मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

२४ तासांच्या 'स्टेटस'मध्ये अडकलेला बाप व्हेंटिलेटरवर; गोळ्या संपल्यावर खेकसणारे 'भामटी पोरं सोशल मीडियावर फादर्स डे साजरा करतात.

महाराष्ट्र:-   सगळेच सारखी नसतात पण अपवादात्मक काही बेगडी प्रेमाचा दिखावा करणारे लोकं सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत आज 'फादर्स डे'चा महापूर आला असून, एरवी बापाकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या कृतघ्न मुलांचा पुळका अचानक उफाळून आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. २४ तासांनंतर गायब होणाऱ्या व्हाट्सॲप स्टेटसवर बापाला 'माझं आभाळ' ठरवणारे हेच ते 'भामटी पोरं' आहेत, जे प्रत्यक्ष आयुष्यात मात्र बापाच्या हक्काच्या गोळ्यांसाठीही घरात कटकट करत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे,. आज सकाळपासूनच फेसबुक, इंस्टाग्रामवर "बाप माझा विठ्ठल" अशा कॅप्शनसह फोटोंची स्पर्धा लागली आहे. परंतु, याच विठ्ठलाला घरात साधी वागणूक कशी मिळते, याचा ग्राऊंड रिपोर्ट अत्यंत भयानक आहे.   बापाची शुगर वाढली किंवा बी.पी.ची गोळी संपली की "अजून मागच्या आठवड्यात तर आणून दिली होती, एवढ्या लवकर कशी संपली?" असा हिशोब मागणारे सुपुत्र आज सोशल मीडियावर बापावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. गोळ्यांच्या पैशांवरून घरात रोज वाद घालणारे हेच 'शहाणे' आज स्टेटसवर बापाचा आदर करण्याचे ढोंग करत ...

इंदापूरच्या रणछोडदास शहा विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन आणि वृक्षारोपण उत्साहात संपन्न..!

इंदापूर: येथील श्री. रनछोडदास कल्याण शहा विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन आणि वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गिरीश शहा यांच्या प्ररणेने आणि मार्गदर्शनाखाली या संयुक्त उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना योग शिक्षिका सौ. सायराभाभी हमीद आत्तार, योग शिक्षक श्री. चंद्रकांत देवकर, अशोक अनपट आणि देवराव मते यांनी योगासनांचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सर्वांकडून विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करून घेण्यात आली. "रोजच्या धावपळीच्या जीवनात योगाचा समावेश केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे उत्तम राहते," याबद्दल मार्गदर्शकांनी मोलाचा सल्ला दिला. योग साधना झाल्यानंतर शालेय परिसरात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत भव्य वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गिरीश शहा, वृक्ष संजिवनी परिवाराचे सायरा आत्तार, श्री. चंद्रकांत देवकर , श्री. अशोक अनपट आणि श्री. हमीदभाई आत्तार तसेच विद्यार्थ्यांच्या...

*प्रवीण माने यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम*

 इंदापूर:- सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे विविध उपक्रम प्रवीण भैय्या माने मित्रपरिवार, शेटफळगडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले. प्रवीण भैय्या माने यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी रात्री आयोजित कार्यक्रमात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शालेय साहित्य वाटपाचा उपक्रमही राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सोनाई परिवाराचे संचालक किशोर भैय्या माने यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडापुरी तसेच श्रीनाथ विद्यालय, वडापुरी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वह्या, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक वस्तूंचे वितरण करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले. याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुरवड येथेही प्रवीण भैय्या माने मित्रपरिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमालाही किशोर भैय्या माने यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक...

*युवा नेते प्रवीणभैय्या माने यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक तुला, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि शैक्षणिक मदतीचे वाटप*

इंदापूर तालुक्याचे युवा नेते, माजी बांधकाम व आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे तथा सोनाई उद्योग समूहाचे संचालक सन्माननीय श्री. प्रविणभैय्या माने यांच्या वाढदिवसानिमित्त प्रविणभैय्या माने मित्रपरिवाराच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत साजरा करण्यात आलेला हा वाढदिवस नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला. यावेळी श्री. प्रविणभैय्या माने यांची शैक्षणिक तुला करण्यात आली. विशेष म्हणजे, वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, हार-तुरे किंवा इतर भेटवस्तू न आणण्याचे आवाहन त्यांनी यापूर्वीच नागरिकांना केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत इंदापूर तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते, मित्रपरिवार व हितचिंतकांनी पुष्पगुच्छाऐवजी वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिली, दप्तर आणि इतर शालेय उपयोगाच्या वस्तू भेटस्वरूपात आणल्या. या सर्व शालेय साहित्याचे संकलन करून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराब...

आरोग्य दूत मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त गोजुबावीत आरोग्य तपासणी व खाऊ वाटप

बारामती : - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख 'आरोग्य दूत' मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुक्यातील गोजुबावी येथे समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बारामती तालुका उपसमन्वयक प्रवीण सोनू माकर यांच्या पुढाकारातून या विशेष कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. शाळेच्या पहिल्या दिवशी गोजुबावी येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत सरस्वती पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. याचबरोबर आरोग्य उपकेंद्र गोजुबावीच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. नयनेश मुंडे यांनी विद्यार्थ्यांची कान, नाक, घसा आणि डोळ्यांची तपासणी केली. गरजूंना आवश्यक औषधोपचार व गोळ्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मंगेश चिवटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चिवटे यांच्या कार्यप्रेरणेतून होत असलेल्या या उपक्रमाचे ग्र...

*इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्याचे पाणी पूर्ण क्षमतेने पोहोचविण्याबाबत जलसंपदा मंत्री यांचे तात्काळ आदेश*

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना खडकवासला कालव्याचे पाणी पूर्ण दाबाने व नियमित स्वरूपात मिळावे, यासाठी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मा.श्री.प्रदीपदादा गारटकर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांना सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात इंदापूर तालुक्यातील शेती क्षेत्र, पाण्याची वाढती गरज तसेच कालव्याच्या शेवटच्या टप्प्यात पाणी पोहोचताना येणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पाणी वितरण व्यवस्था अधिक प्रभावी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या निवेदनाची दखल घेत जलसंपदा मंत्री मा.श्री.रधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. खडकवासला कालव्याचे पाणी कोणत्याही अडथळ्याशिवाय व पूर्ण क्षमतेने इंदापूर तालुक्यातील शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचावे, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, पिकांच्या सिंचनासाठी आवश्यक पाणी वेळेवर उपलब्ध होणार आ...

इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अन्यायकारक भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी*

महावितरण अधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार व दीर्घकाळाच्या भारनियमनामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी, इंदापूर तालुक्याच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली. सध्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत शेतीसाठी आवश्यक असलेले सिंचन, विहिरी, बोअरवेल तसेच विविध विद्युत पंपांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र सततच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेत पाणी देणे अशक्य होत असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील लघु व मध्यम व्यावसायिकांनाही या भारनियमनाचा मोठा फटका बसत आहे. वीज नसल्यामुळे अनेक उद्योगधंदे व व्यावसायिक आस्थापना...

इंदापुरात अवकाळी वादळी पावसाचा तांडव; केळी, डाळिंब व ऊस पिकांचे कोट्यवधींचे नुकसान..!

भाजप नेते प्रदीप गारटकर आणि प्रविण माने यांनी घेतली नुकसानग्रस्त भागाची बांधावर जाऊन पाहणी; तात्काळ सरसकट पंचनामे व मदतीची मागणी इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यात काल झालेल्या भीषण अवकाळी वादळी पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. प्रामुख्याने केळी, डाळिंब, ऊस तसेच इतर भाजीपाला व फळबागांना या वादळाचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती, शेटफळ हवेली, बावडा, टणू, गणेशवाडी, पिंपरी बु., लाखेवाडी, गिरवी या गावांमध्ये या वादळी पावसाने मुख्यत्वे थैमान घातले. अनेक ठिकाणी केळीच्या बागा जमिनीदोस्त झाल्या असून झाडे उन्मळून पडली आहेत. डाळिंब बागांचेही अतोनात नुकसान झाले असून काढणीस आलेला ऊस वाऱ्यामुळे आडवा झाला आहे. नेत्यांकडून प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी या भीषण परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर व नेते प्रविण माने यांनी ...

