मुख्य सामग्रीवर वगळा

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली 
इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24
                 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
           राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
         हर्षवर्धन पाटील म्हणाले, प्रतापराव भोसले उर्फ भाऊंचा सहवास म्हणजे सकारात्मक विचार व माहितीचा प्रचंड खजिना असे. भाऊंबरोबर गेल्या दोन-तीन दशकांमध्ये अनेक कार्यक्रमांना एकत्र येण्याचा योग मला आला.  भुईंजचे भोसले घराणे व बावड्याचे पाटील घराणे यांचा स्नेह, मैत्री सन 1967 पासून आजही कायम आहे. माझे काका शंकररावजी पाटील व प्रतापराव भोसले या दोन भाऊंनी राज्य विधिमंडळात तसेच लोकसभेमध्ये सहकारी म्हणून काम केले. संसदेमध्ये भाऊंनी सेंट्रल हॉलमध्ये खासदारांना एकत्र येण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी महाराष्ट्र कट्टा सुरू केला, त्या कट्ट्याची चर्चा त्यावेळी देशभर झाली. या कट्ट्याचे माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील अनेक लोकहिताचे प्रश्न मार्गी लागले. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर लोकहितासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना आखून त्या यशस्वीपणे राबविल्या.
         राज्य मंत्रिमंडळात ग्रामविकास व इतर खात्यांचे मंत्री म्हणून काम करीत असताना भाऊंनी घेतलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयामुळे आज महाराष्ट्राचा विकास, प्रगती झालेली दिसून दिसत आहे. भाऊ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. राज्याच्या राजकारणाचा इतिहास हा प्रतापराव बाबुराव भोसले या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
     खंडाळा सहकारी साखर कारखान्याची नोंदणी होऊन 20 वर्षे झाली होती, तरी साखर कारखाना उभा राहत नव्हता. केवळ भाऊंच्या आग्रहातर मी सहकार मंत्री असताना सदरच्या कारखान्याला विशेष बाब म्हणून परवानगी दिली व तो कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा उभा राहिला. सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये भाऊंचा मोलाचा वाटा राहिला आहे. 
      भाऊंची एक बाब माझ्या विशेष स्मरणात राहिली आहे, ती म्हणजे ते फोनची डायरी जवळ बाळगत नव्हते. त्यावेळी लँडलाईनचे फोन होते. एखाद्याला फोन लावण्यासाठी ते डायरी न वापरता तोंडपाठ असलेले फोन नंबर सांगत. त्यांच्या या प्रचंड स्मरणशक्तीचे अनेकांना कौतुक वाटत असे, अशी आठवण हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केली. भाऊंनी राज्यामध्ये अनेक दशके राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी क्षेत्रामध्ये केलेले कार्य, त्यांचे योगदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. त्यांचे चिरंजीव माजी आमदार मदनराव भोसले व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वराने द्यावी, अशी प्रार्थनाही हर्षवर्धन पाटील यांनी केली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...