मुख्य सामग्रीवर वगळा

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली 
इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24
                 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
           राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
         हर्षवर्धन पाटील म्हणाले, प्रतापराव भोसले उर्फ भाऊंचा सहवास म्हणजे सकारात्मक विचार व माहितीचा प्रचंड खजिना असे. भाऊंबरोबर गेल्या दोन-तीन दशकांमध्ये अनेक कार्यक्रमांना एकत्र येण्याचा योग मला आला.  भुईंजचे भोसले घराणे व बावड्याचे पाटील घराणे यांचा स्नेह, मैत्री सन 1967 पासून आजही कायम आहे. माझे काका शंकररावजी पाटील व प्रतापराव भोसले या दोन भाऊंनी राज्य विधिमंडळात तसेच लोकसभेमध्ये सहकारी म्हणून काम केले. संसदेमध्ये भाऊंनी सेंट्रल हॉलमध्ये खासदारांना एकत्र येण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी महाराष्ट्र कट्टा सुरू केला, त्या कट्ट्याची चर्चा त्यावेळी देशभर झाली. या कट्ट्याचे माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील अनेक लोकहिताचे प्रश्न मार्गी लागले. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर लोकहितासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना आखून त्या यशस्वीपणे राबविल्या.
         राज्य मंत्रिमंडळात ग्रामविकास व इतर खात्यांचे मंत्री म्हणून काम करीत असताना भाऊंनी घेतलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयामुळे आज महाराष्ट्राचा विकास, प्रगती झालेली दिसून दिसत आहे. भाऊ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. राज्याच्या राजकारणाचा इतिहास हा प्रतापराव बाबुराव भोसले या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
     खंडाळा सहकारी साखर कारखान्याची नोंदणी होऊन 20 वर्षे झाली होती, तरी साखर कारखाना उभा राहत नव्हता. केवळ भाऊंच्या आग्रहातर मी सहकार मंत्री असताना सदरच्या कारखान्याला विशेष बाब म्हणून परवानगी दिली व तो कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा उभा राहिला. सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये भाऊंचा मोलाचा वाटा राहिला आहे. 
      भाऊंची एक बाब माझ्या विशेष स्मरणात राहिली आहे, ती म्हणजे ते फोनची डायरी जवळ बाळगत नव्हते. त्यावेळी लँडलाईनचे फोन होते. एखाद्याला फोन लावण्यासाठी ते डायरी न वापरता तोंडपाठ असलेले फोन नंबर सांगत. त्यांच्या या प्रचंड स्मरणशक्तीचे अनेकांना कौतुक वाटत असे, अशी आठवण हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केली. भाऊंनी राज्यामध्ये अनेक दशके राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी क्षेत्रामध्ये केलेले कार्य, त्यांचे योगदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. त्यांचे चिरंजीव माजी आमदार मदनराव भोसले व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वराने द्यावी, अशी प्रार्थनाही हर्षवर्धन पाटील यांनी केली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...