मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

बावडा ग्रामस्थांसमवेत हर्षवर्धन पाटील यांचा दसरा ऊत्सहात  इंदापूर:            बावडा ग्रामस्थांसमवेत भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दसऱ्याचा सण आनंदी व उत्साही वातावरणात शुक्रवारी (दि.15) सायंकाळी साजरा केला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या रत्नाई निवासस्थानी परंपरेनुसार प्रतिवर्षीप्रमाणे  आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांना आपुलकीने आपट्याची पाने देत शुभेच्छा व्यक्त केल्या.                यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत विविध विषयावरती गप्पा गोष्टी केल्या. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आता सुधारत असल्याचे त्यांनी सांगितले. परतीच्या पावसाने शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. यावेळी बावडा ग्रामस्थांबरोबरच परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ___________________________

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

ज.मा. मोरे त्यांचा पार्थिवाचे दर्शन घेऊन हर्षवर्धन पाटील यांनी वाहीली भावपूर्ण श्रद्धांजली    इंदापूर:- पंचायत समितीचे माजी सभापती तालुक्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक जगन्नाथ मारुतराव मोरे (आप्पा) यांचे आज सकाळी सहा वाजता निधन झाले. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली तसेच ते अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.    कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्यासमवेत ज. मा.(आप्पा)मोरे यांनी कार्य केले असून तालुक्याच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात भरीव योगदान आहे. इंदापूर पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून त्यांची ओळख होती. तालुक्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांचे कार्य होते.  मोरे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची परमेश्वराने शक्ती देवो अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

वीज कोसळून नुकसान झालेल्या घराची हर्षवर्धन पाटील यांनी केली पाहणी जिवीतहानी नाही   इंदापूर प्रतिनिधी-    निमगाव केतकी येथील शेतकरी बबनराव पाटील यांच्या घरावरीत 1 ऑक्टोबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसात मोठा आवाज होऊन वीज कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले होते आज राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी निमगाव केतकी येथील पाटील यांच्या घराची पाहणी करून त्यांना दिलासा दिला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र विजेमुळे घराच्या स्लॅपचा काही भाग फुटून खाली आल्याने घराचे मोठे नुकसान झाले.    घरावर वीज कोसळल्याने बबनराव पाटील कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घराची पाहणी करून पाटील कुटुंबीयांना दिलासा दिला आहे.    यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव आणि पाटील कुटुंबीय उपस्थित होते.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

पीपल्स रिपब्लिकन पार्टी ( कवाडे गट) चे वतीने पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भीमानगर जि.सोलापूर येथे रास्ता रोको करणार-संजय सोनवणे  इंदापूर : विशेष प्रतिनिधी  दि. २१ सप्टेंबर पासून कार्यकारी अभियंता उजनी, यांच्या कार्यालयासमोर सुरु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाची प्रशासनाकडून अद्याप दखल घेतली नाही. याच्या निषेधार्थ (दि. ३०) रोजी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भीमानगर जि.सोलापूर येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पक्ष ( कवाडे गटा) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिली आहे. मौजे रांझणी (ता. माढा जि. सोलापूर ) येथील बौद्ध समाजातील १५० भूमीहीन शेतकऱ्यांच्या मूळ जमिनी ह्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्याकडे संपादित आहेत. हे शेतकरी उजनी धरणग्रस्त असून त्यांना त्या जमिनीच्या मोबदल्यात कुठलाही शासकीय मोबदला व घर,जमीन मिळाली नाही. त्या मूळ जमिनी सध्या पडीक आहेत. ती जमीन शासनाने त्याच्या उदरनिर्वाहासाठी ह्या शेतकऱ्यांना कसण्यास द्यावी. तसेच प्रशासनाकडून उजनी जलाशय पर्यटन विकास केंद्राच...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

हर्षवर्धन पाटील यांचा कर्मयोगी कारखाना निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल इंदापूर:            राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते  हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी (दि.23) इंदापूर प्रशासकीय भवन येथे दाखल केला.             कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या चालू असून कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष, राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्ती उत्पादक कालठण गट आणि ब वर्ग संस्था सभासद प्रतिनिधी या दोन्ही मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. इंदापूरचे तहसीलदार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील, सहाय्यक निबंधक जिजाबा गावडे यांनी अर्ज स्वीकारला.            यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, लालासाहेब पवार,  राजवर्धन प...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

बौद्ध समाजातील भूमिहीन शेतकऱ्यांच्या जमीनी वहिवाटीस द्या : संजय सोनवणे. इंदापूर : महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांच्याकडे असलेल्या बौद्ध समाजातील भूमिहीन शेतकऱ्यांच्या जमीनी इतर शेतकऱ्यांप्रमाणे वहिवाटीस देण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, मौजे रांझणी  ता. माढा जि. सोलापूर येथील बौद्धसमाजातील  भूमीहीन शेतकऱ्यांच्या मूळ जमिनी ह्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्याकडे संपादित आहेत. या भूमिहीन शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या १५० आहे. हे शेतकरी उजनी धरणग्रस्त असून त्यांना त्या जमिनीच्या मोबदल्यात कुठलाही शासकीय मोबदला व घर,जमीन मिळाली नाही. त्या मूळ जमिनी सध्या पडीक आहेत. ती जमीन शासनाने त्याच्या उदरनिर्वाहसाठी त्यांना कसण्यास द्यावी. त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या वहिवाटी सुरु आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची प्रशासनाकडून अडचण येताना दिसून येत नाही परंतु आमच्या भूमिहीन बांधवां...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी राजकीय आरक्षणापासून वंचित- हर्षवर्धन पाटील     इंदापूर:          राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज राजकीय आरक्षणापासून वंचित राहिला आहे. राज्य सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नाही, हे सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र भाजप ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आग्रही असून, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे बुधवारी (दि.15) केली.             इंदापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तहसीलदार श्रीकांत पाटील यांना ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राजकीय आरक्षण कायम राहावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.                   राज्य सरकारने...