मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

 इंदापूर तालुक्यातील कांदलगांव ग्रामपंचायत ने जिजाऊ जयंती व सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने विविध स्पर्धा राबवून महिला व युवतींच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातील काळ हा महिलांचा काळ असून महिलांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडणे गरजेचे आहे.महिलांनी काळ ओळखून स्वावलंबी होणे  भविष्याच्या दृष्टीने खुप गरचेचे आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी कांदलगांव येथील कार्यक्रम प्रसंगी केले. 
   कांदलगांव ग्रामपंचायत आयोजित हळदी कुंकू व बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी त्या विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा पाटील,पद्मजा पाटील,पोलीस पाटील शैलजा पाटील,कांदलगांव ग्रामपंचायत सदस्य रेखा बाबर, तेजमाला बाबर,कमल राखुंडे, कोंडाबाई जाधव,सुवर्णा तुपे,माजी उपसरपंच उज्वला पाटील,अनिता पाटील,ग्रामसेवक स्वाती चव्हाण यांसह गावातील अनेक महिला उपस्थित होत्या. 
   अंकिता पाटील म्हणाल्या की,' कांदलगांव ग्रामपंचायतने जीजाऊ जयंती व सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित करुन महिला व युवतींच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे.महिलांसाठी "वाचन कट्टा" हा उपक्रम देखील सुरु केला आहे.यासाठी निश्चित लवकरचं वाचनीय अशी पुस्तके कांदलगांव ग्रामपंचायतीस उपलब्ध करुन दिली 
जातील.
महिलांच्या भविष्याचा विचार करुन उभारण्यात आलेले हे ग्रंथालय असून भविष्यातील काळ हा आधुनिक काळ आहे. ग्रामसेविका व माजी जिल्हा परिषद सदस्या रुतुजा पाटील या सातत्त्याने महिलांसाठी नवनवीन उपक्रम राबवत असतात.मात्र महिलांनी काळ ओळखून याचा फायदा महिला वर्गांनी करुन घेणे भविष्याच्या दृष्टीने खुप गरचेचे आहे.
    महिला केवळ आता चुल आणि मूल इथपर्यंत अकडून राहिलेल्या नाहीत तर त्या आता बाहेर पडायला लागल्या आहेत.भविष्यात महिलांच्या दोन हाताला काम उपलब्ध करुन देण्यासाठी माझे पुढील काळात प्रयत्न असणार आहेत.मात्र त्यासाठी तुमची साथ असणं फार गरजेचे आहे. तरचं महिलांबाबतील मोठे बदल झालेले पहायला मिळतील.मोबाईल च्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे खुप काही घरबसल्या शिकता येते,त्याचा वापर त्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे.आणि पुढचा काळ आपण आपल्या प्रगतीकरिता कसा घालवू यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.महिला 
सबलीकरण,सशक्तीकरण, रोजगार निर्मिती किंवा वैयक्‍तिक लाभ अशा विविध योजना जिल्हा परिषद राबवत आहे.अशा कोणत्याही कामी माझे आपल्या गावासाठी कायम सहकार्य राहिल अशी मी ग्वाही देते.
कांदलगांव ग्रामपंचायतने स्वच्छता अभियांत्रिकी अंतर्गत जे वेगवेगळे उपक्रम राबवले ते कौतुकास्पद आहेत.कोरोनाच्या काळातही आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी यांनी या गावात चांगले काम केले.'

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते