मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जळालेले डीपी तात्काळ बदला, नवीन डीपी मंजुरीस गती द्या : सभापती अंकिता हर्षवर्धन पाटील

 इंदापूर:- विषय समित्यांची नुकतीच निवड झाल्यानंतर जिल्हा परिषद पुणे स्थायी समितीची आणि जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.वीरधवल जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागात डीपी जळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे डीपी जळाल्याचा अहवाल प्राप्त होताच तात्काळ नवीन डीपी बसवण्यात यावेत, जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा तसेच जनावरांच्या पाण्याची समस्या निर्माण होणार नाही या मागण्या केल्या. तसेच, ज्या ठिकाणी नवीन डीपीची मागणी प्रलंबित आहे त्या सर्व ठिकाणी तातडीने मंजुरी देऊन नवीन डीपी बसवण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.          प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा.विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.गजानन पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती मा.दिपाली हुलावळे, समाजकल्याण सभापती मा.जितेंद्र ब...

पैशांचा पाऊस की खिशाला भोक.? माढ्यात 'गुरुमाऊली'चा कासव-बाजार उद्ध्वस्त..! इंदापूर कनेक्शन काय..!

माढा/टेंभुर्णी: एकीकडे इस्रो चंद्रावर पाऊल ठेवत असताना, दुसरीकडे सोलापूरच्या माढ्यात मात्र काही लोक अजूनही 'कासवाच्या पाठीवर' बसून श्रीमंतीच्या स्वप्नांची सफर करत आहेत. मनोहर मामाच्या 'प्रसादानंतर' आता माढ्यात **नाना महाराज उर्फ गुरुमाऊली वीरकर** या दुसऱ्या महाठगाचा 'मोक्ष' झाला आहे. टेंभुर्णी पोलिसांनी भल्या पहाटे या 'माऊलीं'ना साखरझोपेतून उचलले आणि थेट कोठडीची हवा दाखवली. ' कासव' नेले अन नशीब फुटले!** एका पीडित तरुणाला या बाबाने चक्क पैशांच्या पावसाचे' स्वप्न दाखवले होते. "माझं हे खास कासव घरी ने, मग बघ तुझ्यावर लक्ष्मी कशी प्रसन्न होते," अशी थाप मारून बाबाने त्या तरुणाकडून तब्बल ५ लाख रुपये उकळले.  नशीब तर चमकले नाहीच, पण कासवाच्या नादात तरुणाचा खिसा मात्र 'कासवाच्या गतीने' रिकामा झाला आणि कर्जाचा डोंगर मात्र 'बिबट्याच्या वेगाने' वाढला!   पहाटेचा थरार: पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक ' अनेक राजकीय नेत्यांचे वरदहस्त असल्याने हे बाबा हवेत तरंगत होते. पण, आज पहाटे टेंभुर्णी पोलिसांनी असा काही 'चमत...

इंदापूर ते पुणे एसटीचा ‘ढाबा’ प्रवास: प्रवाशांच्या खिशाला कात्री, एसटी प्रशासनाचे मात्र ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष!

इंदापूर (विशेष बातमी प्रतिनिधी) इंदापूर ते पुणे प्रवासादरम्यान एसटी महामंडळाच्या बस आता अधिकृत बसथांब्यांवर न थांबता चक्क 'बेकायदेशीर' हॉटेल आणि ढाब्यांवर थांबवण्याचा सपाटा सुरू आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी धावणारी एसटी आता चहा-पाणी आणि जेवणाच्या नावाखाली प्रवाशांच्या खिशाला कात्री लावत असून, यामागे काहीतरी 'दाल में काला' असल्याची चर्चा प्रवाशांमधून रंगली आहे. अधिकृत बोर्डाचे नाटक कशासाठी?  एका बाजूला अधिकृत बसथांब्याचे फलक लावून तिथेच गाड्या थांबवण्याचा दिखावा केला जातो, तर दुसरीकडे मात्र बस थेट हॉटेलच्या पार्किंगमध्ये वळवली जाते. हे कशाचे द्योतक आहे? परवानगीचा घोळ काय? या खासगी हॉटेल आणि ढाब्यांना एसटी बसेस थांबवण्याची अधिकृत परवानगी कोणत्या अटींवर देण्यात आली आहे? गाड्यांची मर्यादा किती? संबंधित ढाब्यावर दिवसाला नेमक्या किती बसेस थांबवण्याची परवानगी देण्यात आली आहे? दरपत्रकाचे काय झाले? परवानगी देताना हॉटेल किंवा ढाबा चालकांना एसटी प्रशासनाने कोणतेही दरपत्रक (Rate Card) दिले होते का?  एफडीए (FDA) सुस्त, हॉटेल चालक मालामाल! सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्...

