मुख्य सामग्रीवर वगळा

रेडा गावाच्या सरपंच सौ‌. सुनीता देवकर यांनी दिल्लीची लढाई जिंकली ; सत्यासाठी दिल्ली गाठली...!!मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

सरपंच पदाची न्यायालयीन लढाई दिल्लीपर्यंत नेणाऱ्या पहिल्या सरपंच म्हणून इंदापूर तालुक्यात आगळीवेगळी चर्चा 

इंदापूर;-  तालुक्यातील रेडा गावातील ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी यांना सात जागांवर विजय मिळाला होता आणि विरोधक राष्ट्रवादीला दोन जागेवर विजय मिळाला होता‌. त्यानंतर राजकीय स्वार्थ पोटी, राजकीय खलबत्त करून नेमका शब्द कोणी कोणाला दिलाय हे सर्वसामान्य जनतेला आणि पार्टीच्या  कार्यकर्त्यांना माहित नाही‌. नेमका हा असा म्हणाला आणि तो असा म्हणाला,मी असं केलं, मी तसं केलं  अशी उडवा उडवीची उत्तरे आणि  गावात जिकडे तिकडे चर्चा ऐकायला मिळत होती.खर काय हे अजून नागरिकांना माहिती नसून नेमके काय कारण घडलं की, रेडा गावातील राजकारणाचा चिखल झाला आहे ‌.


 त्यानंतर खोटेनाटे आरोप करून  राजकीय वरदहस्तानी ग्रामसेवक हाताला धरून, गटविकास अधिकारी यांना हाताशी धरून  लोकप्रतिनिधी,तालुका अध्यक्ष ,नातेवाईकांचा हातभार घेऊन  आयुक्त, जिल्हा अधिकारी यांच्याकडे सरपंचाच्या विरोधात तक्रारी करून सरपंच आणि सदस्य पद रद्द करायला  भाग पाडले‌. त्यानंतर अपिलात तक्रार करणे, वरिष्ठ कोर्टात न्याय मागण्यासाठी अपील करणे अशा घटना घडत गेल्या . पुणे आयुक्त यांच्या निर्णयाला ग्रामविकास मंत्र्यांनी स्थगिती  दिल्यानंतर त्या  निकालाच्या विरोधात हायकोर्टातून स्थगिती उठवण्यात आली होती.
रेडा गावच्या महिला सरपंच सौ. सुनीता देवकर हार मानतील त्या कसल्या..!! सत्यासाठी दिल्ली थेट  गाठली. ग्रामविकास मंत्र्याच्या निकालाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी पार्टीने मुंबई उच्च न्यायालयातून दिलेल्या स्थगिती आदेशाला रेडा गावच्या सरपंच  सौ.सुनीता देवकर यांनी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात अपील केले.

रेड्या गावच्या सरपंच सौ .सुनीता नानासाहेब देवकर आणि त्यांची पती नानासाहेब जालिंदर देवकर हे हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थ म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य सहकार्य यांनी हार न मानता थेट दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि त्या दादेला यश आले . अखेर रेड्या गावच्या महिला सरपंचांनी दाखवून दिलं सत्य सत्य असतं.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपच्या सरपंच सौ. सुनीता नानासाहेब देवकर यांच्या अपिलाच्या वरती ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात स्थगित आदेश मिळवला होता. त्या स्थगिती आदेशाला दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने आता स्थगिती दिली आहे आणि पुन्हा रेड्या गावच्या ग्रामपंचायत सरपंच पदी सौ. सुनीता नानासाहेब देवकर यांची निवड झाली आहे. दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाने म्हणजेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशात मुंबई उच्च निकाला स्थगिती आदेशाबाबत  ताशेरे ओढण्यात आले असून दिल्ली सर्वोच्च न्यायालय म्हणजेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या देशात असे म्हटले आहे की,
दरम्यान, दि.२० मार्च २०२४  रोजी  मुंबई  येथील उच्च न्यायलयाने पारित केलेल्या अस्पष्ट आदेशाची कार्यवाही स्थगित राहील. परिणामी, प्रभारी मंत्र्यांनी दि.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी दिलेली अंतरिम स्थगिती पुनर्संचयित केली जाईल आणि याचिकाकर्त्याला पुढील आदेशापर्यंत ग्रामपंचायतीच्या सरपंचाची कर्तव्ये पार पाडण्याची परवानगी दिली जाईल. तथापि, गुणवत्तेवर अपीलाचा निर्णय घेण्याच्या सक्षम अधिकाऱ्याच्या मार्गात या कार्यवाही प्रलंबित राहणार नाहीत. असे सर्वोच्च न्यायालय यांनी आपल्या स्थगिती आदेशात म्हटले आहे.



 शेवटी रेडा गावच्या सुनिता देवकर सरपंच यांनी दिल्लीची लढाई जिंकलीच आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने गावच्या सरपंच पदावर भाजपचे कट्टर सरपंच पुन्हा विराजमान झाले. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील रेडा गाव हे महाराष्ट्रात चर्चेत आले असून सरपंच पदासाठी दिल्लीत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोकवणारे गाव म्हणून ओळख झाली आहे. रेडा गावात एक हर्ष उल्हास,आनंद उत्सव केला जात आहे.अखेर सत्याचा विजय झाला अशा शब्दात सरपंच सौ.सुनीता देवकर यांनी आपली भावना व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते