मुख्य सामग्रीवर वगळा

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी एकाच वेळी कोरोना सर्वेक्षण- नगराध्यक्षा सौ.अंकिता शहा

  इंदापुर:दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असून त्यामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्या समस्येत अधिकच भर पडत आहे. सध्या इंदापूर शहरामध्ये लॉकडाउन असून या काळात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर नगर परिषदेने इंदापूर तहसील, इंदापूर उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना रुग्णांचे ट्रेसिंग होण्यासाठी संपूर्ण शहरभर धारावी  पॅटर्नप्रमाणे 5500 कुटुंबा पर्यंत जाऊन एकाच वेळी विविध विभागातील कर्मचारी आणि शिक्षकांच्या सहकार्याने कोरोना सर्वेक्षण यंत्रणा इंदापुरात राबविली. या सर्वेक्षणाची पाहणी करताना नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी वरील मत व्यक्त केले.
        तहसीलदार सोनाली मेटकरी, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. एकनाथ चंदनशिवे, इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या उपस्थितीत नियोजनाची बैठक काल घेण्यात आली होती. या नियोजन बैठकीत ठरल्याप्रमाणे यासाठी 106 टीम तयार करण्यात आल्या. या टीम मार्फत नागरिकांच्या आरोग्य संदर्भातील सर्वेक्षण केले आहे. टीम मधील कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, पोलीस असे 230 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले आहे. घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सीमीटर, थर्मामीटर गण, पल्समीटर द्वारे, कोरोना लक्षणाचे सर्वेक्षण करून कोरोना रुग्णांचे ट्रेसिंग केले आहे. ट्रेसिंग झालेल्या संशयित रुग्णांची आय कॉलेज येथील विलगीकरण कक्षामध्ये रॅपिड ॲन्टीजीन टेस्ट करण्यात येत आहे.
    अंकिता शहा म्हणाल्या की,' कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आणि इंदापूर नगरपरिषदेमार्फत हे सर्वेक्षण सुरू आहे. घर टू घर जाऊन हे कर्मचारी कोरोना संदर्भातील सर्वेक्षण करीत आहेत. या सर्वेक्षणाचे सर्वत्र कौतुक होत असून या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहर कोरोना मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल.'

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...