मुख्य सामग्रीवर वगळा

निरा भिमा कारखाना 6 लाख मे. टन ऊस गाळप करणार -भाग्यश्री पाटील

 कारखान्याचे मिल रोलरचे पूजन उत्साहात
इंदापूर : प्रतिनिधी दि. 27/7/25
                           शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी ऊस गळीत हंगाम सन 2025-26 साठी बसविण्यात येणाऱ्या मिल रोलरचे पूजन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि. 27) करण्यात आले.
          नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना आगामी 25 व्या गळीत हंगामामध्ये 6 लाख मे. टन ऊसाचे गाळप करणार आहे. सदरचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी दिली.
         सध्या आगामी गळीत हंगामासाठी कारखान्यातील मशिनरीची कामे प्रगतीपथावर आहेत. आगामी गळीत हंगाम हा शासनाच्या धोरणानुसार वेळेवरती चालू होईल, याचे काटेकोर नियोजन करण्यात आलेले आहे. नीरा भीमा कारखान्याने गेली 24 वर्षात शेतकऱ्यांना नेहमीच चांगला दर दिलेला आहे. निरा भिमा ही शेतकऱ्यांच्या हिताची जोपासना करणारी संस्था आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामात शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी केले.
          चालू वर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने ऊस लागणी मोठ्या प्रमाणात चालू आहेत. शेतकऱ्यांनी निरा भिमा कारखान्याकडे ऊस नोंद देऊन सहकार्य करावे, असे प्रतिपादनही भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.
  नीरा भीमा कारखान्याची प्रतिदिनी सुमारे 6500 मे. टन ऊस गाळप क्षमतेची ऊस तोडणी, वाहतुक यंत्रणा पुर्णपणे सज्ज झाली आहे. आगामी गळीत हंगामामध्ये 6 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पुर्ण करणेसाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे व सहकार्य करावे, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे उपस्थित होते. प्रारंभी कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ यांनी स्वागत केले.

-------------------------------------------
ऊस पिकामध्ये ए. आय. ( कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापराने ऊस उत्पादनामध्ये मोठी वाढ, खत व पाणी बचत तसेच एकूण उत्पादन खर्चात बचत होऊन संभाव्य किडी-रोग व इतर माहिती शेतकऱ्यांना मोबाईलवरती मिळणार आहे. त्यामुळे निरा भिमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांच्या शेतात ऊस पिकामध्ये ए. आय. ( कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष भाग्यश्री पाटील यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते