मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

महापुरुषांच्या विचारांची जयंती साजरी व्हावी -प्रा. दुर्गाडे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ देशात वेगवेगळे धर्म, जाती,पोटजाती असून अनेक भाषा बोलल्या जातात तसेच सण उत्सव देखील गुण्यागोविंदाने साजरे केले जातात परंतु या सर्वांना एकत्र जोडण्याचे काम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे शक्य झाले आहे महापुरुषांनी केलेले महान कार्यआजच्या पिढीपर्यंत पोहचण्यासाठी महापुरुषांची जयंती डीजेच्या तालावर नव्हे तर त्यांचे विचार वाचून साजरी करायला हवी असे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील सिद्धार्थ नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रा. दिगंबर दुर्गाडे हे बोलत होते.ते पुढे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय कार्याची व त्याच्या प्रगल्भ विचारांची पारदर्शक माहिती आजच्या पिढीला असणे तितकेच गरजेचे आहे . या प्रसंगी वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड जिल्हा परिषदेच्या सदस्या प्राजक्ता दुर्गाडे उपसरपंच सागर भुजबळ आरपीआयचे अध्यक्ष शै...

इंदापूरच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न होणार

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या **कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात** शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा भव्य **वार्षिक पारितोषिक वितरण आणि वार्षिक क्रीडा व गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ** आज, गुरुवार दि. १६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. संतोष सोनवणे** यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष **मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील** राहणार आहेत. याप्रसंगी मंडळाचे सचिव मा. श्री. अॅड. मनोहर चौधरी आणि विश्वस्त मा. राजवर्धनदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.दिनांक: गुरुवार, १६ एप्रिल २०२६ सकाळी ठीक १०:०० वाजता,शाहीर अमर शेख सभागृह, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर. या कार्यक्रमात वर्षाभरात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या खेळाडूंचा आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, क्री...

प्रकाश भोईटे यांनी ग्रामीण पत्रकारितेला ओळख दिली - हर्षवर्धन पाटील

इंदापूर :प्रतिनिधी  जेष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांनी सन 1990 च्या दशकामध्ये ग्रामीण पत्रकारितेला ओळख निर्माण करून दिली, त्याचबरोबर ग्रामीण पत्रकारितेचा दर्जाही उंचावला. तसेच त्यांनी ग्रामीण पत्रकारितेला महत्त्व प्राप्त करून दिले. प्रकाश भोईटे यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील माझा मित्र हरपला आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.          पुणे श्रमिक पत्रकार संघ, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे (वय 62 ) यांचे सोमवारी (दि.13) दुपारी पुण्यात निधन झाले.      प्रकाश भोईटे यांची सन 1995 च्या सुमारास मी कृषी राज्यमंत्री असताना ओळख निर्माण झाली. त्यावेळी असलेल्या ठराविक पत्रकारांमध्ये ते अभ्यासू व उत्साही पत्रकार होते. ग्रामीण भागातील पत्रकारितेची व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना सखोल माहिती होती, त्यातूनच त्यांनी पुणे जिल्ह्यातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे व पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचे ...

* मा.रत्नाकर तात्यांच्या भिमाई आश्रमशाळेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन..*

*इंदापूर ता.१४: येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी केली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर , तथागत गौतम बुद्ध व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर (तात्या) मखरे यांच्या प्रतिमांचे पूजन माजी नगरसेविका,संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी), सचिव ॲड. समीर मखरे यांच्या हस्ते यांच्या हस्ते केले. यावेळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडला. तसेच काही विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर गीतं गायली. यावेळी प्रश्न मंजुषा घेण्यात आली. प्रश्न मंजुषेत प्रथम क्रमांक आलेली कु. देवयानी माने हिस सचिव ॲड. समीर मखरे यांनी बुद्धांचे चांदीचे नाणे भेट दिले. यावेळी संचालक गोरख तिकोटे, गलांडवाडी नंबर २चे सरपंच आप्पा गाडे, माजी सरपंच गोपीचंद गलांडे, सामाजिक कार्यकर्ते सतीश आढाव, ...

मालोजीराजे भोसले आयटीआय इंदापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

इंदापूर येथील मालोजीराजे भोसले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI)** आज, १३ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून महामानवास अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्राचार्य श्री. दिनेश पानसरे यांनी भूषवले. याप्रसंगी इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. मा.भरतभाऊ शहा, उपनगराध्यक्ष श्री. बाळासाहेब ढवळे शाहू फुले आंबेडकर विकास प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. संदिपान कडवळे,आरपीआय पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. शिवाजीराव मखरे, आरपीआय पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजाभाऊ घाडगे,नगरपरिषदेचे गटनेते.शकिलभाई सय्यद माजी गटनेते श्री. कैलास कदम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.   या वेळी बोलताना श्री. भरतभाऊ शहा (नगराध्यक्ष) संस्थेला दैनंदिन कामकाजात पाणी, वीज, रस्ते किंवा स्वच्छता यांबाबत कोणत्याही अडचणी येत असतील, तर नगर परिषद सदैव सहकार्यासाठी तत्पर राहील," असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.श्री...

थकीत ऊस बिले आणि कामगारांच्या वेतनासाठी 'रयत क्रांती संघटना' आक्रमक; २० एप्रिलला आंदोलनाचा इशारा

इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सह.साखर कारखाना म.फुलेनगर  सहयोग-ओंकार शुगर लिमिटेड (युनिट नं. ११, बिजवडी) या कारखान्याकडे शेतकऱ्यांची ऊस बिले, वाहतूक कंत्राटदारांचे पैसे आणि कामगारांचे अनेक महिन्यांचे वेतन थकीत असल्याने रयत क्रांती संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे जनरल मॅनेजर तावरे साहेब यांना निवेदन देण्यात आले असून, मागण्या मान्य न झाल्यास २० एप्रिल २०२६ रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.  १ जानेवारी २०२६ पासून कारखान्याला गाळपासाठी दिलेल्या उसाचे बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही. नियमानुसार ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांच्या आत पेमेंट मिळणे बंधनकारक असताना कारखान्याने अद्याप ही रक्कम अदा केलेली नाही.            गळीत हंगाम २०२५-२६ मधील ऊस तोडणी आणि वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांची (शेतकऱ्यांची) बिले देखील थकीत आहेत. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे गेल्या अनेक महिन्यांचे पगार रखडलेले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आह...

उजणीच्या कुशीत वाळूमाफियांचा ‘रात्रंदिवस’ नंगानाच; प्रशासकीय मेहेरबानी की राजकीय वरदहस्त?

इंदापूर: पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची भाग्यरेखा समजले जाणारे उजणी धरण सध्या पाणीसाठ्यापेक्षा 'वाळू उपशाच्या' महाभयंकर विळख्यामुळे चर्चेत आले आहे. नियमांची पायमल्ली, पर्यावरणाचा ऱ्हास आणि कोट्यवधी रुपयांची अनधिकृत उलाढाल या त्रिसूत्रीवर इंदापूर तालुक्यात वाळूचा काळा बाजार जोमात सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या काळोखात सुरू असणारा हा बेकायदेशीर उपसा रोखण्यात महसूल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून, हे दुर्लक्ष 'जाणीवपूर्वक आणि अर्थपूर्ण' असल्याचा खळबळजनक आरोप आता नागरिक उघडपणे करू लागले आहेत. बोटींचे जाळे आणि हायटेक तस्करी  उजणीच्या विस्तीर्ण जलाशयात अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सज्ज असलेल्या शेकडो बोटी बेकायदेशीरपणे वाळू उपसा करत आहेत. या बोटी नक्की कुणाच्या? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असला, तरी त्याचे उत्तर 'राजकीय आडोशात' दडलेले आहे. इंदापूर तालुक्यातील काही बड्या राजकीय धेंडांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या मालकीच्या या बोटी असल्याचे बोलले जाते. 'आदर्श व्यक्तिमत्त्व' म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांच्या वरदहस्...