मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

इंदापूर :पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक  व त्यांचे काही सहकारी पोलिस कर्मचारी यांनी गेल्या वर्षात इंदापूर शहर व परिसरात धुमाकुळ घातला आहे. याचे अनेक व्हिडिओ व कागदोपत्री पुरावे वारंवार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाठवून सुद्धा या गुन्हेगारी वृत्तीच्या पोलिसांच्यावर कारवाई होत नाही आसे मत निवेदनात राहुल मखरे यांनी व्यक्त केले आहे ,ते पुढे म्हणाले की,. दि. १९/१/२०२१ रोजी दुपारी ३ चे दरम्यान पोलिस वसीम नजीर शेख यांचे घरी त्यांची पत्नी व ७ वर्षाचा मुलगा अरहन घरात असताना घरी गेले. त्यौपकी मांडगे नावाच्या पोलिसाने एकट्याने घरात प्रवेश करुन आतुन दरवाजाची कडी लावली व तुझा नवरा कुठे आहे. व गुटख्याचा माल कुठे लपविला आहे हे सांग नाहीतर तुला उचलून घेऊन जाईन अशी धमकी दिली. आतुन कडी लावल्याने वसीम शेख च्या पत्नीने आरडा ओरडा सुरु केल्याने ते नंतर तेथुन निघून गेले. या संदर्भातील तक्रार देण्यासाठी अनेक महिला व कार्यकर्ते साधरपणे ४.३० पासून ते रात्री ८.३० वाजेपर्यंत पोलिस स्टेशनमध्ये थांबले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक धनवे व जाधव यांनी या प्रकाराबाबतीत महिलांची माफी मागितली, परंतु महिला तक्रार देण्यावर ठाम असल्याने रात्री ८.३० वा. पोलिसांनी तक्रार घेतली. हे सर्व प्रकरण आता अंगलट येणार आहे हे लक्षात आल्यावर पीआय सारंगकर, पोलिस कर्मचारी जितेंद्र मांडगे व चव्हाण यांनी त्याच रात्री १२.३६ ला सोहेल शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

 त्या गुन्ह्याच्या एफआयआरमध्ये पोलिसांचे म्हणणे प्रमाणे सोहेल शेख व वसीम शेख पोलिसांनी हाक मारुन सुद्धा न थांबता पळून गेले असे नमुद केले आहे. हे पोलिसांचे म्हणणे धादांत खोटे आहे यासाठी आम्ही काही पुरावे देत आहोत आशी माहीती निवेदनात मा.अॅड. राहुल मखरे राष्ट्रीय महासचिव,बहुजन मुक्‍ती पार्टी यांनी दिली, ते पुढे म्हणाले की 


     १) पोलिसांचे म्हणणे प्रमाणे रेडची वेळ दुपारी असल्याने शेख मोहल्ला परिसरात पोलिसांनी हाका मारत असताना, वसीम शेख पळून जात असताना अनेक लोकांनी पाहिले असेल. पण वास्तविक पाहता अशी घटना घडलीच नसल्याने शेख मोहला व आसपासच्या परिसरात हि घटना पाहणारा एकही व्यक्ति मिळून येणार नाही.

२) याही पेक्षा महत्त्वाचा व काऊंटर पुरावा म्हणजे वसीम शेख व मी सकाळी ११.३० पासून रात्री ८.३० पर्यंत बरोबर होतो. सकाळी ११.३०ते १२.०० च्या सुमारास बामसेफ चे राष्ट्रीय महासचिव कुमार काळे साहेब यांचे बरोबर निमगांव केतकी येथील बहुजन मुक्ती पार्टीच्या निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे बोलेरो गाडीत निमगांव केतकी येथे गेलो . सत्काराच्या कार्यक्रमास साधारपणे १५० ते २०० लोक उपस्थित होते, व त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते म्हणुन वसीम शेख याचाही सत्कार करण्यात आला, त्यावेळीचे फोटो व व्हिडिओ शुर्टींग निमगांव केतकी येथील स्थानिक कार्यकर्त्यांच्याकडे उपलब्ध आहे. २.१५ चे सुमारास आम्ही निमगांव वरुन निघुन दुपारी २.३७ चे सुमारास मी वसीम शेख व इतर कार्यकर्त्यांसह घरी आलो. दुपारी ३ च्या सुमारास पत्रकार देवा राखुंडे व राहुल ढवळे हे माझ्या घरी आले. त्यांनी पुनम कडवळे या पुणे जिल्ह्यातून ग्रामपंचायत  निवडणूकीत निवडून आलेल्या सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्याची मुलाखत माझ्या घरीच घेतली. त्याठिकाणी पत्रकारांच्या समोर वसीम शेख उपस्थित आहे. दि १९/१/२०२१ रोजी माझी अकलूज येथील डॉ. इनामदार यांच्याकडे अपॉयमेंट असल्याने मी, वसीम शेख व नानासाहेब घव्हाण यांना घेऊन दुपारी ४ च्या दरम्यान अकलूजला गेलो. अकलूजला निघतानाच वसीम शेख याने मला घरुन , पत्नीचा फोन आला होता. व पोलिसांनी जी असभ्य वर्तणुक केली त्याची माहिती दिली होती. व मला घरी जावे लागेल असे सांगितले परंतु पोलिस तुला खोट्या गुन्ह्यात आडकवतील, तू माझ्या बरोबर अकलूजला चल असे सांगितल्याने तो माझ्यावरोबर अकलूजला आला. अकलूज येथे मी, वसीम शेख व नानासाहेब चव्हाण सांयकाळी ६.३० च्या सुमारास इंदापूर पोलिस स्टेशमध्ये आलो. सकाळी ११.३० पासून वसीम शेख रात्री ८.३० पर्यंत माझ्याबरोबर होता. त्याबाबत निमगांव केतकी येशील कार्यकर्त्यांनी दुपारी १२,३०ते २.१५ पर्यंत काढलेले फोटो व व्हिडिओ दुपारी २.३० ते ४ च्या दरम्यान माझ्या घरचे सिसिटीव्ही फुटेज व त्यामध्ये मी, वसीम शैख, पत्रकार देवा राखुंडे व राहुल ढवळे, सुरज धाईजे, किशोर धाईंजे, नानासाहेब चव्हाण, पुनम कडवळे, संतोष ' कडवळे व अन्य लोक आहोत. त्याचे सिसिटिव्ही फुटेज आपणाकडे देत आहे. या सर्व गोष्टीवरुन हे सिद्ध होत आहे की, पीआय सारंगकर, पोलिस कर्मचारी अमित चव्हाण व मांडगे हे विकृत मनोवृत्तीने काम करीत आहेत. या मांडगे या पोलिस कर्मचाऱ्याने जे कृत्य केले त्यावर पडदा टाकण्यासाठी फिर्यादीमध्ये बनावट मजकूर टाकण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सारंगकर, पोलिस कर्मचारी चव्हाण व मांडगे यांनी त्याच्याकडील व्हिडिओ शुटींग कोर्टात दाखल करावे किंवा सार्वजनिक करावे. असे आवाहन आम्ही करीत आहोत. दि. २३/१/२०२१ पासून इंदापूर पोलिस स्टेशन समोर पिडीत महिलांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु होत आहे. पीआय सारंगकर व त्यांच्या पिटटू विषयी अनेक तक्रारी देऊन सुद्धा काहीच कारवाई होत नसल्याने शहर व परिसरातील नागरिकांच्यामध्ये असंतोष वाढत चालला आहे. या पीआयला वाचविण्यामध्ये राज्यमंत्री भरणे, पोलिस अधिक्षक, अभिनव देशमुख व अप्पर पोलिस अधिक्षक मोहिते यांचा हात असल्याने जर भविष्यात कायदा व सुव्यवस्था यांची काही परस्थिती निर्माण झाली तर या तीन लोकांना जबाबदार धरण्यात यावे. अशी मागणी गृहमंत्री व पोलिस महासंचालक यांच्याकडे करीत आहोत. पीआय सारंगकर व इतर कर्मचारी यांच्या वरगुन्हे दाखल करण्यात यावेत म्हणुन दि. १९/१/२०२१ रोजी गणपत बाबर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचाही या पीआयवर कारवाईसाठी उपयोग करावा ' ही मागणी  अॅड. राहुल मखरे राष्ट्रीय महासचिव, बहुजन  मुक्‍ती पार्टी यांनी केली आहे, 

===============================आम्ही इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली होती त्या साठी  यांच्याशी भ्रमणदूरध्वनीसंचाच्या वतीने  संपर्क साधला असता त्यांनी आमचा भ्रमणदूरध्वनी घेतला नाही, 

============================

एकिकडे महीला सबलीकरण झाले पाहिजे म्हणून शासणाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत पण महीला इंदापूर तालुक्यात तरी सुरक्षित नाहीत याचे उदाहरण म्हणजे च वरिल घडलेली घटना. यावर महीला आयोग काय पवित्रा घेणार का मुग गिळून गप्प बसून मजाच बघणार आहेत.....


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...