मुख्य सामग्रीवर वगळा

इंदापूर:प्रतिनिधी दि.17/9/20
        राज्यातील सहकारी व खासगी दूध संघांनी  चालू सप्टेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांच्या दुधाचा खरेदीचा दर हा प्रति लिटर रू.23 ते 25 पर्यंत केला आहे.भाजपने दूध दरवाढीसाठी 2 वेळा  राज्यव्यापी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्यामुळे दूध संघांनी शेतकऱ्यांच्या दूध खरेदीच्या दरात वाढ केली आहे अन्यथा दूध संघांनी दुधाचे दर वाढविले नसते. शेतकऱ्यांच्या दुधास मिळालेली  दरवाढ ही भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनाचे यश आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी दिली.
                    कोरोना व्हायरसच्या अडचणीच्या काळात दुग्ध व्यवसायाचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार आहे.सर्व दूध संघांनी केलेल्या दरवाढीबाबत समाधान व्यक्त करून हर्षवर्धन पाटील यांनी पुढे सांगितले की, दुधास रू.30 दर मिळावा या मागणीवरती भाजप ठाम असून,या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे.
         शेतकऱ्यांना दुधाला प्रति लिटरला 17 ते 18 रुपये एवढा कमी दर मिळत असल्याने दूध खरेदी दरात वाढ करावी,या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यांमध्ये दि.20 जुलै व 1 ऑगस्ट या दिवशी 2 वेळा दूध दरवाढीसाठी राज्यव्यापी आंदोलन केले . इंदापूर येथे दि. 20 जुलै रोजी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मिटकरी यांचेकडे तहसील कार्यालयामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नावे दुध दर वाढ मिळावी,
असे निवेदन दिले. त्या निवेदनात जर दूध दरवाढ केली नाहीतर दि. 1 ऑगस्ट 20 रोजी राज्यात प्रत्येक गावात भाजपच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार दि.1 ऑगस्ट रोजी इंदापूर येथे तहसील कार्यालयाच्या गेट समोर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध वाढीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. तसेच इंदापूर तालुक्यातील भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी दूध दरवाढीसाठी आंदोलन केले. भाजपच्या राज्यव्यापी दूध दरवाढ आंदोलनामुळे दूध दरवाढ निश्चितपणे मिळेल,अशी आशा शेतकऱ्यांना होती. अखेर 11 सप्टेंबर पासून सहकारी व खासगी दूध संघांनी प्रति लिटरला रू.23 ते 25 पर्यंत दूध खरेदीचा दर वाढविला आहे. 
             शासनाने दुधास प्रति लिटरला 30 रुपये दर द्यावा,अतिरिक्त दुधाची शासनाने भुकटी  करावी, दुधास प्रतिलिटर 10 रू.अनुदान द्यावे,या भाजपच्या मागण्या आजही कायम आहेत.माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी  दिली.
____________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...