मुख्य सामग्रीवर वगळा

पुरस्कारापेक्षा मतदारांचा विश्वास महत्वाचा, सुनेत्रा पवार निश्चित विजयी होणार : अजित पवार

इंदापूर,  
(डॉ. संदेश शहा  यांचेकडून)पंतप्रधान, गृहमंत्र्यावर टीका करुन काहींना संसदरत्न मिळेल मात्र  मतदार संघाच्या विकासासाठी निधी मिळणार नाही. त्यामुळे पुरस्कारापेक्षा मतदारांचा विश्वास जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघाचा खासदार महायुतीचाच हवा. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 
 बारामती लोकसभा मतदार संघ निवडणुक महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या इंदापूर नगरपरिषद प्रांगणात झालेल्या प्रचार सांगता सभेत श्री. पवार बोलत होते. 
   अजित पवार पुढे  म्हणाले, गेल्या दहा वर्षात भिगवण व दौंड येथील रेल्वेसंदर्भातील विविध प्रश्न मार्गी लागले नाहीत. या मतदार संघातील पाण्याचा प्रश्न सुटला नाही. आम्ही सकारात्मक दृष्टिकोना तून राजकारण करतो. नकारात्मक दृष्टीने केलेले राजकारण फार काळ टिकत नाही. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्व पूर्वीचे विरोधक एकत्र आलो. पाण्याचा प्रश्न सोडवणे, कालव्यातून तालुक्या च्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचावे, बंधा-यांची कामे करावीत असे नियोजन करण्यात आले आहे. विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व आपण निधी देवूच. या खेरीज केंद्रातून ही निधी आणायचा आहे. त्यासाठी केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून जाणे लोकसभा मतदार संघातील तालुक्यांसाठी महत्वाचे आहे. विकासावर मत दिले नाही तर तुमची माझी पुढची पिढी जाब विचारल्याशिवाय रहाणार नाही. सत्तर हजार कोटी रुपयांच्या कथित गैरकारभारा बाबत बहुतेक सर्व शासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ह क्लिनचीट मिळाली होती. त्यामुळे विरोधकांनी याचे भांडवल करू नये. 
    यावेळी आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, आपले नीरा देवधर चे पाणी गेले असून हे पाणी पुन्हा न आल्यास आपल्या शेतीचे वाळवंट होईल. नीरा व भीमा नदीतील पाणी, आपले मंजूर पाच टीएमसी पाणी, उजनीच्या पाण्याचे नियोजन गरजेचे आहे. आपले पाणी आणण्याची धमक फक्त अजितदादा पवार यांच्या मध्येच आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्यासाठी सुनेत्रा अजितदादा पवार यांना बहुमताने विजयी करा. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, केंद्र व राज्यात निश्चित भाजपची सत्ता येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी निश्चित तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व विरोधक एकत्र आलो असून आम्ही तालुक्याचा विकास आराखडा तयार केला आहे. इंदापूर चे पालकत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे सुनेत्रा अजित पवार यांना विक्रमी मताधिक्या ने विजयी करून आपल्या सर्वांगीण विकासास मत द्या.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई दुधसंघाचे संचालक तथा जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती प्रविण माने, भाजप जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे आदींची भाषणे झाली.यावेळी पुसदचे आमदार इंद्रनील नाईक, मोहोळचे आ. यशवंत माने, नवनाथ पडळकर, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, राजेंद्र तांबीले, कर्मयोगी कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, लाखेवाडीच्या सरपंच व जय भवानीगड विकास प्रतिष्ठान च्या उपाध्यक्षा सौ.चित्रलेखा श्रीमंत ढोले मॅडम, समता परिषदेचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे, मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नवनाथ रुपनवर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शिवाजीराव मखरे, बाळासाहेब सरवदे वर्धमान शहा, बाळासाहेब ढवळे, विठ्ठलराव ननवरे  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस,अशोकराव मखरे सर, अशोक इजगुडे, धनंजय बाब्रस, मच्छिंद्र शेटे, अविनाश कोतमिरे, दादासाहेब  पिसे,  , राजेंद्र पवार, नाना नरुटे,, दिलीप वाघमारे, दिलीप पाटील उपस्थित होते.
सुत्रसंचलन डॉ. शशिकांत तरंगे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...