मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

मानवी शरीर अनमोल असल्याने सर्वांनी वाहतूक नियमांचे स्वयम शिस्तीने पालन करावे - प्रकाश खटावकर. इंदापूर,  वाहन चालवताना चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे तसेच मोबाईलवर संभाषण करणे धोकादायक आहे. त्यामुळे अपघातात काही जणांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करून आपणा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचेपालन करण्यास सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन  बारामती उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर यांनी केले.    बारामती उपप्रादेशिक परिवहन विभाग, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या  पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठीपत्रकार संघ तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने आयोजित ३२ व्या रस्तासुरक्षाअभियान कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा होते.  यावेळी उद्योजक केशव बोराटे, संजय भोंग, पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख काकासाहेब मांढरे, तालुका सचिव धनंजय कळमकर, शहराध्यक्ष सुरेश जकाते, दीपक खिलारे, कै...

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

इंदापुरचे पोलिस रक्षक कि भक्षक... उचलून घेऊन जाईन अशी महिलेला धमकी देणा-या पोलीसांना निलंबित करा-अॅड राहुल मखरे इंदापूर :पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक  व त्यांचे काही सहकारी पोलिस कर्मचारी यांनी गेल्या वर्षात इंदापूर शहर व परिसरात धुमाकुळ घातला आहे. याचे अनेक व्हिडिओ व कागदोपत्री पुरावे वारंवार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाठवून सुद्धा या गुन्हेगारी वृत्तीच्या पोलिसांच्यावर कारवाई होत नाही आसे मत निवेदनात राहुल मखरे यांनी व्यक्त केले आहे ,ते पुढे म्हणाले की,. दि. १९/१/२०२१ रोजी दुपारी ३ चे दरम्यान पोलिस वसीम नजीर शेख यांचे घरी त्यांची पत्नी व ७ वर्षाचा मुलगा अरहन घरात असताना घरी गेले. त्यौपकी मांडगे नावाच्या पोलिसाने एकट्याने घरात प्रवेश करुन आतुन दरवाजाची कडी लावली व तुझा नवरा कुठे आहे. व गुटख्याचा माल कुठे लपविला आहे हे सांग नाहीतर तुला उचलून घेऊन जाईन अशी धमकी दिली. आतुन कडी लावल्याने वसीम शेख च्या पत्नीने आरडा ओरडा सुरु केल्याने ते नंतर तेथुन निघून गेले. या संदर्भातील तक्रार देण्यासाठी अनेक महिला व कार्यकर्ते साधरपणे ४.३० पासून ते रात्री ८.३० वाजेपर्यंत पोलिस स्टेशनम...

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

हर्षवर्धन पाटील यांची साखर उद्योगा संदर्भात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचेशी चर्चा  इंदापूर !! (विलासराव गाढवे, धनंजय कळमकर)     राज्यातील साखर उद्योगा संदर्भात माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार,अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुणे येथे रविवारी (दि.17) चर्चा केली व केंद्र सरकारने विविध उपाययोजना जाहीर कराव्यात अशी मागणी केली. साखर उद्योगातील अडचणी संदर्भात दिल्लीत लवकरच बैठक घेतली जाईल, केंद्र सरकार साखर उद्योगाला सहकार्य करणेसंदर्भात  सकारात्मक असल्याचे यावेळी रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.                  साखर उद्योगासाठी इथेनॉलचे  धोरण जाहीर केलेबद्दल तसेच 60 लाख मे.टन साखर निर्यातीस अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारचे व रावसाहेब दानवे यांचे अभिनंदन केले. केंद्र सरकारने साखर विक्रीची किंमत किमान रू. 3400 करावी, अशी विनंती हर्षवर्धन पाटील यांनी केली. तसेच एनसीडीसी व एसडीएफकडील ...

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

  महिलांनी काळ ओळखून स्वावलंबी होणे  भविष्याच्या दृष्टीने खुप गरचेचे- अंकिता पाटील  इंदापूर तालुक्यातील कांदलगांव ग्रामपंचायत ने जिजाऊ जयंती व सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने विविध स्पर्धा राबवून महिला व युवतींच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातील काळ हा महिलांचा काळ असून महिलांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडणे गरजेचे आहे.महिलांनी काळ ओळखून स्वावलंबी होणे  भविष्याच्या दृष्टीने खुप गरचेचे आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी कांदलगांव येथील कार्यक्रम प्रसंगी केले.     कांदलगांव ग्रामपंचायत आयोजित हळदी कुंकू व बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी त्या विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा पाटील,पद्मजा पाटील,पोलीस पाटील शैलजा पाटील,कांदलगांव ग्रामपंचायत सदस्य रेखा बाबर, तेजमाला बाबर,कमल राखुंडे, कोंडाबाई जाधव,सुवर्णा तुपे,माजी उपसरपंच उज्वला पाटील,अनिता पाटील,ग्रामसेवक स्वाती चव्हाण यांसह गावातील अनेक महिला उपस्थित होत्या.     अं...

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

नीरा भीमा कारखान्याचे एका दिवसात उच्चांकी 5011 मे.टन गाळप-लालासाहेब पवार इंदापूर: शहाजीनगर(ता.इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु गळीत हंगामामध्ये सोमवारी (दि.18 ) एका दिवसामध्ये उच्चांकी 5011 मे.टन ऊसाचे गाळप केले, अशी माहीती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी आज (मंगळवारी) दिली.              नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालु  गळीत हंगामात कारखान्याने 6.50 ते 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आज अखेर कारखान्याने 4 लाख 5500 मे.टन ऊसाचे गाळप पुर्ण केले आहे. सध्या दररोज सुमारे 4700 ते 4800 मे. टन क्षमतेने गाळप केले जात आहे, अशी माहिती अध्यक्ष पवार यांनी दिली.            कारखाने आजअखेर 1 कोटी 98 लाख 32737 युनिट विजेची विक्री केली आहे. तर अल्कोहोलचे 42 लाख 40725 ली. आणि इथेनॉलचे 31 लाख 86607 ली. उत्पादन घेतले आहे. ऊस पिकासाठी कारखान्याचे ' कृषीरत्न ' हे सेंद्रिय खत विक्रीसाठी उपलब्ध असून, त्...

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

इंदापुर तालुक्यात भाजपकडे 38 ग्रामपंचायती - हर्षवर्धन पाटील                   इंदापूरः तालुक्यात 38 ग्रामपंचायतींवर भाजपची निर्विवादपणे सत्ता आली आहे, तर 4 ग्रामपंचायती संमिश्र आहेत. भिगवण, वालचंदनगर आदी प्रमुख ग्रामपंचायतींवर भाजपने एकतर्फी सत्ता  मिळवली आहे. या निवडणूक निकालातून इंदापूर तालुक्यावरील भाजपचे वर्चस्व निर्विवादपणे  सिद्ध झाले आहे,अशी माहिती भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निकालानंतर बोलताना सॊमवारी दिली.              इंदापूर तालुक्यातील जनता भाजपच्या  पाठीमागे असल्याचे मतदारांनी दाखवून दिले आहे. इंदापूरच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात  जनतेने मतपेटीतून दिलेला हा स्पष्ट कौल असल्याचे प्रतिपादनही भाजप नेते पाटील यांनी केले.               या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायती भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. भाजपच्या ताब्यात तालुक्यातील सुमारे 70 टक्के ग्रामपंचायती आल्या आहेत. इंदापूर कृषी उत्पन्न ...

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

बाभुळगाव ग्रामपंचायतवर इंगळे यांचा जय हनुमान पॅनल विजयी ९ -० ने केला विरुद्ध गटाचा धुराळा  इंदापुर : दि . १८जानेवारी अतीतटीच्या वाटणार्‍या बाभुळगाव ग्रामपंचायत निवडणूकी मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील जय हनुमान ग्राम विकास पॅनल च्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवत ९-० या फरकाने जय भवानी ग्रामविकास पॅनलचा धुव्वा उडवला. वार्ड क्रमांक एक मधून अनिल दशरथ चव्हाण,शैला सोमनाथ जावळे, माजी सरपंच भारत यादव यांच्या भाऊजय छाया तानाजी यादव यांनी विजय मिळवून जय हनुमान ग्राम विकास पॅनल चे खाते उघडून दिले.दुसऱ्या फेरीत वार्ड क्रमांक दोन या माजी सरपंच संजय देवकर यांच्या हक्काच्या वार्डात घुसखोरी करत अमोल इंगळे यांच्या भाऊजय सौ संगीता राजाराम इंगळे यांनी दणदणीत विजय मिळवत सोबतीला नागनाथ गुरगुडे व दिनेश वाईकर यांच्यासह विजयश्री खेचून आणला.तिसऱ्या फेरीत वार्ड क्रमांक ३ मधून दादासाहेब भोसले,  रेश्मा गुरगुडे, शीतल खिल्लारे यांनी विजय खेचून आणत जय भवानी ग्रामविकास पॅनल चा धुव्वा उडवत विजय खेचून आणला.यावेळी बोलताना युवा नेते अमोल इंगळे म्हणाले की माजी मंत्री हर्ष...