मुख्य सामग्रीवर वगळा

रेडा गावाच्या सरपंच सौ‌. सुनीता देवकर यांनी दिल्लीची लढाई जिंकली ; सत्यासाठी दिल्ली गाठली...!!मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

सरपंच पदाची न्यायालयीन लढाई दिल्लीपर्यंत नेणाऱ्या पहिल्या सरपंच म्हणून इंदापूर तालुक्यात आगळीवेगळी चर्चा 

इंदापूर;-  तालुक्यातील रेडा गावातील ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी यांना सात जागांवर विजय मिळाला होता आणि विरोधक राष्ट्रवादीला दोन जागेवर विजय मिळाला होता‌. त्यानंतर राजकीय स्वार्थ पोटी, राजकीय खलबत्त करून नेमका शब्द कोणी कोणाला दिलाय हे सर्वसामान्य जनतेला आणि पार्टीच्या  कार्यकर्त्यांना माहित नाही‌. नेमका हा असा म्हणाला आणि तो असा म्हणाला,मी असं केलं, मी तसं केलं  अशी उडवा उडवीची उत्तरे आणि  गावात जिकडे तिकडे चर्चा ऐकायला मिळत होती.खर काय हे अजून नागरिकांना माहिती नसून नेमके काय कारण घडलं की, रेडा गावातील राजकारणाचा चिखल झाला आहे ‌.


 त्यानंतर खोटेनाटे आरोप करून  राजकीय वरदहस्तानी ग्रामसेवक हाताला धरून, गटविकास अधिकारी यांना हाताशी धरून  लोकप्रतिनिधी,तालुका अध्यक्ष ,नातेवाईकांचा हातभार घेऊन  आयुक्त, जिल्हा अधिकारी यांच्याकडे सरपंचाच्या विरोधात तक्रारी करून सरपंच आणि सदस्य पद रद्द करायला  भाग पाडले‌. त्यानंतर अपिलात तक्रार करणे, वरिष्ठ कोर्टात न्याय मागण्यासाठी अपील करणे अशा घटना घडत गेल्या . पुणे आयुक्त यांच्या निर्णयाला ग्रामविकास मंत्र्यांनी स्थगिती  दिल्यानंतर त्या  निकालाच्या विरोधात हायकोर्टातून स्थगिती उठवण्यात आली होती.
रेडा गावच्या महिला सरपंच सौ. सुनीता देवकर हार मानतील त्या कसल्या..!! सत्यासाठी दिल्ली थेट  गाठली. ग्रामविकास मंत्र्याच्या निकालाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी पार्टीने मुंबई उच्च न्यायालयातून दिलेल्या स्थगिती आदेशाला रेडा गावच्या सरपंच  सौ.सुनीता देवकर यांनी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात अपील केले.

रेड्या गावच्या सरपंच सौ .सुनीता नानासाहेब देवकर आणि त्यांची पती नानासाहेब जालिंदर देवकर हे हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थ म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य सहकार्य यांनी हार न मानता थेट दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि त्या दादेला यश आले . अखेर रेड्या गावच्या महिला सरपंचांनी दाखवून दिलं सत्य सत्य असतं.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपच्या सरपंच सौ. सुनीता नानासाहेब देवकर यांच्या अपिलाच्या वरती ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात स्थगित आदेश मिळवला होता. त्या स्थगिती आदेशाला दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने आता स्थगिती दिली आहे आणि पुन्हा रेड्या गावच्या ग्रामपंचायत सरपंच पदी सौ. सुनीता नानासाहेब देवकर यांची निवड झाली आहे. दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाने म्हणजेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशात मुंबई उच्च निकाला स्थगिती आदेशाबाबत  ताशेरे ओढण्यात आले असून दिल्ली सर्वोच्च न्यायालय म्हणजेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या देशात असे म्हटले आहे की,
दरम्यान, दि.२० मार्च २०२४  रोजी  मुंबई  येथील उच्च न्यायलयाने पारित केलेल्या अस्पष्ट आदेशाची कार्यवाही स्थगित राहील. परिणामी, प्रभारी मंत्र्यांनी दि.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी दिलेली अंतरिम स्थगिती पुनर्संचयित केली जाईल आणि याचिकाकर्त्याला पुढील आदेशापर्यंत ग्रामपंचायतीच्या सरपंचाची कर्तव्ये पार पाडण्याची परवानगी दिली जाईल. तथापि, गुणवत्तेवर अपीलाचा निर्णय घेण्याच्या सक्षम अधिकाऱ्याच्या मार्गात या कार्यवाही प्रलंबित राहणार नाहीत. असे सर्वोच्च न्यायालय यांनी आपल्या स्थगिती आदेशात म्हटले आहे.



 शेवटी रेडा गावच्या सुनिता देवकर सरपंच यांनी दिल्लीची लढाई जिंकलीच आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने गावच्या सरपंच पदावर भाजपचे कट्टर सरपंच पुन्हा विराजमान झाले. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील रेडा गाव हे महाराष्ट्रात चर्चेत आले असून सरपंच पदासाठी दिल्लीत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोकवणारे गाव म्हणून ओळख झाली आहे. रेडा गावात एक हर्ष उल्हास,आनंद उत्सव केला जात आहे.अखेर सत्याचा विजय झाला अशा शब्दात सरपंच सौ.सुनीता देवकर यांनी आपली भावना व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...