मुख्य सामग्रीवर वगळा

दागिन्यांची किंवा पैशांची भिशी नसून चक्क इंदापूरात ‘झाडांची भिशी’ ही कल्पनाच आदर्शवत,हरीत इंदापूर

इंदापूर:- दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘झाडांची भिशी’ ही कल्पना अनेकांना नवीन वाटेल. झालं असं, एकट्या-दुकट्यानं हे काम केलं, तर त्याला व्यापक स्वरूप येणार नाही, काहीतरी वेगळी कल्पना लढवली पाहिजे, असं मनानं घेतलं. एका-दोघांनी झाडं लावण्यापेक्षा ही सामूहिक कृती व्हायला हवी, पण त्यासाठी पैसे हवेत. ते कसे उभे करायचे? सायराभाभी आतार यांनी नगराध्यक्षा सौ.अंकिताताई मुकुंदशेठ शहा ,रश्मी निलाखे, वर्षा ननवरे , कल्पना भोर, चंद्रकांत देवकर अशोक चिंचकर , प्रशांत गिड्डे , धरमचंद लोढा, प्रशांत सिताप सह इतर काही लोकांना झाडांच्या भिशीची कल्पना सांगितली. सगळ्यांनी ती उचलून धरली आणि पाहता पाहता ती आकाराला आली. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांनाच स्वतः झाडं लावण्यासाठी वेळ देणं शक्‍य नव्हतं. शिवाय त्या झाडांचं संगोपनही करण्याचा महत्त्वाचा मुद्दा होता. सगळ्यांनी मिळून त्यावर तोडगा काढला. दिनांक १८/५ / २०२४ . वार शनिवार . पर्यावरणात तापमानात सतत होणारी वाढ ही चिंतेची बाब ठरत आहे याला कारण मोठया प्रमाणात झाडांची होणारी कत्तल असून त्यावर उपाय म्हणजे झाडे लावा झाडे जगवा .हेच उत्तर आहे म्हणूनच या उपक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन पर्यावरण संतुलनासाठी एकत्र येऊन झाडांची भिशी ची यासंबंधी चर्चा करणे साठी मराठी शाळा क्र . १ व २ नगर परिषद जवळ मिटींग आयोजीत करणेत आली होती त्यास सर्व स्तरातून पहिल्याच मिटींगला १०६ सभासद मिळाले या मधे डॉक्टर ,वकिल ,पतंजली योग साधक, शिक्षक , पोलीस स्टेशनचे कर्मचारी बांधव व सूज्ञ निसर्ग प्रेमी मंडळींनी यात आपला सहभाग नोंदवला . यावेळी इंदापूर शहरात प्रत्येक महिन्याला वृक्षांचे रोपण करण्याचे ठरले . तसेच याची सुरुवात म्हणून सभासदाने सुरुवातीला १ झाड म्हणाजे १०६ झाडे लावण्यात येणार आहेत  सावली देणारे व जमिनी मध्ये जलस्त्रोत निर्माण होईल अशा झाडांना म्हणजेप्रामुख्याने वड, लिंब, उंबर, चिंच, पिंपळ, बकुळ, करंज, रेन ट्री, गुलमोहर, नीलमोहर, भोंडर, पांगरा, अर्जुन, कांचनार, अंजन, सप्तपर्णी, जांभूळ, कडुनिंब, काशीद, बेल, सावर, काटेसावर, कवठ, पिंपरान, आवळा, बेहडा या झाडांना प्राधान्य दिले जाते. अशी झाडे प्राधान्याने लावण्यात येणार आहेत या वेळी पर्यावरण वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे ठरले .शैक्षणिक संस्था, शाळा, मैदान, कॉलनी, रस्तेसोसायटी, शाळा, संस्थेच्या परिसरात रोपे लावायची त्याचे संगोपन करणार आहे, ,हरीत व स्वच्छ इंदापूरात आणखिन भर पाडणार आहे आशी माहीती हमिदभाई आत्तार यांनी दिली, 
*******************************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते