मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज


 इंदापूर:  प्रतिनिधी
 कर्मयोगी शंकररावजी पाटील भाऊंचा विचार हे आजच्या पिढीला   प्रेरणादायी असून भाऊंनी इंदापूर तालुक्यात ज्या संस्था उभारल्या तसेच गावोगावी ग्रामपंचायती,  सोसायट्या  उभारणीसाठी तब्बल 65 वर्षाहून अधिक ते चंदनासारखे झिजून त्यांनी तालुक्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले.  त्यांचे विचार आजही नव्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे मत राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
 कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या 14 व्या पुण्यस्मरणानिमित्त बिजवडी (ता. इंदापूर )येथे कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या आवारात उभारण्यात आलेल्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर माजी मंत्री पाटील बोलत होते.
 यावेळी भाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार  व प्रतिमेस चे पूजन व धार्मिक कार्यक्रम  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
माजी मंत्री पाटील पुढे म्हणाले,  कर्मयोगी भाऊंनी तालुक्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्यांना आपल्यातून जाऊन 14 वर्षे झाली तरी त्यांचे विचार अजरामर ठरले आहेत.  त्यांच्या विचारानेच आपण पुढे जात आहोत . कारखान्याने  यंदा गळीत हंगामात  14 लाख टनांचे उद्दिष्ट ठेवले असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनीच सातत्याने काम करणे गरजेचे आहे.  संपूर्ण कारखान्याची गळीत हंगामाची कामे अंतिम टप्प्यात आली असून 25 सप्टेंबरला बॉयलर प्रतीपदन होणार आहे.  कारखान्याच्या परिसरात पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने तब्बल साडेपाच हजार झाडे लावून त्याचे उत्तम रित्या संगोपन करण्यात आलेले आहे .पुढील दोन वर्षात कर्मयोगी कारखाना हा ग्रीन शुगर इंडस्ट्रीज म्हणून नावारूपाला येणार आहे . सेंद्रिय खत कंपोस्ट खत ,बायोगॅस, आसावरी प्रकल्प, सीएनजी गॅस, इथेनॉल प्रकल्प हे  साखर उत्पादनाबरोबरच इतर उत्पादने ही  करण्यात येत आहेत.  सद्यस्थितीत  साखर  कारखानदारीवरती आर्थिक ताण असला तरी यंदा विक्रमी गाळप  करण्याकडे  वाटचाल सुरू आहे.  तालुक्यातील जनतेने आपल्या कामाबरोबरच आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून या कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य आजार पिटाळून लावण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहनही पाटील यांनी शेवटी केले.
 कारखान्याच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले यांनी भाऊंना अभिवादन करून त्यांच्या कार्याची महती सांगून त्यांचे विचार आत्मसात करावे असे सांगितले.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले.
 यावेळी  कारखान्याचे संचालक भरत शहा , वसंत मोहोळकर ,सुभाष काळे, राजेंद्र गायकवाड, भास्कर गुरगुडे, अंबादास शिंगाडे, हनुमंत जाधव, पांडुरंग गलांडे, मच्छिंद्र अभंग, केशव दुर्गे ,  माजी उपाध्यक्ष भागवत गटकुळ यांच्यासह कर्मचारी सभासद उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी केले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते