मुख्य सामग्रीवर वगळा

"आरटीओ" शासकीय खाते म्हणजे पैशाची टकसाळच !

मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील)
RTO गीता शेजवळ "पहिल्या ट्रॅपची चार्जशीट" कोर्टात दाखल होण्यापूर्वीच "दुसऱ्यां"दा एसीबीच्या "ट्रॅप"मध्ये अडकली...
मुंबई
सप्टेंबर २५, २०२५
    काल अहिल्यानगर जिल्ह्यातील आरटीओ विभागातील RTO इन्स्पेक्टर गीता शेजवळ ही पहिल्या "ट्रॅपची चार्जशीट" कोर्टात दाखल होण्यापूर्वीच "दुसऱ्यांदा एसीबीच्या ट्रॅप"मध्ये अडकली असून केवळ ३००० रुपयांची लाच दलालाच्या माध्यमातून घेत असताना अहिल्यानगर एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकली आहे. ही तिची पहिलीच वेळ नसून याआधी सुद्धा ती विदर्भात नागपूर जिल्ह्यात कार्यरत असताना एसीबीच्या तावडीत सापडलेली आहे.ह्यावरून ती महिला अधिकारी सराईत "लाचखोर" असल्याचे दिसून येत आहे.
    नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलिस स्टेशनला ह्याबाबत गीता शेजवळ विरुद्ध "लाचखोरी"चा गुन्हा दाखल झालेला असून त्यात तिला निलंबित देखील करण्यात आले होते.
    यवतमाळ एसीबीच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या तक्रारदाराच्या अर्जानुसार सत्यता पडताळणी करून यवतमाळ एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे RTO निरीक्षक गीता शेजवळ हिला लाचेची "डिमांड" करून ती स्वीकारत असताना रंगेहाथ पकडून स्थानिक रामटेक पोलिस स्टेशन, नागपूर ग्रामीणला अप. क्रं.२३८/२०२३, कलम. ७ A, १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल केला होता.
   आरटीओ गीता शेजवळ हिच्यावर झालेली ही पहिली लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई एसीबीचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक शैलेश सपकाळ ह्यांनी केली होती.तर ह्या प्रकरणाचा संपूर्ण तपास त्यांनीच यवतमाळ व नंतर ते अकोला एसीबीला बदलून आले तरी त्यांच्याकडेच होता. अकोला एसीबीला तेव्हा कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी ह्या तपास कार्यात त्यांना सर्व सहकार्य केले होते.
 गीता शेजवळ हिच्या पहिल्या प्रकरणाचा तपास अजूनही सुरूच असून आता कुठे अनेक "तांत्रिक बाबीं"चा अत्यंत क्लिष्ट असलेला तपास अंतिम टप्प्यात आला आहे. ह्या प्रकरणांत अजूनही काही अहवाल प्राप्त झाले नसल्याने २०२३ मध्ये गुन्हा घडल्यावरही दोन वर्षांत "चार्जशीट" न्यायालयात दाखल होऊ शकली नाही.
   आरटीओ गीता शेजवळला पहिल्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्यावर तिच्या "प्रॉपर्टी"ची खुली चौकशी करण्यात आली होती तेव्हाच ती ६०/६५ कोटी रुपयांच्या आसपास होती.गीता शेजवळच्या व नातेवाईकांच्या नावावर तसेच इतरही आणखी काही "बेनामी संपत्ती"ची आणि "बँक बॅलन्स"चीही चौकशी महासंचालक कार्यालय स्तरावर सुरू असून ती मुख्यालयाच्या आदेशानुसार "पुणे एसीबी" कार्यालय करीत आहे.त्यांचा अहवाल आल्यावर तो यवतमाळ एसीबीला मिळताच "कोर्टात" चार्जशीट दाखल केल्या जाईल.
  २०२३ मध्ये RTO इन्स्पेक्टर गीता शेजवळ नागपूर विभागात असताना एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकल्यावर तिला निलंबित करण्यात आले होते,मात्र निलंबन कालावधी संपुष्टात आल्यावर कोणत्याही अधिकाऱ्याला "एक्झिक्युटिव्ह" पोस्टला न बसविता "नॉन एक्झिक्युटिव्ह" पोस्टला देण्यात येते.नव्हे तसा शासन आदेशच आहे.मात्र गीता शेजवळ ह्या महिला अधिकाऱ्याचा निलंबन कालावधी संपताच तिला पुन्हा "एक्झिक्युटिव्ह" पोस्टला बसवून "लाचखोरी करण्यासाठी रान मोकळे सोडण्यात आले" होते. ह्यामागे कोण कोण वरिष्ट अधिकारी आहेत ह्याचाही शोध पुन्हा दुसऱ्यांदा झालेल्या ट्रॅपच्या चौकशीच्या अनुषंगाने व्हायला पाहिजे. ह्या भ्रष्टाचारी महिला अधिकाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा देखील "बुरखा टराटरा फाडून" त्यांचे खरे रूप जनतेसमोर यायलाच पाहिजे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते