१२ ऑगस्टला सोलापूर सिंचन भवनावर धडक मोर्चाचा इशारा उजनी धरणावर उभारण्यात येणारा प्रस्तावित तरंगता सौरऊर्जा प्रकल्प आणि मत्स्य व्यवसायाचे खासगीकरण करण्याचे शासकीय धोरण मच्छिमारांच्या मुळावर उठले आहे. हे दोन्ही निर्णय तातडीने मागे घेण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी ‘महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती’च्या वतीने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना भरणेवाडी येथे एक विशेष निवेदन सुपूर्द करण्यात आले. प्रशासनाने यावर लवकरात लवकर सकारात्मक पाऊल न उचलल्यास येत्या १२ ऑगस्ट रोजी सोलापूर येथील सिंचन भवनावर भव्य जनआंदोलन उभारण्याचा थेट इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. उजनी धरण हे संपूर्ण महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मासेमारीचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. या धरणाच्या पाण्यावर आणि मत्स्य व्यवसायावर हजारो स्थानिक मच्छिमार, व्यावसायिक व छोटे व्यापारी यांच्या चुली पेटतात. जलसंपदा विभागाने या धरणातील तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावर १,००० मेगावॅट क्षमतेचा ‘फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट’ (तरंगता सौर प्रकल्प) उभारण्याचे नियोजन केले आहे. सुमारे १४,५७६ कोट...
SHIVSRUSTHI NEWS