मुख्य सामग्रीवर वगळा

*प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न*

 इंदापूर सोनाई परिवाराचे संचालक, पुणे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती, इंदापूर तालुक्यातील तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेले युवा नेतृत्व श्री प्रविण दशरथ माने यांचा मंगळवार दिनांक १७ जून रोजी वाढदिवस पार पडला.
आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या युवा नेते प्रविण माने यांच्या वाढदिवसाची संपूर्ण तालुक्याभर चर्चा घडली. या चर्चेमागचे मूळ कारण म्हणजे तालुक्यातील गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय उपयोगी वस्तूंसाठीचा मदतीचा हात होय.
प्रविण माने युवा मंचच्या माध्यमातून प्रविण माने यांच्या समर्थक व मित्रपरिवारांच्या वतीने माने यांची तुला करण्यात आली असून त्यांच्या वजना एवढे शालेय साहित्याचे तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांमध्ये वितरण करण्यात येणार आहे. 
समाजहिताचा विचार करून सातत्याने आपल्या कृतीतून समाजासाठी धडपडणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा आशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने केलेला सन्मान व त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने देण्यात आलेल्या शुभेच्छा हे नक्कीच त्यांच्या कार्याचे एक प्रकारे कौतुकच करण्यात आले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे ही प्रविण माने यांची तालुक्यासाठी जी विशेष ओळख असून, त्यांच्या या कृतीतूनच संपूर्ण इंदापूर तालुक्यातील मित्रपरिवार त्यांच्याशी जोडला गेला असल्याचे मत त्यांच्याच एका सहकाऱ्यांनी आमच्या पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.
आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला येताना कुणीही हार, पुष्पगुच्छ व इतर कुठलीही भेटवस्तू न आणता, शालेयवस्तू आणाव्यात असे आवाहन प्रविण माने यांच्यावतीने करण्यात आले होते, त्यानुसार नागरीकांनी या उपक्रमात सहभागी होत, शालेय वस्तूंनी पूर्ण मंडप भरवल्याचे दृश्य श्री माने यांच्या निवासस्थानी निर्माण झाले होते.
याचसह प्रविण माने यांच्या वाढदिवसानिमित्त रुई येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल ४५० हून अधिक रक्त पिशव्यांचे संकलन झाले आहे. तसेच माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या काही दिवसात इंदापूर, पळसदेव, रेडणी या ठिकाणी रक्तदान शिबीर पार पडणार असून दरवर्षी या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवत प्रविण माने यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत असतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते

नीरा-भीमा कारखान्यावरती संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व कारखान्याची स्थापनेपासूनची सलग 5 वी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध -सर्व 21 जागा बिनविरोध

इंदापूर :प्रतिनिधी दि.13/3/2025                         शहाजीनगर(ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 ते 2030-31 या कालावधीच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग 5 व्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे. या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या 25 वर्षात सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि.13) सर्व 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.           माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांनी सन 1999 मध्ये नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यानंतर संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका बिनविरोध होत आहेत.          नीरा-भीमा कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत गेल्या 25 वर्षांमध्ये शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केलेला आहे . तसेच सध्...