मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

 इंदापूर तालुक्यातील कांदलगांव ग्रामपंचायत ने जिजाऊ जयंती व सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने विविध स्पर्धा राबवून महिला व युवतींच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातील काळ हा महिलांचा काळ असून महिलांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडणे गरजेचे आहे.महिलांनी काळ ओळखून स्वावलंबी होणे  भविष्याच्या दृष्टीने खुप गरचेचे आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी कांदलगांव येथील कार्यक्रम प्रसंगी केले. 
   कांदलगांव ग्रामपंचायत आयोजित हळदी कुंकू व बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी त्या विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा पाटील,पद्मजा पाटील,पोलीस पाटील शैलजा पाटील,कांदलगांव ग्रामपंचायत सदस्य रेखा बाबर, तेजमाला बाबर,कमल राखुंडे, कोंडाबाई जाधव,सुवर्णा तुपे,माजी उपसरपंच उज्वला पाटील,अनिता पाटील,ग्रामसेवक स्वाती चव्हाण यांसह गावातील अनेक महिला उपस्थित होत्या. 
   अंकिता पाटील म्हणाल्या की,' कांदलगांव ग्रामपंचायतने जीजाऊ जयंती व सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित करुन महिला व युवतींच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे.महिलांसाठी "वाचन कट्टा" हा उपक्रम देखील सुरु केला आहे.यासाठी निश्चित लवकरचं वाचनीय अशी पुस्तके कांदलगांव ग्रामपंचायतीस उपलब्ध करुन दिली 
जातील.
महिलांच्या भविष्याचा विचार करुन उभारण्यात आलेले हे ग्रंथालय असून भविष्यातील काळ हा आधुनिक काळ आहे. ग्रामसेविका व माजी जिल्हा परिषद सदस्या रुतुजा पाटील या सातत्त्याने महिलांसाठी नवनवीन उपक्रम राबवत असतात.मात्र महिलांनी काळ ओळखून याचा फायदा महिला वर्गांनी करुन घेणे भविष्याच्या दृष्टीने खुप गरचेचे आहे.
    महिला केवळ आता चुल आणि मूल इथपर्यंत अकडून राहिलेल्या नाहीत तर त्या आता बाहेर पडायला लागल्या आहेत.भविष्यात महिलांच्या दोन हाताला काम उपलब्ध करुन देण्यासाठी माझे पुढील काळात प्रयत्न असणार आहेत.मात्र त्यासाठी तुमची साथ असणं फार गरजेचे आहे. तरचं महिलांबाबतील मोठे बदल झालेले पहायला मिळतील.मोबाईल च्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे खुप काही घरबसल्या शिकता येते,त्याचा वापर त्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे.आणि पुढचा काळ आपण आपल्या प्रगतीकरिता कसा घालवू यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.महिला 
सबलीकरण,सशक्तीकरण, रोजगार निर्मिती किंवा वैयक्‍तिक लाभ अशा विविध योजना जिल्हा परिषद राबवत आहे.अशा कोणत्याही कामी माझे आपल्या गावासाठी कायम सहकार्य राहिल अशी मी ग्वाही देते.
कांदलगांव ग्रामपंचायतने स्वच्छता अभियांत्रिकी अंतर्गत जे वेगवेगळे उपक्रम राबवले ते कौतुकास्पद आहेत.कोरोनाच्या काळातही आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी यांनी या गावात चांगले काम केले.'

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...