इंदापूर ते पुणे एसटीचा ‘ढाबा’ प्रवास: प्रवाशांच्या खिशाला कात्री, एसटी प्रशासनाचे मात्र ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष..!

इंदापूर   (विशेष बातमी प्रतिनिधी)इंदापूर ते पुणे प्रवासादरम्यान एसटी महामंडळाच्या बस आता अधिकृत बसथांब्यांवर न थांबता चक्क 'बेकायदेशीर' हॉटेल आणि ढाब्यांवर थांबवण्याचा सपाटा सुरू आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी धावणारी एसटी आता चहा-पाणी आणि जेवणाच्या नावाखाली प्रवाशांच्या खिशाला कात्री लावत असून, यामागे काहीतरी 'दाल में काला' असल्याची चर्चा प्रवाशांमधून रंगली आहे. अधिकृत बोर्डाचे नाटक कशासाठी..?  एका बाजूला अधिकृत बसथांब्याचे फलक लावून तिथेच गाड्या थांबवण्याचा दिखावा केला जातो, तर दुसरीकडे मात्र बस थेट हॉटेलच्या पार्किंगमध्ये वळवली जाते. हे कशाचे द्योतक आहे? या खासगी हॉटेल आणि ढाब्यांना एसटी बसेस थांबवण्याची अधिकृत परवानगी कोणत्या अटींवर देण्यात आली आहे? गाड्यांची मर्यादा किती? संबंधित ढाब्यावर दिवसाला नेमक्या किती बसेस थांबवण्याची परवानगी देण्यात आली आहे? दरपत्रकाचे काय झाले? परवानगी देताना हॉटेल किंवा ढाबा चालकांना एसटी प्रशासनाने कोणतेही दरपत्रक (Rate Card) दिले होते का?  एफडीए सुस्त, हॉटेल चालक मालामाल सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांची...

जिद्द सोडू नका, यश तुमचेच असेल ! नगराध्यक्ष भरतभाऊ शहा यांचा दहावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश..!

इंदापूर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, इंदापूर नगरीचे नगराध्यक्ष मा. श्री. भरतभाऊ शहा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. दहावीचा निकाल हा जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असून, यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.नगराध्यक्ष भरतभाऊ शहा म्हणाले की, "दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या कष्टाचे फळ आज तुम्हाला मिळाले आहे. इंदापूरच्या मातीतील मुलांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली, याचा सार्थ अभिमान वाटतो."अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना धीर: 'खचून न जाता फिनिक्ससारखी झेप घ्या' जे विद्यार्थी या परीक्षेत अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत किंवा अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांच्यासाठी नगराध्यक्षांनी अत्यंत सकारात्मक आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की: निकाल तुमच्या मनासारखा लागला नसेल, तर खचून ...

