मुख्य सामग्रीवर वगळा

हिंगणगावात डाळिंब चोरीची घटना; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण,विद्युत वितरण कंपनी च्या ना - लायक पणा मुळे शेतकरी अडचणीत

इंदापूर:हिंगणगाव येथील शेतकरी देवकर यांच्या शेतातील विक्रीसाठी तयार असलेल्या डाळिंब पिकाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. सोन्यासारखे जपलेले पीक काही क्षणांत लंपास झाल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला असून परिसरातील डाळिंब उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी रात्री साधारण साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान झाली. शेतात राखण असतानाही चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत धूळफेक करत डाळिंबाचा माल लंपास केला. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शेतीसाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा वेळेवर मिळत नसल्याने रात्री शेत परिसरात अंधाराचे वातावरण असते. याच परिस्थितीचा फायदा चोरटे घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. तसेच डाळिंब पिकासाठी कोणत्याही प्रकारचे प्रभावी विमा संरक्षण उपलब्ध नसल्याने चोरी किंवा नैसर्गिक संकटांचा संपूर्ण आर्थिक भार शेतकऱ्यांवरच पडत आहे.

हिंगणगाव परिसरात सुमारे २०० एकरांहून अधिक क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करण्यात आली असून, सध्या गावात १०० टनांपेक्षा अधिक डाळिंब विक्रीसाठी तयार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत तयार झालेल्या मालाचे संरक्षण कसे करायचे, हा प्रश्न डाळिंब उत्पादकांसमोर उभा राहिला आहे.

या घटनेची सखोल चौकशी करून चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, शेतमाल चोरी रोखण्यासाठी रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, नियमित वीजपुरवठा करावा तसेच डाळिंब उत्पादकांना प्रभावी विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी हिंगणगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव तरडगाव हे गाव पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाची गावे असल्यामुळे विद्युत वितरण कंपनी याकडे अजिबात लक्ष देत नाही कायमस्वरूपी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत दररोज लाईट घालवले जाते जनतेला नाहक त्रास देणाऱ्या ना - लायक आणि भामट्या विद्युत वितरण कंपनीवर कारवाई करावी एकीकडे ऊर्जामंत्री लोड शेडिंग नाही म्हणतात आणि दुसरीकडे एमएसईबीचे अधिकारी लोड शेडिंग रात्रभर लाईट घालवतात अशी सामान्य जनतेची चर्चा आहे अंधाराचा फायदा घेत लाखो रुपयांच्या नुकसान लोकांचे होत आहे चोरांचे प्रमाण वाढले असून महावितरण वर खरी कारवाई करणे गरजेचे आहे,आशी जनतेत चर्चा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...