मुख्य सामग्रीवर वगळा

वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना पण हे आश्वासन हवेतच विरले,

इंदापूर:-
वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या, वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावर पुन्हा मेघडंबरीसह समाधी उभारण्यात यावी अशी सूचना प्रशासनाला दिल्याचे असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भ्रमणध्वनीवरून दिली. 
त्यानंतर आ. गोपीचंद पडळकर, सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गलांडवाडी पाटीवर तब्बल अडीच तास केलेले रास्ता रोको आंदोलन सकल हिंदू समाजाने स्थगित केले. वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमण काढण्यात यावीत या मागणीसाठी व महामार्गाचे रुंदीकरण, उड्डाणपूलाच्या बांधकामामुळे वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळाच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आ.गोपीचंद पडळकर, सागर बेग व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महामार्गावरील गलांडवाडी पाटी येथे आज सकाळी साडेअकरा वाजता रास्ता रोको करण्यात आला. पडळकर म्हणाले, विशाळगड, प्रतापगड गडाच्या धर्तीवर वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील सर्वच्या सर्व अतिक्रमण काढली जावीत. वीरश्री सरदार मालोजी राजे भोसले यांच्या गढीच्या संवर्धनाचा आराखडा कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना दाखवणे आवश्यक होते. हजरत चाँदशाहवली यांचा दर्गा वेगळा ठेवण्यात यावा. मालोजीराजे भोसले यांची गढी व दर्गा यामध्ये भिंत बांधण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. पुणे जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी शासकीय जागांवर बांधण्यात आलेले बेकायदेशीर दर्गाह तोडण्यात यावेत अशी मागणी ही त्यांनी केली.दरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांशी झालेल्या चर्चेनुसार, गढीच्या परिसराची मोजणी करुन सीमांकन व हद्द निश्चित होत नाही. तोपर्यंत त्या ठिकाणच्या दुरुस्ती व सुशोभकरणाचे कामकाज थांबवण्याची सूचना संबंधित यंत्रणेस दिली आहे. दि.२९ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी गढीची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. तेथे मागण्यांच्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाही करणयाबाबत चर्चा केली जाईल, असे पत्र तहसीलदार जीवन बनसोडे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.पण आज अनेक दिवस लोटले पण यावर ना कारवाई झाली, नाही किंवा कोणताच निर्णय घेण्यात आला नाही, आपण छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या नावावर मताचा जोगवा मागत फिरतो, निवडणूक आली की मालोजीराजे यांची गढीवरील विषय, विविधविकास आठवतो, आणि निवडणूक झाली की, त्याचा विसर पडतो, आपण छत्रपतींच्या महाराष्ट्रात रहातो याचे कमीत कमी भान ठेवून राजकारण करा, काय चाललंय राव. आशी सामान्य जनतेत चर्चा आहे, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते