मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

मानवी शरीर अनमोल असल्याने सर्वांनी वाहतूक नियमांचे स्वयम शिस्तीने पालन करावे - प्रकाश खटावकर.

इंदापूर, 

वाहन चालवताना चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे तसेच मोबाईलवर संभाषण करणे धोकादायक आहे. त्यामुळे अपघातात काही जणांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करून आपणा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचेपालन करण्यास सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन  बारामती उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर यांनी केले.

  

बारामती उपप्रादेशिक परिवहन विभाग, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या  पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठीपत्रकार संघ तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने आयोजित ३२ व्या रस्तासुरक्षाअभियान कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा होते.  यावेळी उद्योजक केशव बोराटे, संजय भोंग, पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख काकासाहेब मांढरे, तालुका सचिव धनंजय कळमकर, शहराध्यक्ष सुरेश जकाते, दीपक खिलारे, कैलास पवार ,तात्या पवार, किरण राऊत, कृष्णकुंज खटावकर उपस्थित होते. यावेळी सुरक्षितता नियमावलीची प्रसिद्धी पत्रके वाटण्यात आली. 


प्रकाश खटावकर पुढे म्हणाले, रस्त्यावर होणारे अपघात प्रामुख्याने वाहनास ओव्हरटेक करताना,  दारू पिवून वाहन चालविल्याने तसेच रस्त्यात उभी असलेली नादुरुस्त वाहने न दिसल्याने होतात. त्यामुळे सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन स्वयंशिस्तीने करणे गरजेचे आहे.  

पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.संदेश शहा म्हणाले, मानवी शरीर हे अनमोल असून कोणतेही मानवी अवयव बाजारात विकत मिळत नाहीत. त्यामुळे अपघात होवू नये तसेच अपंगत्व येऊ नये म्हणून सर्वांनी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे.

यावेळी प्रकाश खटावकर व  जिल्हा अध्यक्ष संदेश शहा म्हणाले की बालाजी कला क्रिडा व शैक्षणिक संस्था बिजवडी अध्यक्ष विलासराव गाढवे व शिवसृष्टी कला क्रिडा व शैक्षणिक संस्था हिंगणगाव अध्यक्ष धनंजय कळमकर यांनी शेकडो हायस्कूल व काॅलेज वर आरटीओ नियमांचे पोस्टर्स लावून नेहमीच जनजागृती करत आहेत, व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतरांनी ही हे काम हाथी घ्यावे व अपघात टाळण्यासाठी सहकार्य करावे आसे आवाहन प्रकाश खटावकर व संदेश शहा यांनी व्यक्त केले,  

यावेळी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सुरज पाटील यांनी वाहतुकीचे नियम, कागदपत्रे तर ओरीयंट इन्शुरन्स कंपनीचे तालुकाप्रमुख

प्रकाश एकविरे यांनी अपघाती विम्याचेमहत्व

विशद केले. प्रास्ताविक व सूत्रसंचलनतैय्यब शेख तर आभार प्रदर्शन पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य दिलावर तांबोळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विष्णुपंत बागल, दत्ता बुनगे, संजय राऊत यांनी प्रयत्न केले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...