सौ. अनिताताई नानासाहेब खरात राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न' पुरस्काराने सन्मानित

पुणे::- नाव न घेता थेट 'वा-वा' मिळवणाऱ्यांच्या खाक्यात खोडा घालणे काय असते, याचा जिवंत नमुना आज पुण्यात पाहायला मिळाला. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनिताताई नानासाहेब खरात यांना राष्ट्रभक्त परिवार आणि प्रहार युथ ऑर्गनायझेशन तर्फे 'राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकीकडे पुरस्काराचा गोडवा होता, तर दुसरीकडे अनिताताईंनी आपल्या भाषणातून विघ्नसंतोषी लोकांची काढलेली चव चांगलीच झणझणीत ठरली. पुण्यातील या शानदार सोहळ्याला राष्ट्रभक्ती महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सौ. भारती तुपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रतिलाल चौधरी,राष्ट्रभक्त परिवाराचे अध्यक्ष सुनीलजी गोरे, आणि अष्टविनायक मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्यासह अनेक बड्या असामी हजर होत्या. मान्यवरांच्या हस्ते अनिताताईंना गौरवण्यात आले, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अनिताताईंनी उत्तर द्यायला सुरुवात केली आणि सभागृहात अचानक शांतता पसरली. काम न करता फक्त 'क्रेडिट' लाटणाऱ्या आणि अरेरावी करणाऱ्या हौशा-नवशांची त्यांनी चांगलीच का...

पै. सचिन शिरसट यांची भाजप इंदापूर तालुका पूर्व युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड.

इंदापूर: भारतीय जनता पार्टी संघटन विस्ताराच्या दृष्टीने इंदापूर तालुक्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरडेवाडी येथील भाजपचे सक्रिय व निष्ठावंत कार्यकर्ते पैलवान सचिन शिरसट यांची इंदापूर तालुका पूर्व विधानसभा युवा मोर्चा अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप पूर्व इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष राम असबे यांनी पत्रकाद्वारे या नियुक्तीची घोषणा केली. या बातमीचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत: पैलवान सचिन शिरसट यांचे पक्षासाठीचे सातत्यपूर्ण कार्य, संघटन बांधणीतील योगदान आणि निष्ठा लक्षात घेऊन भाजप मंडल कार्यकारिणीने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.  या नियुक्तीमुळे भाजपच्या युवा संघटनेला नवसंजीवनी मिळेल, अशा भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असून तालुक्यातून शिरसट यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नियुक्ती पत्र प्रदान करताना तालुकाध्यक्ष राम असबे यांनी विश्वास व्यक्त केला की, सचिन शिरसट पूर्व इंदापूर भागातील पक्ष संघटन अधिक मजबूत करतील आणि युवकांना पक्षाशी जोडून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतील. "गाव तिथे शाखा काढून युवकांची मोठी फळी निर्माण क...

या वेळी लाखेवाडी च्या सरपंच डाॅ.चित्रलेखा श्रीमंत ढोले मॅडम

वादळी पावसातील नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश इंदापूर  दि.६: राज्यात काल झालेल्या वादळी पावसामुळे २४ जिल्ह्यात अंदाजे १ लाख ५०० एकराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळण्याच्यादृष्टीने बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीने मदत करण्यात येईल, असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. श्री. भरणे यांनी आज इंदापूर तालुक्यातील वडापुरी, सुरवड, गणेशवाडी, बावडा, टणू, पिंपरी बु. आणि लाखेवाडी भागात झालेल्या नुकसानीबाबत प्रत्यक्ष बांधावर जाणून पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार जीवन बनसोडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे या वेळी लाखेवाडी च्या सरपंच डाॅ.चित्रलेखा श्रीमंत ढोले मॅडम आदी उपस्थित होते. श्री. भरणे म्हणाले, हवामान बदलामुळे आलेल्या राज्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत; बाधित क्षेत्रातील एकही शेतकरी पंचनाम्यापासून वं...

दुष्काळात तेरावा महिना! निसर्गाचा कोप आणि सरकारची डोळेझाक; सरडेवाडीत बळीराजा उद्ध्वस्त!

इंदापूर:  "बाप जगू देईना आणि आई भीक मागू देईना..." अशी अत्यंत विदारक आणि काळजाचा थरकाप उडवणारी परिस्थिती आज इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील सामान्य शेतकऱ्याची झाली आहे. आधीच तीव्र दुष्काळाच्या होरपळीत होरपळणाऱ्या शेतकऱ्याला आता निसर्गानेही दगा दिला आहे. सरडेवाडी परिसरात झालेल्या भीषण चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाने इथल्या शेतकऱ्यांचे कंबरडे पार मोडून टाकले आहे. या वादळी वाऱ्याचा सर्वात मोठा आणि भीषण फटका शेतकरी नितीन कोकरे यांना बसला आहे. निसर्गाच्या तांडवामुळे नितीन कोकरे यांचे राहते घर आणि जनावरांचा गोठा अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. डोक्यावरचे छत हिरावले गेले असून, मुक्या जनावरांचा आसराही या वादळाने हिरावून घेतला आहे. लाखो रुपयांचे नुकसान डोळ्यांदेखत झाल्याने कोकरे कुटुंबीयांवर उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.   नेहमीप्रमाणे शेतकरी संकटात सापडल्यावर महसूल प्रशासन आणि विमा कंपन्या सुस्त का बसतात,कागदी घोडे नाचवणे बंद करा, सरडेवाडीतील नुकसानग्रस्त भागाचे आणि विशेषतः शेतकरी नितीन कोकरे यांच्या घराचे व गोठ्याचे तात्काळ पंचनामे झाले पाहिजेत, तात्काळ आर्...

वरिष्ठ नागरिकों के स्वास्थ्य के लिए 'मोटा अनाज' (तृणधान्य) अमृत के समान है: डॉ. श्रेणिक शाह

इंदापूर, डॉ. संदेश शाह। वरिष्ठ नागरिक समाज के आधारस्तंभ हैं और समाज को सक्षम व सुसंस्कृत बनाने में उनका महत्वपूर्ण योगदान है। इसलिए उनके स्वास्थ्य को बेहतर बनाए रखने के लिए दैनिक आहार में मोटे अनाज (मिलेट्स/तृणधान्य) का उपयोग करना समय की मांग है, ऐसा प्रतिपादन जनरल सर्जन डॉ. श्रेणिक शाह ने किया। वे इंदापूर के 'आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान' तथा 'वरिष्ठ नागरिक संघ' की ओर से वरिष्ठ नागरिक भवन में आयोजित स्वास्थ्य जागरूकता कार्यक्रम में मार्गदर्शन करते हुए बोल रहे थे। कार्यक्रम की अध्यक्षता वरिष्ठ नागरिक संघ के अध्यक्ष सुभाष थोरात ने की। इस अवसर पर मई महीने में जन्मदिन मनाने वाले सभी वरिष्ठ नागरिकों का सत्कार (सम्मान) किया गया।32 प्रकार के मोटे अनाज, 18 प्रकार की आयुर्वेदिक वनस्पतियों के चूर्ण और 7 प्रकार के सूखे मेवों (ड्राय फ्रूट्स) से युक्त मिलेट्स शरीर की दैनिक कैलोरी की आवश्यकता को पूरा करते हैं।  शरीर की इम्यूनिटी (रोगप्रतिकारक शक्ति) को मजबूत बनाए रखता है। * इसमें किसी भी प्रकार के रसायन (केमिकल) का उपयोग नहीं होता, इसलिए शरीर पर इसका कोई द...

अनंतराव थोपटे यांच्या निधनाने ऋषीतुल्य नेतृत्व हरपले- हर्षवर्धन पाटील

इंदापूर : प्रतिनिधी दि.5/6/26                                     राज्यातील जेष्ठ नेते, माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या निधनाने समाजाला दिशा देणारे, आदर्श मूल्ये जपणारे व जनहितासाठी आयुष्य वेचणारे अभ्यासू नेतृत्व आता आपल्यामध्ये राहिलेले नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक ऋषीतुल्य नेतृत्व गमावले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.          अनंतराव थोपटे साहेबांनी आयुष्यभर लोकाभिमुख आणि मूल्याधिष्ठित असे राजकारण, समाजकारण केले. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये दुर्गम भागातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख राजकारण केले. भोर तसेच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांचे मोलाचे योगदान दिले. सर्वसामान्य नागरिकांशी कायम असलेला जिव्हाळ्याचा संबंध आणि लोकहिताची तळमळ ही त्यांची खरी ओळख होती, असे हर्षवर्धन ...

कारखाना चालतोय 'सहकारा'वर, शेतकरी जगतोय 'उधारी'वर..! पाटलांच्या 'कर्मयोगीला' लागला थकीत बिलांचा डाग.; शेतकरी आक्रमक!

इंदापूर:- एकेकाळी सहकार क्षेत्रात आदर्श मानला जाणाऱ्या इंदापूरच्या 'कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्या'च्या नावाला आज ग्रहण लागले आहे. कर्मयोगी शंकरराव भाऊ पाटील आणि गोकुळदास भाई शहा यांनी अत्यंत शिस्तबद्ध नियोजनाने जो कारखाना शेतकऱ्यांचा 'आधारस्तंभ' बनवला होता, त्याच कारखान्यात आज शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत; घामाचे दाम अडकले एक काळ असा होता की, कारखान्याच्या गेटमधून ऊस गेला की काही दिवसांतच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायचे. 'शेतकरी सुखी तरच कारखाना सुखी' हे ब्रीदवाक्य या दिग्गज नेत्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले होते. मात्र, आज चित्र पूर्णपणे बदलले आहे. कारखान्याचे सूत्रे बाबुराव बोत्रे यांच्या हाती सोपवल्यापासून शेतकऱ्यांच्या नशिबी केवळ हतबलता आली आहे. ऊस देऊन पाच-सहा महिने उलटले, तरी अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळालेले नाहीत. भाऊ-भाई'च्या सुवर्णकाळाची आज आठवण   मा.ना.हर्षवर्धनभाऊ पाटील आणि मा.भरतभाऊ शहा यांच्या काळात कारख...

इंदापूर शहरातील प्रत्येक प्रभाग स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध : नगराध्यक्ष भरतभाऊ शहा

स्वच्छ सर्वेक्षण २०२६' आणि 'माझी वसुंधरा अभियान अंतर्गत इंदापूर शहरातील व्यंकटेशनगर परिसर नगरपरिषदेकडून चकाचक इंदापूर :- शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये व्यापक स्वच्छता अभियान राबवून शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्यासाठी नगरपरिषद पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी दिली. केंद्र सरकारच्या 'स्वच्छ सर्वेक्षण २०२६' मिशन लाईफ' आणि राज्य सरकारच्या 'माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक सातमधील व्यंकटेशनगर परिसरात आयोजित विशेष 'स्वच्छता मोहिमेच्या' प्रसंगी ते बोलत होते. या पालिकेने शहराला देशपातळीवर आघाडीवर नेण्यासाठी हे कंबरकसून नियोजन केले आहे. इंदापूर नगर परिषदेच्या वतीने शहरामध्ये, स्वच्छ इंदापूर ! सुंदर इंदापूर !! हरित इंदापूर !!!"या त्रिसूत्री संकल्पनेतून विविध प्रभागांमध्ये अत्यंत गतिमान पद्धतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून व्यंकटेश नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान श्री बालाजी मंदिर परिसर, टाऊन हॉल परिसर, शिकलक...

तालुक्यातील 'सहकार सम्राटाचा' माज मोडूनच काढणार..! मयूरसिंह पाटलांच्या व्हाट्सॲप स्टेटसने इंदापुरात खळबळ

इंदापूर :राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो, पण सध्या इंदापूर तालुक्यात नेत्यांच्या भाषणांपेक्षा त्यांच्या 'व्हाट्सॲप स्टेटस'चीच जास्त चर्चा रंगू लागली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयूरसिंह पाटील यांनी आपल्या व्हाट्सॲपवर ठेवलेल्या एका स्टेटसने सध्या इंदापूरच्या राजकीय गल्लीबोळांमध्ये चांगलाच उन्हाळा वाढवला आहे.मयूरसिंह पाटील यांनी आपल्या स्टेटसवर भगव्या बॅकग्राउंडवर थेट आणि धारदार शब्दांत लिहिलंय"तालुक्यातील सहकार सम्राटाचा माज मोडूनच काढणार..!केवळ एका ओळीच्या या स्टेटसने तालुक्याच्या राजकारणात 'न भूतो न भविष्यती' असा भूकंप आणला आहे. अवघ्या काही मिनिटांतच या स्टेटसचे स्क्रीनशॉट संपूर्ण इंदापूर तालुक्यात वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत.मयूरसिंह पाटील यांनी थेट नाव न घेता 'सहकार सम्राट' असा उल्लेख केल्यामुळे आता हा बाण नक्की कोणाच्या दिशेने सुटलाय, यावर चौकाचौकांत पैजा लागल्या आहेत. तालुक्यात सहकार क्षेत्रावर वर्चस्व असणाऱ्या कोणत्या मोठ्या नेत्याला मयूरसिंह यांनी हा थेट इशारा दिला आहे? आणि हा 'माज' नक्की कसा मोडला जाणा...

*पंतप्रधानांच्या 'हरित वाहतूक' आवाहनाला राजवर्धन पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद; पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू!

 इंदापूर  देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत इंदापूरचे युवा नेते राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. "हरित वाहतूक"आणि इंधन बचतीच्या दृष्टीने त्यांनी आपल्या सेवेत नवीन इलेक्ट्रिक वाहन  दाखल केले असून, आजपासून त्याचा प्रत्यक्ष वापर करण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरण संवर्धन, वाढते प्रदूषण आणि पारंपारिक इंधनाचा तुटवडा या पार्श्वभूमीवर राजवर्धन पाटील यांनी घेतलेला हा निर्णय सध्या मतदारसंघात विशेष चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.याप्रसंगी बोलताना राजवर्धन पाटील म्हणाले की, "पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि प्रदूषणमुक्त भारताच्या निर्मितीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही आजच्या काळाची गरज बनली आहे. स्वच्छ आणि हरित भविष्यासाठी आपण सर्वांनीही शक्य तितक्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करावा. वाढत्या वायुप्रदूषणामुळे आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमुळे जगभरात आता पर्यायी ऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. अशातच, इंदापूर तालुक्यातील एका अग्रगण्य युवा ...

इंदापुरात ‘स्क्रिप्टेड गुन्हेगारी’चा महाधमाका! "तक्रारी तयार करा, गुन्हे लावा आणि वसुली करा"; कोर्टाच्या आदेशाने ‘खाकी’ आणि ‘झारीतील शुक्राचार्यांचे’ धाबे दणाणले!

*इंदापूर (विशेष प्रतिनिधी): चित्रपटात दिग्दर्शक जशी स्क्रिप्ट लिहितो, तशीच काहीशी 'क्राईम स्क्रिप्ट' इंदापुरात लिहिली जात असल्याचा एक अंगावर काटा आणणारा प्रकार उघडकीस आला आहे! प्रतिष्ठित नागरिकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवायचे, पुरावे प्लांट करायचे आणि मग दबावाचे राजकारण करायचे... असा हा इंदापूर पॅटर्न! पण म्हणतात ना, "कायद्याचे हात लांब असतात", अखेर इंदापूर न्यायालयाने या ‘स्क्रिप्टेड’ प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र निंबाळकर यांच्या चौकशीचे थेट आदेश दिले आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्र. चं. बारटक्के यांनी दिलेल्या या दणक्यामुळे इंदापूरच्या पोलीस वर्तुळात आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची कथा २०१८ पासून सुरू होते. इंदापूर शहरातील नामांकित क्रिटी केअर हॉस्पिटलचे संचालक गोरख भोसले यांना फसवणुकीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा विडाच जणू तत्कालीन एपीआय महेंद्र निंबाळकर यांनी उचलला होता. यासाठी त्यांनी औंध येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अव्वल कारकून 'झेंडे' यांना व्हॉट्सअॅप...

पुणे-सोलापूर हायवेवर 'पाणी वाहून जाण्यासाठी आसणारे,, ; ढाबेवाले अन् हॉटेलचालकांनी साईट गटारेच गिळली

इंदापूर,:- पावसाळा तोंडावर आला की शासकीय पातळीवर नालेसफाई आणि पाणी वाहून जाण्यासाठी 'पावसाळापूर्व कामांची' लगबग सुरू होते. पण पुणे-सोलापूर महामार्गावर सध्या भलताच 'सांस्कृतिक आणि व्यापारी' प्रयोग पाहायला मिळतोय. महामार्गावरून पाणी सुसाट वाहून जावे म्हणून काढलेल्या साईड चाऱ्या (गटारे) महाभागांनी चक्क गायब केल्या आहेत. होय, गायब! रस्ता कडेच्या काही अपवादात्मक ढाबेवाल्यांनी, पेट्रोल पंप मालकांनी आणि हॉटेलचालकांनी आपल्या ग्राहकांच्या गाड्या आरामात लागाव्यात म्हणून या चाऱ्यांवर चक्क माती आणि मुरूम टाकून त्या बुजवून टाकल्या आहेत. आता हॉटेलमध्ये 'स्पेशल मटण थाळी' किंवा 'चिकन हंडी' ओरपायला येणाऱ्या गिऱ्हाइकांना गटारावरून उडी मारत कसं आणणार? हा विचार करून या चालकांनी 'आपला विकास, हायवेचा विनाश' हे धोरण राबवलेलं दिसतंय. पण यामुळे येत्या पावसाळ्यात महामार्गावर 'जलतरण तलाव' तयार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासकीय अधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये! या गंभीर प्रकाराची दखल सरडेवाडी टोलनाक्यावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यांनी...