मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  इंदापुरः तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2020-21 चा 31 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ आज विधीवत पुजेसह कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी तथा कारखान्याचे आदरणीय चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो, व्हाईस चेअरमन मा.श्रीमती पद्माताई भोसले व सर्व संचालक मंडळ यांचे शुभहस्ते संपन्न झाला. बॉयलर अग्निप्रदिपन समारंभानिमित्त आयोजित श्री. सत्यनारायण महापुजा श्री. सुभाष बलभिम काळे, संचालक व सौ. सविता सुभाष काळे या उभयतांचे शुभहस्ते संपन्न झाली. 
या गळीत हंगामातील कारखान्याच्या मशिनरी ओव्हरहॉलिंगची सर्व कामे पूर्ण होत आली असून ऊस तोडणी यंञणा सज्ज करणेचे काम सुरु आहे. यावर्षी कारखान्यास 14 लाख मे.टन कार्यक्षेञातील नोंद बिगरनोंद तसेच कार्यक्षेञाबाहेरील 2 लाख असा एकूण 16 लाख मे.टन ऊस उपलब्ध आहे. गाळप हंगामाकरिता कारखान्याने 575 ट्रक/टॅक्टर करार करुन ऍ़डव्हान्स वाटप केलेले आहे व 700 बैलगाडी तसेच 450 टॅक्टरगाडी करार केलेले आहेत. तोडणी प्रोग्रॅम कॉम्प्युटराईज्ड करणेत येत असल्याने ऊस तोडणी व वाहतुकीसाठी कोणतीही अडचण येणार नाही.
यावर्षी आपले कार्यक्षेञामध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे, त्यामुळे कारखान्यास ऊसाची उपलब्धता मुबलक आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील यांनी सर्व ऊस उत्पादक सभासद, कारखान्याचे वाहतुकदार, तोडणी मुकादम व सर्व कामगारांचे सहकार्याने येणारा हा गळीत हंगाम यशस्वी करणेचा मानस व्यक्त केला. 
या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक श्री. भरत शहा, श्री. भास्कर गुरगुडे, श्री. विष्णू मोरे, श्री. हनुमंत जाधव, श्री. मच्छिंद्र अभंग, श्री. अंकुश काळे, श्री. सुभाष काळे, श्री. प्रशांत सुर्यवंशी, श्री. यशवंत वाघ, श्री. मानसिंग जगताप, श्री. राजेंद्र गायकवाड, श्री. राहूल जाधव, श्री. अंबादास शिंगाडे, श्री. वसंत मोहोळकर, श्री. केशव दुर्गे, श्री. अतुल व्यवहारे, श्री. राजेंद्र चोरमले, श्री. पांडुरंग गलांडे, श्री. सुभाष भोसले, सौ. जयश्री नलवडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.बाजीराव जी. सुतार, व सर्व खाते विभागप्रमुख उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...