मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर येथे करियर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न*

इंदापूर  तंत्रशिक्षण संचालनालय विभागीय कार्यालय पुणे, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ पुणे व विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यां साठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 31 मे 2024 रोजी करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तंत्र शिक्षण संचालनालय चे माजी संचालक डॉ. एन.बी पासलकर व प्रमुख व्याख्याता डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे चे माजी प्राचार्य डॉ.विजय वढाई हे उपस्थित होते. तसेच शासकीय तंत्रनिकेतन, पुणे चे प्राचार्य व ऍडमिशन नोडल ऑफिसर डॉ. आर.के. पाटील आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटचे व्याख्याता श्री. परांजपे सर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी केले याप्रसंगी बोलताना त्यांनी खरे शिक्षण हे दहावी व बारावीनंतर सुरू होते व व्यावसायिक शिक्षण घेताना, निर्णय कधी व कसा घ्यावा व त्याचा उपयोग स्वतःसाठी व तसेच समाजासाठी कशाप्रकारे होतो याचे थोडक्यात विवेचन केले .पॉलिटेक्निकला प्रवेश कशाप्रकारे घेता येतो याविषय...

*इंदापूर येथे दिनांक १५ ते १७ जून रोजी जैन तीर्थंकर भगवान मुनीसुव्रतनाथ मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळा*

इंदापूर, डॉ. संदेश शहा. इंदापूर येथे दिनांक १५ ते १७ जून रोजी जैन तीर्थंकर भगवान मुनीसुव्रतनाथ मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळा. इंदापूर येथील श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर प्रांगणात कायोत्सर्ग अवस्थेत असलेल्या तीर्थंकर भगवान मुनीसुव्रतनाथ मूर्तीचा महामस्तका भिषेक सोहळा दिनांक १५ ते १७ जून या कालावधीत होणार आहे. शनिग्रह अरिष्ट निवारक २७ फूट उंच असलेल्या तीर्थंकर भगवान मुनीसुव्रतनाथ मूर्तीस १३ वर्ष पूर्ण  झाल्यानिमित्त या महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा यांनी दिली. डॉ. शहा पुढे म्हणाले, प्रथमाचार्य चारित्र्य चक्रवर्ती १०८ श्री  शांतीसागर महाराज यांच्या परंपरेप्रमाणे तसेच गणाधिपती गणाधराचार्य १०८ श्री कुंथूसागर महाराज व प्रज्ञाश्रमण सरस्वताचार्य श्री देवनंदी महाराज यांच्या आशीर्वादाने  आर्ष परंपरेचे परम प्रभावशाली युगल मुनिराज १०८ श्री अमोघकिर्ती महाराज व अमरकिर्ती महाराज यांच्या मंगल सानिध्यात या २७ फूट उंच तीर्थंकर भगवान मुनीसुव्रतनाथ मूर्तीचा ३३ मंगलद्रव्यांनी   ...

भरतशेठ शहा मित्र परिवार यांचे वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

इंदापूर:- इंदापूर शहरात भरतशेठ शहा मित्र परिवार यांचे वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले, या वेळी पोपटराव पवार, लक्ष्मण देवकाते, प्रमोद राऊत,सुनिल तळेकर, आप्पा माने, गणेश महाजन, काझी,सह इतर मान्यवर उपस्थित होते, या येळी बोलताना भरतशेठ शहा म्हणाले की, अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी (मल्हारपीठ) खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. मल्हारराव होळकर पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखल प्रसिद्ध हिंदू मंदि...

विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मध्ये एसएससी परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न .

दिनांक 29 /5 /2024 रोजी जय भवानी कडे विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये एस एस सी उत्तीर्ण सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वर्षभर कष्ट मेहनत करून मिळवलेल्या यशाचे कुणीतरी कौतुक केले तर आणखी मेहनत करून उत्तुंग यश मिळवण्याची प्रेरणा मिळते विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी त्यांच्या यशाचा यतोचित सन्मान व्हावा म्हणून प्रत्येक वर्षी प्रशालेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सत्कार समारंभासाठी इंदापूर माळशिरस माढा इत्यादी तालुक्यातून सुमारे 30 प्रशालेतील विद्यार्थी व पालकांनी या सत्कार समारंभासाठी हजेरी लावली याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्रीमंत ढोले सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फेटा बांधून ट्रॉफी प्रगती पत्रक तसेच दिनदर्शिका देऊन सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित केले तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा व त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व सांगताना शालेय...

इंदापूर येथे महाराणी अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची बैठक संपन्न

इंदापूर प्रतिनिधी : दि. ३० मे रोजी इंदापूर शासकीय विश्राम गृह येथे महाराणी अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती इंदापूर यांची नुकतीच बैठक पार पडली यामध्ये २३ जून रोजी इंदापूर येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती तालुकास्तरीय मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमासह पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढुन साजरी करण्याचे यामध्ये ठरले तसेच उद्या दिनांक ३१ मे रोजी सकाळी ९:३० वाजता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर तालुक्यातील समाज बांधवांनी इंदापूर न्यायालय शेजारी असणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले  असून अध्यक्षपदी लक्ष्मण देवकाते तर कार्याध्यक्षपदी किरण गोफने  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर येथे शुक्रवारी जनता दरबार

इंदापूर : प्रतिनिधी दि.29/5/24                   राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर येथे भाग्यश्री बंगलो वरती शुक्रवारी (दि. 31) सकाळी 8 वा. पासून जनता दरबार भरणार आहे.              भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या जनता दरबाराला नेहमीच नागरिकांची मोठी गर्दी होते. या जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे विविध प्रश्न, अडचणी तात्काळ सोडविण्यावर हर्षवर्धन पाटील यांचा भर राहिला आहे. तरी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भेटू इच्छिणाऱ्या नागरिकांनी जनता दरबारामध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन इंदापूर येथील हर्षवर्धन पाटील संपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

*खडकवासल्यातून इंदापूरसाठी पाणी सोडण्यात यावे....* *आमदार दत्तात्रय भरणे यांची पालकमंत्री अजित पवारांकडे मागणी...*

इंदापूर :- तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची ही तीव्र टंचाई जाणवत आहे तसेच हातात तोंडाशी आलेली विविध पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. याची गंभीर दखल घेत आज आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे खडकवासल्यातून इंदापूर साठी पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली आहे. याविषयी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की गेल्या वर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे जवळपास सगळीकडचेच नैसर्गिक स्रोत यंदा लवकर आटल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट पडले असुन अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील ब-याच भागातील उन्हाळी पिके जळून गेली आहेत.तसेच पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या गावोगावी निर्माण झाली आहे.यामध्ये विशेषतः शेटफळ गढे,लामजेवाडी,निरगुडे,म्हसोबाचीवाडी,लाकडी,वायसेवाडी,कळस,पिलेवाडी,गोसावीवाडी,रूई,थोरातवाडी,मराडेवाडी,बोराटवाडी,कौठळी,बळपुडी,खामगळवाडी,बिजवडी,पोंदकुलवाडी,तरंगवाडी या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असुन सध्या या परि...

संघर्षयोद्धा**ॲड. राहुल मखरे* *(वकील साहेब)**महासचिव, बहुजन मुक्ती पार्टी, नवी दिल्ली**यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष मंगलमय शुभेच्छा.*

*(दि.२९/५/२०२४)* महाविद्यालयीन जीवनापासून नेतृत्वाचा ठसा उमटविणारे उद्योन्मुख नेतृत्व ॲड. राहुल मखरे यांनी जनमानसात, समाजकार्यात व राजकीय क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. आत्मविश्वास व अभ्यासपूर्ण संवाद, प्रभावी वक्तृत्व, तळागाळात दांडगा जनसंपर्क, विविध पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांशी संपर्काचे जाळे, दुसऱ्यावर प्रभाव टाकण्याची क्षमता आणि नित्य संपर्कातून कार्यकर्ते जोडण्याची कला यातून ॲड. राहुल मखरेंनी सुसंस्कृत, निर्व्यसनी, सुशिक्षित, सामंजस्य व सर्वांचे हित साधणारा खरा मित्र अशी प्रतिमा लोकांच्यात बिंबवली आहे. कॉलेज जीवनापासूनच सामाजिक कार्यात सक्रिय होऊन विद्यार्थ्यांच्या फी संदर्भात कॉलेज प्रशासना विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करून आपल्या संघर्षाची चुणूक वकील साहेबांनी दाखवून दिली. वकील साहेबांना मित्र परिवार देखील जीवाला जीव देणारा लाभला आहे. पुढे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले शालेय आणि कॉलेज जीवनात आपल्या सवंगड्यां बरोबर मनमुरादपणे क्रिकेट खेळण्याचा आनंद वकील साहेबांनी लुटला इंदापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीचे अध्यक्ष झाले, त्यावेळी त्...

*इंदापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात*

पुणे, दि. २८ : इंदापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या वसतिगृहात इयता ८ वी ते १० वी, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय व  व्यावसायिक महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृहात अनुसूचित जाती प्रवर्गास ८० टक्के राखीव प्रवेश असून उर्वरित जागांवर इतर प्रवर्गातील तसेच अपंग व अनाथ विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल. वसतिगृहाची प्रवेश क्षमता कमाल १०० असून विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, अंथरूण, पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी, शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य, दरमहा ५०० रूपये निर्वाह भत्ता, ग्रंथालय आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे. अर्जासोबत गुणपत्रिका, पालकांचा उत्पनाचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्डची प्रत, रहिवाशी दाखला, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत, बोनाफाईड व प्रवेश घेतल्याबाबतची शैक्षणिक शुल्क प...

श्री. नारायणदास रामदास हायस्कूलची गायत्री संतोष आटोळे हिने 97.80% गुण मिळवून संस्थेत मिळवला प्रथम क्रमांक..

इंदापूर येथील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तालुक्याच्या विविध भागातील सात शाळांचा दहावीचा सरासरी निकाल 95.03 टक्के लागला असून यामध्ये इंदापूर शहरातील श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या कुमारी गायत्री संतोष आटोळे हिने 97.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, कुमारी समृद्धी बापूराव जाधव हिने 97 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर राहुल सर्जेराव कोळेकर व राजवर्धन अविनाश ठोंबरे या दोघांनाही 95.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, संचालक राजवर्धन पाटील सचिव ॲड.मनोहर चौधरी, मुख्याध्यापक संजय सोरटे यांच्यासह सर्व पदाधिकारी,यशस्वी विद्यार्थी व त्यांना शिकवणारे सर्व शिक्षक यांचे अभिनंदन केले.     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्च 2024 या दहावीच्या परीक्षेत इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर (94.84),  उत्कर्ष विद्या मंदिर कालठण नंबर एक (95.12),  प्रगती विद्यामंदिर लोणी देवकर (100), नंदकेश्वर प्रगती विद्यालय सराफ...

*कामठवाडीत दुचाकीसह सोन्याचे दागिने चोरीला*

  वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ पुरंदर तालुक्यातील वाल्हे नजीक कामठवाडी येथे अज्ञात चोरट्याने दुचाकी सह सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे वाल्हे गावच्या हद्दीतील कामठवाडीत रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने फारूखपाशा हुसेनभाई इनामदार यांची होंडा कंपनीची दुचाकी( क्र. एम. एच.१२एफ.एच.१५९७) तर लक्ष्मण भाऊसाहेब नवले यांच्या घरातून ५ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला आहे. या घटनेची फिर्याद फारूखपाशा इनामदार यांनी वाल्हे पोलीस चौकीत दाखल केली आहे.त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रशांत पवार हे करीत आहेत

*इंदापूर येथील मा.तहसीलदार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध*

इंदापूर    शुक्रवार दि. २४/५/२०२४ रोजी मा.तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस निरीक्षक मा. सूर्यकांत कोकणे यांना दिले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी प्रा. जयश्री गटकुळ, सौ कल्पना भोर, सौ.जयश्री खबाले, सौ. राधिका शेळके आणि संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी प्रमोद देशमुख,सोमनाथ जगताप,सागर जाधव, प्रतीक झोळ,  निवास शेळके, उदयसिंह भोसले,अरुण लोंढे,योगेश कुटे, गणेश मुळीक,योगेश पवार अन्य मान्यवर उपस्थित होते.

*जय भवानी गडविकास प्रतिष्ठान लाखेवाडीची 100 % निकालाची परंपरा कायम,एस.एस. सी. बोर्ड परीक्षा मार्च 2024 मध्ये उत्तुंग यशाची भरारी*

* सलग 4 वर्ष 100 % निकालाची परंपरा कायम राखत विद्यालयाची यशस्वी  वाटचाल .* इंदापूर:-  जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचालित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मधील एस.एस.सी .बोर्ड परीक्षा मार्च 2024 मध्ये प्रशालेतील एकूण 90 विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते, त्यापैकी 66 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहे, 24 विद्यार्थी प्रथम क्लासने उत्तीर्ण झाले आहेत. *विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत.* 1) काळे साक्षी उत्तम   95.60% 2) कोकणे सुहानी ज्ञानदेव 93.20% 2) मोहिते यशराज सचिन 93.20 % 3) शेटे रितेश राहुल 92.80 % *विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत.* *मराठी*-काळे साक्षी उत्तम -94            नलवडे धनश्री दत्तात्रय -94 *हिंदी*-काळे साक्षी उत्तम -95 *इंग्रजी*-काळे साक्षी उत्तम -94 *गणित*-नाचण सिद्धेश सुधाकर -98 *विज्ञान*- शेटे रितेश राहुल -97 *समाजशास्त्र*-कोकणे सुहानी ज्ञानदेव 98     देवकर ज्ञानेश्वरी संताजी-98      ठेंगल तनिष्...

*जिजाऊ इन्सिटटयुट कालठणचा 10 वीचा निकाल 100%*

 इंदापूर:- विश्व प्रतिष्ठान संचलित जिजाऊ इन्स्टिट्युट कालठणचा 10 वीचा रिझल्ट 100% असून विद्यार्थानी यश संपादन करून जिजाऊ इन्स्टिट्युट कालठण 1 या ग्रामीण भागातील शाळेचे नाव उज्वल केले विद्यार्थाच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विश्व प्रतिष्ठान संचलित जिजाऊ इन्स्टिटयुटच्या अध्यक्षा प्रा.जयश्री भास्कर गटकुळ आणि प्रा. भास्कर गटकुळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जिजाऊ इन्स्टिटयुट कालठण नं.1इयत्ता 10 वी रिझल्ट 100% लागला आहे, प्रथम क्रमांक कु.स्मिता जितेंद्र मोहिते 89% द्वितीय क्रमांक कु. योगिता पांडुरंग होनमाने 83.% तृतीय क्रमांक कु.सिध्दी सत्यवान शिंदे 82% चौथा क्रमांक कु.सोफिया हरिन शिकलकर 80.80% पाचवा क्रमांक माहेश्वरी महेश जगताप 75.20% अशा गुणवत्ताधारक  विद्यार्थाच्या यशामध्ये प्राचार्य राजश्री जगताप, उपप्राचार्य सागर उंबरे,स्मिता भोरे, रेखा जगताप, सारिका चोरमले, प्रतिक्षा कोळेकर,आरिफ शेख, सोनाली महाडिक, यांचा सिंहाचा वाटा आहे.

* डाॅ.संदेश शहा आणि डॉ. राधिका शहा हे इंदापूर शहरातील वैद्यकिय व्यवसाय करणारे आदर्श सामाजिक जोडपे असून यांच्या सहजीवनास आज ३० वर्ष पूर्ण झाली*

इंदापूर : डॉ. संदेश शहा आणि डॉ. राधिका शहा हे इंदापूर शहरातील वैद्यकिय व्यवसाय करणारे आदर्श सामाजिक जोडपे असून यांच्या सहजीवनास आज ३० वर्ष पूर्ण झाली. " एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ तसेच जगी एकच धर्म सर्वांना प्रेम अर्पावे " या तत्त्वाने त्यांची आता पर्यंतची वाटचाल आहे. सर्व जिव्हाळ्याच्या सकारात्मक शक्ती एकत्र करून इंदापूर शहर व तालुक्याचा नावलौकिक वाढावा यासाठी त्यांनी निरपेक्ष वृत्तीने अनमोल योगदान दिले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सुमारे ३० हजार हून जास्त वारकऱ्यांना त्यांनी एक महिन्याची औषधे मोफत देवून औषधदान हे सर्वश्रेष्ठ दान याचा प्रत्यय दिला आहे. इंदापूर रोटरी क्लबचे सन २०१४-१५ चे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी १२४ क्लब मधून इंदापूर क्लब ला पहिल्या पाच मध्ये नेत एकूण २१ पुरस्कार मिळवून दिले. पैकी ५ पुरस्कार आंतरराष्ट्रीय रोटरी प्रतिनिधीच्या हस्ते त्यांना देण्यात आले. या काळात त्यांनी इंदापूर तालुक्यातील गोखळी, तरंगवाडी, विठ्ठलवाडी या गावात ओढा खोली करण व रुंदीकरण करून त्या गावांची पाणीटंचाई दूर केली. विठ्ठलवाडी येथील कार...

ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर येथे ज्येष्ठांसाठी हनुमंत कुंभार सचिव महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) पुणे यांचे व्याख्यान.

इंदापूर:- शनिवार दिनांक.25/5/2024 रोजी ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक मीटिंग संपन्न झाली. ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव हनुमंत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. या महिन्यातील ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे करण्यात आले ,आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक भाऊ गानबोटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब घाडगे उपाध्यक्ष भानुदास पवार, खबाले महाराज, पांडुरंग जगताप, यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव हनुमंत शिंदे, सदानंद गांधले यांचे वाढदिवस साजरे केले. खबाले महाराज ,सदानंद गांधले, थोरात काका, यांनी मनोगत व्यक्त केले. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री हनुमंत कुंभार सचिव महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभाग यांनी ज्येष्ठांना मार्गदर्शन केले ज्येष्ठांसाठी कोणकोणत्या सरकारी योजना आहेत त्या योजनांची माहिती त्यांनी सांगितली. ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर यांचे कार्य महान आहे विविध उपक्रम या संघाद्वारे राबवले जातात ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर ,ज्येष्ठांसाठी सहलींचे आयोजन , सण उत्सव एकत्र साजरे केले जातात ही बाब अतिशय चांगली आहे. म्हणून आ...

इंदापूरच्या तहसीलदारांवरील हल्ल्याची घटना निषेधार्थ, घटनेचा हर्षवर्धन पाटील यांच्याकडून निषेध*

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यामुळे मोठा गोंधळ उडाला. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. या घटनेची माहिती घेत राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी देखील निषेध केला आहे.  हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूरच्या तहसीलदारांच्या गाडीवर आज धक्कादायक प्रकारे हल्ला करण्यात आला आहे. तसेच धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना निषेधार्थ आहे. अशी घटना इंदापूरमध्ये याआधी झाली नाही. यामध्ये आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई केली जावी, यासाठी पोलीस यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. असले प्रकार कधी खपवून घेतले जाणार नाहीत. या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. सरकारी अधिकारी आपल्या परीने काम करत असतात, मात्र अशा प्रकारे हल्ले होत असतील तर हे चुकीचं आहे, असेही ते म्हणाले.

*इंदापूर तालुक्याचे तहसिलदार मा. श्रीकांत पाटील यांच्या वर हल्ला करणाऱ्या आरोपीस त्वरित अटक करून त्यांना कठोर शिक्षा करावी -अनिताताई खरात*

 इंदापूर:- आज सकाळी इंदापूरचे तहसीलदार श्री.श्रीकांत पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला त्याचा मी प्रथमतः निषेध करते, तसेच पोलीस प्रशासनाला विनंती करते की जे कोणी हल्लेखोर असतील त्यांना ताबडतोब अटक करून योग्य ती कारवाई करावी व इथून पुढे असे हल्ले होणार नाहीत यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना योग्य ते संरक्षण द्यावे शासकीय अधिकाऱ्यावर हल्ले होणे ही बाब अतिशय निंदनीय आहे, शासकीय अधिकारी हे तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात आणि अशा अधिकाऱ्यावर हल्ला करणे हे लोकशाहीला धरून नाही, आणि इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे तर नेहमीच आपल्या कामात तत्पर असतात आणि अशा अधिकाऱ्यावर हल्ला होणे ही बाब अतिशय दुर्दैवी आहे तरी मी या गोष्टीचा निषेध करते.            सौ अनिताताई नानासाहेब खरात- तेजपृथ्वी ग्रुप संस्थापक अध्यक्षा महारष्ट्र राज्य.यांनी पोलिस स्टेशन ला निवेदन दिले.

*तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करा.*

 *आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडून हल्ल्याचा निषेध‌...* इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेला हल्ला हा अतिशय धक्कादायक असुन हल्लाखोरांवर ताबडतोब कठोर कारवाई करण्याच्या सुचना आ.दत्तात्रय भरणे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.आज सकाळी नेहमीप्रमाणे श्रीकांत पाटील हे आपल्या कार्यालयाकडे जात असताना अचानकपणे हल्लाखोरांनी त्यांच्यावर मिरचीपुड टाकून हल्ला केला.मात्र सुदैवाने श्री.पाटील आणि त्यांचे वाहनचालक या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांना समजताच त्यांनी त्वरित तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती घेऊन तब्येतीची विचारपूस केली. तसेच याविषयी बोलताना श्री.भरणे म्हणाले की,श्रीकांत पाटील हे अतिशय प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तालुक्यामध्ये परिचीत असुन त्यांच्या प्रशासकीय कामकाजाविषयी जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.मात्र असे असताना त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे हे अतिशय धक्कादायक असून या हल्ल्याचा आमदार भरणे यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच ज्यांन...

युवकांनी व्यायामासोबत प्राणायामचा नियमित अभ्यास करावा आदित्यदेव

Indapur  युवक ही राष्ट्राची शक्ती आहे राष्ट्र निर्माण मध्ये युवाशक्तिची खुप आवश्यकता असून त्यांनी अखंड प्रचंड पुरुषार्थ करावा कोणत्याही कार्यामध्ये विकल्प रहित संकल्प करावा, शरीरसदृढतेसाठी पारंपारिक व्यायामाबरोबरच श्वसनतंत्रसाठी प्राणायाम चा नियमित अभ्यास करावा असे मत पतंजली योगपीठ हरिद्वार चे केंद्रीय युवा प्रभारी स्वामी आदित्यदेवजी यांनी व्यक्त केले. मारकड कुस्ती केंद्रामध्ये पतंजलिच्या वतीने आयोजित व्यक्तिमत्व विकास व युवा संस्कार शिबिरामध्ये युवा कुस्तीगीरांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  यावेळी युवकांचे मनोबल आत्मबल वाढवण्यासाठी प्राणायाम प्रकारचे प्रशिक्षण दिले.   इंदापूर तालुका भारत स्वाभिमान ट्रस्टचे तालुका प्रभारी जयकुमार शिंदे पतंजलीचे प्रभारी मल्हारी घाडगे, मदन चव्हाण, अशोक अनपट यांनी अतिथींचे स्वागत आणि सत्कार केला  . महिला समितीच्या वतीने सायरा आतार राधिका अनपट वर्षा नागणे, जयश्री सरवदे, उमा झोळ,संपदा जाधव,यांनी औक्षण केले.  कुस्ती केंद्रातील युवकांनी यावेळी मल्लखांब, रेसलिंग ,कुस्तीची प्रात्यक्षिके करून दाखवली.कुस्ती केंद्राचे सं...

*जिजाऊ इन्स्टिट्यूट कालठणचा यश उमेश लोखंडे अभिनव राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षेमध्ये महाराष्ट्रात प्रथम*

इंदापूर:- अभिनव राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षा इयत्ता पहिली मध्ये शंभर पैकी अठ्यांनव गुण मिळवलेला यश उमेश लोखंडे विद्यार्थ्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, श्रुती जितेंद्र लवटे ( केंद्रात 2 रँक) इयत्ता सातवी, समीक्षा चंद्रकांत मारकड ( केंद्रात 3 रँक ) इयत्ता तिसरी, शुभ्रा नितिन घाडगे ( केंद्रात 4 रँक ) इयत्ता सातवी  अभिनव राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षा मध्ये पंधरा पात्रताधारक विद्यार्थी  कार्तिक नितीन मारकड ( इयत्ता दुसरी )  विराट राहुल देवकर ( इयत्ता दुसरी ) सायली संतोष घोरपडे( इयत्ता दुसरी ) रुद्रप्रताप राजेंद्र टकले( इयत्ता तिसरी ) मनस्वी औदुंबर देवकर इयत्ता चौथी ) विग्नेश वैभव देवकर( इयत्ता चौथी ) दर्शन शिवाजी सातव (इयत्ता चौथी ) स्वराली दीपक शिंदे ( इयत्ता चौथी ) विनायक सचिन कांबळे( इयत्ता चौथी ) तेजस मारुती बनकर(इयत्ता पाचवी ) शिवराज महेश जगताप( इयत्ता पाचवी ) संभव संतोष घोरपडे( इयत्ता पाचवी ) राजवीर विकास बनकर( इयत्ता पाचवी ) तृप्ती योगेश देवकर ( इयत्ता पाचवी ) अथर्व सत्यवान शिंदे ( इयत्ता सातवी ) एकुण एकोणीस विद्यार्थ्यांनी यश संपादन...

*इंदापूरमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान, शासनाने तातडीने मदत करावी- हर्षवर्धन पाटील*

इंदापूर :        राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. यामध्ये इंदापूर तालुक्यात देखील अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली आहे.         इंदापूर तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील म्हणाले, काल आपल्या इंदापूर तालुक्यात ठिकठिकाणी अनेक गावांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये अनेक शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांची घरे, तसेच शेतीची पिके जमीनदोस्त झाली.       अनेक शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिके, तसेच बागांचे मोठे नुकसान झाले. विजेचे खांब, घरावरील पत्रे, बांधकाम याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, याबाबत अधिकाऱ्यांनाही लक्ष घालण्याबाबत सूचना केल्या आहेत.        शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसात मोठे नुकसान झाले आहे. त्यांना राज्...

*उजनी पाणलोट क्षेत्रात बोट पलटी होण्याची घटना दुर्दैवी : हर्षवर्धन पाटील*

इंदापूर : हे चित्र काल्पनिक आहेयाचा जिवीत मृत यांचाशी काही संबंध नाही             उजनी धरण पाणलोट क्षेत्रात कुगाव हून कळाशीकडे येणारी बोट पाण्यामध्ये पलटी होण्याची मंगळवारी (दि.21) सायंकाळी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी व हृदयदावक अशी आहे. या दुर्दैवी घटने संदर्भात युद्ध पातळीवरती मदत व बचाव कार्य करणेसाठी शासकीय यंत्रणा तातडीने कार्यरत झाल्याची माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.             या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचेसह इतर विभागाच्या शासकीय यंत्रणेची संपर्क साधून मदत कार्य करणे संदर्भात माहिती घेऊन सूचना दिल्या आहेत. या संदर्भात हर्षवर्धन पाटील शासकीय यंत्रणेची संपर्क ठेवून आहेत.     सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव येथून ही बोट इंदापूर तालुक्यातील काळाशी गावाकडे येत असताना सदरची दुर्दैवी घटना घडली. बोटीतील अनेक व्यक्ती बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे  

*जय भवानी गडविकास प्रतिष्ठान लाखेवाडीची 100 % निकालाची परंपरा कायम,*

एच.एस. सी. बोर्ड परीक्षा मार्च 2024 मध्ये उत्तुंग यशाची भरारी* सलग 5 वर्ष 100 % निकालाची परंपरा कायम राखत विद्यालयाची यशस्वी  वाटचाल .  इंदापूर:- जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचालित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मधील एच.एस.सी .बोर्ड परीक्षा मार्च 2024 मध्ये प्रशालेतील एकूण 196 विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते, त्यापैकी 54 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहे, 123 विद्यार्थी प्रथम क्लासने उत्तीर्ण झाले आहेत, तर 19 विद्यार्थी द्वितीय क्लासने उत्तीर्ण झाले आहेत. *विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत.* 1) घाडगे अनिषा देविदास  87.83% 2) बोडके श्रीधर विजय  84.17% 3 ) जगताप अनुष्का अनंता  83.67% 4 ) नागटिळक नेहा अशोक  83.17% 5 ) नागटिळक निकिता अशोक  83% 5) ठवरे ज्योती सोपान  83% 5 ) सुर्यवंशी प्रज्वल भारत 83% प्रशालेतील एकूण 196 विद्यार्थ्यांपैकी 170 विद्यार्थी हे विज्ञान विभागाचे होते व वाणिज्य विभागाचे 26 विद्यार्थी होते त्यापैकी *विज्ञान विभागातील पीक विज्ञान या विषयात 200 पैकी 200...

एन्. ई. एस्. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर कनिष्ठ महविद्यालयाचा इ.12वी परीक्षेचा एकूण निकाल 97.14 टक्के

  इंदापूर तालुक्यातील   निमसाखर एज्युकेशन सोसायटी निमसाखर संचलित एन्. ई. एस्. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर, ता. इंदापूर जि. पुणे या कनिष्ठ महविद्यालयाचा इ.12वी परीक्षेचा एकूण निकाल 97.14 टक्के इतका लागला असून त्यामध्ये विज्ञान शाखेत 133 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 131 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विज्ञान शाखेचा निकाल 99.18 टक्के तसेच, कला शाखेतून 60 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 56 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन कला शाखेचा निकाल 90.69 टक्के इतका लागला आहे. तसेच, वाणिज्य शाखेतून 50 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 49 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन वाणिज्य शाखेचा निकाल 97.77 टक्के इतका लागला आहे. *विज्ञान शाखा*    *प्रथम क्रमांक* - 1. कु. कुंभार सेजल ज्ञानदेव  एकूण गुण 600/519 = 86.50%  *द्वितीय क्रमांक*  2. कु. नायकुडे अर्चिता अनिल  एकूण गुण  600/507 = 84.50%  *तृतीय क्रमांक*  3. कु. घोगरे प्रणोती शहाजी एकूण गुण 600/500 = 83.33% *कला शाखा*    *प्रथम क्रमांक* - 1. कु. कदम आशा भारत...

यंदा अहिल्याबाई होळकर कॉलेजचा १२ वीचा निकाल ९५.५५% लागला,विज्ञान शाखेचा:- १०० %,तर कला शाखेचा ८४.६१.% निकाल.

