मुख्य सामग्रीवर वगळा

सामाजिक समतोल राखत, सर्वांना बरोबर घेतल्याने गाव विकासामध्ये अग्रभागी-हर्षवर्धन पाटील•


इंदापूर : प्रतिनिधी दि.25/8/25
                           सर्वसामान्य नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व राहण्यासाठी घर महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने घरकुल योजनेचा सर्व्हे केल्याने बावडा ग्रामपंचायतीचा जिल्हामध्ये गौरव झाला आहे. आता नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे बावडा ग्रामस्थांनी आगामी 50 वर्षे पिण्याच्या पाण्याची काळजी करू नये. सामाजिक समतोल राखत, सर्वांना बरोबर घेऊन काम केल्याने विकास कामांमध्ये गाव अग्रभागी राहिले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे रविवारी (दि. 24) केले.
          बावडा ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजने (रु. 12. 05 कोटी) च्या 4 ठिकाणी बांधावयाच्या उंच साठवण टाक्यांचे भूमिपूजन, शॉपिंग सेंटर उभारणी व ग्रामसचिवालसमोर प्लेविंग ब्लॉक (रु. 25 लाख) टाकणे आदी कामांचे भूमिपूजन तसेच लोकनेते शहाजीराव (बापू) पाटील प्रवेशद्वार (गाव वेस ) चे लोकार्पण हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव घोगरे होते.
        हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत गावासाठी प्रथमतः 6 कोटीची योजना प्रस्तावित होती. मात्र पुढील 50 वर्षांचा विचार करता सदर योजनेत भीमा नदीवरून नवीन स्वतंत्र पाईपलाईन टाकून गावामध्ये 1) रत्नप्रभादेवीनगर 2) घोगरेवस्ती 3)बारावाफाटा, 4) बागलफाटा येथे उंच साठवण पाणी टाक्या उभारण्यात येणार आहेत. या पाणी साठवण टाक्यांची आज आपण भूमिपूजन केले आहेत. गावासाठी रु. 12 कोटी 5 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ मंजुरी दिली आहे.
      गावामध्ये आता 441 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यातील काहींना आज प्रातिनिधीक स्वरूपात आपण प्रमाणपत्रे वाटप केलेले आहे. नुकताच गावामध्ये नव्याने घरकुलांसाठी सर्व्हे करण्यात आला असून त्यामध्ये 1786 लाभार्थीं कुटुंबाचा सर्व्हे झाला आहे, यांना आगामी काळात घरकुल मिळतील. तसेच गावामध्ये सन 2001 ते 2011 पर्यंतच्या अतिक्रमण जागेतील 954 कुटुंबांची घरकुले त्यांच्या नावावर होणार आहेत. तसेच गावामध्ये तरुणांसाठी हायस्कूल वर 400 मीटरचा ट्रॅक बनवण्यात येईल, तसेच अत्याधुनिक जिम उभारण्यात येईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. राजकारणामध्ये केवळ राजकारणासाठी विरोध करणे, व्यक्तीद्वेष करणे अशी आपल्या गावाची संस्कृती नसल्याचे त्यांनी सांगितले. मी बावडेकर आहोत, याचा मला रास्त अभिमान असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
   यावेळी बोलताना अशोकराव घोगरे यांनी सांगितले की, नेत्याला विकासाची दूरदृष्टी असावी लागते, त्या दृष्टितूनच हर्षवर्धन पाटील यांनी गावासाठी 12 कोटी 5 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आहे. गावामध्ये 32 पर्यंत दलित वस्त्या वाढविल्याने विकास कामे झाल्याचे त्यांनी सांगितले.
      यावेळी बोलताना निरा भीमा कारखान्याचे माजी संचालक उदयसिंह पाटील यांनी सांगितले की, प्रधानमंत्री घरकुल योजनेचा आपण शिक्षकांची मदत घेऊन शिस्तबद्ध सर्व्हे केल्याने आता त्यामध्ये नव्याने सुमारे 1786 कुटुंबाचा सर्व्हे झाला आहे, त्यामुळे या कुटुंबांना आगामी काळात एकूण सुमारे 35 ते 36 कोटी रुपये निधी मिळेल.
        यावेळी बावडा गावातील हनुमान मंदिरासमोर हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांनी सुमारे 17 लाख रुपये खर्चून बांधलेल्या लोकनेते शहाजीराव (बापू) पाटील प्रवेशद्वार (गाव वेस ) चे उद्घाटनही हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच रणजित घोगरे यांनी केले. यावेळी समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे, सरपंच पल्लवी गिरमे, जल जीवन मिशनचे अभियंता सुधीर गोरे यांची भाषणे झाली. 
 यावेळी पाण्याच्या टाकीसाठी मोफत जागा दिलेबद्दल हर्षवर्धन पाटील यांचे सह माऊली घोगरे, रणजीत गिरमे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
        यावेळी मनोज पाटील, माजी सरपंच किरण पाटील, अँड.अनिल पाटील, अमरसिंह पाटील, हरिभाऊ बागल, संतोष पाटील, विकास पाटील, प्रसाद पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, रणधीर पाटील, सुधीर पाटील, विजय घोगरे, मिलिंद पाटील, नामदेव घोगरे, विजय जगताप, इन्नूस मुलाणी, शिवाजीराव पवार, भगवान पांढरे, समीर मुलाणी, पवनराजे घोगरे, लक्ष्मण घोगरे, बाजीराव घोगरे, मुनीर आतार, संपत चव्हाण, विठ्ठल घोगरे, बलभीम घोगरे, तानाजीराव गायकवाड, रणजित गिरमे, संतोष सूर्यवंशी, काशिनाथ गायकवाड, अमोल घोगरे, स्वप्नील घोगरे, दादा कांबळे, धनंजय राऊत, मंगेश कांबळे, महादेव शिंदे, वसंत शेंडगे, दिलीप नायकुडे, ग्रामविकास अधिकारी अंबिका पावसे आदींसह ग्रा.पं. सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कालिदास आवाड यांनी केले. 
जल जीवन मिशनची रु. 12. 05 कोटीची योजना
 - हर्षवर्धन पाटील 
--------------------------------
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची बंगल्यावरती भेट घेऊन बावडा गावासाठी जल जीवन मिशनची रु. 6 कोटी ऐवजी रु. 12. 05 कोटी निधीची योजना मंजूर करून घेतली आहे. राज्यात 20 वर्षे कॅबिनेटमध्ये म्हणून काम करताना आपण राजकारण न करता सर्वांना मोठी मदत केली आहे. त्यामुळे गावच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

--------------------------------
बावडा गावची लोकसंख्या वाढत असल्याने कायदा सुव्यवस्था चांगली राहणे आवश्यक आहे. त्यासाठी बावडा येथे सध्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशन इमारत उभारणीचा प्रस्ताव असून, जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून सदरचा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. यासंदर्भात गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन 4 कोटी रुपयांच्या पोलीस स्टेशन इमारतीचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल. माळेगाव पोलीस स्टेशन प्रमाणे सदरची इमारत होईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते