मुख्य सामग्रीवर वगळा

*साखरे वस्ती शाळेच्या प्रांगणात रंगले नवागतांचे स्वागत*

इंदापूर:- प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व मुलांचे औक्षण करून सौ अनिताताई खरात यांनी नवगतांचे स्वागत केले . तसेच मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्ष लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्या. श्री काकासाहेब जाधव यांनी केले. यावेळी अनिताताई खरात म्हणाल्या की जिल्हा परिषद शाळा या सध्या अतिशय उत्कृष्ट मूल घडवत आहेत आणि पालकांनी आपली मुलं जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळेत पाठवावीत तसेच प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील पालकांनी आपली शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष द्यावे शिक्षकांनीही काही अडचण आली तरी आम्हाला केव्हाही सांगावे आम्ही त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करू परंतु मुलांच्या शिक्षणात कोणती हि काटकसर नको आज सर्वात जास्त अधिकारी जिल्हा परिषद शाळेत शिकून आलेले आहेत. जे अधिकारी बाहेर जिल्हा परिषद शाळेतून शिकून गेले त्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा कडे लक्ष द्यावे त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत कारण आपला पाया हा जिल्हा परिषद शाळेपासूनच भक्कम झाला आहे याचा विसर त्यांनी पडू देऊ नये.तसेच साखरे वस्ती शाळेच्या मुख्याध्यापक जाधव गुरुजी व मल्लिकार्जुन वच्छे गुरुजी यांचे त्यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष गणेश साखरे, मारुती भाळे शाळेचे मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका व शिक्षक स्टाप उपस्थित होता, शेवटी आभार प्रदर्शन शाळेचे उपक्रमशील शिक्षक मल्लिकार्जुन वचे गुरुजी यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते

नीरा-भीमा कारखान्यावरती संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व कारखान्याची स्थापनेपासूनची सलग 5 वी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध -सर्व 21 जागा बिनविरोध

इंदापूर :प्रतिनिधी दि.13/3/2025                         शहाजीनगर(ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 ते 2030-31 या कालावधीच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग 5 व्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे. या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या 25 वर्षात सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि.13) सर्व 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.           माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांनी सन 1999 मध्ये नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यानंतर संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका बिनविरोध होत आहेत.          नीरा-भीमा कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत गेल्या 25 वर्षांमध्ये शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केलेला आहे . तसेच सध्...