मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

मंडप व्यवसाय किती दिवस बंद ठेवणार ? नवरात्रोत्सवापासून परवानगी द्या हर्षवर्धन पाटील  इंदापूर:प्रतिनिधी            नागरिकांची जनजनजीवन, बाजारपेठा  सध्या पूर्ववतपणे सुरु झालेल्या आहेत.सध्या शासनानेही बहुतेक सर्व व्यवसाय सुरू करण्यास नियम व अटी घालून परवानगी दिलेली आहे. सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू असताना गावोगावच्या मंडप व्यावसायिकांवरच बंदी का ? आणखी किती दिवस मंडप व्यवसाय  बंद ठेवणार ? असा परखड सवाल भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.30) उपस्थित केला.            शासनाने नवरात्रोत्सवापासून मंडप व्यवसायिकांना आपला व्यवसाय सुरू करण्यास नियम व अटी घालून परवानगी द्यावी,अशी मागणी यावेळी हर्षवर्धन  पाटील यांनी केली. मंडप व्यवसायिकांना तातडीने मंडप व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना आजच पाठविण्यात येईल,असे पाटील यांनी सांगितले.          शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती ब...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

श्रमिक पत्रकार संघाने निर्भीड व निपक्षपातीपणे जनतेची बाजू मांडावी :-अरविंद (तात्या) वाघ इंदापूर :तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आज इंदापूर विचार मंथन परिवारातर्फे राधिका पॅलेस याठिकाणी करण्यात आला. यावेळी श्रमिक पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सुरेश मिसाळ, कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल देवा राखुंडे, तालुका प्रसिद्धीप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल विजय शिंदे, संघटक पदी निवड झाल्याबद्दल शिवाजी पवार, तसेच मुख्य सल्लागार राहुल ढवळे, पुणे जिल्हा वारकरी संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब उगलमोगले, कार्यकारी सदस्य इम्तियाज मुलानी, सिद्धार्थ मखरे, यांचा सन्मान करण्यात आला. इंदापूर विचार मंथन परिवार ग्रुप हा सर्वसामान्य लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आला असून,इंदापूर शहर व परिसरामध्ये या ग्रुपच्या माध्यमातून धान्य किट, आरोग्यसेवा, व इतर तत्पर सेवेसाठी ग्रुपमधील सदस्य नेहमीच अग्रेसर असतात. या ग्रुपचे संस्थापक इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद तात्या वाघ,पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संघटक शिवाजीराव मखरे, इंदापूर त...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुक्यातील ख-या कोरोना यौध्दा अस्मिताताई संतोष मखरे   इंदापुर : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापरच्या संचालिका आयु. अस्मिताताई संतोष मखरे यांनी दि.24  ऑगस्ट 2020 रोजी 450 बेड असणार्या पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या  जि.प.कोविड रुग्णालय हिंजवडी (विप्रो हाॅस्पिटल) येथे सहाय्यक अधिसेविका म्हणुन कार्यभार स्विकारला. घरातील लोकांचा विरोध असताना देखील आणि नोकरीची आवश्यकता नसताना त्यांनी सामाजिक बांधिलकी  म्हणून स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता हा जाॅब स्विकारला. हाॅस्पिटल मध्येच राहुन त्या 24 तास तेथील कोरोना पेशंटची देखभाल करतात.त्या तेथील इनचार्ज असल्याने तेथील 450 कोरोना पेशंटचे उत्कृष्ट नियोजन करतात.कोरोना पेशंटला डाॅक्टरही तपासायला घाबरतात अशा 450 कोरोना पेशंटला त्या दररोज हाताळतात. पेशंट दगावल्यास त्या स्वतः ती डेड बॅडी पॅक करतात.असे अनेक मन हेलावून टाकणारे अनुभव त्यांनी सांगितले.मखरे कुटुंबाकडुन सामाजिक कार्याचा वसा मिळाल्याने त्या ही जीवघेणी ड्युटी करत असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणुनच भिमाई प्राथमिक ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

”कर्मयोगी कारखान्याचा 31 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न”   इंदापुरः तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2020-21 चा 31 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ आज विधीवत पुजेसह कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी तथा कारखान्याचे आदरणीय चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो, व्हाईस चेअरमन मा.श्रीमती पद्माताई भोसले व सर्व संचालक मंडळ यांचे शुभहस्ते संपन्न झाला. बॉयलर अग्निप्रदिपन समारंभानिमित्त आयोजित श्री. सत्यनारायण महापुजा श्री. सुभाष बलभिम काळे, संचालक व सौ. सविता सुभाष काळे या उभयतांचे शुभहस्ते संपन्न झाली.  या गळीत हंगामातील कारखान्याच्या मशिनरी ओव्हरहॉलिंगची सर्व कामे पूर्ण होत आली असून ऊस तोडणी यंञणा सज्ज करणेचे काम सुरु आहे. यावर्षी कारखान्यास 14 लाख मे.टन कार्यक्षेञातील नोंद बिगरनोंद तसेच कार्यक्षेञाबाहेरील 2 लाख असा एकूण 16 लाख मे.टन ऊस उपलब्ध आहे. गाळप हंगामाकरिता कारखान्याने 575 ट्रक/टॅक्टर करार करुन ऍ़डव्हान्स वाटप केलेले आहे व 700 बैलगाडी ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

जनसामान्यांचे कैवारी गोरगरीब जनतेचा सामान्य नेता -राजवर्धन पाटील यांनी लोक आग्रह खातरचालवली मोटरसायकल इंदापुरः तालुक्यातील  बाभुळगाव येथील  दौऱ्यावरती असताना श्री.  भरत रामचंद्र आसबे यांनी नवीन मोटरसायकल घेतली राजवर्धन पाटील आल्यानंतर त्यांनी नवीन मोटरसायकलची पूजा करण्याचा विनंती केली पाटील, लगेच गाडीतून उतरून त्यांची नवीन मोटरसायकली ची पूजा केली व त्यांना स्वतः गाडीवरती बसवून राजवर्धन पाटील यांनी त्यांची गाडी चालू करून त्यांना त्यांच्याच गाडी वरून पूर्ण गावातून चक्कर मारली. यानंतर बाभुळगाव गावचे युवा कार्यकर्ते अमोल इंगळे यांच्यासोबत  मोटारसायकल चालवण्याचा आनंद घेतला..  राजवर्धन पाटील हे मोटर सायकल चालवत आहे हे पाहून आसबे यांना खूप आनंद झाला. राजवर्धन पाटील हे तालुक्यात सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात, लोकांना वेळोवेळी मदत करत असतात, त्यांनी तालुक्यातील राजकारणाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. राजवर्धन पाटील हे तालुक्याच्या राजकारणामध्ये पूर्णपणे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी सर्वसामान्य जनतेमधून हाक येत आहे. राजवर्धन पा...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणारे शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकरांचा जाहिर निषेध.-हणमंतराव कोकाटे

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

विचार मंथन परीवाचे सदस्य डाॅ.अविनाश पानबुडे यांनी केली कोरोना वर मात- प्रकाशराव पवार इंदापूर:पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत असून त्याच प्रमाणे रुग्ण बरे होवून घरी जाण्याचे प्रमाणही जास्त असल्यामुळे काही अंशी का होईना नागरिकांना दिलासा मिळत आहे. असाच एक कोरोना योद्धा, इंदापुर तालुक्यातील,  नामांकित यशोदिप हाॅस्पिटल चे डाॅ.अविनाश पानबुडे एम.डी.मेडीसीन यांनीही कोरोनावर मात केल्यानंतर त्यांचे इंदापुर शहरात मोठ्या उत्साहाने आगमन झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विचार मंथन परीवाचे सदस्य आसल्याचे अॅडमीन मा.प्रकाशराव पवार यांनी सांगितले,या वेळी मा .रमेश आबा शिंदे ( ग्रुप अॅडमिन आपल इंदापूर )मा .डॉ .बोंगाणे ( सर )  मा . गणेश  घाडगे  .मा . सोमनाथ लांडगे  मा .गणेश  टुले .मा . अमोल  पाटोळे उपस्थित  होते डाॅ. पानबुडे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना पुणे,मुंबई  येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. कोरोनाचा धोका हा बालकांना आणि वृद्धांना जास्त असल्याचं म्हटलं जातंय. पण असं असलं तरीही ...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

कोरोना चा वाढलाय बघा जोर...!जावई माझा भला, कसा होणार शिरजोर...! इंदापूर: धोंड्याचा महिना नुकताच सुरू  झाला आहे दान-धर्मासाठी शुभ असणा-या आणि जावईबापूंच्या स्वागताचा अधिक (धोंड्याच्या) महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे धार्मिक उपक्रमासह सुग्रास जेवण  व जावयांना वस्तू भेट देण्याची रेलचेल या महिनाभर सुरू आसते, पण याच महिण्यावर महाभयंकर कोरोना व्हायरस मुळे मोठे संकट आले आहे, एकिकडे कोरोना चे संकट आसून दुसरीकडे लाॅकडाऊनची सक्ती, एका गावावरून दुसरीकडे जाण्या साठी कोणातही जावई धजावत नाही, लाखो रूपयांचे सोने जरी सारवाडी वरून भेट मिळणार आसेल तरीही मला माझे गाव सोडायचे नाही, आसे नविन लग्न झालेलेच जावायाने ठरवलं आसे नाही, जुने जानते जावई सुद्धा सासरवाडीला जायला तयार नाहीत, कारण कोरोना कधी होईल, व आपणास निशाणा कधी करेल याचा भरवसा नाही, एका माण माणतुकी साठी, पै पाहुणे, घर-प्रपंचा,आख्खे घर बरबाद होईल,याचा कोरोना मुळे भरवसा नाही,"सर सलामत तो पगडी पचास " मला २०२१ बघायचे आहे २०२०मध्येच सोने चांदीच्या लालचे पोटी जायचं नाही राव..अनेक ठिकाणी आसे उदाहरण पहायला मिळाले आहेत, कारण...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

  अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई घ्यावी.    इंदापुर प्रतिनिधी:             भाजपा नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार भाजप व  महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी इंदापूर तहसिलदार यांना शनिवारी (दि.19) निवेदन दिले.अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई घ्यावी,ओला दुष्काळ जाहीर करावा,अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. नायब तहसीलदार शुभांगी अभंगराव यांनी हे निवेदन स्वीकारले.   या निवेदनावर इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार, शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, पुणे जिल्हा भाजपच्या मागासवर्गीय आघाडीचे उपाध्यक्ष नानासाहेब शेंडे, भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्य सचिव तानाजी थोरात, भाजपा किसान मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक माऊली चवरे, जेष्ठ नेते मारुतीराव वनवे, जिल्हा भाजपचे शिवाजीराव तरंगे, पुणे जिल्हा क...
भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनांमुळे दूध खरेदी दरात वाढ- भा.ज.पा.नेते. हर्षवर्धन पाटील इंदापूर:प्रतिनिधी दि.17/9/20         राज्यातील सहकारी व खासगी दूध संघांनी  चालू सप्टेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांच्या दुधाचा खरेदीचा दर हा प्रति लिटर रू.23 ते 25 पर्यंत केला आहे.भाजपने दूध दरवाढीसाठी 2 वेळा  राज्यव्यापी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्यामुळे दूध संघांनी शेतकऱ्यांच्या दूध खरेदीच्या दरात वाढ केली आहे अन्यथा दूध संघांनी दुधाचे दर वाढविले नसते. शेतकऱ्यांच्या दुधास मिळालेली  दरवाढ ही भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनाचे यश आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी दिली.                     कोरोना व्हायरसच्या अडचणीच्या काळात दुग्ध व्यवसायाचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार आहे.सर्व दूध संघांनी केलेल्या दरवाढीबाबत समाधान व्यक्त करून हर्षवर्धन पाटील यांनी पुढे सांगितले की, दुधास रू.30 दर मिळावा या मागणीवरती भाजप ठाम असून,या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे.   ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा जन इंदापूर यांच्यावतीने इंदापूर तहसीलदार यांना दिले निवेदन इंदापुर:मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा जन इंदापूर यांच्यावतीने इंदापूर तहसील कार्यालय येथे मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मा. तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षण स्थगिती आदेश संदर्भात निवेदन देण्यात आले  आहे. 1) मा. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे सुपूर्त करताना जो स्थगिती आदेश दिला आहे, राज्य सरकारने घटना तज्ञांचा सल्ला घेऊन सदरची स्थगिती उठविण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर बाब अवलंबित करावी त्यात पहिला पर्याय आहे तो मा. मुख्य न्यायमूर्ती कडे अर्ज करून घटना पिठाची स्थापना करून स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावेत. 2) न्यायालयाचा स्थगिती आदेश येण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन व नियुक्त्या निवड जाहीर झालेल्या आहेत या संरक्षित करण्यात याव्यात मराठा आरक्षणाला स्थगिती आल्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे ते शासनाने होऊ देऊ नये. 3) स्थगिती उठविण्याचा बाबतचा निर्णय येईपर्यंत SEBC प्रवर्गातील...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

बळीराज्याचाआनंदाचा सन..! बैल पोळ्याला लागले कोरोना चे ग्रहण...!!,   इंदापुर :तालुक्यातील शेतक-यालाच नव्हे तर संपूर्ण देशात हेच चाललय आसे जरी लोकं म्हणत आसतील तरीही ...इंदापुर तालुक्यातील शेतक-यांची,व्यथाच वेगळी आहे,..... एकीकडे कोरोना ने मारलं, आणी दुसरीकडे जणता कर्फ्यु करून प्रशासनाने तर पार जिवच मारलं रावं ,ज्यावेळी जनता कर्फ्यु ची मिटींग होती, तेंव्हा,त्यांनी फक्त काही मोजकेच लोकं, कार्यकर्ते, व तेच मुठभर व्यापारी यांना, बोलावलं आणि जनता कर्फ्यु लावला,हा निर्णय जनतेच्या हितासाठी घेतला आहे का..? याचे जरा आमदारांनी आत्मपरीक्षण करावे,पण शेतकरी वर्गाचा साधा विचार ही यात केला नाही,त्यांच्या भाज्या, शेतमाल, सडतील, वाळतील ,याचा साधा विचार ही केला नाही,ज्यांनी मतं दिली त्यांनाच आशी वागणूक,.....रामजाने...!आशी सर्वत्र चर्चा आहे,  आम्ही शेतकरी कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करतच आहोत, पण यात राजकारण करणं आता बंद करणे गरजेचे आहे,कोरोना ला हरवणं गरजेचे आहे, पण सामान्य नागरिकांना वेठीस धरून नव्हे,आमदार हे तालुक्यातील जनतेचे मायबाय आसतात, आणि माय बापाने जनतेची का...

श्रीधर भाऊ बाब्रस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सॅनिटायझर व मास्क चे वाटप

अनावश्यक खर्चाला फाटा देत सॅनिटायझर व मास्कचे वाटप करून,आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्रीधर बाब्रस यांचा वाढदिवस साजरा  इंदापुर:गेली अनेक महीने कोरोना ने आपल्या देशात थैमान घातले आहे, हा महाभयंकर व्हायरस मुळे अनेक जनांचे बळी घेतले आहेत,तेही केवळ काळजी न घेतल्या मुळे,मास्कचा व सॅनिटायझर चा वेळोवेळी योग्य वापर न केल्यामुळे व इतरांच्या चुकांमुळे या भयानक प्रकाराला बरेच निरापराध लोक बळी पडले आहेत,आसे मत श्रीधर बाब्रस माजी नगरसेवक यांनी व्यक्त केले, कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाढदिवसाला होणारा  अनावश्यक खर्च टाळून इंदापुर येथील काही गरजू लोकांना सॅनेटायझर आणि मास्क वाटप करुन सामाजिक संदेश दिला आहे.बाब्रस यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, या वाढदिवसासाठी होणा-या वायफळ इतर खर्च टाळून  त्यांनी  मास्क आणि सॅनेटायझर देण्याचे ठरविले.  यांच्या या निर्णयामुळे वाढदिवसादिनी त्यांनी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.  धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने एका बागेला  धर्मवीर संभाजी महाराज उद्यान आसे नाव देण्यात आले पूर्व...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

