मुख्य सामग्रीवर वगळा

निरा भिमा करखान्याचे 7 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी सहकार्य करावे -हर्षवर्धन पाटील यांचे आवाहन

इंदापूर : 
                                नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2025-26 च्या रौप्यमहोत्सव गळीत हंगामामध्ये प्रति टन रु. 3101 प्रमाणे उच्चांकी उचल ही विना कपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शुक्रवारी जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अधिकच्या ऊस दरासाठी चालू हंगामामध्ये 7 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी आवाहन कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि. 5) केले.
         शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे नीरा भीमा कारखाना कार्यस्थळावर शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमांमध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी कारखान्याच्या इतिहासामध्ये प्रथमच उच्चांकी अशी प्रति टन रु. 3101 प्रमाणे उचल जाहीर केलेबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करीत, कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांचा संचालक मंडळासह सत्कार केला. 
       आगामी काळामध्ये नीरा भीमा कारखान्याचा समावेश हा राज्यातील सर्वोत्तम असलेल्या कारखान्यांमध्ये होईल, असा ठाम विश्वासही यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखान्याचे कामकाज केले जात आहे. चालू गळीत हंगामामध्ये कारखान्याने 34 दिवसात 2 लाख मे. टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. तसेच कारखान्याचे तांत्रिक पॅरामीटर उत्कृष्ट असून, कारखान्याने मंगळवारी (दि. 2) एका दिवसात 6400 मे. टन ऊसाचे गाळप करून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. 
         कारखान्यामध्ये 4 वर्षांपूर्वी धाडसी निर्णय घेऊन झिरो मिल टाकण्यात आली, परिणामी सध्या प्रतिदिनी 3500 मे. टन गाळप क्षमता असतानाही सध्या 5600 ते 6000 मे. टन क्षमतेने व उच्च गुणवत्तेने गाळप केले जात आहे. कारखान्याला आर्थिक अडचण असतानाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून उच्चांकी रु. 3101 प्रमाणे उचल देण्याचा निर्णय घेतला आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
     यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील भाषणात म्हणाल्या, कारखाना उत्कृष्टपणे चालू असून इथेनॉल, सहवीज निर्मिती, सेंद्रिय खत प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्याबद्दल ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी वर्ग, हितचिंतक यांचे अभिनंदन केले. तसेच शेतकऱ्यांनी गुणवत्तेचा सर्व ऊस गळीतास देऊन सहकार्य करावे, त्यामुळे 7 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्टे पूर्ण होऊन आगामी काळातही चांगला ऊस दर देणे शक्य होईल, असेही सौ.भाग्यश्री पाटील यांनी भाषणामध्ये नमूद केले.
   प्रास्ताविक कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी केले. याप्रसंगी लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, ज्ञानेश्वर वाघ, विलास ताटे देशमुख, नितीन शिंदे, नंदकुमार लावंड यांनी मनोगते व्यक्त केली.
     यावेळी माजी सभापती प्रदीप पाटील, सुरेश मेहेर, दत्तू सवासे, दत्तात्रय शिर्के, विकास पाटील, प्रतापराव पाटील, धनंजय कोरटकर, मनोज पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, अमरदीप काळकुटे, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, तानाजी नाईक, शिवाजीराव शिंदे, रवींद्र जगदाळे, आबासाहेब शिंगाडे, सुभाष काळे उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे तर आभार उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी मानले. 

-----------------------------------
चांगला दर देणाऱ्या कारखान्यांना ऊस देणेसाठी शेतकरी थांबतात, असा अनुभव आहे. त्यामुळे ऊसाला चांगला दर मिळणेसाठी शेतकऱ्यांनी ऊस तोडणीची घाई करू नये. शेतकऱ्यांचा एक टिपरू ऊस गळापा आभावी शिल्लक राहणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही कारखान्याच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील यांनी यावेळी दिली.

-----------------------------------
नीरा भीमा कारखान्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे रु. 50 कोटी रक्कमेचे अल्पमुदत इथेनॉल कर्ज मे महिन्यात मागितले होते. त्यावेळी कारखान्याकडे रु. 17 कोटीची रक्कम ही शेतकऱ्यांची देय ऊस बिल देणेसाठी उपलब्ध झाली होती. त्यावेळी बँकेने सांगितले की रु. 17 कोटीची कर्जाची रक्कम भरल्यास कारखान्याला रु. 50 कोटीचे सदरचे कर्ज देऊ. त्यानुसार कारखान्याने रु.17 कोटीची रक्कम बँकेकडे भरली. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांच्या शिफारशी होऊन बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कारखान्यास रु.50 कोटी ऐवजी रु. 40 कोटी कर्ज मंजूर करण्यात आले. मात्र त्यानंतर बँकेने कारखान्यास कर्ज रक्कम देणेसाठी टाळाटाळ सुरू केली. त्यावेळी ज्येष्ठ नेते मा.शरदचंद्र पवारसाहेब यांनीही बँकेस फोन करून मंजूर कर्ज रक्कम कारखान्यास द्यावी, असा फोन केला. तसेच मीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्यक्ष भेटून मंजूर कर्ज देणे बाबत अनेकदा बोललो. तरीही कारखान्यास मंजूर कर्ज रक्कम देण्यात आली नाही. नंतर तब्बल दोन महिन्यांनी कारखान्याला पत्र पाठवून कर्ज देता येणार नाही असे कागदोपत्री कळविण्यात आले. याचवेळी निरा भीमा कारखान्यास कर्ज न देता जिल्ह्यातील इतर कारखान्यांना मात्र कर्ज देण्यात आले. जर कारखान्यास कर्ज देणार नव्हते तर रु. 17 कोटी रक्कम बँकेकडे भरणेऐवजी आम्ही शेतकऱ्यांची ऊस बिले त्यामधून दिली असती. जिल्हा बँकेकडून नीरा भीमा कारखान्याला कर्ज देणेबाबत अडवणूक करण्यात आल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...