मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

इंदापूरात परशुराम जयंती साजरी

इंदापूर :- ( सुरेश जकाते यांचे कडून)ब्राम्हण सेवा संघाच्या वतीने परशुराम जयंती उत्साहात संपन्न झाली या निमित्त भगवान परशुरामाच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते मुख्यबाजार पेठेतील गोसावी विठ्ठल मंदिरातुन पालखीचा प्रारंभ झाला बाजारपेठेतुन  ही पालखी शहरातुन मिरवणुकीने पूर्ववत विठ्ठल मंदिरात आणण्यात आली. या ठिकाणी प्रभु श्रीरामा वरील नादातुन नाद र्निमीतो श्रीराम जय राम जय जय राम या गीताचे लेखक  जयंत भिडे यांचे व्याख्यान झाले त्यात त्यांनी या गीताची र्निमीतीची कथा सांगितली ब्राम्हण समाजातील युवक व युवतींनी नोकरीच्या मागे न लगता स्वतंत्र उद्योग व्यवसाय उभारून देशाची सेवा करावी असे आवाहन केले. यावेळी सुत्रसंचलन शिरीष जोशी यांनी केले यावेळी श्री व सौ अरविंद गारटकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली डॉ अमोल उन्हाळे केदार गोसावी ॲड प्रसन्न जोशी विनय देशपांडे राजेंद्र जोशी शाम महाजन मोहन गोसावी प्रशांत दुनाखे ॲड अनिरूध्द कुगांवकर प्रसन्न दुनाखे प्रसाद जोशी सौ स्नेहल जकाते सौ रसिका देशपांडे इ कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले

*बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे विजयी चौकार मारणार की सुनेत्रा पवार जॉइंट किलर ठरणार या कडे सर्वांचे लक्ष !*

इंदापूर , (डॉ.संदेश शहा यांचेकडून )   बारामती लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी चौकार मारणार की  महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार जॉइंट किलर ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोघांसह सर्व म्हणजे ३८ उमेदवारांचे भवितव्य कुलूपबंद झाले असून दिनांक ४ जून रोजी लागणाऱ्या निकालाकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.   देशाच्या राजकारणात बारामती लोकसभा मतदार संघाचा गेले सात दशकापासून राजकीय आदरयुक्त दबदबा असून ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या कर्तबगारी मुळे देशातील आदर्श मतदार संघ म्हणून हा मतदार संघ ओळखला जातो. या मतदार संघावरील शरद पवार यांचे महत्त्व कायमचे संपविण्यासाठी भाजपने या निवडणुकी पूर्वी दोन वर्ष राजकीय रणनिती तयार करून काम सुरू केले. त्यांनी साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरत पवार कुटुंबातील एकच वादा कामात दादा असलेले तसेच दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले मात्र नंतर भाजपस पाठिंबा देवून पावन...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...

वाल्हेत ६६ % मतदान

वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ  पुरंदर  तालुक्यात राजकीय चळवळीचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्हे गाव भागात लोकसभेच्या निवडणूकीसाठी एकूण ८ हजार ६५७ पैकी ५ हजार ७२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ६६ % चुरशीचे मतदान झाले. यावेळी वाल्हे गावठाण येथील केंद्र्क्रमांक ३६८ मधून ११२५ पैकी ७०१ केंद्रक्रमांक ६६९ मधून ८४० पैकी ४८५ केंद्र्क्रमांक ३७० मधून ८१७ पैकी ४४४ तर केंद्र्क्रमांक ३७१ मधून ११७७ पैकी ७०३ जणांनी मतदानाचा हक्क  बजावला ,यासह कामठवाडी येथे ९४६ पैकी ७०६ तर अंबाजीचीवाडी येथे ७२६ पैकी ५१३ ,वागदरवाडीत ६४८ पैकी ३९८ , मोरुजीचीवाडी ७१८ पैकी ५१३ आडाचीवाडी येथे ९१८  पैकी ६८८ तर  सुकलवाडी येथे ७४२ पैकी ५७५ मतदारराजांनी आपले मत इव्हिएम यंत्रात बंद केल्याने सरासरी ६६ % मतदान झाले आहे . यावेळी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे  यांच्या नेतृत्वाखाली अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

*हर्षवर्धन पाटील यांचे बावडा येथे लोकसभा निवडणुकीसाठी सहकुटुंब मतदान*

हर्षवर्धन पाटील यांचे बावडा येथे लोकसभा निवडणुकीसाठी सहकुटुंब मतदान इंदापूर :                   भाजप नेते, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देशाच्या 18 व्या लोकसभेसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये बावडा (ता. इंदापूर) येथे मंगळवारी (दि.7) सकाळी सहकुटुंब मतदान केले. यावेळी इंदापूर तालुका जिजाऊ बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे अध्यक्ष राजवर्धन पाटील या कुटुंबातील अन्य सदस्यांनीही यावेळी मतदानाचा हक्क बजावला.            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते 3 ऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत हे निश्चित आहे. तर देशात भाजप 400 प्लस चे उद्दिष्ट पूर्ण करेल अशी परिस्थिती आहे. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित आहे, असे मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन पाट...

देशात भाजपा विरोधी लाट, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना दोन दिवसात त्यांची जागा दाखवू : शरद पवार

इंदापूर, डॉ. संदेश शहा यांचेकडून. ज्या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, ते लोक तुम्हाला दमदाटी करत असतील, तर तुम्ही चिंता करू नका. हा शरद पवार कायम तुमच्या पाठीशी राहील. इंदापूर तालुक्यात कोणी सत्तेचा गैरवापर केला, तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम आम्ही दोन दिवसांत करू. मात्र देशात भाजपा विरोधी लाट आहे असे प्रतिपादन करत शरद पवार यांनी विरोधकांना सज्जड इशारा दिला.  बारामती लोकसभा मतदार संघ निवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही सभा झाली.  शरद पवार पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यात द्राक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची आमच्या पक्षाला सहकार्य करण्याची इच्छा आहे. मात्र तसे केल्यास त्यांच्या शेतीचे पाणी बंद करण्याची धमकी दिली जात आहे. शेतीचे पाणी हे काही बापजाद्याची इस्टेट नाही. कुणी नोकरी टिकणार नाही म्हणतात. दमदाटी व दहशतीने त्यांना हव्या त्या रस्त्याने लोकांना नेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत.काही जणांना शक्ती व पाठिंबा देण्याची गरज असते, तशी भूमिका आम्ही घेतल...

पुरस्कारापेक्षा मतदारांचा विश्वास महत्वाचा, सुनेत्रा पवार निश्चित विजयी होणार : अजित पवार

इंदापूर,   ( डॉ. संदेश शहा   यांचेकडून)पंतप्रधान, गृहमंत्र्यावर टीका करुन काहींना संसदरत्न मिळेल मात्र  मतदार संघाच्या विकासासाठी निधी मिळणार नाही. त्यामुळे पुरस्कारापेक्षा मतदारांचा विश्वास जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघाचा खासदार महायुतीचाच हवा. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.   बारामती लोकसभा मतदार संघ निवडणुक महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या इंदापूर नगरपरिषद प्रांगणात झालेल्या प्रचार सांगता सभेत श्री. पवार बोलत होते.     अजित पवार पुढे  म्हणाले, गेल्या दहा वर्षात भिगवण व दौंड येथील रेल्वेसंदर्भातील विविध प्रश्न मार्गी लागले नाहीत. या मतदार संघातील पाण्याचा प्रश्न सुटला नाही. आम्ही सकारात्मक दृष्टिकोना तून राजकारण करतो. नकारात्मक दृष्टीने केलेले राजकारण फार काळ टिकत नाही. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्व पूर्वीचे विरोधक एकत्र आलो. पाण्याचा प्रश्न सोडवणे, काल...