इंदापूर:- दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘झाडांची भिशी’ ही कल्पना अनेकांना नवीन वाटेल. झालं असं, एकट्या-दुकट्यानं हे काम केलं, तर त्याला व्यापक स्वरूप येणार नाही, काहीतरी वेगळी कल्पना लढवली पाहिजे, असं मनानं घेतलं. एका-दोघांनी झाडं लावण्यापेक्षा ही सामूहिक कृती व्हायला हवी, पण त्यासाठी पैसे हवेत. ते कसे उभे करायचे? सायराभाभी आतार यांनी नगराध्यक्षा सौ.अंकिताताई मुकुंदशेठ शहा ,रश्मी निलाखे, वर्षा ननवरे , कल्पना भोर, चंद्रकांत देवकर अशोक चिंचकर , प्रशांत गिड्डे , धरमचंद लोढा, प्रशांत सिताप सह इतर काही लोकांना झाडांच्या भिशीची कल्पना सांगितली. सगळ्यांनी ती उचलून धरली आणि पाहता पाहता ती आकाराला आली. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांनाच स्वतः झाडं लावण्यासाठी वेळ देणं शक्य नव्हतं. शिवाय त्या झाडांचं संगोपनही करण्याचा महत्त्वाचा मुद्दा होता. सगळ्यांनी मिळून त्यावर तोडगा काढला. दिनांक १८/५ / २०२४ . वार शनिवार . पर्यावरणात तापमानात सतत होणारी वाढ ही चिंतेची बाब ठरत आहे याला कारण मोठया प्रमाणात झाडांची होणारी कत्तल असून त्यावर उपाय म्हणजे झाडे लावा झाडे जगवा .हेच उत्तर आहे म्हणूनच या उपक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन पर्यावरण संतुलनासाठी एकत्र येऊन झाडांची भिशी ची यासंबंधी चर्चा करणे साठी मराठी शाळा क्र . १ व २ नगर परिषद जवळ मिटींग आयोजीत करणेत आली होती त्यास सर्व स्तरातून पहिल्याच मिटींगला १०६ सभासद मिळाले या मधे डॉक्टर ,वकिल ,पतंजली योग साधक, शिक्षक , पोलीस स्टेशनचे कर्मचारी बांधव व सूज्ञ निसर्ग प्रेमी मंडळींनी यात आपला सहभाग नोंदवला . यावेळी इंदापूर शहरात प्रत्येक महिन्याला वृक्षांचे रोपण करण्याचे ठरले . तसेच याची सुरुवात म्हणून सभासदाने सुरुवातीला १ झाड म्हणाजे १०६ झाडे लावण्यात येणार आहेत सावली देणारे व जमिनी मध्ये जलस्त्रोत निर्माण होईल अशा झाडांना म्हणजेप्रामुख्याने वड, लिंब, उंबर, चिंच, पिंपळ, बकुळ, करंज, रेन ट्री, गुलमोहर, नीलमोहर, भोंडर, पांगरा, अर्जुन, कांचनार, अंजन, सप्तपर्णी, जांभूळ, कडुनिंब, काशीद, बेल, सावर, काटेसावर, कवठ, पिंपरान, आवळा, बेहडा या झाडांना प्राधान्य दिले जाते. अशी झाडे प्राधान्याने लावण्यात येणार आहेत या वेळी पर्यावरण वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे ठरले .शैक्षणिक संस्था, शाळा, मैदान, कॉलनी, रस्तेसोसायटी, शाळा, संस्थेच्या परिसरात रोपे लावायची त्याचे संगोपन करणार आहे, ,हरीत व स्वच्छ इंदापूरात आणखिन भर पाडणार आहे आशी माहीती हमिदभाई आत्तार यांनी दिली,
*******************************************************
टिप्पण्या