आर्थिक दुर्बल घटकातील मराठा युवकांनी इडब्लूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा.जयश्री भास्कर गटकुळ यांनी केले आहे       इंदापुर: सर्वोच्च न्यायालय निकाल दि. ९-९-२०२० नुसार आर्थिक दुर्बल घटकातील  मराठा युवकांनी दहा टक्के आरक्षण लाभ घेणे संदर्भात   मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ९-९-२०२० रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने लागू केलेले शिक्षण व नोकरीतील आरक्षण २०२०-२१ या वर्षासाठी स्थगित केले आहे . या परिस्थितीत मराठा समाजातील सर्व मुला मुलींनी केंद्र सरकारने सन २०१९ च्या कायदाने दिलेल्या दहा टक्के इडब्लूएस - आर्थिक दुर्बल घटकांना लागू असलेल्या या आरक्षणाचा लाभ घ्यावा . हे आरक्षण अखिल भारतीय पातळीवर तसेच सर्व राज्यातील शासकीय नोकरीसाठी लागू आहे.  इडब्लूएस *EWS :- ECONOMICALLY WEAKER SECTION..* आरक्षण उत्पन्न दाखला सादर केले तरच मिळते. तो दाखला काढणे व इतर अटी  शासकीय कार्यालयात मिळू शकेल. महत्वाचे  मुद्दे खालीलप्रमाणे आहेत  (१) दहा टक्के इडब्लूएस आरक्षण हे फक्त उत्पन्न दाखला सादर केला तरच मिळते अन्यथा नाही. (२) जे समाज...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  मराठा आरक्षण स्थगिती च्या निषेधार्थ मराठा समाजाने कुटुंबासमवेत काळा दिवस पाळा ; मराठा क्रांती मोर्चा चे आवाहन  हडपसर : महाराष्ट्र राज्य मराठा क्रांती मोर्चा ठरल्याप्रमाणे हडपसर विभागाची ची मराठा आरक्षण स्थगिती बाबत निर्णय बैठक कोरोना चे सावट असल्याकारणाने झूम वेब द्वारे संपन्न झाली.  यामध्ये मराठा क्रांती मोर्चा समन्वयक महेश टेळेपाटील यांनी मराठा आरक्षण स्थगिती बाबत सविस्तर माहिती दिली. या बैठकीमध्ये मराठा आरक्षण स्थगिती बाबत पुढील दिशा आणि आंदोलन बाबतीत चर्चा करण्यात आली.  उपस्थित असणाऱ्या मराठा समन्वयकांमध्ये राजेंद्र कुंजीर,संदीप लहानेपाटील, हनुमंतराव मोटे,दिलीपराव गायकवाड, मराठा सेवा संघ शहराध्यक्ष रघुवीर तुपे,शिवप्रहार संघटना जिल्हाध्यक्ष कैलास आवारी, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, सामाजिक कार्यकर्त्या शोभा लगड, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा जयश्रीताई गटकूळ, आदि समन्वयकांनी सहभाग घेऊन आपली भूमिका मांडली.  यामध्ये प्रमुख्याने तीन निर्णय प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यात आले. बुधवार 16 सप्टेंबर 2020 रोजी हडपसर भागातील सकल मराठा समाजाच्या प्र...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

कर्मयोगी शंकरराव पाटील(भाऊंचे)यांचे विचार सर्वांना प्रेरणादायी ठरले - हर्षवर्धन पाटील  इंदापूर:  प्रतिनिधी  कर्मयोगी शंकररावजी पाटील भाऊंचा विचार हे आजच्या पिढीला   प्रेरणादायी असून भाऊंनी इंदापूर तालुक्यात ज्या संस्था उभारल्या तसेच गावोगावी ग्रामपंचायती,  सोसायट्या  उभारणीसाठी तब्बल 65 वर्षाहून अधिक ते चंदनासारखे झिजून त्यांनी तालुक्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले.  त्यांचे विचार आजही नव्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे मत राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.  कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या 14 व्या पुण्यस्मरणानिमित्त बिजवडी (ता. इंदापूर )येथे कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या आवारात उभारण्यात आलेल्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर माजी मंत्री पाटील बोलत होते.  यावेळी भाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार  व प्रतिमेस चे पूजन व धार्मिक कार्यक्रम  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . माजी मंत्री पाटील पुढे म्हणाले,  कर्मयोगी भाऊंनी तालुक्यासाठी अहोरात्र क...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

प्रशालेच्या मैदानात वृक्षारोपण करुन कै.शंकरराव पाटील स्मृतिदिन साजरा कर्मयोगी शंकरराव (भाऊ) बाजीराव पाटील यांचा १४वी  पुण्यतिथी  महात्मा फुलेनगर बिजवडी हायस्कूलमध्ये साजरी करताना कारखान्याचे संचालक श्री मच्छिद्र अभंग  ग्रामपंचायत सदस्य श्री देवीदास यादव व नुतन मुख्याध्यापक श्री शिवाजी कांबळे यांच्या हस्ते  प्रतिमेचे पुजन करुन प्रतीमेस अभिवादन केले व प्रशालेच्या मैदानात वृक्षारोपण करुन स्मृतिदिन साजरा करण्यात आला.  त्यावेळी संचालक मच्छिद्र अभंग म्हणाले की भाऊ म्हणजे एक नितीमूल्याधिष्ठित आचरणाचा आदर्श आहेत त्यांनी तालुक्यात सामाजिक राजकिय धार्मिक केले अनेक संस्था, बॅंका, कारखाना, कृषी उत्पन्न समितीची स्थापना, करुन शेतकरी कामगार यांचे हित जोपासण्याचे काम केले त्याच बरोबर  शिक्षणाची गंगा आणली गावोगावी शाळा काडून ग्रामिण भागातील मुलगा मुलगी शिक्षणापासुन वंचित रहाणार नाही ती शिकली पाहिजे असे धोरण होते अशा महान व्यक्तिचे कार्य श्रेष्ठ होते असे गौर उद् गार काडून  भाऊंच्या कार्याची माहिती दिली. त्यावेळी शाळेचे शिक्षक शिक्षकेत...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

कर्मयोगी शंकररावजी बाजीराव पाटील (भाऊ ) यांना 14 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन   इंदापुर:भारतीय राजकारणी माजी संसद सदस्य कर्मयोगी शंकररावजी बाजीराव पाटील (भाऊ) यांच्या 14 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त इंदापूर महाविद्यालयाच्या परिसरातील भाऊंच्या समाधी स्थळाचे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पदमा भोसले आणि मान्यवरांनी  दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले.     कर्मयोगी परिवाराने उपस्थित राहून समाधी स्थळाचे दर्शन घेतले. इंदापूर महाविद्यालयात दरवर्षी भाऊंच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत असते परंतु यावर्षी कोरोना पार्श्वभूमी व लॉक डाऊन यामुळे हे कार्यक्रम होऊ शकले नाहीत.      इंदापूर तालुक्याच्या जडणघडणीमध्ये भाऊंचे योगदान मोठे असून एक आदर्श विचार आणि समाज विकासामध्ये सहकाराच्या माध्यमातून केलेले कार्य मोठे आहे. भाऊ हा एक विचार असून खऱ्या अर्थाने भाऊ कर्मयोगी होते असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

कै.शंकररावजी (भाऊ)पाटील यांचे१४वे पुण्यस्मरणा निमित्त विनम्र अभिवादन   इंदापुर:आज रविवार दि. १३ सप्टेंबर 2020 आदरणीय श्रद्धेय कै. शंकररावजी (भाऊ )पाटील यांच्या पुण्यतिथीचा दिवस व १४ वे पुण्यस्मरण. इंदापूर कॉलेजमध्ये कर्मयोगी भाऊंच्या समाधी दर्शनासाठी गेल्यावर राजवर्धन पाटील म्हणाले की  एका अनोख्या सामाजिक राजकीय व्यक्तिमत्त्वची नेहमीच वेगळी अनुभूती लाभते. कर्मयोगी भाऊ (आजोबा) हे माझ्यासाठी नेहमीच हा एक विचार, एक शुद्ध आचार, एक प्रेरणाशक्ती, दिव्यत्वाची अनुभूती आणि समाजाप्रति असणारी जाणीव आणि जागृती आहे. आज मी जेंव्हा तालुक्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्य करत असताना कर्मयीगी भाऊ आजोबांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना भेटतो तेव्हा त्यांच्या आठवणी लोक ज्या आत्मयतेने मांडतात, त्यातून मला सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा मिळत असते.असे मत राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे,भाऊंच्या कुळात आपला जन्म झाला याचे समाधान आणि अभिमान वाटतो. आदरणीय कर्मयोगी भाऊंना शत शत नमन करून कर्मयोगीच्या विचाराचे बंधन बांधून आज मी कृतकृत्य झालो. आजोबा आपणास मनोभ...

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी एकाच वेळी कोरोना सर्वेक्षण- नगराध्यक्षा सौ.अंकिता शहा

  इंदापुर:दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असून त्यामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्या समस्येत अधिकच भर पडत आहे. सध्या इंदापूर शहरामध्ये लॉकडाउन असून या काळात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर नगर परिषदेने इंदापूर तहसील, इंदापूर उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना रुग्णांचे ट्रेसिंग होण्यासाठी संपूर्ण शहरभर धारावी  पॅटर्नप्रमाणे 5500 कुटुंबा पर्यंत जाऊन एकाच वेळी विविध विभागातील कर्मचारी आणि शिक्षकांच्या सहकार्याने कोरोना सर्वेक्षण यंत्रणा इंदापुरात राबविली. या सर्वेक्षणाची पाहणी करताना नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी वरील मत व्यक्त केले.         तहसीलदार सोनाली मेटकरी, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. एकनाथ चंदनशिवे, इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या उपस्थितीत नियोजनाची बैठक काल घेण्यात आली ...
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारचा जाहीर निषेध      इंदापुरः मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेली कित्येक वर्षे मराठा समाजातील लहान थोर मंडळी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आले आहेत. अनेक सरकारे आली व गेली पण आज तागायत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, मात्र गेल्या वेळचे फडणवीस सरकार यांनी मराठा आरक्षणाला सकारात्मक प्रतिसाद देऊन कोर्टात टिकणारे आरक्षण देऊ असा विश्वास मराठा  समाजाला दिला  व उच्च न्यायालयात टिकणारे आरक्षण त्यांनी दिले. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. परंतु मराठा आरक्षणाला काही लोकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. आरक्षणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात  सुरू होती परंतु सर्वोच्च न्यायालयाने  अंमलबजावणी करता येणार नाही म्हणून स्थगिती दिलेली आहे व प्रकरण खंडपीठाकडे वर्ग केले आहे  मध्यंतरीच्या काळात फडणवीस सरकार जाऊन आघाडी सरकार आले परंतु या सरकारचा मराठा आरक्षणाला म्हणावा तसा सकारात्मक प्रतिसाद दिसून आला नाही कारण त्यांनी या आरक्षणाकरता नियुक्त केलेले वकील बदलले त्यांना  मराठा आरक...
भरतशेठ शहा मित्रपरिवार आणि महात्मा फुले ग्रुपच्या वतीने कोविंड योद्ध्यांचा सन्मान    इंदापूर :-येथील स्मशानभूमीमध्ये भरत शहा मित्रपरिवार आणि महात्मा फुले ग्रुपच्या वतीने इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, आरोग्य निरीक्षक मनोज बारटक्के व आरोग्य विभागातील कर्मचारी यांचा कोविड योद्धा सन्मानपत्र, गुलाब पुष्प व वाफेचे मशीन देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कोरोना व्हायरसमुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांचा अंत्यविधी करण्याचे काम करणाऱ्या आरोग्य विभागातील योद्ध्यांचा प्रवेश द्वारा पासून संपूर्ण रस्त्यावर फुलांच्या पाकळ्यांचा सडा मारुन त्यांचे आगमनाच्या वेळेस त्यांच्यावर पुष्पांचा वर्षाव करण्यात येऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.     आपल्या जीवाची पर्वा न करता आपली जबाबदारी, माणुसकी म्हणून रात्री-अपरात्री हे  कर्तव्य त्यांच्या हातून घडत आहे. त्याबद्दल त्यांच्या कर्तव्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल आणि नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य विभागातील कर्मचारी क...