मुख्य सामग्रीवर वगळा

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याच्या माध्यमातून सहकार टिकवण्याचा देशातील पहिलाच उपक्रम - हर्षवर्धन पाटील


ओंकार शुगरचा सहयोग
•बोत्रे-पाटील यांच्या उपस्थितीत गळीत हंगाम शुभारंभ 
इंदापूर : प्रतिनिधी दि.3/11/25
                कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना ही आपली सर्वांची मातृसंस्था आहे, या संस्थेमुळेच इंदापूर तालुका सर्वांगीण क्षेत्रात अग्रेसर राहिला आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याच्या माध्यमातून व ओंकार शुगरचा सहयोगातून सहकार टिकविण्याचा हा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या सहयोगाच्या माध्यमातून सहकारातील शेतकरी, कामगार टिकवण्याचे काम होणार असून, शेतकऱ्यांच्या सर्व उसाचे वेळेवर गाळप व उच्चांकी भाव देणेसाठी आंम्ही कटिबद्ध राहू, अशी ग्वाही राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सॊमवारी (दि. 3) दिली.
       महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि., सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टीलरी पॉवर प्रा.लि. चा सन 2025-26 च्या
36 व्या हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगामाचा शुभारंभ हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील, रेखाताई बोत्रे पाटील उपस्थित होत्या.
        हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, कर्मयोगी शंकररावजी पाटील व ओंकार शुगरचा सहयोग (कोलाब्रेशन ) सहकाराच्या सेक्शन 20 नुसार सहकार टिकवण्यासाठीचा पहिलाच नावीन्यपूर्ण प्रयोग आहे. त्यामुळे शंकररावजी पाटील कारखाना हा सहकारी राहणार आहे. सहकारातील कर्तव्ये, जबाबदाऱ्या कायम राहणार आहेत. ओंकार उद्योग समूहाचे प्रमुख बाबुराव धोत्रे पाटील यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. कष्टाने, प्रामाणिकपणे त्यांनी शेतकऱ्यांसाठी कारखानदारी चालवली आहे. 
       ते पुढे म्हणाले, चालू गळीत हंगामामध्ये कारखान्याकडे 32 हजार एकर ऊसाची नोंद झालेली आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना आपली मातृसंस्था आहे. श्रद्धेय शंकररावजी पाटील उर्फ भाऊंनी उभारलेल्या या मातृसंस्थेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे गेली 35 वर्षे संसार प्रपंच यशस्वीरित्या मार्गी लागले आहेत. त्यातून शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती झाली आहे. त्यामुळे कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्यास गत वैभव प्राप्त करून देणेसाठी आपण सर्वांनी एकत्रित मिळून काम करू या. 
      केंद्र सरकारने इथेनॉलचे आगामी हंगामासाठी 1050 कोटी लि.चे टेंडर काढले आहे. त्यामध्ये तब्बल 650 कोटी लि. इथेनॉल कोटा हा साखर उद्योगासाठी दिलेला आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. तसेच साखरेच्या किमान विक्री दरात दरात वाढ करावी, असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. शेतकऱ्यांनी ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर करून कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पन्न घेणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कर्मयोगी कारखान्याला गळीतास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन ही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.
     ओंकार शुगर समूहाचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील भाषणात म्हणाले, आज पर्यंत साखर कारखाने हे भाडेतत्त्वावर किंवा लिजवर घेतले जात होते. परंतु कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याशी सहयोगी तत्वाचे हे रोल मॉडेल महाराष्ट्रातील नवे तर भारतातील पहिलाच यशस्वी प्रयोग आहे. हे रोड मॉडेल सहकार क्षेत्रासाठी नवसंजीवनी ठरणार आहे. 
      मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. ओंकार शुगर ग्रुपच्या माध्यमातून दररोज 1 लाख 5 हजार मे. टन उसाचे गाळप, आसवानी प्रकल्पातून 20 लाख केपीएल उत्पादन, को-जन प्रकल्पातून 240 मे.वॅट वीज निर्मिती केली जात आहे, तर 8 लाख शेतकरी संबंधित आहेत. शेतकऱ्यांच्या उसाचे 15 दिवसात पेमेंट, ऊस वाहतूकदारांचे व कर्मचाऱ्यांचे प्रत्येक महिन्याला पेमेंट हे ओंकार शुगर ग्रुपचे ब्रीदवाक्य आहे, असे बाबुराव बोत्रे पाटील यांनी भाषणात नमूद केले.
      प्रास्ताविक जितेंद्र माने यांनी केले. याप्रसंगी सत्यनारायण पूजा कारखान्याचे संचालक सतीश व्यवहारे व अलका व्यवहारे या या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, संचालक मंडळ, ऊस तोडणी वाहतूकदार तसेच कार्यकारी संचालक विजयसिंह शिर्के, जनरल मॅनेजर रणजीत तावरे, अधिकारी, कर्मचारी व सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन भोसले तर आभार संचालक भूषण काळे यांनी मानले.

------------------------------------
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टीलरी पॉवर प्रा.लि. ऊस देऊन शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. चालू हंगामामध्ये 14 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केल्यास शेतकऱ्यांच्या ऊसाला पुणे जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर देऊ, असे ओंकार शुगरचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी नमूद करताच शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...