मुख्य सामग्रीवर वगळा

संघर्षयोद्धा**ॲड. राहुल मखरे* *(वकील साहेब)**महासचिव, बहुजन मुक्ती पार्टी, नवी दिल्ली**यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष मंगलमय शुभेच्छा.*

*(दि.२९/५/२०२४)*

महाविद्यालयीन जीवनापासून नेतृत्वाचा ठसा उमटविणारे उद्योन्मुख नेतृत्व ॲड. राहुल मखरे यांनी जनमानसात, समाजकार्यात व राजकीय क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. आत्मविश्वास व अभ्यासपूर्ण संवाद, प्रभावी वक्तृत्व, तळागाळात दांडगा जनसंपर्क, विविध पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांशी संपर्काचे जाळे, दुसऱ्यावर प्रभाव टाकण्याची क्षमता आणि नित्य संपर्कातून कार्यकर्ते जोडण्याची कला यातून ॲड. राहुल मखरेंनी सुसंस्कृत, निर्व्यसनी, सुशिक्षित, सामंजस्य व सर्वांचे हित साधणारा खरा मित्र अशी प्रतिमा लोकांच्यात बिंबवली आहे. कॉलेज जीवनापासूनच सामाजिक कार्यात सक्रिय होऊन विद्यार्थ्यांच्या फी संदर्भात कॉलेज प्रशासना विरोधात लोकशाही
मार्गाने आंदोलन करून आपल्या संघर्षाची चुणूक वकील साहेबांनी दाखवून दिली.
वकील साहेबांना मित्र परिवार देखील जीवाला जीव देणारा लाभला आहे. पुढे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले शालेय आणि कॉलेज
जीवनात आपल्या सवंगड्यां बरोबर मनमुरादपणे क्रिकेट खेळण्याचा आनंद वकील साहेबांनी लुटला इंदापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीचे
अध्यक्ष झाले, त्यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेबांची अप्रतिम जयंती साजरी
करून दाखवली. समाजातील युवा पिढी
समोर एक नवा आदर्श वकील साहेबांनी घालून
दिला. बहुजन महापुरुषांची सामायिक जयंती उत्सव साजरा करणे ही संकल्पना
देखील वकील साहेबांचीचं. किती दूरदृष्टी, कल्पकता दादांच्या व्यक्तीमत्वात नेतृत्वात दिसून येते. त्यांनी व्यावसायिक वकिली कधी केलीच नाही. ते जनतेचे विनाशुल्क वकिली करणारे जनतेचे वकील झाले. बहुजनांवर झालेल्या कायिक,वाचिक हल्ल्याच्या विरोधात वकील साहेब खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभे राहिले. वडील रत्नाकर मखरे (तात्या) यांचे राजकारण व समाजकारणातील चांगले
अनुभव व अभ्यासू वृत्तीचे त्यांना बाळकडू मिळाले
शिव, शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांची कास धरून
सामाजिक, राजकीय क्षेत्रात निष्ठेने वकील साहेब काम करू लागले. वकील साहेबांनी बामसेफचे सर्वेसर्वा राष्ट्रीय नेते मा. वामन मेश्राम साहेबांचे नेतृत्व स्वीकारत आपल्या
राजकीय, सामाजिक नेतृत्वाला एक नवा
आयाम दिला. वकील साहेबांचे नेतृत्व खऱ्या अर्थाने खुलले. पुढे बहुजन मुक्ती पार्टी ह्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश करुन नवी राजकीय इनिंग वकील साहेबांनी सुरु
केली. राष्ट्रीय पक्ष नेतृत्वाने वकील साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव
पदाची जबाबदारी दिली. वकील साहेबांनी पक्षाची प्रतिष्ठा, निष्ठा राखत स्वतःला झोकून देत निःस्वार्थपणे सर्व सामान्य
व्यक्तीस अर्थात शेवटच्या घटकाला न्याय मिळून देण्यासाठी अनेकदा संघर्ष, आंदोलन,रास्तारोको केले. उपोषणं केली. प्रसंगी वकील साहेबांना तुरुंगवास भोगावा
लागला, यामुळे सर्व सामान्य जनतेशी जोडली गेलेली आपलेपणाची वीण अधिक घट्ट होत गेली. तरुण कार्यकर्त्यांचा विश्वास वकील
साहेबांनी संपादन केला. तसेच राष्ट्रीय नेतृत्वाचा विश्वास देखील आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी संपादन केला.
२४ ऑक्टो. २०१० रोजी भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुणे पेथील
दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढण्यासाठी लाखोंची सभा झाली होती.
त्या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने
श्रेष्ठींनी ॲड.राहुल मखरेंवर सोपवली ती अचूक, उत्तम नियोजनाने यशस्वीरित्या
पार पाडून दाखवली.

सर्व सामान्य कार्यकर्ता वकील साहेबांच्या हाकेला धावून येत राहिला, वकील
साहेबांचे नेतृत्व अधिक उमेदीने पुढे येत राहिलं, व्यापक होत गेले.
केंद्र सरकारने ओबीसी जातीनिहाय जनगणना करावी यासाठी अनेकदा रास्तारोको, बंद, मोर्चे यासारखे लोकशाहीला
धरून सनदशील मार्गाने वकील साहेबांनी आंदोलने उभारली.

युवकांचा बुलंद आवाज, युवा नेतृत्व, युवानेते, शांत, संयमी, सुसंस्कृत, मितभाषी, प्रसंगी आक्रमक, कणखर, कल्पक,अभ्यासू नेतृत्व, कुशल संघटक, स्पष्ट
वक्तेपणा, जनसेवेशी सदैव तत्पर असलेले स्पष्ट वक्ते म्हणून वकील साहेब
नावारूपाला आले, ते ही स्व- कर्तृत्वाने सिध्द झाले.

विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी वकील साहेबांकडे आपापली
कामे घेऊन येतात, वकील साहेब कोणताही पक्षीय भेदाभेद करत नाही,
कोणाचीही अडवणूक न करता शक्य होईल ती मदत नाराज न करता कार्यकर्त्यांना करत असतात. तात्यांच्या पश्चात वकील साहेब आपल्या असंख्य
कार्यकर्त्यांच्या, सहकाऱ्यांच्या समवेत
इंदापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती महोत्सव समिती (ट्रस्ट)  इंदापूर तालुक्याच्या वतीने संयोजक या नात्याने
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती
मोठ्या दिमागदार पद्धतीने, उत्तम नियोजनाने सालाबाद प्रमाणे साजरी करतात.

पुण्य परोपकार पाप ते परपीड़ा।

या भूमिकेतून पक्षीय भेद न बाळगता

लोकांची कामं वकीलसाहेब अपेक्षेविना करत असतात.

एप्रिल २०२० च्या अखेरीस कोरोना काळात भिमाई आश्रमशाळेवर आंबेडकरनगर, साठेनगर, होलारवाडा आदी भागातील गरजू लोकांना अर्थात
ज्यांच्या हाताला त्यावेळी रोजगार नव्हता
अशा गरजूंना गहू, तांदूळ धान्याचे वाटप मखरे परिवाराच्या वतीने केले.
वकील साहेबांनी व्यक्तिशः कोरोना रुग्णांना वैद्यकीय मदत केली. कोरोना योद्धयांचा येथोचीत सन्मान केला. यातून त्यांची जनतेची सेवा करण्याची तळमळ
दिसून येते.कार्यकर्त्यांशी घनिष्ट ऋणानुबंध जपणारे,
कार्यकर्त्यांच्या हृदय सिंहासनावर अढळ
स्थान निर्माण करणारे वकील साहेब जनतेचा आवाज बनले. समाजसेवेची
परंपरा कृतीतून सिद्ध करावी लागते, हे आपल्या कृतीतून अनेकदा सिद्ध करत
आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल वकील साहेब करत
आहे. त्यांची विशेष ओळख म्हणजे राजकारणा पलीकडे पाहणारा एक सामाजिक कार्यकर्ता, जनसेवक, जनतेचा वकील अशीच राहिली आहे. जनतेचे प्रश्न,
अडीअडचणी, समस्या सोडविण्यासाठी आपला अधिकचा वेळ वकील साहेब
देतात. कोरेगाव भीमा चौकशी आयोग प्रकरणी कायदेशीर लढाई ते लढत आहे.कोरेगाव भीमा आयोग प्रकरणात राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्र पवार यांची ॲड. राहुल मखरेंनी क्रॉस एक्झामिनेशन घेतली. आपल्या वकिलीतला अभ्यासू बाणा त्यांनी अनेकदा सिध्द केला आहे.

२५ फेब्रुवारी २०२४ मुंबईत MMRD मैदानात आयोजित शाळा वाचवा, शिक्षण वाचवा,शिक्षक वाचवा या महामेळाव्याच्या नियोजनाची जबाबदारी पार पाडली.मा. मेश्राम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली थेट राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब,उध्दवजी ठाकरे ,खा. संजय राऊत,खा.सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्याशी संवाद साधत वकील साहेबांनी वेळोवेळी आपल्या पक्षाची, संघटनेचे विचारधारा स्पष्ट केली.
विचारधारेशी तडजोड आपल्या पित्याप्रमाणे कधी केली नाही.
दिवंगत तात्या आज हयात असते तर त्यांना आपल्या मुलाचा अभिमान वाटला असता व खूप आनंद झाला असता.

शहराच्या विकासकामात कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता राजकारणा पलीकडे जाऊन सामाजिक जाणीवेतून
सामाजिक प्रश्न, शहराच्या हिताचे प्रश्न सोडवणुकीसाठी अविरत परिश्रम वकील साहेब घेतात. लोकसंग्रहाचा सेतू बांधण्याची समृध्दीचं ऐन तारुण्यात संपादन
करणाऱ्या ॲड.राहुल मखरेंना समाजकारण व राजकारणात मोठ्यांचा
लाभलेला सहवास प्रगल्भता मिळवून देणारा ठरला आहे.

आपल्या कार्यकर्तृत्वामुळे ॲड.राहुल मखरे हे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी संघर्ष करणारे गतिमान नेतृत्व आहे. हे
अनेकदा सिद्ध झाले आहे.

वकील साहेब हे मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे या नामांकित शिक्षण संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत.

बहुजन मुक्ती पार्टी या राष्ट्रीय पक्षाच्या सचिव पदाची जबाबदारी कणखरपणे पार पाडत आहेत. 
 *बंधूतुल्य विधीज्ञ राहुल मखरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष मंगलमय शुभेच्छा !!*

*संकलन*
*श्री. नानासाहेब सानप इंदापूर*🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...