मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापुर प्रतिनिधी:

            भाजपा नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार भाजप व  महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी इंदापूर तहसिलदार यांना शनिवारी (दि.19) निवेदन दिले.अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई घ्यावी,ओला दुष्काळ जाहीर करावा,अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. नायब तहसीलदार शुभांगी अभंगराव यांनी हे निवेदन स्वीकारले.
  या निवेदनावर इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार, शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, पुणे जिल्हा भाजपच्या मागासवर्गीय आघाडीचे उपाध्यक्ष नानासाहेब शेंडे, भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्य सचिव तानाजी थोरात, भाजपा किसान मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक माऊली चवरे, जेष्ठ नेते मारुतीराव वनवे, जिल्हा भाजपचे शिवाजीराव तरंगे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, भाजप युवा मोर्चाचे मोर्चाचे सचिन सावंत आदि पदाधिकार्‍यांच्या सह्या आहेत.
     या निवेदनात असे म्हटले आहे की इंदापूर तालुक्यात सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वदूर अतीवृष्टी झाली आहे, यामुळे ओढे, नाले, नदी यांना पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतक-यांच्या घरात तसेच शेप्तामध्ये पाणी साठले आहे. काही ठिकाणी अतीवृष्टीमुळे शेतजमीनी खचल्या असून शेतातील माती पाण्याबरोबर वाहून गेली आहे. शेतक-यांच्या उभ्या पिकांमध्ये पाणी साठले असून अतिरिक्त पाण्यामुळे डाळींब, द्राक्ष, केळी, पेरू आदी फळबागा तसेच ऊस, मका, आदि पिके आणि मका, कडवळ, आदि जणावरांच्या चा-याचे नुकसान झाले आहे. अगोदरच कोरोना महामारीच्या संकटामुळे पिकांना बाजारभाव नसलेला शेतकरी खचललेला पिचलेला असून अतिवृष्टीमुळे त्यांचे हातातील पिके आणि चा-याचे नुकसान झाल्याने पशूधन तसेच दुग्ध व्यवसाय धोक्यात आलेला आहे. त्यामुळे शेतक-यांचे अतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे. खरोखरच शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.त्याला या संकटातून बाहेर काढणेसाठी अतीवृष्टीमुळे जिथे जिथे पिकांचे, घरांचे, शेतजमीनिचे नुकसान झााले आहे, तिथे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शेतक-यांना तातडीची मदत जाहिर करावी व शेतक-यांचे खातेवर शासकिय मदतीची रक्कम जमा करावी.सध्या शेतक-यांच्या जमीनिमध्ये पाणी आहे तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आणखी काही दिवस हे अतिवृष्टी ते मध्यम पावसाचे असून त्यामुळे शेतक-यांच्या समस्यांमध्ये आणखी वाढ होणार असल्याने शासनस्तरावर ओला दुष्काळ जाहिर करावा.शासन स्तरावरून होणा-या सर्व वसुल्या तात्काळ थांबवाव्यात.पुरसदृष्य स्थिती निर्माण झाल्याने आणि ठिकठिकाणी दलदल झाल्याने भविप्यात शेती पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन नुकसानीमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. तसेच गावांगावांमध्ये साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने त्याबाबतीत आगोदरच शासकिय यंत्रनेने उपाय योजना कराव्यात जेणेकरून होणारा अनर्थ टाळता येईल, या मागण्या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत.
      या मागण्यावरती शासनाने त्वरीत उपाय योजना कराव्यात अन्यथा भाजप नेते व माजी मंत्री  हर्षवर्धन पाटील यांच्या आदेशाने इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनामध्ये देण्यात आला आहे.
_________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...