मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज



      इंदापुर: सर्वोच्च न्यायालय निकाल दि. ९-९-२०२० नुसार आर्थिक दुर्बल घटकातील 
मराठा युवकांनी दहा टक्के आरक्षण लाभ घेणे संदर्भात 
 मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ९-९-२०२० रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने लागू केलेले शिक्षण व नोकरीतील आरक्षण २०२०-२१ या वर्षासाठी स्थगित केले आहे . या परिस्थितीत मराठा समाजातील सर्व मुला मुलींनी केंद्र सरकारने सन २०१९ च्या कायदाने दिलेल्या दहा टक्के इडब्लूएस - आर्थिक दुर्बल घटकांना लागू असलेल्या या आरक्षणाचा लाभ घ्यावा . हे आरक्षण अखिल भारतीय पातळीवर तसेच सर्व राज्यातील शासकीय नोकरीसाठी लागू आहे.
 इडब्लूएस *EWS :- ECONOMICALLY WEAKER SECTION..*
आरक्षण उत्पन्न दाखला सादर केले तरच मिळते. तो दाखला काढणे व इतर अटी  शासकीय कार्यालयात मिळू शकेल. महत्वाचे  मुद्दे खालीलप्रमाणे आहेत 
(१) दहा टक्के इडब्लूएस आरक्षण हे फक्त उत्पन्न दाखला सादर केला तरच मिळते अन्यथा नाही.
(२) जे समाज घटक एससी एसटी ओबीसी अंतर्गत समाविष्ट नाहीत अशाच आर्थिक दुर्बल घटकांना हे आरक्षण लागू होते .
(३) सन २०१९-२० या आर्थिक वर्षात सर्व कुटुंबातील सदस्यांचे सर्व प्रकारचे एकूण उत्पन्न आठ लाख रुपये पेक्षा जास्त नसावे .
(४) सर्व कुटुंबाकडे मालकीचा  नगरपालिका क्षेत्रातील नगरात शंभर चौरस यार्ड पेक्षा मोठा रिकामा प्लॉट नसावा.
(५) ग्रामीण भागात दोनशे चौरस यार्ड पेक्षा मोठा रिकामा प्लॉट नसावा.
(६) सर्व कुटुंबियांचे एक हजार चौरस फूट पेक्षा मोठे घर नसावे .
(७) सर्व कुटुंबियाकडे पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन नसावी .
*दाखला काढणे ...*
*EWS प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्र:-*
१) वंशावळ 
२) राशन कार्ड 
३) आधार कार्ड 
४) मतदान कार्ड 
५) १९६७ चा जातीचा पुरावा 
६) जात प्रमाणपत्र 
८) वडील व काका चे निर्गम 
९) भाऊ बहिणीचे निर्गम 
१०)तहसीलदार प्रमाणित उत्पन्न प्रमाणपत्र
११) परिपत्र अ व ब
वरील यादीनुसार सर्व माहिती भरुन व कागदपत्रे जोडून  जिल्हाधिकारी , अतिरिक्त जिल्हाधिकारी , उप जिल्हाधिकारी , तहसीलदार यांच्याकडे इडब्लूएस आरक्षण साठी उत्पन्न दाखला मिळण्यासाठी लेखी अर्ज सादर करावा . 
 उत्पन्न दाखला नमुना सर्व भारतीयांना एकच लागू आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे..
 याप्रमाणे इडब्लूएस उत्पन्न दाखला मिळाल्यानंतर तुम्हाला केंद्र व राज्य शासनाच्या सर्व प्रकारच्या क्षेत्रातील नोकरीसाठी अर्ज करता येतो. *मराठा युवकांनी* या आरक्षणाचा लाभ घेताना गुगल वर इडब्लूएस अशी कमांड दिली तर सर्व माहिती उपलब्ध आहे. तेथे शोध घ्यावा.
जे जे युवक या इडब्लूएस आरक्षण मध्ये बसत असतील त्यांनी वेळ न घालवता तातडीने उत्पन्न दाखला मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्याची कारवाई करावी असे आवाहन जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्षा प्रा डॉ जयश्री भास्कर गटकुळ यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते