधी दादर पश्चिमेला आलात तर या ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या आई भवानीचे दर्शन नक्की घ्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते