मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन; इंदापूरचे नगराध्यक्ष मा.भरतभाऊ शहा यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली

इंदापूर: भारतीय संगीत क्षेत्रातील एक अढळ तारा आणि कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून, संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. भरतभाऊ शहा यांनी आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.          श्रद्धांजली वाहताना भरतभाऊ शहा म्हणाले की आशाताईंचे जाणे हे केवळ संगीत क्षेत्राचेच नव्हे, तर प्रत्येक भारतीयाचे वैयक्तिक नुकसान आहे. त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने अनेक पिढ्यांना आनंद दिला. त्यांच्या गायकीतील वैविध्य आणि ऊर्जा नेहमीच प्रेरणादायी राहील. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. आशा भोसले यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नव्हे, तर विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीतातील 'आशा' नावाचा एक सुवर्णकाळ संपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे....

सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही

मुंबई प्रतिनिधी:(सतिश पाटील ) सर्वोच्च न्यायालयचा ऐतिहासिक निर्णय  सर्वोच्च न्यायालयाने कलम ६६(A) अंतर्गत सोशल मीडिया पोस्टवर होणारी कारवाई बेकायदेशीर ठरवली असली तरी, देशाचे ऐक्य, सुरक्षा किंवा जातीय सलोखा बिघडवणारी पोस्ट केल्यास कारवाई होऊ शकते. आक्षेपार्ह मजकुरासाठी आयटी कायदा आणि IPC अंतर्गत गुन्हे दाखल होऊ शकतात, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कडक नियमावली लागू आहे.  महत्त्वाचे मुद्दे: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: कलम ६६(A) रद्द केल्यामुळे पोलिसांना पोस्टवरून थेट कारवाई करता येत नाही, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग मानले जाते. कायदेशीर मर्यादा: जर पोस्टमुळे दंगल, हिंसाचार किंवा देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असेल, तर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. सरकारी कर्मचारी: सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास किंवा शिस्तभंग केल्यास नोकरीवर कारवाई होऊ शकते. गोपनीयता (Privacy): कोणाच्या संमतीशिवाय त्यांची चित्रे किंवा व्हिडिओ टाकणे हा गुन्हा आहे. बदलाव: केंद्र सरकार सोशल मीडियावरील मजकूर ब्लॉक करण्याचे नियम कडक करत आहे.  टीप: सोशल मीडिया...

इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी तलावात खडकवासला कॅनलमधून पाणी सोडावे; शेतकऱ्यांचे कृषीमंत्र्यांना साकडे

इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी, गोखळी आणि पोंदकुलवाडी परिसरातील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तरंगवाडी तलावात खडकवासला कॅनलमधून त्वरित पाणी सोडावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री **नामदार दत्तात्रय (मामा) भरणे** यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. यावेळी तरंगवाडीचे सरपंच कांतीलाल तरंगे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. गेल्या काही दिवसांपासून परिसरात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर खडकवासला कालव्याचे पाणी तरंगवाडी तलावात सोडले, तर तरंगवाडीसह गोखळी आणि पोंदकुलवाडी या तिन्ही गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याच उद्देशाने ग्रामस्थांच्या वतीने हे अधिकृत निवेदन कृषीमंत्र्यांना देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर नामदार दत्तात्रय मामा भरणे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तलावात पाणी सोडण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून...

इंदापुरात १७ एप्रिल रोजी 'विराट हिंदू संमेलन'चे आयोजन; सकल हिंदू समाजाची मोठी तयारी

इंदापूर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने येत्या १७ एप्रिल २०२६रोजी भव्य 'विराट हिंदू संमेलन' आयोजित करण्यात आले आहे. हिंदू संस्कृतीचे रक्षण, सामाजिक समरसता आणि राष्ट्र सुरक्षेच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे संमेलन इंदापूर नगरपरिषद मैदानात सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत पार पडणार आहे. या संमेलनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मातृशक्तीच्या प्रतिनिधी कु. जागृती आयचीत आणि पुणे विभागाचे सह-संयोजक श्री. सुनील भालेराव उपस्थित राहणार आहेत. तसेच, हिंदुत्ववादी वक्ते आशुतोष झा यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार असून, त्यांच्या प्रभावी भाषणातून हिंदुत्वाचा जागर केला जाणार आहे. आयोजकांनी या संमेलनाचे आयोजन करण्यामागची भूमिका स्पष्ट केली असून, त्यात खालील मुद्द्यांवर भर दिला आहे: स्वराज्य रक्षण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य विचारांची जोपासना करणे. राष्ट्र सुरक्षा हिंदू संघटित तरच राष्ट्र आणि संविधान सुरक्षित राहू शकते, हा संदेश देणे.सामाजिक एकताजातीपाती विसरून 'हिंदू' म्हणून एकत्र येणे आणि सामाजिक समरसता वाढवणे. जागृती:कुटुंब प्रबोधन, आत्मबोध, पर्यावरण संर...

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुलेयांच्या १९९ व्या जयंती निमित्त नागरी संघर्ष समितीचे विनम्र अभिवादन

 इंदापूर क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी  यांच्या १९९ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.. इंडियन युथ आयकॉन 2026 हा अंबुज चित्रपटाचे दिग्दर्शक नरेंद्र गायकवाड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना प्राकृष्णा ताटे म्हणाले की नरेंद्र गायकवाड यांनी इंदापूरच्या सुवर्णमय इतिहासाला उजळा दिला असून इंदापूर शहराने यापुर्वी इतिहासामध्ये अनेक लेखक, चित्रपट निर्माते, चित्रपट दिग्दर्शक, गायक, कवियत्री दिले आहेत यामध्ये ग .प . प्रधान ,शांता शेळके, यु . म . पठाण' प्रतिभाताई गारटकर, अरुण ढवळे यासारखे नामवंत लेखक चित्रपट दिग्दर्शक शृंखलेमध्ये नरेंद्र गायकवाड यांनी सर्वसामान्य गरीब दलित माणसाच्या जीवनाचे चित्रण करून एक उत्तम" अंबुज " नावाचा चित्रपट दिला त्या चित्रपटाला उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून युथ इंडियन आयकॉन 2026 हा पुरस्कार त्यांना मिळाला . त्याबद्दल इंदापूर शहरवासीयांच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन  यावेळी संघर्ष समितीचे हमीदभाई आत्तार , कवी महादेव चव्हाण, भीमराव...

इंदापूर नगरपरिषदेत महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

इंदापूर: भारतीय समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी इंदापूर शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या सोहळ्याप्रसंगी इंदापूरचे नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे-पवार गटनेते शकीलभाई सय्यद,विरोधी पक्षनेते अनिल अण्णा पवार,प्रशांत उंबरे, नगरसेवक,अक्षय सूर्यवंशी,पोपट शिंदे,श्रीनिवास माने,स्वप्नील राऊत मा.नगरसेवक, आणि नगरसेवक डोनाल्ड शिंदे, यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर नगराध्यक्ष आणि इतर मान्यवरांनी शहरातील विविध चौकातील महापुरुषांच्या स्मारकांना भेटी देऊन पुष्पहार अर्पण केले." महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील उपेक्षितांसाठी आणि स्त्री शिक्षणासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यांचे विचार आजही स...

*भिमाई आश्रमशाळेत महात्मा फुलेंना अभिवादन..**

*इंदापूर ता.११: इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी केली. यावेळी क्रांतीसुर्य महात्मा फुले, तथागत गौतम बुद्ध व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर (तात्या) मखरे यांच्या प्रतिमांचे पूजन प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार व माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राचार्या अनिता साळवे यांच्या हस्ते केले. यावेळी सर्व विद्यार्थी, अधिक्षक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.