भोंदू महाराज चक्क 'वाळू माफियांचे' गॉडफादर,होते,वाळू चोर भोंदूबाबांची अवैध प्रकरणे मिटविण्यासाठी तत्पर, वेळ प्रसंगी जिव द्यायला तयार
इंदापूर/पुणे: पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणाच्या पट्ट्यात सध्या एक अजब आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोरगरीब जनतेला देवादिकांच्या नावाखाली गंडा घालणारे आणि स्वतःला 'महात्मा' म्हणवून घेणारे भोंदू महाराज आता चक्क 'वाळू माफियांचे' संरक्षक (गॉडफादर) बनले आहेत. अंधश्रद्धेच्या दुकानातून लाखो रुपये कमवणारे हे भामटे आता थेट उजनीच्या वाळू चोरांना अभय देत असल्याचे समोर आल्याने, सामान्य जनतेच्या डोळ्यातून संतापाच्या ज्वाला बाहेर पडत आहेत.
एकीकडे गोरगरीब भाविकांना "तुमचे ग्रह फिरले आहेत", "घरात दोष आहे" असे सांगून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लाटणाऱ्या या भोंदू बाबांचा दरारा मोठा आहे. मात्र, या भोंदू महाराजांची खरी माया उजनीच्या काळ्या सोन्यात म्हणजेच वाळूमध्ये दडलेली आहे. आम्ही वीरकर महाराज यांचे शिष्य आहोत, महाराजांना काही झाले तर पहीला वार आमच्यावर घेऊ म्हणणारे वाळू व्यवसायिक एवढे आंधळे झाले कसे,काही दिवसा पुर्वी इंदापूर तालुक्यातील काही पत्रकारांनी वीरकर महाराज अडचणीत येणार आशा बातम्या टाकल्या होत्या ,विरकर महाराजांचा पर्दाफाश करणारे धाडसी इंदापूर चे पत्रकार, यांच्या कार्याला सलाम...! पण भोंदूबाबांच्या विरोधात बातमी टाकू नका म्हणुन पत्रकारांचे पाय धरणारे वाळू चोर कुठे बसले आहेत, वाळु चोरांनी या भोंदूबाबांचे आनेक प्रकरणे मिटवली आहेत,पैशांचा माज आसणारे भामट्या वाळु चोरावर पोसिसांनी कठोर कारवाई यावी,
कसा चालतोय खेळ? रात्रीच्या वेळी उजनीच्या पात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसणारे गुन्हेगार या महाराजांच्या आश्रयाला जातात. विरकर महाराज त्यांना सुरक्षा कवच,देत होते, बाबांच्या दरबारात येणाऱ्या राजकीय मंडळींना आणि पोलिसांना हे बाबा "ते आमचेच भक्त आहेत" असे सांगून 'क्लीन चिट' देतात.
नफा-तोटा समीकरण: या बदल्यात वाळू माफियांकडून बाबांना दरमहा 'श्रद्धा' म्हणून मोठी रक्कम पोहोचवली जातहोती,, असा धक्कादायक आरोप परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
या महाभागांनी आता आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. पूर्वी फक्त लिंबू-मिरची आणि धागे-दोऱ्यांवर चालणारा त्यांचा धंदा आता थेट 'रेती'वर (वाळूवर) येऊन पोहोचला आहे. गोरगरीब नागरिक जेव्हा देवाच्या दर्शनासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी जातात, तेव्हा त्यांना उलट वाळू उपशाचे 'पुण्य' असल्याचे सांगून चक्क वाळू माफियांच्या गाड्यांना वाट मोकळी करून दिली जाते.
आम्ही देवाला घाबरून जगणारे लोक आहोत, पण हे महाराज स्वतःलाच देव समजून वाळू चोरांना पाठीशी घालत आहेत. अशा भोंदूबाबांवर आणि वाळू माफियांच्या या युतीवर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे -स्थानिक नागरिकांचे मत आहे, राजकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व समाजकारणात राजकारणात सक्रिय आंधळे भक्त यांचे शिष्य बनले होते,यांचा जनतेने काय आदर्श घ्यावा,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यारखा माणूस जादू ठोणा करून संपवला,आशी जनतेत चर्चा आहे,महसूल विभागातील अधिकारी तहसीलदार नदीपात्रात कधीच येऊ नये म्हणून हे भामटे महाराज करणीबाधी,लिंबु मिरची,कासव,इतर साहित्य वाळु चोरांना देय होते,आशी जनतेत चर्चा आहे,
एका बाजूला महसूल आणि पोलीस विभाग वाळू माफियांवर कारवाई करण्याचे नाटक करत आहे, तर दुसऱ्या बाजूला या भोंदू महाराजांच्या वरदहस्तामुळे वाळू तस्कर बिनधास्त आहेत. त्यामुळे आता जनतेचा प्रश्न एकच आहे या भोंदू बाबांची वाळू माफियांसोबतची 'भक्ती' कधी संपणार आणि प्रशासन कारवाई कधी करणार?...!
टिप्पण्या