मुख्य सामग्रीवर वगळा

इंदापूर:प्रतिनिधी दि.17/9/20
        राज्यातील सहकारी व खासगी दूध संघांनी  चालू सप्टेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांच्या दुधाचा खरेदीचा दर हा प्रति लिटर रू.23 ते 25 पर्यंत केला आहे.भाजपने दूध दरवाढीसाठी 2 वेळा  राज्यव्यापी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्यामुळे दूध संघांनी शेतकऱ्यांच्या दूध खरेदीच्या दरात वाढ केली आहे अन्यथा दूध संघांनी दुधाचे दर वाढविले नसते. शेतकऱ्यांच्या दुधास मिळालेली  दरवाढ ही भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनाचे यश आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी दिली.
                    कोरोना व्हायरसच्या अडचणीच्या काळात दुग्ध व्यवसायाचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार आहे.सर्व दूध संघांनी केलेल्या दरवाढीबाबत समाधान व्यक्त करून हर्षवर्धन पाटील यांनी पुढे सांगितले की, दुधास रू.30 दर मिळावा या मागणीवरती भाजप ठाम असून,या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे.
         शेतकऱ्यांना दुधाला प्रति लिटरला 17 ते 18 रुपये एवढा कमी दर मिळत असल्याने दूध खरेदी दरात वाढ करावी,या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यांमध्ये दि.20 जुलै व 1 ऑगस्ट या दिवशी 2 वेळा दूध दरवाढीसाठी राज्यव्यापी आंदोलन केले . इंदापूर येथे दि. 20 जुलै रोजी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मिटकरी यांचेकडे तहसील कार्यालयामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नावे दुध दर वाढ मिळावी,
असे निवेदन दिले. त्या निवेदनात जर दूध दरवाढ केली नाहीतर दि. 1 ऑगस्ट 20 रोजी राज्यात प्रत्येक गावात भाजपच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार दि.1 ऑगस्ट रोजी इंदापूर येथे तहसील कार्यालयाच्या गेट समोर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध वाढीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. तसेच इंदापूर तालुक्यातील भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी दूध दरवाढीसाठी आंदोलन केले. भाजपच्या राज्यव्यापी दूध दरवाढ आंदोलनामुळे दूध दरवाढ निश्चितपणे मिळेल,अशी आशा शेतकऱ्यांना होती. अखेर 11 सप्टेंबर पासून सहकारी व खासगी दूध संघांनी प्रति लिटरला रू.23 ते 25 पर्यंत दूध खरेदीचा दर वाढविला आहे. 
             शासनाने दुधास प्रति लिटरला 30 रुपये दर द्यावा,अतिरिक्त दुधाची शासनाने भुकटी  करावी, दुधास प्रतिलिटर 10 रू.अनुदान द्यावे,या भाजपच्या मागण्या आजही कायम आहेत.माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी  दिली.
____________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते