मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

मानवी शरीर अनमोल असल्याने सर्वांनी वाहतूक नियमांचे स्वयम शिस्तीने पालन करावे - प्रकाश खटावकर.

इंदापूर, 

वाहन चालवताना चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे तसेच मोबाईलवर संभाषण करणे धोकादायक आहे. त्यामुळे अपघातात काही जणांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करून आपणा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचेपालन करण्यास सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन  बारामती उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर यांनी केले.

  

बारामती उपप्रादेशिक परिवहन विभाग, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या  पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठीपत्रकार संघ तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने आयोजित ३२ व्या रस्तासुरक्षाअभियान कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा होते.  यावेळी उद्योजक केशव बोराटे, संजय भोंग, पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख काकासाहेब मांढरे, तालुका सचिव धनंजय कळमकर, शहराध्यक्ष सुरेश जकाते, दीपक खिलारे, कैलास पवार ,तात्या पवार, किरण राऊत, कृष्णकुंज खटावकर उपस्थित होते. यावेळी सुरक्षितता नियमावलीची प्रसिद्धी पत्रके वाटण्यात आली. 


प्रकाश खटावकर पुढे म्हणाले, रस्त्यावर होणारे अपघात प्रामुख्याने वाहनास ओव्हरटेक करताना,  दारू पिवून वाहन चालविल्याने तसेच रस्त्यात उभी असलेली नादुरुस्त वाहने न दिसल्याने होतात. त्यामुळे सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन स्वयंशिस्तीने करणे गरजेचे आहे.  

पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.संदेश शहा म्हणाले, मानवी शरीर हे अनमोल असून कोणतेही मानवी अवयव बाजारात विकत मिळत नाहीत. त्यामुळे अपघात होवू नये तसेच अपंगत्व येऊ नये म्हणून सर्वांनी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे.

यावेळी प्रकाश खटावकर व  जिल्हा अध्यक्ष संदेश शहा म्हणाले की बालाजी कला क्रिडा व शैक्षणिक संस्था बिजवडी अध्यक्ष विलासराव गाढवे व शिवसृष्टी कला क्रिडा व शैक्षणिक संस्था हिंगणगाव अध्यक्ष धनंजय कळमकर यांनी शेकडो हायस्कूल व काॅलेज वर आरटीओ नियमांचे पोस्टर्स लावून नेहमीच जनजागृती करत आहेत, व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतरांनी ही हे काम हाथी घ्यावे व अपघात टाळण्यासाठी सहकार्य करावे आसे आवाहन प्रकाश खटावकर व संदेश शहा यांनी व्यक्त केले,  

यावेळी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सुरज पाटील यांनी वाहतुकीचे नियम, कागदपत्रे तर ओरीयंट इन्शुरन्स कंपनीचे तालुकाप्रमुख

प्रकाश एकविरे यांनी अपघाती विम्याचेमहत्व

विशद केले. प्रास्ताविक व सूत्रसंचलनतैय्यब शेख तर आभार प्रदर्शन पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य दिलावर तांबोळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विष्णुपंत बागल, दत्ता बुनगे, संजय राऊत यांनी प्रयत्न केले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते