*इंदापूर*: ज्ञानाची दीपशिखा पेटवणारे, विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला घडवणारे,मूल्यांचे संस्कार रुजवणारे आदर्श शिक्षक जेव्हा अर्ध शतकाचा टप्पा गाठतात तेव्हा तो क्षण खरोखरच अभिमान आणि प्रेरणादायी ठरतो.
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील एका खेडेगावात जन्मलेले सुपुत्र हे इंदापूर येथे सन १९९४ - ९५ या शैक्षणिक वर्षात इंदापूर येथील दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या भिमाई आश्रमशाळेत शिक्षकपदी रुजू झाले. गेली ३१ वर्षापासून अध्यापनाचे कार्य अतिशय प्रामाणिकपणे करत आहे. त्याचबरोबर त्यांचा सामाजिक सलोखा देखील वाखाणण्याजोगा आहे. शिव, फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारधारेने प्रेरित होऊन शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात स्वतः ला अविरतपणे झोकून दिले आहे.
सानप सरांनी दिवंगत रत्नाकर (तात्या) मखरे, लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि संत भगवान बाबा यांना आदर्श मानून आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यास प्रारंभ केला.सामाजिक बांधिलकी जपणारे सानप सर यांनी आपल्या वर्तणुकीतून व कार्यातून जनमानसात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
स्पष्ट आणि सडेतोड स्वभावाने परिचित असणाऱ्या सानप सरांनी खांद्यावर पडलेली प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडल्यामुळे अल्पावधीतच माजी नगराध्यक्ष व संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे तात्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे तात्यांनी सरांना त्यांच्या प्रामाणिकपणाचे फळ म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून
माहे - ऑगस्ट २०१७ साली मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट या शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार माझे वडील सानप सरांना इंदापूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व ज्येष्ठ नेते भाई गोकुळशेठ शहा यांच्या हस्ते व तत्कालीन आमदार, सध्याचे महाराष्ट्राचे कृषीमंत्री नामदार श्री.दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.अनेक मान्यवर व यावेळी दिवंगत मखरे तात्या, संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थी, शिक्षक -शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शैक्षणिक बाबतील सरांचे योगदान उत्तम राहिले आहे. त्यांच्या हातून शिक्षण घेऊन गेलेले संस्थेतील विद्यार्थी पुढे वकील, डॉक्टर, इंजिनिअर, पोलिस खात्यात अधिकारी, आरटीओ, बँकेत अधिकारी, आयटी कंपनी सेवेत आहेत. तसेच काही विद्यार्थी उद्योजक तर प्रगतशील बागायतदार तसेच राजकीय क्षेत्रात देखील आघाडीवर आहेत.
सर उत्कृष्ट सूत्रसंचालक व प्रभावी वक्ते देखील आहे. सरांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून दिवंगत रत्नाकर मखरे तात्यांनी सामाजिक,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा व त्यांच्या जीवन पटाचा लेख सरांनी मखरे तात्या हयात असतानाच लिहिला. शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून ते शैक्षणिक , सामाजिक प्रगतीचा आलेख आपल्या लेखणीतून नानासाहेब सानप सरांनी लिहिला तो लेख दैनिक सकाळने प्रसिद्ध केला. तात्यांनी सरांच्या पाठीवर अनेकदा कौतुकाची थाप दिली.
तसेच संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी) यांच्यावर देखील अप्रतिम लिखाण केलं. ॲड. राहुल मखरे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व या विषयावर त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला लेख देखील वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाला. सरांनी उत्तम स्तंभलेखन देखील केले आहे .उत्तम बातमी लेखन सुद्धा करतात. त्यांनी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून त्यांच्या शाळेत घेतले जाणारे विविध शैक्षणिक उपक्रम त्याच लेखन करून ते सोशल मीडिया व वृत्तपत्रांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहे.त्यांच्या लेखणीतून शिक्षण संस्थेच्या कार्याचा नावलौकिक वाढविण्यात देखील सरांचा खारीचा वाटा राहिला आहे. हे नाकारता येणारं नाही.
आजचा दिवस हा सरांच्या अखंड परिश्रमाचा,शैक्षणिक सेवाभावाचा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या निस्वार्थी प्रेमाचा उत्सव आहे. ३१ वर्ष प्रत्यक्ष शिक्षणाच्या उन्नतीसाठी अर्पण केले आहे.
कार्यकर्तृत्ववान आदर्श शिक्षक माझे वडील श्री. सानप सरांना ५० व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा !🌹💐🎂
(दि.७/१२/२०२५)
*शब्दांकन: इंजि. रोहन सानप*
टिप्पण्या