इंदापूर:- विषय समित्यांची नुकतीच निवड झाल्यानंतर जिल्हा परिषद पुणे स्थायी समितीची आणि जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.वीरधवल जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागात डीपी जळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे डीपी जळाल्याचा अहवाल प्राप्त होताच तात्काळ नवीन डीपी बसवण्यात यावेत, जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा तसेच जनावरांच्या पाण्याची समस्या निर्माण होणार नाही या मागण्या केल्या. तसेच, ज्या ठिकाणी नवीन डीपीची मागणी प्रलंबित आहे त्या सर्व ठिकाणी तातडीने मंजुरी देऊन नवीन डीपी बसवण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या. प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा.विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.गजानन पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती मा.दिपाली हुलावळे, समाजकल्याण सभापती मा.जितेंद्र ब...
SHIVSRUSTHI NEWS