मुख्य सामग्रीवर वगळा
     इंदापुरः मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेली कित्येक वर्षे मराठा समाजातील लहान थोर मंडळी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आले आहेत. अनेक सरकारे आली व गेली पण आज तागायत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, मात्र गेल्या वेळचे फडणवीस सरकार यांनी मराठा आरक्षणाला सकारात्मक प्रतिसाद देऊन कोर्टात टिकणारे आरक्षण देऊ असा विश्वास मराठा  समाजाला दिला  व उच्च न्यायालयात टिकणारे आरक्षण त्यांनी दिले. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. परंतु मराठा आरक्षणाला काही लोकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. आरक्षणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात  सुरू होती परंतु सर्वोच्च न्यायालयाने  अंमलबजावणी करता येणार नाही म्हणून स्थगिती दिलेली आहे व प्रकरण खंडपीठाकडे वर्ग केले आहे 
मध्यंतरीच्या काळात फडणवीस सरकार जाऊन आघाडी सरकार आले परंतु या सरकारचा मराठा आरक्षणाला म्हणावा तसा सकारात्मक प्रतिसाद दिसून आला नाही कारण त्यांनी या आरक्षणाकरता नियुक्त केलेले वकील बदलले त्यांना  मराठा आरक्षणाबाबत  काही माहिती नाही  असे वकील दिले त्यांना योग्य ती माहिती या सरकारने दिली नाही  व त्या वकिलांनी सुद्धा कसलाही अभ्यास न करता कोर्टात व्यवस्थित व भक्कम बाजू मांडली नाही परिणामी सदरच्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने मनाई दिलेली आहे.
 या मनाईमुळे मराठा समाजातील तरुण, युवक व शाळकरी मुले व्यथित झाली आहेत त्यांचे भविष्य अंध:कारमय झाले आहे. उच्चशिक्षित होऊनही त्यांना नोकऱ्या मिळतीलच असा भरोसा राहिलेला नाही अनेकांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळणे कठीण होऊन बसले आहे.आरक्षण नसल्याने अनेक युवक बेकार आहेत काहींना मिळालेल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. सरकारच्या या नाकर्तेपणामुळे शिक्षण घेऊन बेकार फिरण्याची वेळ मराठा समाजातील युवकांवर आलेली आहे व संपूर्ण मराठा तरुणांचे भविष्य आज अधांतरी झाले आहे सुशिक्षित असूनही कामधंदा नसल्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मराठा तरुण युवक जगत आहे.
 न्याय मिळावा म्हणून शांततामय मार्गाने अनेक आंदोलने केली.आरक्षण मिळावे  यासाठी समाजातील 40 ते 50 युवक-युवतींनी आपला जीवही गमावला आहे आणि तरीसुद्धा या आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता कोणत्याही प्रकारचा गांभीर्याने विचार न करता उच्च न्यायालयात टिकलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात केवळ यांच्या नाकर्तेपणामुळे योग्य त्या पद्धतीने पुराव्यासकट भूमिका सर्वोच्य न्यायालयासमोर न मांडल्याने त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 
केरळ  व तामिळनाडू  या राज्यांमध्ये  अशा आरक्षणास  जर कोर्टाच्या  सर्व स्तरातून  कायदेशीर मान्यता मिळत असेल  तर महाराष्ट्रामध्ये  मराठा समाजाला  आरक्षण का मिळू नये  असा प्रश्न  मराठा समाजाला पडला आहे या आघाडी सरकारने आरक्षणाबाबत मराठा समाजाची तसेच तरुणांची चेष्टा चालवली आहे आघाडी सरकार मधील एकाही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात अवाक्षरही बोलले नाही अथवा कोणतीही तातडीची बैठक बोलावली नाही. यावरून हे आघाडी सरकार मराठा समाजाच्या विरोधात आहे हेच सिद्ध होते. तसेच या सरकारला आरक्षणा बाबत काहीएक देणेघेणे राहिलेले नाही त्यामुळे सकल मराठा समाजाचे व तरुणांचे भविष्य हे अंध:कारमय झालेले आहे याला सर्वस्वी हे आघाडी सरकार जबाबदार आहे.अशा आघाडी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...