मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुन्या आठणींना उजाळा, ११ वर्षीय देवेंद्र फडणवीसांनी एकाच वेळी ३५ पुरणपोळ्या खाऊन रचला होता विश्वविक्रम

इंदापूर;- (विशेष प्रतिनिधी) : राजकीय पटलावर आपल्या चाणाक्ष आणि आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जाणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस यांचा लहानपणीचा एक अनोखा आणि रंजक इतिहास सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे. तब्बल ४४ वर्षांपूर्वी, म्हणजेच १५ जून १९८२ रोजी प्रसिद्ध दैनिक 'तरूण भारत'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांनी एका खाण्याच्या स्पर्धेत तब्बल ३५ पुरणपोळ्या आणि १ किलो तूप फस्त करून चक्क 'विश्वविक्रम' प्रस्थापित केला होता. नागपूरमधील रेशीमबाग भागात या भव्य पुरणपोळी खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नागपूरसह संपूर्ण विदर्भातील तब्बल ९२ दिग्गज स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. मात्र, अवघ्या ११ वर्षांच्या चिमुकल्या देवेंद्र यांनी आपल्या अफाट खाण्याच्या क्षमतेच्या जोरावर सर्वांना मागे टाकत या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.प्रथम क्रमांक:देवेंद्र फडणवीस (३५ पुरणपोळ्या आणि १ किलो तूप) द्वितीय क्रमांक शैलेंद्...

“सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 इंदापूर:- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतीसोबत पूरक उद्योग उभारणे ही काळाची गरज असून, ‘सोनाई परिवाराने’ दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून उभा केलेला विकासाचा आदर्श संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. इंदापूर ते बारामती पालखी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यानिमित्त नितीन गडकरी यांनी इंदापूर तालुक्यातील गोखळी येथील ‘सोनाई डेअरी’च्या मुख्य प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली.  यावेळी सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ दादा माने व प्रविणभैय्या माने यांनी त्यांचे स्वागत करून प्रकल्पाची माहिती दिली. प्रकल्प परिसराची पाहणी करताना गडकरी यांनी दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, शेतकरी सहभाग, दूध प्रक्रिया व्यवस्था आणि ग्रामीण रोजगारनिर्मिती याबाबत विशेष समाधान व्यक्त केले. दशरथ माने यांच्या नेतृत्वाखाली सोनाई परिवाराने परिसरातील हजारो शेतकरी कुटुंबांना दुग्ध व्यवसायाशी जोडून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन उत्पन्नात वाढ, महिलांना रोजगाराच्या संधी आणि ग्...

इंदापूरच्या राजकारणात 'संगीत खुर्ची'! गडकरींच्या गाडीत बसून नेत्यांची 'जय हरी विठ्ठल' वारी;

इंदापूर:"- राजकारणात 'नेते बदलतात, पण निष्ठा बदलत नाही' असं म्हणतात. पण सध्या इंदापूर तालुक्याच्या राजकारणाने जो नवा 'म्युझिकल चेअर'चा खेळ सुरू केलाय, तो पाहून बिचाऱ्या मतदारांच्या डोक्याचा पार दही झालाय! आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी इंदापूरच्या पालखी मार्गाच्या (इंदापूर-अकलूज पट्टा) पाहणी दौऱ्यावर आले होते. गडकरी आले तर रस्ते चकाचक होणार हे उघडच आहे, पण त्यांच्या गाडीत जी 'राजकीय सरमिसळ' बसली होती, ती पाहून इंदापुरातल्या जनतेने थेट कपाळावर हात मारून घेतलाय. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (सुनेत्राताई पवार गट - महायुती) चे कृषीमंत्री दत्तूमामा भरणे बसलेले. दुसऱ्या बाजूला काल-परवापर्यंत भाजपमध्ये असलेले आणि आता थेट तुतारी हाती घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे हर्षवर्धनभाऊ पाटील. तर खाली स्वागताला भाजपचे प्रदीपदादा गारटकर आणि प्रवीणभैय्या माने! बाप रे बाप! अशी खिचडी तर हॉटेलमध्येही मिळत नाही. ज्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत एकमेकांचे कपडे फाडायचे बाकी ठेवले होते, ते सगळे नेते आज नितीन गडकरींच्या 'हायव...

*पालखी महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा*

इंदापूर  तालुक्यातील काटेवाडी ते इंदापूर तालुक्यातील सराटी गावादरम्यान अनेक वर्षांपासून रखडलेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या अपूर्ण कामाबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी प्रदीप गारटकर व युवा नेते प्रविण माने यांच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील इतर अनेक भागांमध्ये श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम पूर्ण झालेले असताना, इंदापूर तालुक्यातील काटेवाडी ते सराटी हा महत्त्वाचा टप्पा अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवासी, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि वारकरी यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दरवर्षी होणाऱ्या पालखी सोहळ्यादरम्यान या मार्गावर प्रचंड गर्दी होत असते. अशा परिस्थितीत रस्त्याचे अपूर्ण काम हे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर समस्या बनले आहे. खराब आणि अपूर्ण रस्त्यामुळे वाहतूक कोंडी, धुळीचे प्रमाण, तसेच अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची बाबही निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे...

इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग तात्या शिंदे यांच्या मातोश्री सुंदराबाई शिंदे यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन

इंदापूर  नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग तात्या शिंदे आणि बळीराम शिंदे यांच्या मातोश्री **कै. सुंदराबाई हरिभाऊ शिंदे** यांचे आज, शुक्रवार दिनांक १५ मे २०२६ रोजी वयाच्या १०२ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिंदे परिवारावर शोककळा पसरली असून इंदापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शतायुषी आयुष्य लाभलेल्या सुंदराबाई शिंदे या अत्यंत प्रेमळ आणि सुसंस्कारी व्यक्तिमत्व म्हणून परिचित होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. एक आदर्श माता आणि मार्गदर्शक गमावल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज शुक्रवार, दि. १५/०५/२०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार आहेत. अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी (जुना शहा रोड, यशवंत नगर, इंदापूर) येथून मार्गस्थ होईल. शिंदे परिवाराच्या या दुःखात शिवसृष्टी न्यूज आणि इंदापूर शहर सहभागी असून, ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना. ---

इंदापुरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन,'शंभूराजांचा इतिहास प्रेरणादायी' - नगराध्यक्ष भरतभाऊ शहा

इंदापूर: स्वराज्यरक्षक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंदापूरचे नगराध्यक्ष मा. भरतभाऊ शहा यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष भरतभाऊ शहा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाराजांच्या पराक्रमाचा गौरव केला. ते म्हणाले की, "छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आणि शौर्य हे युगानुयुगे पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. त्यांचा स्वाभिमान आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा आजच्या तरुणाईने अंगीकारणे काळाची गरज आहे." या कार्यक्रमाला नगराध्यक्षांसोबत उपनगराध्यक्ष मा.बाळासाहेब ढवळे, गटनेते,शकीलभाई सय्यद,नगरसेवक प्रतिनिधी, भारत शिंदे, मा.प्रशांत उंबरे,गणेश महाजन, पोपट शिंदे,स्वप्नील राऊत, नगरसेवक शुभम पोपटराव पवार, भैय्या हरणावळ, अमोल माने यांच्यासह नगरपरिषदेचे इतर पदाधिकारी, कर्मचारी आणि शहरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी 'जय शंभूराय...

.इंदापूरमधील बहुतांश शिक्षण संस्थांनी आता स्वत:च्याच परिसरात खाजगी 'अकॅडमी' थाटल्या,

इंदापूर (प्रतिनिधी): एकेकाळी ज्ञानाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या इंदापूर तालुक्यात आता शिक्षणाचे पूर्णपणे व्यापारीकरण' झाले असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये सध्या प्रायव्हेटायझेशनचे (खाजगीकरण)पेव फुटले असून, सर्वसामान्य आणि गोरगरीब पालकांची लूट करण्याचे जणू सत्रच सुरू झाले आहे. "शाळा राहिली बाजूला, आता सगळीकडे अकॅडमीच गाजतेय," अशी संतापजनक प्रतिक्रिया तालुक्यातील पालकांमधून उमटत आहे. इंदापूरमधील बहुतांश शिक्षण संस्थांनी आता स्वत:च्याच परिसरात खाजगी 'अकॅडमी' थाटल्या आहेत. साध्या शिक्षणापेक्षा या अकॅडमीचे शुल्क अव्वाच्या सव्वा असून, हे पैसे भरताना सामान्य शेतकऱ्याचे कंबरडे मोडत आहे. केवळ नफा कमवणे हाच एकमेव उद्देश ठेवून या संस्था कार्यरत असल्याचे दिसत आहे. ज्याप्रमाणे बारामतीमध्ये शिक्षणाचे मोठे हब झाले, मात्र तिथे सर्वसामान्यांच्या मुलांपेक्षा श्रीमंतांच्या पोरांचेच चोचले जास्त पुरवले जातात, तशीच अवस्था आता इंदापूरची होताना दिसत आहे. मोठ्या इमारती आणि जाहिरातींच्या झगमगाटात गुणवत्ते'पेक्षा 'बिलाला' जास्त महत्त्...