मुख्य सामग्रीवर वगळा

विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मध्ये एसएससी परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न .


दिनांक 29 /5 /2024 रोजी जय भवानी कडे विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये एस एस सी उत्तीर्ण सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वर्षभर कष्ट मेहनत करून मिळवलेल्या यशाचे कुणीतरी कौतुक केले तर आणखी मेहनत करून उत्तुंग यश मिळवण्याची प्रेरणा मिळते विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी त्यांच्या यशाचा यतोचित सन्मान व्हावा म्हणून प्रत्येक वर्षी प्रशालेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सत्कार समारंभासाठी इंदापूर माळशिरस माढा इत्यादी तालुक्यातून सुमारे 30 प्रशालेतील विद्यार्थी व पालकांनी या सत्कार समारंभासाठी हजेरी लावली याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्रीमंत ढोले सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फेटा बांधून ट्रॉफी प्रगती पत्रक तसेच दिनदर्शिका देऊन सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित केले तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा व त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व सांगताना शालेय जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आपण यशस्वीरित्या पार केला असून यानंतर करिअरच्या अनेक वाटा आपल्यासमोर मोकळ्या आहेत आपल्या आवडीनुसार योग्य करिअरची निवड करून अशाच प्रकारे येणाऱ्या काळात मेहनत करून आपल्यातून डॉक्टर इंजिनियर चांगले अधिकारी घडावेत व आपले व आपल्या आई वडिलांचे नाव आपण उज्वल करावे असे प्रेरणादायी विचार याप्रसंगी मांडले व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन याप्रसंगी केले.गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. श्रीमंत ढोले सर, उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले मॅडम, सचिव श्री. हर्षवर्धन खाडे सर, संस्थेचे मुख्य सल्लागार प्रदीपजी गुरव साहेब ,सहसचिव सौ. पौर्णिमा हर्षवर्धन खाडे मॅडम, प्रशासक श्री. गणेश पवार सर, प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर सर, सर्व विभागाचे सुपरवायझर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...