अनाथांचा' कॅप्टन! इंदापूरचे धरमचंद गिरीधारीलाल लोढा 'अनाथ सेवा' क्षेत्रातील 'राज्यस्तरीय रत्न' पुरस्कार..! प्रधान

इंदापूर :- आपल्या आगळ्यावेगळ्या 'समाज सेवेच्या' शैलीसाठी प्रसिद्ध असलेले माननीय श्री. धरमद गिरधारीलाल लोढा यांनी पुन्हा एकदा 'मोठा धमाका' केला आहे. त्यांना २०२६ चा प्रतिष्ठित 'राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले आहे, आणि तेही त्यांच्या 'अनाथ सेवा' क्षेत्रातील अतुलनीय कार्यासाठी!आपली 'अनाथ सेवा' फक्त नावापुरती मर्यादित न ठेवता, ती 'कृती'तून कशी उतरवायची, हे लोढा पप्पा यांनी जगाला दाखवून दिले आहे. त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाने आणि अनाथांच्या मनातील 'आनंद' फुलवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांनी त्यांना हा सन्मान मिळवून दिला आहे. पुरस्कार स्वीकारताना लोढांचा 'तो' आत्मविश्वासाने भरलेला फोटो पाहून अनेकांना त्यांच्या सेवेची खरी 'ताकद' समजली. या पुरस्कारामुळे केवळ लोढा पप्पा नाही, तर संपूर्ण 'इंदापूर' तालुक्याचा गौरव वाढला आहे. त्यांच्या कार्याची दखल राज्य स्तरावर घेतली गेल्याने आता इंदापूरचे नाव 'समाज सेवा' क्षेत्रातही आदराने घेतले जाईल. अनाथांच्या 'मदत'साठी नेह...

इंदापूर नगरीत घुमणार 'शिवशंभो गर्जना'! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य लोककला मैफिल

इंदापूर: स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून इंदापूर नगरीत एका ऐतिहासिक आणि भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक अभिजीत जाधव आणि अमु जाधव यांचा 'अभि-अमु लाईव्ह' हा गाजलेला **मराठी लोककला संगीताचा  कार्यक्रम प्रथमच इंदापूरकरांच्या भेटीला येत आहे.इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांनी  कोरलेल्या वीर रणधुरंधर योद्ध्यांच्या पराक्रमाचा जागर करण्यासाठी 'शिवशंभो गर्जना' हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे. रणवाद्यांच्या घोषात आणि शाही सुरांच्या साथीने संभाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येईल.प्रमुख कलाकार,अभिजित जाधव आणि अमु जाधव (अभि-अमु लाईव्ह) दिनांक शुक्रवार, १५ मे २०२६ वेळ सायंकाळी ठीक ०७:०० वाजता स्थळ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक, आय कॉलेज समोर, इंदापूर.इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांनी कोरलेल्या वीर रणधुरंधर योद्ध्यांचा जागर, रणवाद्यांसोबत वाजवायला आणि गाजवायला आपण सर्व इंदापूरकर नागरिक आमंत्रित आहात!"महाराष्ट्रात सर्वत्र गाजलेला हा जबरदस्त कार्य...

सौ. सायरा हमीद आत्तार यांना 'राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न' पुरस्काराने सन्मानित

इंदापूर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रभक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव सोहळा पुण्यात संपन्न झाला. यामध्ये वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल इंदापूर येथील 'वृक्ष संजीवनी परिवारा'च्या सौ. सायरा हमीद आत्तार यांना 'राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सौ. भारतीताई तूपे आणि राजेंद्र पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे ठिकाण पुणेआयोजक राष्ट्रभक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य सन्मानित व्यक्ती सौ. सायरा हमीद आत्तार (वृक्ष संजीवनी परिवार, इंदापूर) पुरस्काराचे नाव राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न प्रमुख पाहुणे/हस्ते प्रदान सौ. भारतीताई तूपे आणि राजेंद्र पवार सध्याच्या वाढत्या तापमानाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष केल्यास मानवाला भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. पर्यावरणात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येकाने 'एक व्यक्ती, एक झाड' ही संकल...

इंदापूरचे विकास खिलारे यांना 'राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार' प्रदान

 इंदापूर  १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पुण्यात आयोजित राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात, इंदापूर येथील श्री. विकास पांडुरंग खिलारे यांना 'राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. ३ मे रोजी हा शानदार सोहळा पार पडला. श्री. विकास खिलारे यांना हे सन्मान 'रक्तदान चळवळ' या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत तब्बल ३५ वेळा रक्तदान करण्याचा विक्रम नोंदवला आहे. तसेच, वर्षातून किमान २ वेळा रक्तदान करण्याचा त्यांनी संकल्प केला असून त्यांचा हा आदर्श इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. या सोहळ्याचे आयोजन राष्ट्रीय भक्ती संघटना महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संयोजक श्री. राजेंद्र श्रीरंग पवार (कार्याध्यक्ष, राष्ट्रभक्ती संघटना महाराष्ट्र) आणि व्यवस्थापन विजेते मीडिया यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी इंदापूर चे उद्योगपती धरमचंद लोढा उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण सोहळ्याबद्दल परिसरामध्ये श्री. खिलारे यांचे अभिनंदन होत आहे.

कु.तनिष्का किशोर राऊत श्री.नारायणदास रामदास हायस्कूल व सायन्स महाविद्यालयात बारावीत ८७ टक्के गुण मिळवून प्रथम

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री.नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनिअर सायन्स महाविद्यालय इंदापूर येथील कु.तनिष्का किशोर राऊत (परीक्षा क्रमांक -P049421) ही विद्यार्थिनी श्री.नारायणदास रामदास हायस्कूल व सायन्स महाविद्यालयात बारावीत ८७ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे.तसेच पुणे जिल्ह्यात मराठी विषयात प्रथम आली आहे.तिला मराठी विषयात ९८ गुण मिळाले आहेत.मराठी विषयाच्या शिक्षिका प्रा.सौ.मीना कैलास कदम यांनी तिला मार्गदर्शन केले आहे.वर्गशिक्षक श्री.सहदेव म्हस्के व मुख्याध्यापक श्री.संजय सोरटे यांनी तिचे अभिनंदन केले.संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांनी विद्यालयाचे नावलौकिक झालेबद्दल विद्यार्थिनी व शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

सामुदायिक विवाह सोहळयाचे यंदा ६वे वर्षे डोंबिवली

मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील ) पिंपळेश्वर महादेव मंदिर मैदान,मानपाडा रोड,सागांव डोंबिवली पूर्व येथे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. आतापर्यत सामुदायिक विवाह सोहळयात ३९ शुभलग्न धुमधक्यात संपन्न झाले आहेत. यंदा ७ शुभविवाह धुमधडाक्यात पार पडली. याचे श्रेय आगरी समाज प्रबोधन संस्था सर्व कार्यकर्ते तसेच मा. आमदार राजूदादा पाटील यांना जाते कारण प्रत्येक जोडप्यास एक लाख रूपये मानधन दिले जाते. आणि पुढेही देणार भले कितीही लग्न जुळूदे असे मा.आमदार राजूदादा पाटील यांनी व्यासपीठावर जाहीर केले. त्यांनी संस्थेचे ही कौतुक केले.ज्याच्या कडे भरपूर पैसा आहे अशा लोकांनी जरूर आपल्या कुवती प्रमाणे लग्न कार्यात खर्च करावा. पण कर्ज काढून आयुष्यभर हप्ते भरत बसू नये. त्याला पर्याय म्हणून आगरी समाज प्रबोधन संस्थेत नाव नोंदणी करून सामुदायिक विवाह सोहळा उत्तम पर्याय आहे. येथे आपल्या घराच्या सारखा लग्नसोहळा  आयोजित केला जातो. वधुवर व आपले वराडी उपस्थित राहायचे आहे. भटजी,हारतुरे, पोळापापडी, सर्व धार्मिक विधी होम हवन, स्टेज,डेकोरेशन, बुफे जेवणापासून,आईसक्रीम, वेलकम ड्रीक, बँड ...

सरडेवाडी येथे 'एक गाव, एक पोलीस' अंतर्गत पोलीस अंमलदारांची भेट; ग्रामस्थांना सुरक्षा व नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शन

इंदापूर: राज्य शासनाच्या 'एक गाव, एक पोलीस' या संकल्पनेअंतर्गत इंदापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदार **कल्याणी विजय जाधव (ASI, ब. नं. 79)** यांनी दि. १ मे २०२६ रोजी सरडेवाडी गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधून गावच्या सुरक्षेबाबत विविध सूचना दिल्या.सकाळी ८:०० ते ८:३० या वेळेत झालेल्या या भेटीदरम्यान जाधव यांनी गावातील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक आणि ग्रामपंचायत सदस्यांशी सविस्तर चर्चा केली. हिंगणगावचे पोलीस पाटील उपस्थित होते.यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला:  सीसीटीव्ही यंत्रणा:गावातील मुख्य चौक आणि गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सूचना दिल्या. सद्यस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयासमोर कॅमेरे बसवण्यात आले असून, हायवे रोडवरील महत्त्वाच्या ठिकाणीही यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.  महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि जनजागृती करण्याबाबत चर्चा झाली.  केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन BNS (भारतीय ...

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

इंदापूर (पुणे ग्रामीण): [असिफभाई शेख यांचेकडन ] इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे सासरच्या छळाला कंटाळून एका १९ वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी पती, दीर आणि सासू अशा तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी विकास शिंदे (वय १९ वर्षे ७ महिने) असे मृत विवाहितेचे नाव आहे. शिवानीचा विवाह मे २०२५ मध्ये वरकुटे बुद्रुक येथील विकास अजिनाथ शिंदे याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत होते. मात्र, त्यानंतर पती विकास, दीर प्रकाश आणि सासू सुरेखा शिंदे यांनी शिवानीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली.फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी तिला नेहमी फोनवर कोणाशी बोलते, यावरून टोचून बोलत असत. तसेच, वॉटर फिल्टर प्लांट टाकण्यासाठी माहेरून २ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. या जाचाला कंटाळून शिवानीने सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन ...

उजणीच्या कुशीत 'वाळू'माफियांचा बाजार; प्रशासनाच्या डोळ्यावर 'गांधीजी,पण जातीयवाद बोकाळणार, मोठ्या रक्तापाताची प्रतीक्षा ? मुडदे पडतील याला जबाबदार कोण.?

इंदापूर | विशेष प्रतिनिधी उजणी धरण म्हणजे सोलापूर आणि पुण्याची जीवनवाहिनी. पण सध्या ही जीवनवाहिनी वाळू चोरांसाठी 'सोन्याची अंडी देणारी कोंबडी' ठरत आहे. प्रशासकीय यंत्रणेने डोळ्यावर गांधी वादाची पट्टी बांधली आहे की काय, असा सवाल आता सामान्य जनता विचारू लागली आहे. इंदापूर तालुक्यातील बॅकवॉटरच्या गावांमध्ये सध्या जो नंगानाच सुरू आहे, तो पाहता येथे ' खाकी'चा धाक उरलाय की 'खादी'च्या आशीर्वादाने हे दुकान सुरू आहे , हे शोधण्याची वेळ आली आहे. वाळू उपसा हा केवळ पर्यावरणाचा ऱ्हास नाही, तर तो आता सामाजिक शांततेसाठी 'कॅन्सर' ठरू लागला आहे. या अवैध व्यवसायातून जातीयवादाचे विष पेरले जात असून, वर्चस्ववादातून मोठा रक्तापात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण खेळात 'झारीतील शुक्राचार्य' नेमके कोण आहेत? हे शुक्राचार्य एसी केबिनमध्ये बसून वसुलीचे आकडे मोजत आहेत की बांधावर उभे राहून मलिदा खात आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान पुणे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसमोर आहे.असे म्हणतात की 'पैसा फेकला की तमाशा दिसतो', पण इथे पैसा फे...

गायीला 'राज्यमाता' दर्जा द्या; इंदापुरात तहसीलदारांना निवेदनराधाई रुक्मिणी गोशाळा ट्रस्टची मागणी; 'गो सन्मान आवाहन अभियाना'तंर्गत प्रशासनाला साकडे.

इंदापूर :संपूर्ण भारतात राबविल्या जाणाऱ्या 'गो सन्मान आवाहन अभियाना'च्या पार्श्वभूमीवर, इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथील **राधाई रुक्मिणी गोशाळा ट्रस्ट**च्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन आज इंदापूरचे तहसीलदार यांना देण्यात आले. गायीला 'राज्यमाता' आणि 'राष्ट्रधरोहर' असा दर्जा देण्यात यावा, ही या निवेदनाची प्रमुख मागणी आहे. २७ एप्रिल हा दिवस 'गो सन्मान दिवस'** म्हणून साजरा करत असताना, देशभरातील गोप्रेमी आपल्या स्थानिक महसूल कार्यालयामार्फत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना आपले गाऱ्हाणे मांडत आहेत. याच अनुषंगाने हिंगणगाव येथील गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष **श्री. नितीन मारुती आरडे पाटील** यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.  गो सेवागायींच्या संगोपन, संवर्धन आणि संशोधनासाठी गोशाळांना आवश्यक तो शासकीय निधी आणि अनुदान उपलब्ध करून द्यावे.  गो सुरक्षा, संपूर्ण देशभरात गोहत्या पूर्णपणे बंद करण्यासाठी कठोर आणि एकसमान केंद्रीय कायदा तातडीने लागू करावा. गो सन्मान गायीला केवळ प्राणी न मानता तिला 'राज्...

उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले ; नागरिकांनी हर्षवर्धन पाटील यांचे मानले आभार!

इंदापूर : उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवार (दि. 24) पासून पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडणेसाठी सतत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केलेबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी निरा भिमा कारखान्यावरती शनिवारी (दि. 25) भेट घेऊन सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.        सध्या उजनी धरणाच्या पावर हाऊस मधून 1600 क्युसेक्स व दरवाजामधून 4000 क्युसेक्स याप्रमाणे एकूण 6000 क्युसेक्स या क्षमतेने भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले जात आहे. इंदापूर व माढा तालुक्यातील नदीकाठच्या गावांमधील नागरिक, ग्रामपंचायतींचे सरपंच, पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी आदींनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेत नदीत पाणी सोडण्यासाठी महत्वाची भूमिका पार पडलेबद्दल आभार व्यक्त केले.    भीमा नदीकाठच्या गावांमधील व नदी पात्रातील पात्रातील पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी त्याचबरोबर जनावरांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. पाणी काटकसरी...

इंदापुरात गुंजणार 'संघर्ष योद्धा'चा आवाज; मनोज जरांगे पाटील २४ एप्रिलला येणार!

इंदापूर: मराठा आरक्षणाच्या लढ्यातील अग्रगण्य नेतृत्व आणि 'संघर्ष योद्धा' म्हणून ओळखले जाणारे **मा. श्री. मनोज दादा जरांगे पाटील** हे येत्या **शुक्रवारी, २४ एप्रिल २०२६** रोजी इंदापूर शहरात येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे इंदापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील हे समाजातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यासाठी इंदापूर दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन भव्य स्वरूपात करण्यात आले असून, इंदापूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवार, २४ एप्रिल २०२६,सकाळी ठीक १०:०० वाजता,गुरुकृपा सांस्कृतिक भवन, राहुल सिनेमा शेजारी, इंदापूर.येथे या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून जरांगे पाटील आरक्षणाच्या लढ्याची पुढील दिशा आणि समाजापुढील आव्हाने यावर भाष्य करण्याची शक्यता आहे. "चलो इंदापूर" असा नारा देत या सभेची तयारी सध्या जोरात सुरू आहे. प्रशासनाकडूनही या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतली जात असून, जनसमुदाया...

माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी उषा कोपुलवार

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी उषा श्रीकांत कोपुलवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्राद्वारे सदरची निवड जाहीर केली असून या निवडीमुळे कामगार चळवळीला नव्याने बळ मिळणार असल्याची भावना सर्वसामान्य वर्गामधून व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून उषा कोपुलवार यांनी सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात देखील आपल्या नावाचा आगळा वेगळा ठसा उमटविला होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदाची जवाबदारी त्यांना देण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष उमेश पाटील तसेच कार्याध्यक्ष महेश पाटील व सरचिटणीस प्रसाद तनपुरे यांनी दिली. तर या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते मनोज साळवे राकेश वाघमारे अतुल चव्हाण रवी शिंगे गणेश गायकवाड विजय राठोड राजन नायर स्वाती शिंगे आरपीआयचे अध्यक्ष शैलेंद्र भोसले यांसह विविध सामाजिक संघटनेच्या वतीने उषा कोपुलवार यांचा विशेष सत्कार देखील क...

एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सज्ज-*डॉ. किरण पाटील

* पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी नियोजन व अंमबजावणीचे मार्गदर्शक तत्वे जारी * पुणे, दि. २२: राज्यात वाढत्या तापमानाची शक्यता व उष्णलहरींचा धोका लक्षात घेता, पशुसंवर्धन विभागाने राज्यातील पशुपालक, कुक्कुटपालक व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पशुधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी विभागाने सर्व पशुवैद्यकीय संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, पशुपालकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. उष्णलहरींच्या काळात पशुधनाची कशी काळजी घ्यावी व याबाबत क्षेत्रिय स्तरावर काय जनजागृती करण्यात यावी, याबाबत पशुसंवर्धन विभागाने मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून अधिनस्त संस्थाप्रमुखांना अवगत केले  आहे. तसेच पशुपालकांना मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून पशुधनाची काळजी घेण्याबाबत आवाहन केले आहे. यामध्ये, पशुधनाला पुरेसे स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. आहारात क्षार मिश्रणे व जीवनसत्वांचा समावेश करावा. दुभत्या जनावरांना संतुलित आहार द्यावा.  शेतीच्या किंवा वहनाच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पशुधनाला सकाळी ११ ते साय...

भलतंच अंतर..! शाळेपासून घर फक्त ३४ सेंटीमीटर..? आरटीई प्रवेशाच्या 'घोटाळा एक्स्प्रेस'चा पर्दाफाश..! - सौ.अनिताताई खरात

इंदापूर:  गरिबांच्या मुलांच्या हक्काच्या आरटीई (RTE) प्रवेशावर यंदा श्रीमंतांनी आणि काही 'जुगाडू' पालकांनी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेपासून घर लांब असूनही चक्क ३४ सेंटीमीटर, ३७ सेंटीमीटर आणि ४७ सेंटीमीटर एवढ्या "नगण्य" अंतरावर घर असल्याचे दाखवून अनेकांनी प्रवेश लाटले आहेत. आता प्रश्न असा पडला आहे की, हे विद्यार्थी शाळेच्या आवारातच राहतात की काय?  सेंटीमीटरचा अजब खेळ शाळेपासून घराचे अंतर किमीमध्ये असण्याऐवजी चक्क काही सेंटीमीटर दाखवून गुपचूप प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. ३४ सेंटीमीटर म्हणजे एका फुटापेक्षा थोडे जास्त! इतक्या अंतरावर घर असू शकते का? असा सवाल तेजपृथ्वी (फाउंडेशन) ग्रुप'ने उपस्थित केला आहे.   अनेक धनदांडग्यांनी आणि राजकारण्यांनी पैशांच्या जोरावर शाळेच्या जवळ राहणाऱ्या लोकांच्या नावे खोटे भाडेकरार (Rent Agreement) बनवून घेतले आहेत. विशेष म्हणजे, हे करार शाळा सुटल्यानंतरच्या तारखेचे असल्याचेही पत्रात म्हटले आहे. आरटीईचा मूळ उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शिक्षण देणे हा आहे. मात्र, इथे २५-३० किमी लांब र...