इंदापूर( दि.२१*) : - येथील राजमाता अहिल्याबाई होळकर निवासी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान व कला शाखेच्या मुला- मुलींचा बारावीचा निकाल ९५.५५ % टक्के लागला असून दोन्ही शाखेंनी कॉलेजच्या यशाची परंपरा कायम राखत यंदाही घवघवीत यश संपादन केले आहे. यावेळी कॉलेजच्या विज्ञान शाखेचे ३२ परीक्षार्थी परीक्षेस सामोरे गेले.सर्व ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचे १३ पैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. *विज्ञान शाखेचे पहिले तीन मानकरी*  - *शेकडा गुणांसह -*  *प्रथम क्रमांक -१) कु. शेंडगे वैष्णवी कांतीलाल ६७.३३%*  *द्वितीय क्रमांक- २) कु.काळेल ज्योती दादा ६५.८३ %* *( मराठीत ९३ गुण)* *तृतीय क्रमांक -३) मोरे रेश्मा सुखदेव - ६१.५०%* *कला शाखेचे पहिले तीन मानकरी*         *शेकडा गुणांसह -*  *प्रथम क्रमांक- १) कु.पोळ साक्षी रामचंद्र .- ६६.६७ %* *द्वितीय क्रमांक- २) - कु. सुखदेव शामल अरुण.६४.८३ %* *तृतीय क्रमांक- ३) निकम नाथाजी अंकुश- ६०%* वरील मानकऱ्यांसह उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचे व...

दागिन्यांची किंवा पैशांची भिशी नसून चक्क इंदापूरात ‘झाडांची भिशी’ ही कल्पनाच आदर्शवत,हरीत इंदापूर

इंदापूर:- दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘झाडांची भिशी’ ही कल्पना अनेकांना नवीन वाटेल. झालं असं, एकट्या-दुकट्यानं हे काम केलं, तर त्याला व्यापक स्वरूप येणार नाही, काहीतरी वेगळी कल्पना लढवली पाहिजे, असं मनानं घेतलं. एका-दोघांनी झाडं लावण्यापेक्षा ही सामूहिक कृती व्हायला हवी, पण त्यासाठी पैसे हवेत. ते कसे उभे करायचे? सायराभाभी आतार यांनी नगराध्यक्षा सौ.अंकिताताई मुकुंदशेठ शहा ,रश्मी निलाखे, वर्षा ननवरे , कल्पना भोर, चंद्रकांत देवकर अशोक चिंचकर , प्रशांत गिड्डे , धरमचंद लोढा, प्रशांत सिताप सह इतर काही लोकांना झाडांच्या भिशीची कल्पना सांगितली. सगळ्यांनी ती उचलून धरली आणि पाहता पाहता ती आकाराला आली. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांनाच स्वतः झाडं लावण्यासाठी वेळ देणं शक्‍य नव्हतं. शिवाय त्या झाडांचं संगोपनही करण्याचा महत्त्वाचा मुद्दा होता. सगळ्यांनी मिळून त्यावर तोडगा काढला. दिनांक १८/५ / २०२४ . वार शनिवार . पर्यावरणात तापमानात सतत होणारी वाढ ही चिंतेची बाब ठरत आहे याला कारण मोठया प्रमाणात झाडांची होणारी कत्तल असून त्यावर उपाय म्हणजे झाडे लावा झाडे जगवा...

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

रेडा गावाच्या सरपंच सौ‌. सुनीता देवकर यांनी दिल्लीची लढाई जिंकली ; सत्यासाठी दिल्ली गाठली...!!मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

सरपंच पदाची न्यायालयीन लढाई दिल्लीपर्यंत नेणाऱ्या पहिल्या सरपंच म्हणून इंदापूर तालुक्यात आगळीवेगळी चर्चा  इंदापूर;-  तालुक्यातील रेडा गावातील ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी यांना सात जागांवर विजय मिळाला होता आणि विरोधक राष्ट्रवादीला दोन जागेवर विजय मिळाला होता‌. त्यानंतर राजकीय स्वार्थ पोटी, राजकीय खलबत्त करून नेमका शब्द कोणी कोणाला दिलाय हे सर्वसामान्य जनतेला आणि पार्टीच्या  कार्यकर्त्यांना माहित नाही‌. नेमका हा असा म्हणाला आणि तो असा म्हणाला,मी असं केलं, मी तसं केलं  अशी उडवा उडवीची उत्तरे आणि  गावात जिकडे तिकडे चर्चा ऐकायला मिळत होती.खर काय हे अजून नागरिकांना माहिती नसून नेमके काय कारण घडलं की, रेडा गावातील राजकारणाचा चिखल झाला आहे ‌. काही जणांनी अनेक देवळातील देव खिशात घालून ओढ्या नाल्यात सोडले. ह्या देवाची शपथ घे, त्या देवाची शपथ घे,आले भाजप मधुन निवडणूक आणि पदा पायी ह्याचे तळवे चाट त्याचं पुढेपुढे लाळघोटेपणा कर , तुप मिळतंय म्हणून उष्ट चाटे पर्यंत पातळी गाठली.  त्यानंतर खोटेनाटे आरोप करून  राजकीय वरदहस्तानी ग्रामसेव...

*वाल्हे येथे पैशाच्या वादातून मित्राचा खून*

वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ  वाल्हे ( ता.पुरंदर ) हद्दीतील एका परमिट रूम अँड बिअरबारच्या कॉटेज जवळ दारू पार्टीत मग्न झालेल्या तळीरामांनी पैशाच्या वादातून आपल्याच मित्राचा निर्घूणपणे खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार ( दि.१४ मे ) रोजी रात्री ९ च्या सुमारास पवन संभाजी शेलार ( वय २३ रा.पिंगोरी ) व त्याचे मित्र तुषार शरद यादव तसेच विकास अर्जुन भोसले ( दोघे रा.पिंगोरी ) व अविनाश आत्माराम पवार ( रा.आडाचीवाडी ) यांच्या समवेत वाल्हे हद्दीतील एका परमिट रूम अँड बिअरबारच्या कॉटेज जवळ दारू पित बसले होते.त्यावेळी पैशाच्या कारणास्तव वाद निर्माण झाल्याने तुषार यादव विकास भोसले व अविनाश पवार या तिघांनी मिळून पवन शेलार याला मातीच्या विटांसह दारूच्या बाटलीने अमानुषपणे मारहाण केली.यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी पवन शेलार याला उपचारासाठी जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले .परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते.मात्र उपचारादरम्यान पवन शेलार याचा मृ...

*भिमाई आश्रमशाळेत पँथर रत्नाकर मखरेंना तृतीय स्मृतीदिनी अभिवादन !!*

*भिमाई आश्रमशाळेत पँथर रत्नाकर मखरेंना तृतीय स्मृतीदिनी अभिवादन !!* *इंदापूर* ( दि.१४ ) :- इंदापूरचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत पँथर रत्नाकर मखरेंच्या (तात्या) तृतीय स्मृती दिनाचा कार्यक्रम (दि.१४) भिमाई आश्रमशाळेत छोटेखानी पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बौद्धाचार्य किशोर धाईंजे यांच्या हस्ते व आयु. शकुंतला रत्नाकर मखरे, ॲड. राहुल मखरे,संतोष मखरे, ॲड. समीर मखरे व कुटुंबीयांच्या उपस्थितीत दिवंगत रत्नाकर मखरेंच्या (तात्या) समाधीस्थळी त्रिशरण पंचशील घेऊन पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गोपीचंद गलांडे,माऊली नाचण, हनुमंत कांबळे,बाबजी भोंग, नानासाहेब चव्हाण, मधुकर जगताप, संग्राम भैलुमे,राहुल शिंगाडे, महेश लोंढे,गोरख तिकोटे, संजय कांबळे,युवराज बन, संतोष शेंडे, अश्वजीत कांबळे, ॲड.सूरज मखरे, तेजस मखरे,अक्षय मखरे, साहेबराव पवार,शिक्षक व कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांन...

*हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामदैवत भैरवनाथाचे सहकुटुंब घेतले दर्शन!- बावडा येथे भैरवनाथाची यात्रा सुरू*

इंदापूर                  बावडा गावचे ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भैरवनाथ मंदिरात बुधवारी ( दि. 9) सकाळी सहकुटुंब विधिवत पूजा केली व दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांनी भैरवनाथाच्या अश्वाचे दर्शन घेतले व श्रीफळाचे तोरण अर्पण केले.      यावेळी इंदापूर तालुका जिजाऊ बचत गट असोसिएशनचे अध्यक्षा सौं.भाग्यश्री पाटील, इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख व युवा नेते राजवर्धन पाटील उपस्थित होते. चालू वर्षी चांगले पाऊसमान होऊन, नागरिक व शेतकरी सुखी समाधानी व्हावेत, असे श्री भैरवनाथ चरणी साकडे घातल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच यात्रेनिमित्त हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांनी ग्रामस्थांना यावेळी शुभेच्छा दिल्या.        भैरवनाथ यात्रेनिमित्त श्रींची छबिना मिरवणूक बुधवारी दि.15 रात्री निघणार असून, गुरुवारी दि.16 रात्री 7 वा. बाजारतळावरती मनोरंजनासाठी लोकनाट्य कार्यक्रमाचे आय...

Where denied, the highest rank attained, Human life is precious, so one should be able to love even one's enemy.Jeevan Gaurav awardee Engineer, Dr. Valuable thoughts of Mr. Anil Kumar Gaikwad.

Indapur, Dr.  Sandesh Shah. No matter how someone treats us, we do not treat them the same way.  Then, there is no difference between their culture and ours.  Those who had a direct or indirect hand in suspending me were scared after I assumed this big position.  They thought that I would deal with them with vengeance;  But I didn't.  Rather, I promoted some of them.  Revenge is not the way to correct injustice, but it is a part of our culture to be kind even to the bad, asserted Jeevan Gaurav Award winner Engineer, Vice Chairman and Managing Director of Maharashtra State Road Development Corporation, Shri.  Anil Kumar Gaikwad did.      Despite passing the Public Works Department examination, I was not accepted in the Public Works Department as I was only a junior engineer in the Water Conservation Department; but I wanted to join this department.  With this determination, the efforts were culm...