मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मालोजीराजे भोसले आयटीआय इंदापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

इंदापूर येथील मालोजीराजे भोसले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI)** आज, १३ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून महामानवास अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्राचार्य श्री. दिनेश पानसरे यांनी भूषवले. याप्रसंगी इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. मा.भरतभाऊ शहा, उपनगराध्यक्ष श्री. बाळासाहेब ढवळे शाहू फुले आंबेडकर विकास प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. संदिपान कडवळे,आरपीआय पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. शिवाजीराव मखरे, आरपीआय पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजाभाऊ घाडगे,नगरपरिषदेचे गटनेते.शकिलभाई सय्यद माजी गटनेते श्री. कैलास कदम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.   या वेळी बोलताना श्री. भरतभाऊ शहा (नगराध्यक्ष) संस्थेला दैनंदिन कामकाजात पाणी, वीज, रस्ते किंवा स्वच्छता यांबाबत कोणत्याही अडचणी येत असतील, तर नगर परिषद सदैव सहकार्यासाठी तत्पर राहील," असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.श्री...

थकीत ऊस बिले आणि कामगारांच्या वेतनासाठी 'रयत क्रांती संघटना' आक्रमक; २० एप्रिलला आंदोलनाचा इशारा

इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सह.साखर कारखाना म.फुलेनगर  सहयोग-ओंकार शुगर लिमिटेड (युनिट नं. ११, बिजवडी) या कारखान्याकडे शेतकऱ्यांची ऊस बिले, वाहतूक कंत्राटदारांचे पैसे आणि कामगारांचे अनेक महिन्यांचे वेतन थकीत असल्याने रयत क्रांती संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे जनरल मॅनेजर तावरे साहेब यांना निवेदन देण्यात आले असून, मागण्या मान्य न झाल्यास २० एप्रिल २०२६ रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.  १ जानेवारी २०२६ पासून कारखान्याला गाळपासाठी दिलेल्या उसाचे बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही. नियमानुसार ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांच्या आत पेमेंट मिळणे बंधनकारक असताना कारखान्याने अद्याप ही रक्कम अदा केलेली नाही.            गळीत हंगाम २०२५-२६ मधील ऊस तोडणी आणि वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांची (शेतकऱ्यांची) बिले देखील थकीत आहेत. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे गेल्या अनेक महिन्यांचे पगार रखडलेले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आह...

उजणीच्या कुशीत वाळूमाफियांचा ‘रात्रंदिवस’ नंगानाच; प्रशासकीय मेहेरबानी की राजकीय वरदहस्त?

इंदापूर: पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची भाग्यरेखा समजले जाणारे उजणी धरण सध्या पाणीसाठ्यापेक्षा 'वाळू उपशाच्या' महाभयंकर विळख्यामुळे चर्चेत आले आहे. नियमांची पायमल्ली, पर्यावरणाचा ऱ्हास आणि कोट्यवधी रुपयांची अनधिकृत उलाढाल या त्रिसूत्रीवर इंदापूर तालुक्यात वाळूचा काळा बाजार जोमात सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या काळोखात सुरू असणारा हा बेकायदेशीर उपसा रोखण्यात महसूल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून, हे दुर्लक्ष 'जाणीवपूर्वक आणि अर्थपूर्ण' असल्याचा खळबळजनक आरोप आता नागरिक उघडपणे करू लागले आहेत. बोटींचे जाळे आणि हायटेक तस्करी  उजणीच्या विस्तीर्ण जलाशयात अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सज्ज असलेल्या शेकडो बोटी बेकायदेशीरपणे वाळू उपसा करत आहेत. या बोटी नक्की कुणाच्या? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असला, तरी त्याचे उत्तर 'राजकीय आडोशात' दडलेले आहे. इंदापूर तालुक्यातील काही बड्या राजकीय धेंडांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या मालकीच्या या बोटी असल्याचे बोलले जाते. 'आदर्श व्यक्तिमत्त्व' म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांच्या वरदहस्...

इंदापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होणार

इंदापूर: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन संचलित मालोजीराजे भोसले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), इंदापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री ना. मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यासाठी श्रीमती रुपाली कृष्णा पाटील (शिल्प निर्देशिका - यांत्रिक मोटार गाडी) या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार असून त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रकाश टाकणार आहेत. या कार्यक्रमाला इंदापूरमधील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत: मा. श्री. भरत भाऊ शहा (नगरअध्यक्ष, इंदापूर नगरपरिषद) मा. श्री. बाळासाहेब ढवळे (उपनगरअध्यक्ष, इंदापूर नगरपरिषद) मा. श्री. कैलास कदम (माजी गटनेते, इंदापूर नगरपरिषद) मा. श्री. शिवाजीराव मखरे(कार्याध्यक्ष, आर.पी.आय. पुणे जिल्हा)मा. श्री. संदिपान कडवळे (संस्थापक, शाहू फुले आंबेडकर विकास प्रतिष्ठान) हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित करण्यात आला आहे. ...

किरण बाबा गायकवाड यांच्या पुढाकारातून भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर; संयुक्त जयंती उत्साहात साजरी

अकलूज (प्रतिनिधी):  माळशिरस तालुक्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून, किरण बाबा गायकवाड (बाबा ग्रुप) यांच्या वतीने भव्य रक्तदान आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माळशिरस तालुक्याचे आमदार मा. रामभाऊ सातपुते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा समाजोपयोगी उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला. १३७ जणांचे रक्तदान, ७३२ नागरिकांची आरोग्य तपासणी   या शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक बांधिलकी जपत १३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच, सेवासदन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिरात ७३२ नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना तपासणीअंती मोफत सल्ला व उपचार प्रदान केले श्री. सुजयसिंह माने-पाटील (अकलूज मंडळ अध्यक्ष) श्री. महादेवराव कावळे (अकलूज शहराध्यक्ष) श्री. महेशभाऊ शिंदे (नगरसेवक) श्री. राहुलभैय्या लोंढे (नगरसेवक तथा गटनेते) श्री. किसनराव शिंदे (ओबीसी सेल शहराध्यक्ष) सौ. ज...

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन; इंदापूरचे नगराध्यक्ष मा.भरतभाऊ शहा यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली

इंदापूर: भारतीय संगीत क्षेत्रातील एक अढळ तारा आणि कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून, संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. भरतभाऊ शहा यांनी आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.          श्रद्धांजली वाहताना भरतभाऊ शहा म्हणाले की आशाताईंचे जाणे हे केवळ संगीत क्षेत्राचेच नव्हे, तर प्रत्येक भारतीयाचे वैयक्तिक नुकसान आहे. त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने अनेक पिढ्यांना आनंद दिला. त्यांच्या गायकीतील वैविध्य आणि ऊर्जा नेहमीच प्रेरणादायी राहील. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. आशा भोसले यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नव्हे, तर विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीतातील 'आशा' नावाचा एक सुवर्णकाळ संपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे....

सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही

मुंबई प्रतिनिधी:(सतिश पाटील ) सर्वोच्च न्यायालयचा ऐतिहासिक निर्णय  सर्वोच्च न्यायालयाने कलम ६६(A) अंतर्गत सोशल मीडिया पोस्टवर होणारी कारवाई बेकायदेशीर ठरवली असली तरी, देशाचे ऐक्य, सुरक्षा किंवा जातीय सलोखा बिघडवणारी पोस्ट केल्यास कारवाई होऊ शकते. आक्षेपार्ह मजकुरासाठी आयटी कायदा आणि IPC अंतर्गत गुन्हे दाखल होऊ शकतात, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कडक नियमावली लागू आहे.  महत्त्वाचे मुद्दे: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: कलम ६६(A) रद्द केल्यामुळे पोलिसांना पोस्टवरून थेट कारवाई करता येत नाही, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग मानले जाते. कायदेशीर मर्यादा: जर पोस्टमुळे दंगल, हिंसाचार किंवा देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असेल, तर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. सरकारी कर्मचारी: सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास किंवा शिस्तभंग केल्यास नोकरीवर कारवाई होऊ शकते. गोपनीयता (Privacy): कोणाच्या संमतीशिवाय त्यांची चित्रे किंवा व्हिडिओ टाकणे हा गुन्हा आहे. बदलाव: केंद्र सरकार सोशल मीडियावरील मजकूर ब्लॉक करण्याचे नियम कडक करत आहे.  टीप: सोशल मीडिया...