इंदापूर तालुक्यात 'आम सभाच घेतली नाही,; जनजीवन चा काळा बाजार उजेडात येऊ नये म्हणून लोकशाहीचा सोहळा की 'गुपचूप' कारभार..?
इंदापूर:
आम सभा' म्हटलं की जनतेचे प्रश्न, अधिकाऱ्यांची पळापळ आणि लोकप्रतिनिधींचा कडकडाट... हे सगळं ऐकून-पाहून इंदापूर तालुक्यातील जनतेचे कान आणि डोळे आता पार थकलेत. कारण, तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून 'आम सभा' झालीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता इंदापूरकर विचारतायत "काय चाललंय राव..? तालुक्याच्या विकासाचा आणि जनतेच्या अडीअडचणींचा पाढा वाचण्यासाठी 'आम सभा' हे हक्काचं व्यासपीठ मानलं जातं. पण इंदापूर तालुक्यात मात्र या सभेला जणू 'अज्ञातवासा'त धाडण्यात आलं आहे. वर्ष सरली, ऋतू बदलले, अगदी नेते आणि अधिकारीही बदलले, पण बदलली नाही, तालुक्यात सध्या अशी चर्चा रंगली आहे की, आम सभा न घेण्यामागे नक्की काय गुपित आहे? लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नांची भीती वाटतेय, की प्रशासनाला उत्तरं देण्याची सोय वाटत नाहीये?रस्ते, पाणी आणि वीज,गावखेड्यातील पाण्याचे प्रश्न, रखडलेले रस्ते आणि विजेचा लपंडाव यावर बोलायचं कुणाकडे?आम सभाच होत नसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. विचारणारं कोणी नसल्याने 'आओ जावो घर तुम्हारा' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.सभा घेऊन उणिवा चव्हाट्यावर आणण्यापेक्षा, 'सभाच नको आणि वादही नको' अशी सोयीची भूमिका घेतली जातेय का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.'आम सभा' होत नसल्याने ती आता 'खास' झाली आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं नाही, तर लोकशाहीचा मुख्य उद्देशच बाजूला पडेल. आता तरी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जाग येणार का? की इंदापूरची जनता आपल्या प्रश्नांचे फलक हातात घेऊन थेट प्रशासनाच्या दारात उभी ठाकणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
टिप्पण्या